शनिवार, १ नोव्हेंबर, २०२५

" विचार शृंखला :108 : 01112025 "

विचार शृंखला :108 : 01112025

 109)  एक काळ असा होता की, आपल्या आई-वडिलांचा केंद्राबिंदू आपणच होतो. अपत्यसंगोपन हा त्यांचा विसावा, छंद आणि ध्येय होतं. आपलं मूल आपल्याला दुरावेल का?- हा प्रश्न त्यांना कधी पडला नाही. आपल्या मुलांसाठी आज आपण वेळ देत आहोत का? मुलांपलीकडे आपल्या आनंदाच्या जागा कोणत्या आहेत? त्यांचे आणि आपले आनंद एकच आहेत का? आईबाप म्हणून आपण त्यांचा विश्वास कमावला आहे का? तसं नसेल, तर ते अस्थिर आहेत. अस्थिर माणसं जशी बारमध्ये सापडतात तशी सिद्धिविनायकाच्या रांगेतही. अर्थहीन श्रद्धाही व्यसनासारखीच. जित्याजागत्या माणसांशी संवाद संपला की हे तकलादू आधार शोधावे लागतात. "

वपूर्झा/सुरेंद्र/01112025

                                                            

शुक्रवार, ३१ ऑक्टोबर, २०२५

विचार शृंखला :107 : 31102025

विचार शृंखला :107 : 31102025

 107)  माणसांनी आपलं आयुष्य इतकं धावपळीच, दगदगीच आणि म्हणूनच अत्यंत वरवरचं का करून घेतलं आहे? आशा-निराशा, साफल्य- वैफल्य, सुख-दुःख, मिलन-विरह, हे सगळेच घाव ही माणसं कातडीवरच्या तिळासारखी वागवतात. कातडीवर तीळ असला काय आणि नसला काय? काय अडतं? ही माणसं अशीच. हयांना साय हवी, दूध तापवण्याचा खटाटोप नको. सुगंध हवा, पण रोपट्याची मशागत करण्याची खटपट नको. मुलं हवीत, पण संगोपनाची यातयात नको. गती हवी, प्रगती नको. प्रसिद्धी हवी, सिद्धी नको. ही माणसं आयुष्य काढतात, जगत नाहीत. चालणारा माणूसच फक्त पायाखाली किडा-मुंगीची हत्या होतं नाही ना हे बघतो. धावणारा माणूस फक्त तुडवण्याचं काम करीत धावतो. " 

वपूर्झा/सुरेंद्र/31102025

                                                            

गुरुवार, ३० ऑक्टोबर, २०२५

विचार शृंखला :106 : 30102025

विचार शृंखला :106 : 30102025

 106)  राजकारण, संप, बंद, हिंसा, भ्रष्टाचार, संघटना, टीव्ही, व्हिडीओ, पार्ट्या, ट्रीप्स हे सगळे संवाद तोडणारे शोध. गप्पा म्हणजे संवाद नव्हे. संवादाच नातं विचारांशी. निराशेने ग्रासलेल्या ह्या देशाला ठणठणीत विचारच सावरू शकेल. आपण आपल्या मुलांना बुद्धिनिष्ठ व्हायला शिकवता का? विचारांवर प्रेम करायला शिकवतात का? यश म्हणजे तरी काय? शिक्षणातून जे मिळत नाही, ते संस्कारातून द्याल का? ग्रंथांशी मैत्री म्हणजे विचारांची आराधना. निर्भेळ विचार म्हणजे आत्मविश्वास. बुद्धीची उपासना हीच भक्ती. भक्तीने कृती हीच संस्कृती. रोज प्रत्येकाने स्वतःला एकच प्रश्न विचारावा. माझ्या घरात माझा सगळ्यांशी संवाद आहे का/ वपूर्झा/सुरेंद्र/30102025

                                                            

मंगळवार, २८ ऑक्टोबर, २०२५

विचार शृंखला :103/104/105 : 28102025

विचार शृंखला :103/104/105 : 28102025

 103)   "  बेदम पैसा मिळवणं ह्याचाईतकं         मिडीऑकर ध्येय दुसरं असू शकत नाही. माणसं जोडायला त्यापेक्षा जास्त बळ लागतं. "

104)  "  स्पर्श न करताही आधार देता येतो हे ज्याला कळतं त्यालाच " पालक " शब्द समजला. "

105 )   "  माणसाने फक्त घरातल्यांना सांभाळावं. ठराविक मर्यादेपलीकडे समाजाला स्वतःच्या आयुष्यात किती डोकावू द्यायचं, हे ठरवायला हवं, आणि ते मात्र लवकर ठरवावं. आपण घेतलेले निर्णय अमलात आणण्यासाठी आयुष्य उरलेलं असतानाच काही संकल्प सोडायचे असतात. " 

वपूर्झा/सुरेंद्र/28102025

                                                            

शनिवार, २५ ऑक्टोबर, २०२५

विचार शृंखला:99/100/101/102 : 25102025

विचार शृंखला : 99/100/101/102 : 25102025

  99)   " रातकिडा कर्कश ओरडतो, त्या ओरडण्याचा त्रास होतो ह्यात शंकाच नाही, पण त्यापेक्षा जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतोय ह्याचा पत्ता लागतं नाही, त्याचा होतो. " 

100)  "   शत्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो. त्यातून तो बरा झाला की शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो. "

101 )   "   दूध अचानकपणे, म्हणजे आपण तंद्रित असतांना, वेगाने वर काठापर्यंत येतं. चिमटा शोधायला वेळ नसतो. अशा वेळेला पाण्याचा शिडकावा करून ते तिथल्या तिथे शांत करायचं असतं. थांबवायचं असतं. मग सावकाश चिमटा शोधावा. उसंत घेऊन ते खाली उतरवावं. तसंच काहीसं..... अनेक समस्याचं......

102) ज्या माणसाला भूकच नाही, अन्नावर वासनाच नाही, त्याला पांगतिमधलं कोणतंही पान चालतं. "

वपूर्झा/सुरेंद्र/25102025

                                                            

शुक्रवार, २४ ऑक्टोबर, २०२५

" विचार शृंखला :96/97/98 : 24102025 "

" विचार शृंखला :96/97/98 : 24102025

96)      "   कोणतेही समर्थन मूळ दुःखाची हाकालपट्टी करू शकत नाही. वर पट्टी बांधायची ती जखम झाकण्यासाठी. आत जखम आहे ती ज्याची त्याला ठसठसत असतेच. "

97)    "   रिटायर होणाऱ्या म्हाताऱ्यांचं नेमक दुःख कोणतं? रिटायर झालो की पगार नाही, उद्योग नाही, ह्या विचारांपेक्षाही आपल्या गैरहजेरीने ऑफिस बंद पडणारं नाही, हे दुःख फार मोठ असतं. आपल्यावाचून कुणाचतरी अडतं ही भावना फार सौख्यदायक असते. "

98)       "  दुसऱ्याच्या पगाराची, मिळकतीची चौकशी करणं हे अत्यन्त संस्कारहीन आहे, असंस्कृतपणाचे लक्षण आहे. त्याच प्रमाणे  ' तुम्हाला आता काय कमी आहे? ' असंही फाडकन कुणाला विचारू नये. ज्यांना काहीच कमी नसतं त्यांना खर्चही कमी नसतात. "      

वपूर्झा/सुरेंद्र/24102025

                                                            

गुरुवार, २३ ऑक्टोबर, २०२५

" विचार शृंखला :92/83/94/95:23102025 "

" विचार शृंखला : 92/83/94/95 : 23102025

92)      "   दुःख आणि डोंगर ह्याच्यात साम्य असतं. लांब अंतरावरून दोन्ही गोजिरे दिसतात. एका डोंगराला पार करावं तर त्याच्या मागे दुसरा डोंगर असतोच. तसच दुःखाचं. जवळ गेलं की ह्या दोन्ही गीष्टी पार करता येणार नाहीत, असं वाटतं. त्यांचं रौद्र रूप लांब गेलं की गोजिरवाण होतं. "

93)    "   आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं, आपला उत्कर्ष होतोय. "

94)       "  दुबळ्या माणसाला सदिच्छा व्यक्त करण्याचा अधिकारच नसतो. "

95)       " बालपण जसं परावलंबी असतं तसंच वर्धक्यही. स्वतःच्या मतांचा मागोवा आणि पाठपुरावा करण्याचा अधिकार तरुण्यातच अनुभवता- उपभोगता येतो. " 

वपूर्झा/सुरेंद्र/23102025

                                                            

बुधवार, २२ ऑक्टोबर, २०२५

" विचार शृंखला :89/90/91 : 22102025 "

" विचार शृंखला :89/90/91 : 22102025

89)      "   दारिद्र अनेक प्रकारचं असतं. मानसिक, नैतिक, आर्थिक... इट इस अँन  एन्डलेंस अफेयर. स्वतःच्या धर्माबरोबरच एक राष्ट्रीय धर्म असतो. त्या धर्माची आठवण समाज्यातल्या प्रेत्येक घटकाला होणं जरुरीच असतं. तो चमत्कार जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत हा देश असाच राहणार. "

90)       "   संसार या शब्दाबरोबरच संघर्ष हा आलाच. संघर्ष नेहमी दुसऱ्या माणसाबरोबरच असतो, असं नाही. नको वाटणारा निर्णय घेण्याची पाळी स्वतःवरच आली की, स्वतःशीच संघर्ष सुरु होतो. संसारात या संघर्षाचं खापर फोडण्यासाठी जोडीदार मिळतो इतकंच. पण, असे हे संभाव्य संघर्ष कुणामुळेही निर्माण झाले तरी, एकमेकांना ' गुड- नाईट ' म्हणण्यापूर्वी त्या दिवसाचे संघर्ष त्याच दिवशी संपवायचे असतात. "

91)       "  शृंगार आणि वैराग्य एकत्र नांदत नाहीतर, त्याच प्रमाणे संशय आणि भक्ती. वैराग्य केवळ तारुण्यावर आघात करीत असेल, पण संशय उभ्या आयुष्याची राख करतो. आयुष्यातले आनंदाचे अनेक क्षण, उपेक्षेचे हुंदके, दुःखाचे कढ आणि आवर घातलेले आवेग- हे ज्याचे त्यालाच माहीत असतात. "

वपूर्झा/सुरेंद्र/22102025

                                                            

मंगळवार, २१ ऑक्टोबर, २०२५

" विचार शृंखला :86/87/88 : 21102025 "

" विचार शृंखला :86/87/88 : 21102025

86)      "   अभिरुचीसंपन्न नवरा मिळावा, अशी काही ऐकूणएक स्त्रियांची मागणी नसेन. त्यांनाही आपल्या मर्यादा माहीत असतात. पण to किमान माणूस तरी असावा, ही अपेक्षा गैर आहे का? असे किती संसार ध्येय-माणुसकीशून्य पुरुषांपाईवाया गेले असतील? किती संसार? किती घरं? जो सर्वसाधारण का होईना, पतीसुद्धा होऊ शकत नाही, तो आदर्श बाप तरी कसा होईल? ".                                                  87)    "   न मावणार दुःख नेहमीच जीवघेण असतं. कारण तुमचा जीवच तेव्हा दुःखापेक्षा लहान झालेला असतो. तेव्हा माणसाने नेहमीच दुःखापेक्षा मोठ व्हायचं ध्येय ठेवावं. दुःख मावल्यावर भांड्यात वर रिकामी जागा राहील इतकं मोठ व्हावं. अर्थात हे झालं स्वतःच्या बाबतीत. आपल्याला होणाऱ्या   यातनांसाठी मोठ भांड वापरायचं पण इतरांच्या संदर्भात एका अश्रूनेही भांड ओसंडून जाईल इतकं छोटं ठेवायचं. "                                                88)    "  सर्वात जीवघेणा क्षण कोणता? खूप श्रद्धाभावनेने एखादी शुभ गोष्ट करायला जावं आणि स्वतःचा काहीही अपराध नसतांना पदरी फक्त वाईटपणाच यावा, सदहेतूचीच शंका घेतली जावी, हा ! "                                          वपूर्झा/सुरेंद्र/21102025

                                                            

सोमवार, २० ऑक्टोबर, २०२५

" विचार शृंखला :83/84/85 " : 20102025

" विचार शृंखला :83/84/85 " : 20102025

83)      "   पाच गुंडांचा तमाशा, आजूबाजूची पाच हजार माणसं शांतपणे सहन करतात. वास्तविक अशा माणसांचा काटा काढणं अवघड नाही. पण पोलिसांनीच ते काम केलं पाहिजे असं नाही. त्यासाठी शरीर कमवावं लागतं, फार बळ लागतं असंही नाही. फक्त धैर्य लागतं. रक्तात चीड असावी लागते. पण या समाजात ' पुरुषार्थ ' कुणालाच समजलेला नाही. पोलिस डिपार्टमेंट म्हणूनच टिकलंय. " 

84)       "  टाळ्या वाजवणारे खूप असतात. सर्कस बघायला येतात ते  फक्त तेवढ्यासाठी येतात. मृत्युच्या गोलात फटफटी फिरवणारा असतो. त्याला टाळ्यांचा आधार नाही वाचवत ! त्याच्याबरोबर जो दुसरा फटफटीवाला असतो तो सावरतो. "

85)       " बायको मग ती कुणाचीही असो, ती नवऱ्याचा संशय घेणारच. हा मी दोष मानत नाही. संशय हा नेहमी दृष्टीनेच घेतला जातो असं मी म्हणत नाही. त्याचा प्रेमाशीच संबंध असतो. आपल्या नवऱ्याचं आपल्यावर प्रेम असावं ही भावना त्यामागे असते. महत्व त्याला नाही. तो संशय जेव्हा अतिरेकाने धुमाकूळ घालतो तेव्हा उबग येतो. ' अति सर्वत्र वर्जयेत ' म्हणतात तसं आहे. मर्यादेपलीकडे नवरा-बायकोनी एकमेकांवर प्रेम करणही वाईट असतं. "

वपूर्झा/सुरेंद्र/20102025

                                                            

रविवार, १९ ऑक्टोबर, २०२५

" विचार शृंखला : 81/82:19102025B "

विचार शृंखला : 81/82:19102025B

81)      "   नवरा अकाली गेला. वय वर्ष अट्टावीस हे मरणाचं वय नक्कीच नाही नवरा जाणं ही एक नैसर्गिक क्लायमेटी झाली. पण नंतर वर्षे न वर्ष समाजाने त्या बाईला तिच्या वैधव्याची जाणीव देत राहायचं, ह्या क्लायमेटीला काय अर्थ आहे? खरं तर समाजात जास्तीत जास्त प्रोटेक्शची गरज एकट्या पडलेल्या स्त्रियांना असते. समाजाने त्यांना कुशीत घ्यायला हवं. जेव्हा एखादी व्यक्ती संसार अर्ध्यावर टाकून जाते दोघांपैकी एका व्यक्तीच आयुष्य संपत, तर मागं उरतो त्याचा संसार संपतो. म्हणूनच जें सामाजिक, सांस्कृतिक म्हणा किंवा कौटुंबिक कार्यक्रम म्हणा, अशा मनोरंजनाच्या सोहळ्यांची गरज, जी दुर्दैवाने एकटी पडली आहे तिला जास्त आहे. "                                                    82)       "  प्रत्यक्ष कृती घडली की ती कशी घडली ह्याची कारण आपण शोधू लागतो. कधी स्वतःच्या समाधानासाठी. कधीसमर्थनासाठी. इतरांना सुचत नाही, असं नाही. ज्यांना नुसतंच सुचत ते फक्त आयुष्यभर ' मला हेच म्हणायचं होत ' असं म्हणत राहतात. सुचल्यावर जे त्याच्यावर चिंतन करतात पण कृती करत नाहीत ते सगळे फिलॉसॉफर्स. आणि जे कृती करतात ते संत. "                                                  वपूर्झा/सुरेंद्र/19102025B

                                                            

शनिवार, १८ ऑक्टोबर, २०२५

" विचार शृंखला : 79/80 : 19102025A "

" विचार शृंखला : 79/80 : 19102025A "

79)    "  माणसाची ग्यारंटी नाही म्हणून मी लग्न जमवण्याच्या भानगडीत पडत नाही. आपल्याला माहीत असलेला मुलगा किंवा मुलगी, नवरा आणि बायको ही दोन नाती वगळून एरवी कशी आहेत तेव्हढच माहीत असतं. आय. एस. आय. कंपनीचा शिक्का ज्यावर कधीही मारता येणार नाही असं  माणूस ' नावाचं एक और यंत्र आहे. " 80)     "  अत्यंत महागडी, न परवडणारी, खऱ्या अर्थानें ज्याची हानी भरून येतं नाही अशी गोष्ट किती उरली आहे, ह्याचा हिशोब नसतांना आपण जी वारेमाप उधळतो ती गोष्ट म्हणजे आयुष्य. ' मन रमवणे ' ह्या नावाखाली गपागोष्टी, दिवसचे दिवस पत्ते खेळण, मोबाईल अथवा कॉम्प्युटर वर गेम खेळण, पार्ट्या, सिनेमेच सिनेमे बघत सुटणे, निंदानालस्ती, गॉसिपिंग, शॉपिंग, बुद्धीला चालना न देणारी नटनटयांच्या भानगडीची साप्ताहिक वाचण आणि यापैकी काहीही नसेल तर दिवसाच्या दिवस लोळून काढणारे बहाद्दर असतात. "                                          वपूर्झा/सुरेंद्र/19102025

                                                            

" विचार शृंखला : 76/77/78 : 18102025 "

" विचार शृंखला : 76/77/78 : 18102025 "

76)      " माणसं माणसांना भेटतच नाहीत. वेगवेगळे हेतू एकमेकांसमोर येतात. सावल्या सावल्यांना भेटतात. म्हणूनच हेतूपूर्तता झाली की माणसं एकटी पडतात. दुसरा माणूस भेटला नाही तरी चालतं. फार कशाला, सगळेच हेतू संपले की स्वतःच्या आयुष्यातला आजचा दिवसही नको वाटतो. "                                                  77)     "  आपत्ती पण अशी यावी की, त्याचाही इतरांना हेवा वाटावा. व्यक्तीचा कस लागावा. पडून पडायचं तर ठेच लागून पडू नये. चांगलं दोन हजार फुटानवरून पडावं. माणूस किती उंचावर पोचला होता, हे तरी जगाला समजेल. "        78)    ".   सगळे वार परतवता येतात. अहंकारावर झालेला वार परतवता येतं नाही. आणि पचवताही येतं नाही. "                    वपूर्झा/सुरेंद्र/18102025

गुरुवार, १६ ऑक्टोबर, २०२५

" विचार शृंखला : 73/74/75 : 16102025 "

" विचार शृंखला : 73/74/75 : 16102025 "

73)      "   प्रामाणिकपणा ही शिकवण्याची बाब नव्हे. तो रक्तात असावा लागतो. त्यात टक्केवारी नसते. तो असतो किंवा नसतो. "                  74)       "   जी माणसं भावनाप्रधान असतात, त्यांच्या स्वाभिमानाला जर जबरदस्त धक्का लागला तर दोनपैकी एक काहीतरी होत. काही माणसं गप्प बसतात, मनातल्या मनात कुढतात, आणि निवृत्तीचा मार्ग  पत्करून सगळं आयुष्य एखाद्या बाभळीच्या झाडासारखं शुष्क घालवतात. हयाउलट काही माणसं चिडून उठतात. सारासार विचार गुंडाळून ठेवतात आणि मग सगळ्यांवर वांर करीत सुटतात. अशी माणसं एके काळी भावनाप्रधान होती, हे सांगून खरे वाटत नाही. "                                            75)       ' स्त्री ' जन्माला घालतांना परमेश्वराने तिला विचारलं, ' तुला बुद्धी हवी की सौदर्य? ' तेव्हा स्त्री म्हणाली, ' बुद्धीची गरज नाही, सौदर्य दे! ' ' का ', ' बुद्धीच्या सामर्थ्यावर सौदर्य मिळवता येतं नाही, पण  सौन्दर्याच्या जोरावर बुद्धी विकत घेता येते. "                                            वपूर्झा/सुरेंद्र/16102025

                                                            

मंगळवार, १४ ऑक्टोबर, २०२५

" विचार शृंखला : 70/71/72 : 14102025 "

" विचार शृंखला : 70/71/72 : 14102025 "

70)       "  आपण नक्की म्हातारे झालो, असं केव्हा समजावं? तर चमचमीत कांद्याची भजी खातांना जेव्हा खोकल्याची आठवण होते तेव्हा. उडी मारून रुळ ओलांडायची भीती वाटते तेव्हा! जागरण म्हणजे रक्तदाब किंवा पंगतीतलं पिवळ्याधमक केशरी जिलब्यांचं ताट म्हणजे मधुमेह असली  त्रैराशिकदिसायला लागतात तेव्हा, म्हातारपण आलं असं खुशाल समजावं. " 71 )      "    माणूस पैशाशिवाय जगू शकतो, अब्रू गेली तरी मजेत राहू शकतो. पण खुर्ची गेली की त्याची काय अवस्था होते हे पहायचं असेल तर कोणत्याही सेवानिवृत्त माणसाकडे पाहा. '72)       "   निसर्ग निरनिराळ्या वयाला निरनिराळ्या देणग्या देतो. बालपणात कुतूहलाची देणगी, किशोरवस्थेत सगळ्या जगावर खूष राहण्याची देणगी, तारुण्यात तर बहरच बहर! शृंगार, प्रेम, शरीराच आकर्षण ही देणगी. लग्नानंतर वात्सल्याची देणगी. ह्या सगळ्या देणग्यांवर आपण जगतो. "                    वपूर्झा/सुरेंद्र/14102025

                                                            

सोमवार, १३ ऑक्टोबर, २०२५

" विचार शृंखला : 67/68/69 : 13102025 "

" विचार शृंखला : 67/68/69 : 13102025 "

67)       "   प्रत्येक वेळेला रडणाऱ्याच सांत्वन करता येतच असं नाही. अर्थात रडणाऱ्याला त्याची जाणीव नसते. पण काही काही वेळेला रडणाऱ्या माणसापेक्षा सांत्वन करणाऱ्या माणसावरच जास्त ताण पडतो. जोतिपेक्षा समई जास्त तापत नाही का?

68)       "    सुखामागे माणूस पळतो. पळतांना पडतो, ठेचकाळतो. पस्तावून परततो. तो त्याचा परतण्याचा काळ म्हणजे खरा सोख्याचा काळ. नेमक्या त्या काळात त्याला साथ मिळत नाही. सावलीची वाण पडते. व्यथेला श्रोता मिळत नाही. त्याला कोणी जवळ करीत नाही. "

69)       "   खऱ्या भावना, खरी कृती, आणि निसर्गदत्त वृत्ती ह्या अडाणी, अप्रगल्भ माणसाला जेवढ्या समजतात, तेव्हड्या तुम्हा-आम्हाला समजत नाहीत. शिक्षण मिळवून आपण शब्दांना वाजवीपेक्षा जास्त तरी महत्व देतो, नाहीतर त्याला पूर्ण न्याय देऊ शकत नाही. अडाणी माणसं जें मनात येतं ते दाखवून मोकळी होतात. "

वपूर्झा/सुरेंद्र/13102025

                                                            

रविवार, १२ ऑक्टोबर, २०२५

" विचार शृंखला : 64/65/66 : 12102025 "

" विचार शृंखला : 64/65/66 : 12102025 "

64)    "   तुम्ही नुसते असून चालत नाही. ते गुण खळखळ न करता मान्य करणारा समाज तुमच्या भोवती जमण याला महत्व आहे. गुणी माणसाचं नाणं वाजणंच कठीण होऊन बसलंय. ".      65)    "    प्रॉब्लेम नसतात कुणाला? - ते शेवटपर्यंत असणारच. पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैंसा, तर कधी माणसं! या तीन गोष्टींच्या टप्प्यापलीकडचा प्रॉब्लेम अस्तित्वातच नसतो. "                                                  66)   "     भित्र्या माणसाला फसण्याची धास्ती नाही. अंगात धडाडी असणारी माणसंच वाव मिळेल तिथं उडी घेतात. काही उड्या जमतात. काही फसतात. उडी जमली किंवा फसली तरी दोन्ही  बाबतीत ती काही ना काही अनुभवाचं माप पदरात टाकून जातेच. त्याशिवाय मूळ  ईर्षा जोपासली जाते, ते निरळं! "                    वपूर्झा/सुरेंद्र/12102025

                                                            

शनिवार, ११ ऑक्टोबर, २०२५

" विचार शृंखला : 61/62/63 : 11102025 "






" विचार शृंखला : 61/62/63  : 11102025 "

61)       "    भांबावलेला माणूस अस्थिर असतो. अस्थिर माणसाची विचारशक्ती क्षीण बनते. क्षीण विचारांची माणसं एकत्र येतं नाहीत. माणसं एकत्रित नाहीत म्हणजे संघशक्ती नाही. संघशक्तीशिवाय आंदोलन अशक्य! "

62)       "     माणूस निराळा वागतोय, बिघडला - कामातून गेला, असं आपण पटकन एखाद्याबद्दल बोलतो. पण तसं नसतं. त्या सगळ्याचा अर्थ तो आपल्याला हवा तसा वागत नाही एव्हडाच असतो. "

63)       "      सुख, सुख म्हणजे तरी काय? समाधान मानून घेण्याची वृत्ती असलेला माणूस कधीच दुःखी होत नाही. स्वतःला सुखी समजणारी इतर माणसंही सवयीने सुखी झालेली असतात. शेकडा नव्वद टक्के लोकांना जे मिळतं ते आपल्यालाही मिळालं आहे ह्या जाणीवेतून ती सुखी होतात. " 

वपूर्झा/सुरेंद्र/111102025

                                                            

           

गुरुवार, ९ ऑक्टोबर, २०२५

" विचार शृंखला : 58/59/60 : 10102025 "

" विचार शृंखला : 58/59/60  : 10102025 "

58)   " अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या तीन गरजा राज्यकर्त्यांनी पुरवायच्या असतात. ह्या भागल्या की उरलेला सगळा  ङामङौल असतो. दर्जा, पत, प्रतिष्ठा, स्टेटस हे सगळे राक्षस. त्यामुळे जहापन्हा, अमिरउमरावांना प्रतिष्ठा विकत घेता येते म्हणून ते खूष. झोपडपट्टीत हे राक्षस नांदत नाहीत म्हणून कनिस्ठेतर वर्ग खूष. "             59)  "    भीतीमधूनच फिलॉसॉफी निर्माण होते असं नाही. स्वार्थी आणि निष्क्रिय माणूस चांगलं तत्वज्ञान सांगू शकतो. "                              60)   "    संसार असाच असतो. लाकडाचा धूर डोळ्यात जातो म्हणून चूल पेटवायची थांबवायचं नसतं. जीवनात दरी निर्माण झाली म्हणून आपण खोल खोल जायचं नसतं. ती दरी पार करायची असते. "                                              वपूर्झा/सुरेंद्र/10102025

                                                            

" विचार शृंखला : 56/57 : 09102025 "

" विचार शृंखला : 56/57            : 09102025 "


56)       ".    म्हातारपण म्हटलं की म्हातारपणाची तरतूद आपण फक्त पैशांची केली की संपलं असं समजतो. ते चूक आहे. म्हातारपण स्वीकारण्याची फार मोठी तयारी करावी लागते. मानसिक तयारी. आपली इच्छा असो वा नसो, तो न आवडणारा पाहुणा घरात कायमचा राहायला येणार आहे ह्यात वादच नाही. ज्या घरात तो वास्तव्याला येणार आहे त्याचेच वासे तो मोजणार आहे, हे आतापासूनच गृहीत धरायला हवं. 

57)       " फार तर्क-तर्क, माणसाचा एकांत वाढवत जातो. तो तर्क कर्ककर्क श होत जातो. फार फार

' मॅटर ऑफ फॅक्ट ' - होतो. तुसता तर्क करीत राहणारा माणूस फार संशयी होत जातो. त्याची वाढ होत नाही आणि त्याला सुखही लागतं नाही. असं का होत जातं? तर- तर्कलाही सत्याचा, वास्तवतेचा आधार लागतोच. ज्या तर्काला वस्तूस्थितीचा आधार गवसत नाही तो तर्क सोडून द्यायची तयारी असावी लागते. सत्याचा आधार शोधायची धडपड जाणिवेने  करायची असते. जी माणसं तशी धडपड करतात त्यांची वाढ होते. ज्यांचं तर्कावरच प्रेम बसतं ती माणसं तिथल्या तिथे फिरतात. स्वतः दुःखी होतात, इतरांना दुःखी करतात. आपल्या अपरिपक्व विचारांमुळे इतरांना दुःखी करण्याचा आपल्याला काय अधिकार आहे. याचा विचार अशी माणसं करीत नाहीत. नरक-नरक म्हणतात तो ह्या यातने पेक्षा वेगळा असतो का? 

वपूर्झा/सुरेंद्र/09102025

                                                            

बुधवार, ८ ऑक्टोबर, २०२५

" विचार शृंखला: 53/ 54/55 : 081002025 "

" विचार शृंखला: 53/ 54/55  : 081002025 "

53)       "  मी एक छोटा माणूस आहे. मी पुढाऱ्यांची पण पूजा करीत नाही आणि सरकारची पण नाही. निरपराध माणूस भरडला गेला की डोळ्यांच्या कडा ओल्या होणारा मी एक साधा जीव आहे. रात्रीचा अंधार पडला की डोळ्यासमोर असंख्य प्रश्न नाचतात. ते सोडवता सोडवता ग्लानी येते आणि त्याच प्रश्ननांनी जाग येते. "                                                    54)        "    माणसं खळखळून  मोकळी होत नाहीत. गप्प राहतात. सहन करतात. ही माणसं, ह्या व्यक्ती काय गमवतात, काय मिळवतात हे फक्त त्यांनाच माहीत. मोहावर जेव्हा ही मंडळी मात करतात तेव्हा त्यांच्या त्या यशाला सत्काराचे हार नाहीत आणि पराभवाच्या दुःखाला सांत्वनाचा स्पर्श नाही. "                            55)       " नियंत्रणाचा मार्ग पोटाकडून मेंदूकडे जातो. महाराज, पोट गहाण पडलं की, मेंदू आपोआप गुलाम होतात. "                      वपूर्झा/सुरेंद्र/08102025

                                                            

शनिवार, ४ ऑक्टोबर, २०२५

" विचार शृंखला: 50/ 51/52 : 051002025 "

" विचार शृंखला: 50/ 51/52   : 051002025 "

50)       "  ओळख हा शब्द फार फसवा आहे. ओळख ही प्रत्येक क्षणी निरनिराळ्या स्वरूपात होते. रक्तमासांची नातीदेखील फसवी. आपण स्वतःलाही प्रत्येक क्षणी नव्याने समजतो. सर्वात जवळच्या माणसांच्या वागण्याचे धक्के जास्त बसतात. कारण त्यांच्या पहिल्या ओळखीपाडून ती खूप अंतरावर गेलेली असतात. तेव्हा ' ओळख ' शब्दाचं नातं  ' चालू वर्तमानकाळा ' शीच असतं. "                                          51)        " आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस नक्की चांगला असणार, याची आशा सुटत नाही, म्हणून आपण जगतो. उद्याबद्दलची काही ना काही स्वप्न उराशी असतात म्हणून आज मृत्यूला कवटालावं असं वाटत नाही. "                      .   52)   " प्रत्येक माणसाला आयुष्यभर कुणाचा ना कुणाचा मत्सर वाटत असतो. ज्या सुखाला आपण लायक आहोत ते दुसऱ्या कुणालातरी मिळतंय ह्याचं एक ठसठसनारं दुःख तो कायम जवळ बाळगून असतो आणि त्याहीपेक्षा कुचंबणा अशी की हे कुठ बोलता येतं नाही. "वपूर्झा/सुरेंद्र/05102025

                                                            

" विचार शृंखला: 48/49 :041002025 "

" विचार शृंखला: 48/49     :041002025 "

48)       "  दुःखात होरपळलेल्या माणसाला शब्दांचा चेहरा दिसतं नाही आणि त्याचा वासंही ओळखता येतं नाही. मग तो माणूस अजाणपणे सगळ्यांनाच दुःख सांगत सुटतो किंवा सगळ्यांपासून पळण्याचा प्रयत्न करतो. "

वपूर्झा/ Surendra/04102025.                            Ooo.                                                           49)   "  मनस्ताप ही अवस्था अटळ. पण आपणच संघर्ष टाळू शकलो तर..... तडा गेलेल्या काचेच्या भांड्याचे दोन्ही तुकडे  जागच्या जागी राहतात. त्यातून पाणी पिता आलं नाही तरी त्यात फुलं ठेवता येतात. "

वपुर्झा/Surendra/04102025.  

Ooo.                                                             

शुक्रवार, ३ ऑक्टोबर, २०२५

" विचार शृंखला: 46/47 :03102025 "

" विचार शृंखला: 46/47      :03102025 "

46)       "  आकाशात जेव्हा एखादा कृतिम ग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळून लावेपर्यंतच सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वतःची गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो. असंच माणसाचं आहे. समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते. "

वपूर्झा/ Surendra/03102025.                            Ooo.                                                           47)   "  ' इट जस्ट हॅपॅन्स ' म्हणत पुढच्याच क्षणी जी माणसं कामाला लागतात, ती जास्त जगतात. अश्रू गाळण्यात आपलं वीस टक्के आयुष्य वाया जात असेल. काही माणसांचं तितके टक्के आयुष्य इतरांच्या नावाने बोटं मोडण्यात जात. पुढच्याच क्षणी मागचा क्षण विसरणारे अलिप्त, कृतघ्न, वास्तववादी, की हे सगळे समर्थ्यांचे शिष्य?. ' मरे एक त्याचा, दुजा शोक वाहे, अकस्मात तोही, पुढे जात आहे, ' -- अकरा शब्दांत समर्थानी सगळं उकलून दाखवलं.'

वपुर्झा/Surendra/03102025.  

Ooo.                                                             

बुधवार, १ ऑक्टोबर, २०२५

" विचार शृंखला: 43/44/45 :. 01102025 "

" विचार शृंखला: 43/44/45/       :01102025 "

43)       "  आम्ही कोण आहोत?  जनावरं? छे! आम्ही पूर्णत्वाने जनावरंझालो तर चांगलं होईल. जनावरं वाजवीपेक्षा जास्त खात नाहीत. जनावरं बलात्कार करीत नाहीत. जनावरं सज्जनांची राजरोस हत्या करून ' दयेचा अर्ज ' करीत नाहीत. ".                                            वपूर्झा/ Surendra/01102025.                  Ooo.                                                      44)   "  आयुष्यात नुसती गुणवत्ता उपयोगी पडत नाही. वेळेच भान ठेवणे महत्वाचं. वेळेशी आणि काळाशी फटकून वागणाऱ्या माणसांचा आक्रोश, म्हणजे इतिहास. ट्यालेन्टेड पण वेळेवर न भेटणाऱ्या माणसांपेक्षा, मठ्ठ पण हव्या त्या क्षणी हजर होणाऱ्या माणसांवरच आपली मदार असते. ".       वपुर्झा/Surendra/01102025.            Ooo.                                                          45)   "   काही जात नसतं तेव्हाच लोकांना जास्त उचापती हव्या असतात. ज्याला थोडी का होईना, झीज सोसावी लागते तो विचार करून बोलतो. " .      वपुर्झा/Surendra/01102025.                    Ooo

मंगळवार, ३० सप्टेंबर, २०२५

" विचार शृंखला: 40/41/42/ :30092025 "

" विचार शृंखला: 40/41/42/       :30092025 "

40)  " कुणी कोणासाठी किती त्याग केला ह्याचा हिशोब आला की आंब्याच्या झाडाने आपला मोहोर येण्याचा काळ संपला हे जाणावं. ". वपूर्झा/ Surendra/30092025.                  Ooo.                                                          41)   "  कबुतरला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीच वेड रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येतं नाही. ".          वपुर्झा/Surendra/30092025.             Ooo.                                                         42)   "   माणसाचं मन ही एक फार मोठी शक्ती आहे. ती कोणत्या स्वरूपात कुठे, कशी प्रकट होईल, हे सांगता यायचं नाही. प्रकट झाल्यावर ती विधायक होईल की विध्वनसक होईल, हेही सांगणं कठीण आहे. मला तर मन म्हणजे बाटलीत कोंडलेला राक्षसच वाटतो. अफाट शक्ती आणि बुद्धीवर ताबा नाही. " वपुर्झा/Surendra/30092025.                  Ooo

सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५

" विचार शृंखला: 37/38/39/ 29092025 "

विचार शृंखला: 37/38/39/       :29092025 "

37)       "  संसारातला नवरा-बायकोचा चार्म का जातो? तर तिथं प्रतीक्षा ही अवस्थाच नसते. एकमेकांना गृहीत घरलं जातं. सुख हाताशी असतं म्हणूनच हातातून निसटतं. संसारातील उदासीनता ही निव्वळ अभिरुचीवर अवलंबून नाही. प्रतीक्षेची अनुपस्थिती हेही एक कारण. "वपूर्झा/ Surendra/29092025.                   Ooo.                                                        38)   "  निर्बुद्धातल्या निर्बुद्ध माणसालाही, ' तुला ह्यातलं काही समजणार नाही ' म्हटलं की संताप येतो. बुद्धीवान माणसाला अकलेचे अहंकार असतो, तर मूर्ख माणसाच्या गर्वाला मूर्खपणा जाहीर झाल्याने त्याचा धक्का    पोचतो. ".        वपुर्झा/Surendra/29092025.            Ooo.                                                          39)   "   कोणत्याही श्रेष्ठपदाला पोहोचलेल्या व्यक्तीला समर्थनाशिवाय स्वतःच श्रेष्ठत्व टिकवता आलं पाहिजे. " वपुर्झा/Surendra/29092025.                     Ooo

रविवार, २८ सप्टेंबर, २०२५

" विचार शृंखला: 33/34/35/36:28092025 "

" विचार शृंखला: 33/34/35/36        :28092025 "

33)       " ज्याला प्रेम समजतं, शब्द समजतो तो वेळ पाळतो, नि ज्याला फक्त स्वार्थ समजतो, तो वेळ साधतो. ".                                    वपूर्झा/ Surendra/28092025.                  Ooo.                                                           34)   "   सुविचारांची वही नंतर शोभेची वस्तू होते. ".          वपुर्झा/Surendra/28092025.             Ooo.                                                         35)   "   सकाळचे जाग आल्याबरोबरचे क्षण नेहमीच शुद्ध असतात. निर्लॅप असतात. दिवसांच्या कारस्थांनाचा, कपटांचा, खोटेपणाचा थर त्यावर चढलेला नसतो. " वपुर्झा/Surendra/28092025.                Ooo.                                                        36).    " गादी-उशीशिवाय झोपणं तर सोडाच, पण नेहमीची उशी जरी वाटणीला आली नाही तरी आपली मिजास जाते. दिवसातून दहा वेळा जप करतो. डोळ्याला डोळा नाही हो रात्रभर. रात्र वैरीण नसते. सवय वैरीण. आणि तिला जन्म देणारे आपणच. "वपुर्झा/Surendra/28092025.                 Ooo

शनिवार, २७ सप्टेंबर, २०२५

" विचार शृंखला: 30/31/32 :27092025 "

" विचार शृंखला: 30/31/32        :27092025 "

30)  " मूल पाच वर्षाचं होईतो त्याला फारसं कळत नाही म्हणून त्याला विक्षिप्त म्हणायचं. नंतर दहा वर्षापर्यंत ' वाढतं वय ' म्हणून मुलांचं वागणं सहन करायचं. नंतरच वय धड ना बाल्य ना तारुण्य म्हणून हेकटपणाने वागण्याचा काळ. मग' ' तारुण्याची धुंदी ' म्हणून वेगळं वागणं. मग स्वभाव पक्का बनला म्हणून तो असेल तो स्वीकारायचा. असं म्हणता म्हणता, ' आता एव्हड्या उशिरा, हया वयात त्याचा स्वभाव बदलणं कसं शक्य आहे? ' हे म्हणायची पाळी येते. कोणत्या वयाची हमी  घ्यायची? '.      वपूर्झा/ Surendra/27092025.                   Ooo.                                                        31).   "   ' वियोग ' झाल्यावर माणूस का रडतो माहीत आहे? ', ' ते फक्त वियोगाच दुःख नसतं. जिवंतपणी आपण त्या व्यक्तीवर जे अन्याय केलेले असतात, त्याला आपल्यापायी जे दुःख भोगावं लागलेलं असतं, त्या जाणीवेचं दुःखही त्यात असतं. त्याशिवाय जीवघेण्या यातनाही त्यात असतात. ज्याच्या साठी आपण रडतो, नेमकी तीच व्यक्ती वगळून, आपण किती दुःख करीत आहोत अशा अनेकांना ते नुसतं दिसतं. ज्याच्यापर्यंत ते दुःख, अश्रू तसेच्या तसे पोचले असते तोच तिथं उपस्थित नसतो. ' तुम क्या जाने, तुम्हारी यादमे हम कितने रोये ' हेच खरं. "वपुर्झा/Surendra/2792025.              Ooo.                                                           32).   "   आपल्याला न आवडणारे विचारही आपल्यावर हुकमत गाजवून जातात. "वपुर्झा/Surendra/27092025.                     Ooo


गुरुवार, २५ सप्टेंबर, २०२५

" विचार शृंखला: 27/28/29 :26092025 "

" विचार शृंखला: 27/28/29         :26092025 "

27).       " निर्णयाची घाई असलेल्या व्यक्तींशी चर्चा करतांना सेफ वाटत नाही "

वपूर्झा/ Surendra/26092025.                            Ooo.                                                          28).       "   प्रत्येक खुर्चीचा मान असतो, बाबा. खुर्चीची शान ज्याची त्याने टिकवायची असते आणि तिचा मान इतरांनी सांभाळायचा असतो "               " ते ऑफिसात, घरी तसं काही नसतं. " " अरे बाबा, घरचांनी ही प्रथा सांभाळली, तरच पाहुणेही त्या खुर्चीच महत्व जाणतात. नाहीतर मग, आमची वाट्टेल तेव्हडी मैत्री आहे, हे सिद्ध करण्यासाठी माणसं वय, लौकिक काहीही न बघता शब्दही हवे तसें वापरतात आणि त्याची खुर्चीही. " 

वपुर्झा/Surendra/2692025.                                               29).      "   शब्द नेमकेपणा दर्शवतात. त्यांचं नातं सगुणसाकाराशी. ' भाव ' ही शब्दाहीन होणारी गोष्ट नव्हे. म्हणूनच परमेश्वराने डोळ्यांची मांडणी मेंदू आणि तोंड ह्यांच्या मध्ये केली. " 

 वपुर्झा/Surendra/26092025.                     Ooo


" विचार शृंखला: 24/25/26 :25092025 "

   " विचार शृंखला: 24/25/26         :25092025 "

  24)      " समोरच्या चालत्या-बोलत्या माणसांशी जितके छान वागता येईल तितकं छान वागायचं. आपल्यामुळे दुसऱ्याच आयुष्य दुःखी होत नाही एव्हडं माणूस नक्की सांभाळू शकतो. "वपुर्झा/Surendra/25092025.                Ooo.                                                        25).       " तुमचे-आमचे पूर्वज दारिद्र्याला घाबरले नाहीत. तुम्ही पण घाबरू नका. तुमच्या वाट्याला, इतरांचे वैचारिक दारिद्र्य पचवणं आले आहे. तेही पचवून दाखवा. सातत्य हा निसर्गाचा धर्म नाही. तेव्हा ढोगयुग संपेल. भविष्याबद्दल निराश राहण्याचा आपल्याला अधिकार नाही. तुमच्या सहवासात जी माणसं येतात, तेव्हढच जग नाही. हे जग अजुन चाललंय. ह्याचा अर्थच हा की इथं चांगलं जास्त आहे वाईट कमी      आहे. ".            वपुर्झा/Surendra/25092025.             26).      "   चेहरा म्हणजे भावना. डोळे म्हणजे शब्दातील भाव. स्पर्श्यांच्या-मोहाच्या राजधानीकडे नेणारी वाट. नजर चुकवली की पुढचा बराचसा प्रवास थांबवता येतो. मुक्कामाचा अखेरचा टप्पा टाळता येतो. "पुर्झा/Surendra/25092025.                     Ooo



शनिवार, २० सप्टेंबर, २०२५

" विचार शृंखला: 21,22,23/20092025 "




" विचार शृंखला: 21,22,23/20092025 "

21).    मैत्री, विवाह, संसार ह्यांचा प्रारंभ जसा होतो, तसाच त्यांचा शेवट अपेक्षेप्रमाणे होतं नाही. आयुष्य ही एक अज्ञात यात्रा आहे. भाग्योदयासाठी आपण जो प्रारंभ करतो, त्याचा शेवट भाग्यातच होतो, असं नाही. असं का होतं? आपल्या बरोबर आपल्या जीवन-यात्रेबरोबरच एक अज्ञात शक्ती ही प्रवास करीत असते. त्या शक्तीनेही एक हातचा राखून ठेवलेला असतो, हे आपल्याला माहीत नसतं. "

वपुर्झा/Surendra/20092025

Ooo

22).       " प्रत्येक नव्या अनुभवाचं नातं, अंगावर काटा किंवा रोमांच उठवणाऱ्या केवळ एकाच क्षणाशी असतं. दुसऱ्याच पुढच्या क्षणी तो अनुभव एका क्षणाने जुना झालेला असतो. भूतकाळात गेलेला असतो. नंतरचा आनंद पुनःरूक्तीचा असतो.    ' क्षणभंगूर ' हे विशेषण आयुष्याला न लावता अनुभवालाच लावलं पाहिजे. "

वपुर्झा/Surendra/20092025

23).      "   संसारातल्या प्रत्येक व्यक्तीची सुखाची कल्पना, सुखाच्या जागा, सुखाची साधन ही वयानुसार, कालानुसार निरनिराळी असतात. आणि प्रत्येकजण त्याच्या कल्पनेतल्या सुखामागे पळतोही. पण संसार टिकतो तो कसा? तर दुःख जेव्हा सगळ्यांच एकच होतं, तेव्हा घर उभं राहतं."

वपुर्झा/Surendra/20092025

----------------------------------------------------------- 

  

शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२५

" विचार शृंखला: 18,19,20 "

" विचार शृंखला: 18,19,20 "  

18) " स्वतःचा वेळ खर्च करणारा, तुमचा मित्रच देवमाणसासारखा असतो. फार कशाला, तुमच्या विद्द मन:स्थितीत, भीषण एकटेपणी, एकाकी अस्थिर मनाच्या अवस्थेत, एकांतात एखाद्या व्यक्तीचा निःशब्द वावरही तुम्हाला किती बळ देतो, ते जीवनाचा साथीदार गेल्यावर कळत. "

19) " काळ फक्त माणसाचं वय वाढवतो. आठवणींना वार्धक्याचा शाप नसतो. "

20) " शत्रूची व्याख्या काय? : शतृत्व पैदा होण्यासाठी प्रथम परिचय हवा. त्याच मैत्रीत रूपांतर व्हायला हवं. मग केव्हातरी किरकोळ अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, म्हणून मतभेद किंवा ' अतिपरीचयात अवज्ञा ' असे शत्रूत्वाचेही टप्पे असतात. "

वपुर्झा/Surendra/19092025

Ooo



" विचार शृंखला: 15,16,17 "

" विचार शृंखला: 15,16,17"  

 15) " मैत्री म्हटलं की काय असावं, काय नसावं ह्याचं चिंतन करावं. आणि खऱ्या प्रेमाची व्याख्या Love decides what is wrong, instead of who is wrong अशी आहे. "

16) " आपल्या बद्दल एखाद्याला विश्वास वाटतो ही सुखवणारी भावना, आणि अस्वस्थता वाटते कारण तो विस्वास सार्थ ठरवण्याची जाणीव. "

" कोणतीही महत्वाकांक्षा न बाळगणाऱ्या माणसाला वैफल्य येण्याचा अधिकार आहे का?

17) " देखणी माणसं सगळ्यांनाच मोहात पाडतात. पण एखाद्या देखण्या माणसाबद्दल आपलेपणाची भावना कधी निर्माण होते? - तो प्रेमळ असेल तर, लाघवी, नम्र, मनमिळाऊ असेल तर. उन्मत्त सौदंर्यावर कोण लुब्ध होईल?

वपुर्झा/Surendra/19092025

" विचार शृंखला: 12,13,14 "

" विचार शृंखला: 12,13,14"  

   

12) " संपत आलेल्या जाणिवेच्या दुःखावर औषध नाही. "

13) " माणसाचा, मृत्यूपेक्षा भयंकर शत्रू कुणी तर तो म्हणजे अहंकार! "

14) " संशयाने एकदा समजूतदारपणाची वाट अडवली की माणूस सत्य जाणून घेण्याचा खटाटोपच करीत नाही." 

वपुर्झा/Surendra/19092025

गुरुवार, १८ सप्टेंबर, २०२५

" विचार शृंखला: 9,10,11"

 " विचार शृंखला: 9,10,11"                        

9)    " प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैंसा तर कधी माणसं. या तीन गोष्टींच्या टप्प्यापलीकडचा प्रॉब्लेम अस्तित्वातचं नसतो. "

वपुर्झा /250/Surendra / 18092025

-----------------------------------------------------------10)      "  मार्गदर्शन फक्त एकाच बाबतीत करता येतं. कोणत्या रस्त्याने गेलं तर शॉर्टकट पडतो, इतकंच मार्गदर्शन करता येतं. मुक्कामाचं ठिकाण प्रवाशानेच पसंत करायचं असत. "

वपुर्झा /250/Surendra / 18092025

----------------------------------------------------------

11). " निरनिराळ्या लोकांच्या दृष्टिकोनातून आपण जर स्वतःला पाहू शकलो, तर आपल्याला खूप नवे मित्र आपल्यातच मिळतील. "

वपुर्झा /249/Surendra / 18092025

-----------------------------------------------------------

"विचारशृंखला:6,7,8"

"विचारशृंखला:6,7,8" 

6)    " नेतृत्वाचा संबंध पितृत्वापेक्षा कर्तृत्वाशी असायला हवा "

वपुर्झा /252/Surendra / 17092025

-----------------------------------------------------------

7)      "  माणसाला जिवाभावाची सखी एकच. तीच नाव वेदना. सुख, समाधान, आनंद हे सगळे ' बर्ड्स ऑफ प्यासेज '. वेदना मरेपर्यंत सोबत करते तर आपण तिचाच राग करतो. "

वपुर्झा /250/Surendra / 17092025

-----------------------------------------------------------

8).   " खरं प्रेम फक्त एकदाच करता येतं. सर्वस्वाच दान आयुष्यात एकदाच. त्यानंतर जे स्वीकारलं जातं त्याला सर्वस्वाच जतन म्हणायचं. ते जतन करायला दुसऱ्याची मदत लागतं नाही. ज्याचा तो समर्थ असतो. शरीर वार्धक्यापूर्वी थकत ते मनं म्हातारं होतं म्हणून. "

वपुर्झा /250/Surendra / 17092025

-----------------------------------------------------------

मंगळवार, १६ सप्टेंबर, २०२५

" विचार शृंखला " 3, 4, 5.

                 " विचार शृंखला "                           3) नोकरी काय पैशासाठीच असते का? शरीरात बरोबर ती बुद्धीची गुंतवणूक अडते.            वपुर्झा /257/Surendra / 16092025-

-------------------------------------------------------4)      "  सौन्दर्याने समाजातला वावर सांभाळून केला पाहिजे. सौन्दर्याने आपलं अस्तित्व स्वतः पुरतंच ठेवायला हवं. शिंपलीतला मोती, शिंपली उघडली तरच दिसतो. तसच सौदर्य निराकाराच्या अवगुंठनात नंदावं. "

पुर्झा /256/Surendra / 15092025

-----------------------------------------------------------

5).  " शांततेमागे तृप्ती असावी,

.       सुतक नसावे. 

        तटस्थतेमागे जाणीव असावी, 

        तडफडाट नसावा. "

वपुर्झा /253/Surendra / 15092025

-----------------------------------------------------------

सोमवार, १५ सप्टेंबर, २०२५

" विचार शृंखला " 1, 2 /15092025

" विचार शृंखला "                        

1)                  '   कायम विवाद्य विषय कोणता असेल तर तो म्हणजे पाऊस. तो पडो आथवा न पडो, केव्हाही पडो, कितीही कोसळो, कसाही येवो, तो कायम टिकेचाच विषय झालाय. पुरुष आणि पाऊस, त्यापेक्षा नवरा आणि पाऊस ह्या दोघांनी नक्की कसं वागावं हे त्या दोघांनाही ठरवता येणार नाही आणि इतरांनाही सांगता येणार नाही. ' अर्ध्या वचनात ' ची अपेक्षा आपण कुणाकडून करीत नाही? साहेब, नोकर, भावंड, मुलं, आणि नवरा, सगळे अर्ध्या वचनातलेच हवेत. पुरुष कसेही असोत, त्यांचे ' नवरे ' झाले की ते अर्धा वचनात हवेत. "

वपुर्झा /256/Surendra / 15092025

---------------------------------------------------------2)      " बोलायला कोणी नसणं ह्या शोकांतिकेपेक्षा, आपण बोललेलं समोरच्या माणसापर्यंत न पोचण ही शोकांतिका जास्त भयाण. "

वपुर्झा /257/Surendra / 15092025

-----------------------------------------------------------


शनिवार, १३ सप्टेंबर, २०२५

"नुसत्या वाचनाने माणूस मोठा होत नाही."

"नुसत्या वाचनाने माणूस मोठा होत नाही."                           

                             ooo

                  '   नुसत्या वाचनाने माणूस मोठा होत नाही. वाचलेल्या विचारांना स्वतःचे अनुभव जोडायचे असतात. म्हणजे ते ते साहित्य       स्वतःपुरतं चिरंजीव होत. करमणूक करवून घेतांनाही स्वतःला खर्ची घातल्या शिवाय ती करमणूक भिनत नाही. ' साहित्य हे केवळ चुन्या सारखं असत.' त्यात आपल्या विचारांचा कात टाकल्याशिवाय आपल्या आयुष्याचा ग्रंथ रंगत नाही. आणि लेखकाला हवा असतो संवाद. त्याशिवाय त्याच पान रंगत नाही.' 

वपुर्झा /258/Surendra / 13092025

गुरुवार, ११ सप्टेंबर, २०२५

" मूळ जगण्याचं प्रयोजन शोधायला हवं."

"     मूळ जगण्याचं प्रयोजन शोधायला हवं."                                  

                             ooo

                  '   मूळ जगण्याचं प्रयोजन शोधायला हवं. आयुष्य आहे तोपर्यंत जगायला हवं, असं तर प्रत्येकजण म्हणतो तरी देखील जगण्याचं प्रयोजन शोधण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न दिसतो. सामान्यातली सामान्य माणसंही  ' मुलांचं शिक्षण होऊ दे, मग नोकरीं, टाळक्यावर आता चार अक्षता पडू देत आणि शेवटी नातवाचं तोंड पाहू दे ' ह्यासारखी चाकोरीबद्द अटळ प्रयोजनं आणि प्रलोभनं शोधत असतात. चाकोरी सतत ' कोरी ' ठेवण्याचा प्रयत्न करतात. ह्या माणसांची काहीच चूक नाही. मुलाबाळांनी भरलेला संसार हा ज्या प्रवासाचा प्रारंभ आणि शेवट आहे त्याचा स्वीकार केल्यावर वेगळं आयुष्य वाट्याला कसं यावं? त्यातही सत्तर ते ऎशी टक्के लोकांना प्रयोजन शोधण्याची गरजच वाटत नाही. Survival for Existence ह्यातच त्यांची इतकी शक्ती खर्च होत असावी की जरा मान उंच करून, दृष्टी पल्याड न्यावी, काही वेगळ्या दिशेचा शोध घ्यावा ह्याची त्यांना भूक नसते. जाणीव नसते. अपुऱ्या जागेत फळीवरचा छोटासा देव्हारा त्यांना आपल्यासाठी पुरतो आणि वर्षाकाठी सत्यनारायणाची पूजा, उरलेल्या ' अंरिअर्स ' साठी बास होते. सर्व विपरीत घटनां ची उत्तर ' प्रारब्ध ' ह्या शब्दात त्यांना मिळतात. ही तमाम जनता सुखी. पण ह्यापलीकडे  थोंडी जास्त जिज्ञासा जागी झाली, आयुष्याचा अर्थ शोधण्याची धडपड सुरु झाली की, न संपणारी प्रश्नमाला सुरु. "

वपुर्झा /243/Surendra / 11092025

बुधवार, १० सप्टेंबर, २०२५

" मानसोपचार तज्ञ त्यांचं अस्तित्व मान्य करतात, पण त्याच उच्यटन करू शकत नाहीत. "

" मानसोपचार तज्ञ त्यांचं अस्तित्व मान्य करतात, पण त्याच उच्यटन करू शकत नाहीत. "

                                 000

                  '   एखाद्या व्यक्तीच्या प्रपंचांत जेव्हा काही व्यथा निर्माण होतात तेव्हा त्याला इतर व्यक्तींपेक्षा परिस्थिती जबाबदार असते. ही परिस्थिती प्रत्येक व्यक्तीला कमी अधिक प्रमाणात जाणवते. काहींना जणू भूकंपाचे धक्के बसतात, तर काहींना केवळ वेधशाळेने नोंद केली तरच समजते. जी व्यक्ती मनानें जास्तीत जास्त संवेदनक्षम असते तिलाच तातडीने रया वातावणावर उपाय हवाअसतो. हा उपाय कधी प्रत्यक्ष स्वरूपात हवा असतो तर कधी निव्वळ शब्दांची फुंकर पुरते. स्वतःच्या यातनामय आयुष्यक्रमाची आणि भानात्मक ताणतणावाची तितक्याच  लहरीवर दुसऱ्या कुणाला तरी जाणीव आहे आणि ती व्यक्तीही  तेव्हडीच बेचैन आहे एव्हढाही आधार काहींना पुरेसा असतो. अशा आधाराची आवश्यकता निर्माण होणं आणि चार भिंतीच्या घरकुलात तसा हात न मिळणं इथंच कुठेतरी वाळ्वी लागली आहे, ह्याची साक्ष आहे. घरकुलाच्या बांधकामत कुठंतरी ओल आहे. मी व्यवसायाने आर्किटेक्ट असूनही सांगतो की भिंतीत ही अशी ' ओल ' नक्की कोठून येते, हे शोधणे अशक्य असत. पूनर्बंधणी करणं हाही इलाज योग्य ठरत नाही. एखादी व्यथा अशी असते. वाळवीचा बंदोबस्त एक वेळ करता येतो पण बांधकामात ' ओल ' कुठं वा का आहे हे भल्या भल्या        तंत्रज्ञाना कळत नाही. तशी एखादी व्यथा-रुखरूखीची पाळमुळं किती खोलवर गेलेली आहेत, ते उकळत नाही. मानसोपचार तज्ञ त्यांचं अस्तित्व मान्य करतात, पण त्याच उच्यटन करू शकत नाहीत. "

वपुर्झा /240/Surendra / 10092025

मंगळवार, ९ सप्टेंबर, २०२५

"पुन्हा ' नोकरीचा रुबाब दाखवू नकोस ' ही अरेरावी आहेच. "

" पुन्हा ' नोकरीचा रुबाब दाखवू नकोस ' ही अरेरावी आहेच. "

                                 000

                  '  ' विचार करा ' तुमच्या नोकरीची तुमच्या संसाराला नितांत गरज आहे. हे जर तुम्हाला स्वतःला पटलं तर तो जीवनक्रम खळखळ न करता स्वीकारा. त्यानंतर सगळ्या ' प्रयोरिटीज ' बदलतील. त्यांचही मग स्वागत करा. ' नोकरीं ' की ' अपत्य ' ह्यातही अग्रहक्क कशाला हे ठरवणं आलं. हा सगळा तिढा अवघड का? तर ह्या वेगवेगळ्या पातळीवरच्या डिमांड्स आहेत म्हणून. नोकरीधर्म श्रेष्ठ की मातृत्वाची भावना? प्राप्ती की अपत्य? अपत्यप्राप्ती हा मग एकच शब्द उरत नाही. तिथंही ' प्राप्ती ' हा शब्द प्रथम लिहायचा की ' अपत्य '? अपत्य आणि प्राप्ती दोन्ही साधायचं म्हणजे मूल नोकराकडे किंवा सासू- ' unwilling guardian की willing? अपत्य झाल्यावर हे कळणार.  नाहीतर मग शेजारी, थोडक्यात म्हणजे त्या निष्पाप पिल्लाला  ' आई ' सोडून कुणीही. बाप परकाच असतो. ' श्त्री ' ही क्षणाची पत्नी, अनंतकाळची माता असं एक वचन, हयाउलट ' पुरुष हा क्षणाचा पिता आणि अनंतकाळचा..... ' मोकळ्या जागेत, पुरुष पिता खऱ्या अर्थानें झाला तर, नाहीतर पती, dictator जो शब्द असेल तो. शाळा, अभ्यास, संगोपन सुश्रुषेबरोबर नोकरीं. त्यातही श्त्रीला म्हणजे बायकोला नवऱ्यापेक्षा पगार जास्त असला तर किती नवऱ्यांना खपत? पुन्हा ' नोकरीचा रुबाब दाखवू नकोस ' ही अरेरावी आहेच. "

वपुर्झा /238/Surendra / 09092025

शनिवार, ६ सप्टेंबर, २०२५

" कारण वेगवेगळी असतात, पण माणसं एकमेकांना वापरतात. "

" कारण वेगवेगळी असतात, पण माणसं एकमेकांना वापरतात. "

                                 000

                  '  शी: शी:! किती गलिच्छ विचार आहेत तुमचे? ' "  गलिच्छ म्हण किंवा आणखी कोणतेही नाव दे. पण विचार तेव्हडेच खरे आहेत. माणसं माणसांना वापरतात. राज्यकर्ते जनतेला वापरतात. फार कशाला एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राला वापरत. आईबाप मुलांना वापरतात. मुलंही नंतर तेच करतात. नाहीतर ज्यांचा उपयोग संपलेला आहे अशा आईवडिलांची वार्धक्यात सासेहोलपट झाली नसती. कुणी भावनात्मक गरज भागवण्या साठी, कुणी सुरक्षितपणाच्या नावाखाली, कुणी केवळ आर्थिक लाभासाठी, तर कुणी फक्त विकृत आनंद शमविण्यासाठी, कारण वेगवेगळी असतात, पण माणसं एकमेकांना वापरतात. "

वपुर्झा /238/Surendra / 06092025

गुरुवार, ४ सप्टेंबर, २०२५

" जिथे संस्कारच नसतात तिथे बडगाच हवा "

" जिथे संस्कारच नसतात तिथे बडगाच हवा "

                                 000

                "  लोकशाही तत्व म्हणून ठीक आहे, पण देशाचा कारभार करायचा म्हणजे शिस्तीचा बडगा हवाच. जिथे संस्कारच नसतात तिथे बडगाच हवा. आपल्या घरातल्या घरात ज्यांना आपण रक्ताचे नातेवाईक मानतो तिथेसूद्धा काहीं गोष्टी मनासारख्या व्हायला हव्या असतील तर घर चालविणाऱ्या माणसाला अघूनमधून रुद्रावतार घारण करावाच लागतो. आपल्या नवऱ्याला किंवा बायकोला किंवा आईवडिलांना आपण अमुक तऱ्हेने वागलो तर आनंद होणार आहे, गैरसोय होणार नाही, ह्या समजूतीने वागणारी माणसं फार थोडी. अनेक घरांतून स्वतःचेच नातेवाईक सांगूनसुद्धा ऐकत नाहीत. असं का घडत असावं? आणि तेही स्वतःच्याच माणसांकडून? कारण झोडगिरीने वागलं तरी ते खपहून घेतलं जातं ह्याची खात्री आहे म्हणून. ह्याचं वृत्तीने देशातली माणसं    वागतात. "

वपुर्झा /223/Surendra / 05092025

" महापालिकेच्या पिवळ्या कागदावर तुझी जी जन्मतारीख आहे, तो जन्म नव्हे, ती केवळ तू कायद्याने ' सज्ञान ' कधी झालास ह्याच्या तपासणी साठी आवश्यक असलेली नोंद."

" महापालिकेच्या पिवळ्या कागदावर तुझी जी जन्मतारीख आहे, तो जन्म नव्हे, ती केवळ तू कायद्याने  ' सज्ञान ' कधी झालास ह्याच्या तपासणी साठी आवश्यक असलेली नोंद."

                                 000

                "  कथाकथनचा कार्यक्रम संपल्यावरचे क्षण कसे असतात? हे आयुष्यातले शून्य क्षण. मुक्त क्षण नव्हेत. शून्यातूनच सगळं निर्माण झालं म्हणतात. पण हे निर्मितीक्षम शून्य नव्हे, हे तुम्हाला उजाड, एकाकी, पोरकं करणार शून्य. तुमच्यावर जिवाभावाने, उत्कटतेने तुटून पडणारं कुणीतरी सानिध्यात असणं ही त्या शून्याची गरज. त्याने काही बोलू नये, काही सांगू नये, काही विचारू नये. स्तुती नको, कार्यक्रमाचं कौतुक नको, त्याने फक्त असावं. कधी कधी काहीच नसतं. आपण फक्त असतो. कधी कधी हे क्षण चिरंतन स्वरूपाचे पण स्वतःचीच साधना नसल्यामुळे, उत्तर हरवलेले प्रश्न समोर उभे करतात. हे सगळं काय आहे?,  का आहे?, कधी सुरु झालं?, कधी संपणार?, मागं काय उरणार?, किती काळ उरणार?, वरवरची उत्तर तयार असतात. हे सगळं काय आहे ह्याचं आकलन तुला होणारच नाही. तू गप्प रहा. का आहे? - सांगता येणार नाही. कारण तू ह्याचा निर्माता नाहीस. हे कधी सुरु झालं?- तुझ्या जन्मापासून हे सुरु झालं. महापालिकेच्या पिवळ्या कागदावर तुझी जी जन्मतारीख आहे, तो जन्म नव्हे, ती केवळ तू कायद्याने  ' सज्ञान ' कधी झालास ह्याच्या तपासणी साठी आवश्यक असलेली नोंद. त्यातला ' सज्ञान ' हा शब्द संपूर्ण अज्ञान दर्शविणारा. कॅलेण्डरवरचे छापील चोकोन मागे पडल्याने माणूस सज्ञान होतो काय? ज्या दिवशी तुझ्या जाणीवांचा प्रारंभ झाला तो तुझ्या जन्म. तो दिवस टिपता येईल? नो. नेमक्या कोणत्या दिवशी गर्भ राहिला हेही सांगता येतं नाही. तरीही समज, जाणिवा जाग्या झाल्या त्या दिवसापासून हे चक्र फिरू लागलं. कधी संपणार?- तुझ्या शेवटच्या श्वासाबरोबर. मागं काय उरणार?, काही नाही. तुझ्या पश्चात तुझं अस्तित्व किती?, इतरांच्या जाणिवा जितके दिवस राहतील तितके दिवस. कदाचित तुझं अस्तित्व तुझ्या हयातीतच संपल्याच तुला पहावं लागेल. " 

वपुर्झा /222/Surendra / 04092025

बुधवार, ३ सप्टेंबर, २०२५

कर्तृत्वाला प्रयत्नांचे अश्व जुमपायचे असतात. एकच दिशा ठरवायची असते. निग्रहाचे लगाम हातात ठेवायचे असतात आणि सातत्याचा चाबूक स्वतवरच उगारायचा असतो. "

" कर्तृत्वाला प्रयत्नांचे अश्व जुमपायचे असतात. एकच दिशा ठरवायची असते. निग्रहाचे लगाम हातात ठेवायचे असतात आणि सातत्याचा चाबूक स्वतवरच उगारायचा असतो. "

                                 000

                "  आयुष्यातली पहिली पंचवीस वर्ष सोडूनच द्यायची. कोणत्या कुटुंबात जन्म, कोणतं गाव, कोणती शाळा, शिक्षक, प्राध्यापक, यश, व्यवसाय, आयुष्याचा साथीदार........ प्रत्येकाने मागे वळून पाहिलं तर हीच स्टेशन'. पण इलाखे वेगवेगळे. आणि मग मर्यादांनी वेढलेल्या ह्या प्रवासात, एका माणसाला अनुभव येऊन येऊन किती येणार? आयुष्यात किती माणसं भेटणार? त्यातली साधी किती? सोज्वळ किती? मिडिऑकर किती? विद्वान पण आढयताखोर किती? असे अनेक प्रश्न मला पडतात आणि तरीसुद्धा वाटतं, विचारांचा मागोवा घेण्याचा ज्यांना ज्यांना छंद आहे त्या सगळ्यांना ज्ञानभाराने नम्र झालेला एक तरी महाभाग भेटला असेलच. विचारांचाच मागोवा घेणारे समाजात किती लोक आहेत, हा प्रश्न बाजूला ठेवणे भाग आहे. पण अशी विनम्र असलेली, ज्ञानी माणसं, सगळीच्या सगळी भेटणं अशक्य. मलाच असं नव्हे, तर कोणत्याही एका व्यक्तीला. कर्तृत्वाला प्रयत्नांचे अश्व जुमपायचे असतात. एकच दिशा ठरवायची असते. निग्रहाचे लगाम हातात ठेवायचे असतात आणि सातत्याचा चाबूक स्वतवरच उगारायचा असतो. असं केलं तरच            ' व्यक्ती ' च्या गावापासून  ' व्यक्तिमत्ववा ' च्या महानगरी पर्यंतचा प्रवास होतो. निग्रहाचे लगाम सोडले की आश्वाचा.   ' वारू ' होतो. ' वारू ' आणि ' वारा ' ह्यांचं एक नातं असावं. ते कोणत्याही दिशेने जातात. "

वपुर्झा /218/Surendra / 03092025

गुरुवार, २८ ऑगस्ट, २०२५

" बालगोपालही स्मार्टली स्वतःसाठी फ्रुटी आणतात. बाप त्याला ' टीप ' देतो."

" बालगोपालही स्मार्टली स्वतःसाठी फ्रुटी आणतात. बाप त्याला ' टीप ' देतो."

                                 000

                "  प्रत्येक माणसाची आयुष्यभर एकच धडपड असते. आपण जसे आहोत त्यापेक्षा वेगळी प्रतिमा समाजात उमटावी. एक काळ असा होता की, समाजात व्यसनी माणसाचं प्रमाण अत्यल्प होत. क्वचित कोणी ड्रिंक्स घेतही असत. त्याचा बाजार झाला नव्हता. आपल्या घरातील जेष्ठ मंडळीं ड्रिंक्स घेतात हे घरातल्या गावीही नव्हतं. मग समाजातल्या प्रतिमेला घक्काही लागायचं कारण नव्हतं. आज घरातल्या सहा-सात वर्षाच्या बालगोपालांनाच सोड्याच्या बाटल्या आणण्यासाठी पिटाळलं जातं. पाहुण्यांना कौतुकाने सांगितलं जातं, ' ही इज व्हेरी स्मार्ट, रस्ता परफेक्टली क्रॉस करतो.' बालगोपालही स्मार्टली स्वतःसाठी फ्रुटी आणतात. बाप त्याला ' टीप ' देतो.

वपुर्झा /217/Surendra / 28082025

मंगळवार, १९ ऑगस्ट, २०२५

"अनेकजण पदं-पैंसा-प्रति"ष्ठा ह्या पायऱ्यांवरच धडपडणार-"

अनेकजण पदं-पैंसा-प्रति"ष्ठा ह्या पायऱ्यांवरच धडपडणार-"

                                 000

                "  नेहमीच्या गोष्टी करणारा माणुससुद्धा अगतिक झालेला असतो. त्याचा पुनःरूक्तीचा आनंदही विटलेला असतो. पण त्याऐवजी काय करावं हेही त्याला कळत नाही. तो एक अगतिक सदवर्तनी किंवा निवृत्त भोगीच असतो. ह्याचं अवस्थेत बुद्ध भेटावा लागतो. कुणी सांगावं,आजच्या विसाव्या शतकातही अनेकजण बुद्धाची प्रतिक्षा करीत असतील. एखाद्याचं संपूर्ण परिवर्तन होईलही.' करून करून भागला आणि देवपूजेला लागला' ह्या वचनाला घाबरवून, ते कंटाळलेल्या मार्गांवरूनच चालतं असतील. खरं तर सगळ्या गोष्टी करून पाहिल्यावरच, शांती न मिळाल्यावर जो भक्तिमार्गाकडे वळतो, तो कायमचा वळतो. तोपर्यंतचा त्याचा प्रवास चिरंतन शांतीच्या दिशेनेच होत असतो. त्याला हसायचं कारण नाही, अनेकजण पदं-पैंसा-प्रतिष्ठा ह्या पायऱ्यांवरच धडपडणार- यम, नियम, असणापासून समाधीच्या पायरीकडे नुसते बघत, फास्ट लोकलकडे बघत, ठिकठिकाणी रखडणाऱ्या गाडीनेच प्रवास करतात. ह्याचं कारणासाठी सत्पूरुष व्यक्तीच्या, गतकाळातल्या चरित्र्याची चिरफाड करणाऱ्या वृत्तपत्रीय भाष्याला मी महत्व देत नाही. प्रेस कॉन्फरन्ससाठी बोलावलेल्या पत्रकारांपैकी दारूच्या बाटल्या घरी नेणारे महाभाग मला माहीत आहेत. "

वपुर्झा /213/Surendra / 19082025

बुधवार, १३ ऑगस्ट, २०२५

" सदवर्तनाची जशी एक नशा असते तशीच दृशकृत्याची पण एक चटक असते. कैफ असतो."

" सदवर्तनाची जशी एक नशा असते तशीच दृशकृत्याची पण एक चटक असते. कैफ असतो."

                                 000

                "   आपण एखाद्याचा मोठेपणा झुगारूनच द्यायचं ठरवलं, तर ते काय अशक्य आहे का? त्याला फार धाडस किंवा अक्कल लागते का? त्यासाठी फक्त नफ्फडपणा लागतो. आज वकील, डॉक्टर, प्राध्यापक, व्यापारी, समाजसेवक, चित्रपट, नाट्यव्यवसाय, राजकारण, न्याययंत्रणा ह्या सगळ्या व्यवसायात शुद्ध चारित्र्य राहीलच नाही, असं आहे का? जकात नाक्यावरही कात टाकलेली साधी, सरळ माणसं नाहीत का? रेल्वेपासून पोलीस खात्यापर्यंत युनिफॉर्मचा गैरवापर न करणारी माणसं कमी असतील का? पण तशी माणसं भेटावी लागतात. ह्यांच्या माना, पदं, पैंसा, प्रतिष्ठा मानणाऱ्या गेंड्यांच्या-नव्हे-झेंड्यांच्या गळफासत गेल्या असतील, तर ते कुठे जातील? - एका रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वतःची मानणाऱ्या लालबहादूर शास्त्रीचा जमाना कधीच संपला. शास्त्री गेले तेव्हा त्यांच्या खात्यावर किती पैसे होते, हे त्या वेळच्या समाजाला माहीत आहे. त्या शास्त्रीना दोन वेळा 'कोटी' ,' कोटी' नमस्कार. परिवर्तरन ही अंतर्मनाची प्रक्रिया आहे. तुम्ही एखाद्या माणसासमोर शंभर आदर्श ठेवा, दासबोधची पारायण करा किंवा अनेकजणांची उदाहरणं ज्ञा, त्या माणसावर ' डिम्म ' परिणाम होणार नाही. तो जे पटल्यासारखं दाखवतो, ते intellectual appreciation असतं. सदवर्तनाची जशी एक नशा असते तशीच दृशकृत्याची पण एक चटक असते. कैफ असतो. ज्या मनात ह्या दोन्ही गोष्टींचा उगम होतो, तिथंच जागृतीचा, awareness चा कोंब फुटावा लागतो. "

वपुर्झा /212/Surendra / 14082025

मंगळवार, १२ ऑगस्ट, २०२५

" पुन्हा एक बुद्ध हवा आहे. पण तोही हतबुद्ध होईल. "

" पुन्हा एक बुद्ध हवा आहे. पण तोही हतबुद्ध होईल. " 

                                 000

                "   रामायणाच्या काळात, अयोध्याकांडापासून, युद्धकांडापर्यंत, एकूण किती कांड आहेत हे माझ्या ध्यानात नाही. गेले काही दिवस, वर्तमानपत्रातून रोज वाचावं लागतंय, ते वासनाकांड रामायणात नव्हतं. हे वासनाकांड रातोरात निर्माण झालेलं नाही. पात्रता नसणाऱ्यांना मिळणारी पदं, पक्षांच्या जोरावर निवडून येणारे अशिक्षित खासदार, आमदार, नगरसेवक, क्वचित काही मंत्रीही, लॉ आणि ऑर्डरमध्ये सरकारी हस्तक्षेप, ठिकठिकाणी उघडलेले बीअर बार्स आणि त्याहीपेक्षा जास्त परिणाम वर्षानुवर्षे होतोय, तो सेक्स आणि व्हायोलन्सनें सडलेल्या, किडलेल्या हिंदी चित्रपटांचा, वेब सिरीजचा. पोलीस कमिशनर, मंत्री ह्यांची निर्लज्ज नाचक्की पाहून, सेन्सॉर बोर्ड तर सोडाच, आतापर्यंत समाजातील कोणीही चित्रपट किंवा वेब सिरीज बंद पडायला धजावलेलं नाही. अख्या माहाराष्ट्राची, भारताची वीणा तुटून गेली आहे आणि कायद्याच्या तारा ढिल्या पडल्या आहेत. भ्रष्टाचाराच्या तारा ताणल्या गेल्या आहेत, पुन्हा एक बुद्ध हवा आहे. पण तोही हतबुद्ध होईल." 

वपुर्झा /212/Surendra / 13082025

" Who is wrong ह्याऐवजी What is wrong ह्याचाच शोध घ्यायचं दोघांनी ठरवलंत तर, संसार बहरलाच पाहिजे"

"   Who is wrong ह्याऐवजी What is wrong ह्याचाच शोध घ्यायचं दोघांनी ठरवलंत तर, संसार बहरलाच पाहिजे".

                                 000

                "   संसार हा एक कोर्स आहे. न संपणारा अभ्यासक्रम. ह्याचं टेक्स्ट रोज बदलणार. रोज परीक्षा द्यायची. ह्याला करिक्युलम नाही. डिग्री नाही, गाईड नाही. आपण एका न संपणाऱ्या कोर्सला बसलो आहोत. आपण परीक्षकासारखेच एकमेकांशी वागलो तर कसं होणार? सगळ्या कुटुंबातून पतिपत्नी परीक्षकाप्रमाणे एकमेकांची गंमत बघत राहतात. कोण कसं चुकतं. मग मीही कशी जिरवतो किंवा जिरवते ते पहा. सगळीकडे एकच. आजपासून आपल्यापुरतं हे बंद. संसार रोज एक प्रश्नपत्रिका देईल, ऐनवेळी. अगोदर न फुटणारी. ती दोघांनी सोडवायची. ह्याचं एका कोर्समध्ये पेपर सोडवतांना कॉपी करायची परवानगी आहे. आपला प्रत्येक श्वास जसा वर्तमानकाळातल्या ताज्या क्षणांशी इमानाने नातं ठेवतो, तितक्याच प्रमाणात वृत्ती कोऱ्या ठेवून, संसारातला प्रत्येक क्षण जोखायचा. भूत, भविष्याची वजनं वापरून वर्तमानकाळातलाकोणताही क्षण तोलता येतं नाही. पाच पंचेंद्रिये आणि ज्ञानेंद्रिये हीच मोजमाप. Nobody is perfect हे सूत्र मनात हवं. शुद्ध हेतूबाबत कधीच शंका नसावी आणि खूप चांगलं चांगलं करण्या-वागण्याची इच्छा असूनही, मधल्या steps चुकू शकतात, ह्यावर श्रद्धा असावी. Who is wrong ह्याऐवजी What is wrong ह्याचाच शोध घ्यायचं दोघांनी ठरवलंत तर, संसार बहरलाच पाहिजे. तुमच्या भाषेत सांगायचं तर, सरळ पायऱ्या चढून शिखर गाठणं म्हणजे Who is wrong च्या मळलेल्या पायवाटेवरून जाणं. What is wrong चा शोध घेणं म्हणजे ट्रेकिंग. हेच ट्रेकिंग अखंड चालो. "

वपुर्झा /209/Surendra / 12082025

सोमवार, ११ ऑगस्ट, २०२५

" केवळ अंतरपाट दूर केल्याने अंतर्मनाच मिलन होईल ह्याची शाश्वती नाही. "

 "  केवळ अंतरपाट दूर केल्याने अंतर्मनाच मिलन होईल ह्याची शाश्वती नाही. "

                                 000

                "   कुणावर तरी प्रेम बसणं. त्यानंतर मनात होणारी हुरहूर, त्या पाठोपाठ काहूर ह्या सगळ्या अवस्था डोळ्यासमोर उभ्या राहतात. लग्नाला एकच दिशा असते, प्रेमाला अनेक. लग्न केलं म्हणजे एकमेकात प्रेम निर्माण होईल हया चुकीच्या धारणेवरच समाज उभा आहे. प्रेम हे आकाशाइतकं उत्तुंग आणि विशाल आहे. तर लग्नसंस्था  जमिनीला घट्ट धरून उभी आहे. म्हणूनच लग्नानंतर प्रेमाच नात निर्माण झालं नाही तर पायाखालची जमीन सरकायला लागते. नैसर्गिक धरणीकंप अधूनमधूनच होतात, अनेक घराघरातून होणाऱ्या धरणीकंपाची नोंद कुठल्याही वेधशाळेत घेतली जातं नाही. त्या जमिनी तिथल्या तिथेच थरथरत राहरात. प्रेम निसर्गाने निर्माण केलंय आणि लग्न संस्था समाजाने. प्रेमातून संसार फुलला पाहिजे, त्याऐवजी संसारातून मुलांची पैदास होते आणि त्यालाच आम्ही प्रेम समजून कवटाळत राहतो. प्रेम ही चैतन्याची खूण आहे. ते फुलतं आणि वरमाला बनवावी लागते. म्हणून केवळ अंतरपाट दूर केल्याने अंतर्मनाच मिलन होईल ह्याची शाश्वती नाही. "

वपुर्झा /200/Surendra / 11082025

मंगळवार, ८ जुलै, २०२५

" आयुष्यात यश अनेकदा जाता - जाता मिळून जातं "

" आयुष्यात यश अनेकदा जाता - जाता मिळून जातं "

                                  000

                "  Hamlet is a tragedy of overthinking whereas Macbeth is a tragedy of over ambition. ह्या ठिकाणी ' ओव्हर ' हा शब्द जास्त महत्वाचा. अतिविचार केला म्हणजेच योग्य कृती घडते असं नाही. विचारसाखळीतला कृती करायला लावणारा शेवटचा दुवा चुकीचा ठरू शकतो. त्याचप्रमाणे एका झटक्यात एखादी कृती केली आणि अपयश आलं, तर ' हा अविचाराचा परिणाम ' असा शिक्काही तयार ठेवायचं कारण नाही. आयुष्यात यश अनेकदा जाता - जाता मिळून जातं आणि एकदा यश मिळालं की, माणूस जास्त खोलात जातं नाही. यशस्वी माणूस विचारवंतच मानला जातो आणि तो आपल्या येशाचं श्रेय नियतीला देत नाही. आपली दूरदृष्टी, अचूक योजना, निर्णय घेण्याची क्षमता अशी अनेक पिसं आपल्या टोपीत खोचायला तो अधीर झालेला असतो."

वपुर्झा /199/Surendra / 08072025

रविवार, ६ जुलै, २०२५

" पालखीमधल्या आराध्यदैवतेचं नाव असावं ' समर्पण '. त्या पालखीत तुम्ही अहंकाराला जागा दिलीत की संसाराच झंझट झालंच."

" पालखीमधल्या आराध्यदैवतेचं नाव असावं  ' समर्पण '. त्या पालखीत तुम्ही अहंकाराला जागा दिलीत की संसाराच झंझट झालंच."

.                                  000

                "  तुम्ही-आम्ही सगळेच भिकाऱ्यासारखे आहोत. संसार हे आपल्याला ओझं वाटतं. आपण ते कायम डोक्यावर घेतो. म्हणून स्वतःचीं पत्नी, मुलं, नातेवाईक हे सगळं आपल्याला झंझट वाटतं. जीवन ही न मागता लाभलेली पर्वणी आहे. संसाराचा भार घ्यावा, तो पालखीसारखा. पालखीमधल्या आराध्यदैवतेचं नाव असावं  ' समर्पण '. त्या पालखीत तुम्ही अहंकाराला जागा दिलीत की संसाराच झंझट झालंच. नियतीने तुम्हाला जीवनरथ जन्मापासून बहाल केलाय. आनंदाच्या दिशेने तुम्हाला तो वळवता आला पाहिजे. मैलाचा दगड म्हणजे मुक्कामाचं ठिकाण नव्हे. बाणाने दाखवलेली दिशा म्हणजे प्रवासाची समाप्ती नव्हे. ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला योग्य मार्ग दाखवतात आणि किती अंतर कापायचं आहे ह्याचा इशारा देतात. म्हणूनच संसाराच गाठोडं पायाशी ठेऊन, त्या गाठोड्यावर उभे राहा. त्यामुळे तुमची उंची वाढेल आणि उंची वाढल्याशिवाय अमर्याद आकाशाचं दर्शन होत नाही. एकदाच डोक्यावरचं गाठोडं खाली ठेवा. त्याच्यावर उभे राहा. मोकळा श्वास घ्या, म्हणजे स्वतःचं अस्तित्व वगळल्यास सगळ्या दुनियेकडे झंझट म्हणून पाहण्याची कला अवगत होते. कोणत्याही माणसात बदल होईल ही अपेक्षा नको, उपदेश नको, म्हणजे प्रवास ' झंझट ' न वाटता ती आनंदयात्रा ठरेल. "

वपुर्झा /198/Surendra / 06072025(2)

" निरीक्षण आणि क्रोध एकाच वेळी संभवत नाही. "

" निरीक्षण आणि क्रोध एकाच वेळी संभवत नाही. "

                               000o0"00

                "   युद्धाच्या प्रसंगी मन जास्तीत जास्त शांत ठेवावं लागतं. संघर्ष आणि क्रोध ह्याही वेळेला मन शांत हवं. हे विधान विनोदी वाटेल, पण त्यात एक गरभितार्थ  आहे. विलक्षण संताप आला की, त्याचा निरीक्षणशक्तीवर परिणाम होतो. हवी असलेली वस्तू समोर असून दिसत नाही. लहान मुलांना मारताना आपण त्याच्या शरीरावर कुठं हात उगारीत आहोत, ह्याचं भान राहत नाही. डोळे, कान अशी नाजूक इंद्रियं, जवळ असलेला मुलांचा गालच जवळचा वाटतो, कारण तेव्हा स्वतःला वाकायचेही श्रम घ्यावे लागतं नाहीत. काही मुलं एका कानाने बहिरी झालेली माझ्या ऐकिंवात आहे. आपला हात किती लागतो, हे मारणाऱ्या बापाला कळत नाही. पण निरीक्षण आणि क्रोध एकाच वेळी संभवत नाही. पत्नीवर हात उगारणारे नवरे कमी आहेत का?

वपुर्झा /198/Surendra / 06072025

                            

गुरुवार, ३ जुलै, २०२५

" हेच आंधळेपण. विचारहीनता."

 " हेच आंधळेपण. विचारहीनता."

                               000o0"00

                "  जड वस्तुंना पण भावना असतात. सगळं विश्व त्रिगुणत्मक आहे. रजोगुण, तमोगुण, सत्वगुण. ह्याबाहेर कुणी जाऊ शकणार नाही. ऍटम मध्ये सुद्धा प्रोटॉन,          इलेंकट्रॉन, न्यूट्रॉन हे तीनच घटक सापडले. वर्षानुवर्षं एखादा दगड एकाच जागी पडून असतो. का? तिथे तमोगुणाचा अतिरेक आहे. कुणीतरी तो उचलून लांबवर भिरकावतो. म्हणजे काय करतो? तर स्वतःचीं रजोगुणाची शक्ती त्याला अर्पण करतो. रजोगुणाचा शेवटचा अंश ज्या स्थानावर संपेल तिथे तो दगड पुन्हा स्थिर होतो. तमोगुण आहे म्हणून घरातलं फर्निचर आहे तसच राहतं. ती चैतनन्याचीच रूपे आहेत. आपल्याला कोणत्याही दिव्य शक्तीची गरज नाही. निसर्गाने दिलेल्या दृष्टीचा तरी आपण उपयोग करतो का? गीता दूरच राहिली. सिगारेट, दारू ह्यासारखी व्यसनं आपण ध्रुतराष्ट्रसारखी गुरु करतो आणि धोक्याच्या जाहिराती नजरेसमोर आल्या, म्हणजे गंधारीसारखी पट्टी बांधतो. ह्या व्यसनांपायी कॅन्सर वगैरे होणारी माणसं दुसरी आहेत, आपण नव्हे--असं समजतो. हेच आंधळेपण. विचारहीनता.'

वपुर्झा /197/Surendra / 03072025(2)

" माणसानेही मनाचे सगळे दरवाजे बंद करून ' स्टॉक टेकिंग ' करायला हवं."

"  माणसानेही मनाचे सगळे दरवाजे बंद करून ' स्टॉक टेकिंग ' करायला हवं."

                               000o000

                "  आपल्या मनाचा कोपरन कोपरा आपण कधी पिंजून काढत नाही. प्रत्येक दुकानदार आपलं दुकान वर्षातून एकदा. ' स्टॉक टेकिंग ' साठी बंद ठेवतो. माणसानेही मनाचे सगळे दरवाजे बंद करून ' स्टॉक टेकिंग ' करायला हवं. राखेचे आवरण पांघरलेले किती तरी निखारे सापडतील. एखाद्या प्रसंगाने, व्यक्तीमुळे ती राख उडते आणि त्या निखाऱ्याचा चटका समोरच्या माणसाला बसतो. आपल्याच तोंडून ते शब्द निसतात, तेव्हा त्याची धग आपल्यालाही जाणवल्याशिवाय राहत नाही. "

वपुर्झा /196/Surendra / 03072025

रविवार, २९ जून, २०२५

" पत्नी म्हणजे बासरी."

" पत्नी म्हणजे बासरी."

                               000o000

                "  पत्नी गेली की विस्व हरवतं. सूर नुसता सुरच राहतो. उरलेल्या आयुष्याचं संगीत होत नाही. सूर म्हणजे संगीताची जननी. बासरी ही नुसती भोकं असलेली बांबूची नळी असते. ओठांतून फुंकर, प्राणाचं चैतन्य देणारा गेला की बासरीचा पुन्हा बांबू झालाच. एका टोकाला कापडाचा तुकडा लावलेली ती झटकणी होते. प्रेम करणारी इतर कितीही माणसं भोवती गोळा झाली तरीही तो निव्वळ ऑर्केस्ट्रा होतो. काही काळ मनोरंजन होतं, इतकंच. पत्नी म्हणजे बासरी. त्याहीपेक्षा मी म्हणेन पुरुष म्हणजे बांबूची नळी. प्राणांची फुंकर घालून ओठाला लावणारी पत्नी गेली की नवऱ्याची झटकणीच होते. "

वपुर्झा /196/Surendra / 29062025

शनिवार, २८ जून, २०२५

" रस्त्याचे आत्मचरित्र "

" रस्त्याचे आत्मचरित्र "

                               000o000

                "  लहानपणी निबंधासाठी एक विषय ठरलेला असायचा. कोणत्यातरी निर्जीव वस्तूचं आत्मचरित्र. परवा फिरायला जातांना सहज रस्त्याला म्हटलं, ' कसं काय? ' आणि रस्ता म्हणाला, " संपूर्ण राष्ट्राच्या जीवनात रस्त्याचं महत्व अनन्यसाधारण आहे. ज्या गावाला रस्ता नाही, त्या गावाला अस्तित्व नाही. राष्ट्राची सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक प्रगती रस्त्याशिवाय अशक्य. त्यासाठी आम्ही काय काय सहन करतो? अवाडव्य वाहनांखाली आम्ही नित्य जगतो, मरतो. तुम्ही माणसं आमच्या अंगावर कुठेही गलिच्छपणे थुंकता. रस्त्याच्या दोन्ही कडांना नको ते विधी करता. तुम्हा मनावांची घाण आम्ही अंगावर तर घेतोच, पण आमच्या पोटातूनही तीच घाण सतत वाहत असते. तुम्ही रस्ते खणता, वर्षानुवर्षे दुरुस्तीच्या नावाखाली उकळतं डांबर ओतात. तुमचं पिण्याचं पाणी आणि त्याचे अजस्त्र नळ आमच्याच आतड्यातून, टेलिफोनच्या तारा आणि काय काय सांगू? अर्थातं आमचा जन्मच त्याच्यासाठी आहे. आमची जी कर्तव्य आहेत त्यापासून आम्ही मागे सरकणार नाही. आम्हाला परतीची वाट नाही. पण आता आमचं जे प्रयोजन आहे, त्यालाच धक्का लागायची वेळ आली." " म्हणजे?     "आम्हाला मोर्चाचा भार पेलत नाही." " येस. मोर्चा इस द लास्ट स्ट्रॉं ऑन द कॅमल्स बॅक. ", " आम्ही स्थिर आहोत म्हणून देश गतिमान आहे. वाहत असणं हा आमचा धर्म आहे आणि तुम्ही रस्तेच अडवता. ज्या कामासाठी आमची योजना आहै. तेच काम जर आम्हाला करू दिलं नाही तर इथे राहायचं कशाला?, चला रे. " सगळे रस्ते एकएकी जायला निघाले. मी जिवाच्या आकांताने म्हणालो, " आम्ही काय करायचं? " " संप, हरताळ, मोर्चे ह्यात आमचा जीव गेला. तुम्ही आता तुमच्या अस्तित्वासाठी.... आणि प्रगतीसाठी.... नवे रस्ते शोधा. "

वपुर्झा /136/Surendra / 28062025

शुक्रवार, २७ जून, २०२५

"कोणत्या वयाची हमी द्यायची? "

"कोणत्या वयाची हमी द्यायची? "

                                  000o000

                "  मूल पाच वर्षाचं होईतो त्याला फारसं कळत नाही म्हणून त्याला विक्षिप्त म्हणायचं. नंतर वर्षा पर्यंत.       ' वाढतं वय ' म्हणून मुलांचं वागणं सहन करायचं. नंतरच वय धड ना बाल्य, ना तारुण्य म्हणून हेकटपणाने वागायचा काळ. मग ' तारुण्याची धुंदी ' म्हणून वागणं. मग स्वभाव पक्का बनला म्हणून जो असेल तो स्वीकारायचा. असं म्हणता म्हणता ' आता एव्हड्या उशिरा, ह्या वयात त्याचा स्वभाव बदलणं कसं शक्य आहे? ' - हे म्हणण्याची पाळी येते. कोणत्या वयाची हमी द्यायची?

वपुर्झा /135/Surendra / 27062025

गुरुवार, २६ जून, २०२५

" माणूस हा किती संकेतांनी जखडला गेलेला असतो पाहा!"

" माणूस हा किती संकेतांनी जखडला गेलेला असतो पाहा!

                                  000o000

                "  ह्या अफाट चक्रावरचे आपण एक घटक. घटकलाच पूर्णचक्र समजावं ही अपेक्षाच अवास्तववादी. एका घटकाने दुसऱ्या घटकालाच जास्तीत जास्त जाणून घेण्याची धडपड करावी आणि ते करत असतानाच स्वतःच्या प्रवासाची बांधाबांध करावी. दुसरं काय? माणूस हा किती संकेतांनी जखडला गेलेला असतो पाहा! ' प्रवास ' शब्द उच्यारला की पाठोपाठ ' बांधाबांध ' हाच शब्द डोक्यात येतो. ' इथून-तिथे ' या दोन शब्दातलं अंतर जोपर्यंत' मैलात ' मोजता येतं, तोपर्यंतच बांधाबांध ह्या शब्दाला अर्थ आहे. पण जिथे मैलांचा हिशोब नाही तिथं डागांचाही नाही. एकदम ट्रॅव्हल लाईट! पण परंपरेने बांधलेले आपण, प्रवास म्हटलं की विचार सामानाचा, बरोबर काहीतरी न्यावं लागतं हेच मनावर बिंबलेलं. त्याला कोण काय करणार? पाच वर्षाच्या मुलालाही आपण छोटी पिशवी देतो आणि ' हिला सांभाळायचं ' असं सांगतो. नंतरच्या आयुष्यात मात्र आपण गळ्यात पडणाऱ्या पिशव्या कशा झटकता येतील ह्याचा विचार करीत राहतो. फार मजा वाटते. फनी वाटतं. आपला मुलगा एखादं वाक्य उलटून बोलला की संताप येतो. कारण  ' उलटून बोलायचं नसतं ' अशी एक पिशवी आपण त्याच्या गळ्यात कधीच लटकवलेली असते. अशा तऱ्हेच्या  भ्रामक, खुळचट पिशव्या आपण बाळगतो. पाप-पुण्य, नीती-अनीती, श्त्री-पुरुष सहवास, व्यसनं..... कितीतरी! अशाच कुणाला तरी आपण केव्हा केव्हा खूप दिवसांनी पाहिल्यावर विचारतोही, ' एवढे थकल्या सारखे, ओढल्यासारखे का दिसताय? त्याच्या खांद्यावरच्या पिशव्यांची त्यालाही जाणीव नसते, तो म्हणतो, ' तसा आता मी बरा आहे, पण मधून मधून एकदम थकवा येतो. थकवा कशाचा असं विचारलं तर सांगता येणार नाही. "

वपुर्झा /133/Surendra / 26062025

मंगळवार, २४ जून, २०२५

" मनाची ताकद मनालाच कुणीतरी दाखवायची असते."

" मनाची ताकद मनालाच कुणीतरी दाखवायची असते."

                                  000o000

                " प्रत्येक जुन्या अनुभवाला नव्याने सामोरे जाण्याची एक कला असते. आयुष्य म्हणजे पुनरूक्ती. ब्रेकफास्ट, आंघोळ, दुपारचं जेवण, त्यासाठी स्वयंपाक, आलटूनपालटून त्याच भाज्या, आमटी, तीच कणिक, त्याच पोळ्या. मग एखादी डुलकी, पून्हा दुपारचा चहा. परत रात्रीचं जेवण. मग झोप. हा झाला एक दिवस. प्रति क्षणी नवा जन्म घेण्याची शक्ती फक्त मनाजवळ असते. पण त्याला ते शिकवावं लागतं. मनाची ताकद मनालाच कुणीतरी दाखवायची असते. त्याने ती उचलली की मग सगळं सोपं असतं. मग ते मनच तुम्हाला एक आयुष्य पुरणार नाही इतक्या युक्त्या शिकवत. ते मन मग लेखकांला कथानक पुरवत, कवीला शब्द सुचवतं, संगीतकारला चाल, नर्तकाला पदन्यास, शात्रज्ञाला शोध, साध्यासुध्या, सर्वसामान्य बाईचं आदर्श गृहिणीत रूपांतर कसं करायचं, हेही मनच शिकवतं. श्त्रीची गृहिणी होणं, ही सुद्धा कलाकृतीच आहे. "

वपुर्झा /126/Surendra / 25062025

" माणसाच्या स्वभावातली एखादी छटा म्हणजे तो संपूर्ण माणूस नाही."

" माणसाच्या स्वभावातली एखादी छटा म्हणजे तो संपूर्ण माणूस नाही."

                                  000o000

                " माझी संसाराची व्याख्याच निराळी आहे. एकमेकांचे वाभाडे काढण्यासाठी किंवा वर्मावर चोची मारण्यासाठी संसार करायचा नसतो. जिथे जोडीदार कमी पडेल तिथे आपण उभं रहायचं. मी तुला स्वीकारलं ते तुझ्या वलयासहित स्वीकारलं. माणसाच्या स्वभावातली एखादी छटा म्हणजे तो संपूर्ण माणूस नाही. एखाद्या क्षणी, एखादी भावना अनावर होते. का? ह्याचं उत्तर ज्याचं त्याच्या जवळ नसतं. भावनांचे तिढे आपण बुद्धीने सोडवायला बघतो आणि बुद्धी्वादाने कठोर प्रश्न सोडवायचे असतात, तिथं भावनेचा घोळ घालतो. ही भावनेची बुद्धीवरआणि बुद्धीची भावनेवर अवेळी पडणारी झापडच असते. झापड उडायच्या आत माणूस संसारात पडतो, आणि जाग येण्यापूर्वी संसार संपलेला असतो. "

वपुर्झा /124/Surendra / 24062025

सोमवार, २३ जून, २०२५

" ओझं दिसतं कारण ते लादलेल असतं. जबाबदारी स्वीकारलेली असते."

" ओझं दिसतं कारण ते लादलेल असतं. जबाबदारी स्वीकारलेली असते."                             

                                  000o000

                '  संसार ही जबाबदारी असते. त्याचं ओझं वाटायला लागलं, की आनंद संपला. ' ' जबाबदारी आणि ओझं, ह्यातला नेमका फरक काय? ' " ओझं म्हणजे खांद्यावर दिलेला बोजा. पण कधी कधी दहा-बारा हजारांचा एखादा दागिना सांभाळायचा असतो. ते इतरांनाही माहीत नसतं. त्याला जबाबदारी म्हणतात. आयुष्यात प्रेम, मैत्री, संगोपन, शुश्रुषा ह्या सगळ्या जबाबदाऱ्या. त्यांचं ओझं वाटली की सहजता गेली. " ओझं हीदेखील जबाबदारी नसते का? " " ओझं दिसतं कारण ते लादलेल असतं. जबाबदारी स्वीकारलेली असते. ओझं बाळगणाऱ्याला कदाचित मदतीचा हात मिळतो. तसं जबाबदारीचं नसतं. "

वपुर्झा /117/Surendra / 23062025

शनिवार, २१ जून, २०२५

"ह्यातला कोणता माणूस खरा? कोणता खोटा? "

"ह्यातला कोणता माणूस खरा? कोणता खोटा?"                                   

                                  000o000

                "  मान्य करा अथवा करू नका, माणसाला सतत काही ना काही थरारून टाकणार हवं असतं. ' माणूस ' कोणतीही व्याख्या, गणित, न्यायशात्र, मानसशांत्र आणि तर्कशात्र ह्या सगळ्यातून ' निसटण्याचं शात्र ' शिकल्याप्रमाणे पळणारा वा निसटणारा प्राणी. वर्तमानपत्रातील भयानक बातमी वाचून तो थरारतो. खून, आत्महत्या म्हटलं की हळळतो. महापुराच्या बातम्या पाहून तो परमेश्वराचा उद्धार करतो. अत्याचार, बलात्कार, लाचलुचपत, खुर्चीसाठी पागल झालेले पुढारी पाहून त्याची झोप उडते. तो शिव्यांची लाखोली वाहती. आणि हाच माणूस पेपर उघल्याबरोबर जर ह्या पैकी काही सापडलं नाही तर म्हणतो, " आज पेपरमध्ये काहीच नाही ". ह्यातला कोणता माणूस खरा? कोणता खोटा? " 

वपुर्झा /113/Surendra / 22062025

" दुःखातली व्यक्ती रडणं एका क्षणात विसरू शकत नाही."

" दुःखातली व्यक्ती रडणं एका क्षणात विसरू शकत नाही."                                         

                                  000o000

                "  सांत्वनासाठी आजवर जगात कुणालाही शब्द सापडलेनसतील. सांत्वन म्हणजे दुःखाचं मूल. मूल आईपेक्षा मोठ कसं होईल? मूल मोठ व्हायला लागलं की आई आणखी मोठी व्हायला लागते. म्हणून, समजूत घालणारे कुणी भेटलं म्हणजे हुंदके वाढतात. हसता हसता माणूस एका क्षणात थांबू शकतो. दुःखातली व्यक्ती रडणं एका क्षणात विसरू शकत नाही."

वपुर्झा /101/Surendra / 21062025(2)

शुक्रवार, २० जून, २०२५

" जगण्यासाठी प्रयोजन मिळालं की माणूस जगतो."

"      जगण्यासाठी प्रयोजन मिळालं की माणूस जगतो."                                               

.                                   000o000

                "   जगण्यासाठी प्रयोजन मिळालं की माणूस जगतो. तो प्रयोजन शोधत असतो. बायको, प्रेयसी, मुलबाळं, नोकरीं, पत, प्रतिष्ठा, पैंसा, वाहन, कीर्ती, मानसन्मान.... जितके डबे जोडता येतील तितके जोडायचे, व्याप वाढत गेला की बँकर्स शोधायचे. घाट संपला की जरजेपुरते जोडलेले बँकर्स सोडून द्यायचे. त्याच पळापळीत, गरज संपली आणि हौस भागली की आपल्यालाही तोडणारे भोवती असतात. पुन्हा एकाकीपण सुरु. अशा एकटेपणात ज्या माणसाकडे त्यांचं जगण्याचं प्रयोजन स्वतःच्या हातात नसतं, त्या माणसांच्या. ' ने रे पांडुरंगा ' च्या आरोळ्या सुरु होतात. " 

वपुर्झा /101/Surendra / 21062025

गुरुवार, १९ जून, २०२५

" Birds of the same feathers flock together म्हणतात, ते उगीच नाही. "

"  Birds of the same feathers flock together म्हणतात, ते उगीच नाही. "

                           000o000

                "   स्वतःची अस्मिता कधी टिकवता येते? तर मित्राच्या अस्मितेची जेव्हा सखोल जाणीव असते तेव्हा. ती जाणीव असली म्हणजे चारचोघात आपल्या मित्राशी वा मैत्रिणीच्या बाबतीत कस वागायचं, बोलायचं हे आपोआप समजतं. आयुष्यभर माणूस समानधार्मियांच्या शोधात असतो. Birds of the same feathers flock together म्हणतात, ते उगीच नाही. मैत्रीत न पटणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची शक्ती मिळवायची असते. वेगवेगळ्या प्रसंगी आपलं वर्तन कसं होतं आणि तीच परिस्थिती मित्र कशी हाताळतो इकडे भान हवं. त्याचं चुकलं तर कान पकडण्याचा अधिकार मिळवायचा असतो आणि त्याचं बरोबर वाटलं तर अनुकरण करण्याचा मोठेपणा कमवावा लागतो. "

वपुर्झा /101/Surendra /20062025

बुधवार, १८ जून, २०२५

" माणसाचं मनं फार विचित्र असतं "

"  माणसाचं मनं फार विचित्र असतं "           

.                .     .000o000

                "   माणसाचं मनं फार विचित्र असतं. आपण एखाद्या माणसाला भेटायला जातो, तेव्हा त्या आजारी माणसाला त्याची विचारपूस केल्याचा आनंद प्रत्येक वेळी मिळतोच असं नाही. त्याच्या मनात हा भेद कायम असतो की भेटायला येणाऱ्या माणसाचं विश्व हे निराळ विश्व आहे.      धडधाकडं माणसाचं विश्व ते! आपलं आजारी माणसाचं विश्व वेगळं, हा विचार त्याला कायम सतावतो. आजारी माणूस इतरांशी चिडल्यासारखा वागतो त्याचं हेच कारण. त्या आजारी माणसाला जेव्हा त्याच्याहीपेक्षा गंभीर अवस्थेतला रोगी दिसतो तेव्हा त्याला खरं समाधान होतं. एरवी इतर    धडधाकडं माणसं व आपण ह्यांत फार मोठ अंतर पडलं आहे आणि जे काही बरे वाईट व्हायचं आहे ते आपलं होणार आहे. धडधाकडं माणसं शाबूत राहणार आहेत हया विचारांपाई तो चिडचिडा व अगतिक झालेला असतो. आणि थोड्याफार फरकाने संकटात सापडलेला माणूस हा आजारी माणसासारखाच असतो. त्याला सहानभूती नको असते. त्याला आपल्यापेक्षा मोठ्या संकटात सापडलेला माणूस पाहायला हवा असतो. आपली अवस्था इतरांपेक्षा वाईट आहे हया विचारापेक्षा आपली अवस्था आपल्याला वाटली होती तेव्हडी वाईट नाही हा विचारच त्याला तारून नेतो. "

वपुर्झा /98/Surendra / 18062025

गुरुवार, १२ जून, २०२५

" नव्या उमेदीने, मागे पाहत पाहत प्रवास चालू असतो, ठेवावा लागतो."

 " नव्या उमेदीने, मागे पाहत पाहत प्रवास चालू असतो, ठेवावा लागतो." 

                           000o000

                "   वर्तमानकाळ बोलायचा नसतोच. तो जगायचा असतो. माणसं बोलतात ती भूतकाळाबद्दल. त्यातला त्यात   दुःखाच्या हकीगती. त्याचीच उजळणी. दुःख जितकं जुनं तितकं त्याला जास्त पॉलिश. झाडाझुडपात फुलं जशी उगवतात तशी ती बघायची नाहीत. वेगवेगळ्या आकाराची भांडी आणायची. त्या भांड्यात बाणांची शय्या करायची. आणि मग कर्दळीच्या पानापुढे निशिगंधाला ताटकळत ठेवायचं, आणि आफ्रिकन लिलीच्या घोळक्यात गुलाब रोवायचे. त्या काट्यानंच्या शय्येवर फुलांना.     डुलायला लावायचं. म्हणायचं इकेवाना. तशी जुनी दुःख जास्त आकर्षक करायची. ती अनेकदा सांगून सांगून निरूपणाला नेमकेपणा आलेला असतो. त्या दुःखाचा इकेवाना करायचा. झाडं तसं करत नाहीत. फुललेल्या फुलाच्या पाकळ्या गळत असतांनाच इकडे देठाला नवा हुंकार उमटत असतो. मोठ्या आघातांसाठी माणसाच्या मनाची तयारी झालेली असते आणि तशा प्रसंगी सावरणारेही अनेक भेटतात. छोटे छोटे आघात असंख्य असतात. ते एकट्याला गाठून हताप्रभ करतात. त्यात वाटेकरी नसतात. ते एकट्याने सोसायचे! माणूस थांबतो, शिणून जातो, खचतो. पण पुन्हा सावरतो. तो शिणवटा कुणाला कळत नाही, सावरणही समजत नाही! नव्या उमेदीने, मागे पाहत पाहत प्रवास चालू असतो, ठेवावा लागतो.

वपुर्झा /96/Surendra /13062025

मंगळवार, १० जून, २०२५

" साधे प्रश्न आपण गहन करतो आणि मग जी समस्या निर्माण होते, तिचे बळी होतो. "

"  साधे प्रश्न आपण गहन करतो आणि मग जी समस्या निर्माण होते, तिचे बळी होतो. "

                          000o000

                "   आपली मुलं म्हणजे आपले खरे परीक्षक असतात. आई, वडील म्हणजेच नवरा - बायको आपण होऊन एका ठिकाकाराला जन्माला घालतात. ती मुलं परखडपणे कुणाचं चुकतं हे अचूक सांगतात. आपण त्यांना  ' तुला अक्कल नाही ' म्हणून गप्प बसवतो. " त्यांना अक्कल असते का? " नसते म्हणूनच ती खरं बोलतात. अक्कल वाढली की अहंकार वाढतो. आडमुठेपणा रक्तात वाहतो. खरं आणि खोटं ह्यांत जे सूक्ष्म अंतर आहे तिचं मतलब साठू लागतो. पुढे त्यात स्वार्थाची भर पडते. मुलांनामग कुणाची बाजू घ्यायची ते कळायला लागतं. मुलं सबजेक्टिव्हली बोलत नाहीत. ऑब्जेक्टिव्हली बोलतात. हयाउलट आपणस सबजेक्टिव्हली जगतो. " आपण कसे जगतो ह्याचाच पत्ता लागत नाही. आपण सगळे ' डिप्लोमॅटिक ' कडून ' ऑटोमॅटिक 'कडे दौड करीत आहोत. आपल्यातला माणूस झपाट्याने नाहीसा होत आहे. साधे प्रश्न आपण गहन करतो आणि मग जी समस्या निर्माण होते, तिचे बळी होतो. डिप्लोमॅटिकली प्रश्न विचारले की ऑटोमॅटिकली उत्तरं मिळतील ह्या भ्रमात आपण वावरतो. मुलांचा उपयोग मग  ' साथीदारा ' ऐवजी आपण                ' साक्षीदारा ' सारखा करतो. मुलंही मग ' कल ' पाहून बोलायला शिकतात " चार अपशब्दांपेक्षा अनावश्यक - अनुकंपा ही कोणत्याही धारदार शस्त्र्यापेक्षा जास्त तीक्ष्ण असते.                   

 "वपुर्झा /97/Surendra / 11062025

" अनेक घरातून स्वत:चेच नातेवाईक सांगूनसुद्धा ऐकत नाहीत. असं का घडत असावं?

 " अनेक घरातून स्वत:चेच नातेवाईक सांगूनसुद्धा ऐकत नाहीत. असं का घडत असावं?

                           000o000

                "  लोकशाही तत्व म्हणून ठीक आहे. पण देशाचा कारभार करायचा म्हणजे शिस्तीचा बडगा हवाच. जिथे संस्कारच नसतात तिथे बडगाच हवा. आपल्या स्वतःच्या घरात ज्यांना आपण रक्ताचे नातेवाईकमानतो तिथेसूद्धा काही गोष्टी मनासारख्या व्हायला हव्या असतील तर, घर चालवणाऱ्या माणसाला अधूनमधून रुद्रावतार धारण करावाच लागतो. आपल्या नवऱ्याला किंवा बायकोला किंवा आईवडिलांना आपण अमुक तऱ्हेने वागलो तर आनंद होणार आहे, गैरसोय होणार नाही, ह्या समजुतीने वागणारी माणसं फार थोडी. अनेक घरातून स्वत:चेच नातेवाईक सांगूनसुद्धा ऐकत नाहीत. असं का घडत असावं? आणि तेही स्वतःच्याच माणसांकडून? कारण झोॅंडगिरीने वागलं तरी ते खपवून घेतलं जातं ह्याची खात्री आहे म्हणून. ह्याच वृत्तीने देशातली माणसं वागतात. "

वपुर्झा /223/Surendra /10062025

सोमवार, ९ जून, २०२५

" कदाचित तुझं अस्तित्व तुझ्या हयातितच संपल्याच तुला पाहावं लागेल."

"  कदाचित तुझं अस्तित्व तुझ्या हयातितच संपल्याच तुला पाहावं लागेल."

                          000o000

                "   कथाकथनाचा कार्यक्रम संपल्यावरचे क्षण कसे असतात? हे आयुष्यातले शून्य क्षण, मुक्त क्षण नव्हेत. शून्यातून सगळं निर्माण झालं म्हणतात. पण हे निर्मितीक्षम शून्य नव्हे, हे तुम्हाला उजाड, एकाकी, पोरक करणार शून्य. तुमच्यावर जिवाभावाने, उत्कटतेने तुटून पडणार कुणीतरी सानिध्यात असणं ही त्या शून्याची गरज. त्याने बोलू नये, काही सांगू नये, काही विचारू नये. स्तुती नको, कार्यक्रमाचं कौतुक नको, त्याने फक्त असावं. त्या शून्य मन:स्थितीत पुन्हा कार्यक्रम सुरु झालेला असतो. उणिवांचा मागोवा घेत उलट्या प्रवासाचा आरंभ असतो. कधी कधी काहींच नसतं. आपण फक्त असतो. कधी कधी हे क्षण चिरंतन स्वरूपाचे पण स्वतःचीच साधना नसल्या मुळे, उत्तरं हरवलेले प्रश्न सामोरं उभे करतात. हे सगळं काय आहे?, का आहे?, कधी सुरु झालं?, कधी संपणार?, मागं काय उरणार?, किती काळ उरणार?, वरवरची उत्तरं तयार असतात. हे सगळं काय आहे ह्याचं आकलन तुला होणार नाही. तू गप्प राहा. का आहे? - सांगता येणार नाही. कारण तू ह्याचा निर्माता नाहीस. हे कधी सुरु झालं? - तुझ्या जन्मापासून हे सुरु झालं. महापालिकेच्या पिवळ्या कागदावर तुझी जी जन्मतारीख आहे, तो जन्म नव्हे, ती केवळ तू कायद्याने  ' सज्ञान ' कधी झालास ह्याच्या तपासणी साठी किंवा उलटतपासणीसाठी आवश्यक असलेली नोंद. त्यातला ' सज्ञान ' हा शब्द संपूर्ण अज्ञान दर्शवणारा. कॅलेंडरवरचे छापील चौकोन मागे पडल्याने माणूस सज्ञान होतो काय?. ज्या दिवशी तुझ्या जाणिवांचा प्रारंभ झाला तो तुझा जन्म. तो दिवस टिपता येईल?- नो.नेमक्या कोणत्या दिवशी गर्भ राहिला हेही सांगता येत नाही. तरीही समज, जाणिवा जाग्या झाल्या त्या दिवसापासून हे चक्र फिरू लागलं. कधी संपणार?- तुझ्या शेवटच्या श्वासाबरोबर. मागं काय उरणार?- काही नाही. तुझ्या पश्चात तुझं अस्तित्व किती? इतरांच्या जाणिवा जितके दिवस राहतील तितके दिवस. कदाचित तुझं अस्तित्व तुझ्या हयातितच संपल्याच तुला पाहावं लागेल. 

"वपुर्झा /222/Surendra / 10062025

शनिवार, ७ जून, २०२५

' कुठे शोधशी रामेश्वर अन!कुठे शोधिशी काशी!'

 ' कुठे शोधशी रामेश्वर अन!कुठे शोधिशी काशी!' .          000o000.    

   "  आपल्याला स्वतःला एखाद निरपेक्ष काम करतांना, अंतरंगातून शांतीचे झरे वाहत आहेत किंवा निःस्वार्थीपणाने कुणासाठीही कोणतंही काम करतांना किंवा ' श्रेयस ' आणि ' प्रेयस ' ह्यांत स्वतचं काही ना काही प्रमाणात नुकसान होत असतांनासुद्धा तटस्थपणे श्रेयसची निवड करता आली, म्हणजे आपण आपले गुरु होतो. ह्याचाच अर्थ गुरुचं वास्तव्य आपल्यातच चोवीस तास असतं. आपल्याला त्याचं भान नसतं किंवा भान असूनही आपण ' प्रेयस ' ला प्राधान्य दिलं की गुरुत्वापासून लांब जातो. कोणतीही कृती करत असतांना आपण ती का करीत आहोत, त्यात जिव्हाळा किती, नाटक किती, उमाळा किती आणि नाईलाजास्तवता किती, समाजात प्रतिष्ठा मिळवण्यासाठी किती आणि शुद्ध सात्विक भाव किती, हे ज्याचं त्याला माहीत असतं. अशा अनेक प्रसंगी  स्वतःचं स्वतःला होत, ते ज्ञान! ' ज्ञान म्हणजेच गुरु ' ज्याची व्याख्या करता येते, त्याला       ' माहिती ' म्हणतात. ' परमात्मा तुमच्यातच आहे' असं म्हणतात.  ' कुठे शोधशी रामेश्वर अन!कुठे शोधिशी काशी!'  ह्या कवितेत पाडगावकरांनी  ' हृदयातल्या उपाशी राहिलेल्या परमेश्वरावर  ' अचूक बोट ठेवलेलं आहे. मग जसा परमात्मा बाहेर शोधायचा नसतो, तसा गुरुही! असं जर असेल तर मी स्वतः कायम गुरुपदावर का राहू शकत नाही? संभ्रम आणि द्वंद्व हेच ह्याचं कारण!

 वपुर्झा /183/Surendra /07062025

शुक्रवार, ६ जून, २०२५

"माणूस जेवढा जवळचा, तेवढा त्याचा बाण जास्त जहरी. "

"माणूस जेवढा जवळचा, तेवढा त्याचा बाण जास्त जहरी. "

                          000o000

                "   हत्या करण्यासाठी कागदी बाणही चालतो, नव्हे, तोच जास्त विषारी असतो. वाग्बाणासारखा. धनुष्यावरचा बाण तुम्हाला कायमची चिरनिद्रा देऊन तुम्हाला मुक्त करतो. वाग्बाण निद्रा घालवतो आणि तुमच्या स्मृती जितकी वर्ष टवटवीत राहतील, तितकी वर्ष तुमची हत्या करीत राहतो. माणूस जेवढा जवळचा, तेवढा त्याचा बाण जास्त जहरी. "

वपुर्झा /183/Surendra / 06062025(2)

" मैलाच्या दगडापाशी ' सब घोडे बारा टक्के'. "

"  मैलाच्या दगडापाशी ' सब घोडे बारा टक्के'. " 

                          000o000

                "  समोरच्या माणसाचं मार्गदर्शन हे तुम्हाला हव्या असलेल्या किंवा पेलणाऱ्या रस्त्याच मार्गदर्शन नव्हे. तो स्वतः ज्या मार्गांवरून चालत आलेला आहे, त्यातून त्याने काढलेला तो निष्कर्ष आहे. म्हणूनच मला वाटतं, मार्गदर्शन हा प्रकार खऱ्या अर्थानें संभवतच नाही. आपल्या वृत्ती वेगळ्या, आयुष्य वेगळं, पूर्वानुभव वेगळे, समस्या वेगळ्या. मग त्यांची उत्तरं दुसऱ्याजवळ कशी असतील? चार रस्त्यापैकी बडोद्याला जाणारा रस्ता कोणता, हे दर्शविणारा बाण आणि खालचा मैलाचा आकडा हेच खरे मार्गदर्शक. इथं तुमच्या वृत्तीचा, अहंकाराचा, आज्ञानाचा प्रश्न येत नाही. हया रस्त्याऐवजी दुसरा रस्ता बडोद्याला का जातं नाही? हाही प्रश्न विचारता येत नाही आणि परीक्षेत जसे मार्क्स वाढवून मिळतात, तसें इथे मैल कमी करता येत नाहीत. मैलाच्या दगडापाशी ' सब घोडे बारा टक्के'. " 

वपुर्झा /182/Surendra / 06062025

मंगळवार, ३ जून, २०२५

' लग्नाची आमंत्रणपत्रिका म्हणजे संपूर्ण संसाराच चित्र नव्हे. "

 ' लग्नाची आमंत्रणपत्रिका म्हणजे संपूर्ण संसाराच चित्र नव्हे. "

                           000o000

                " कोमलतेत ताकद असते ती ही अशी. पावसाचं पाणी तर आकाशातून पडतं. माती वाहून जाते, नद्यांना पूर येतात, भलेभले खडक झिजतात. पाणी वाहतच राहते. फुलही पाण्यासारखीच कोमल असतात. एक दगड भिरकावला तर दहा  - बारा फुलं खाली पडतात. ज्या दगडामुळे फुलं वेचायला मिळाली तो दगड कोणी घरी आणत नाही. आपण फुलंच आणतो. ती कोंमजतात. पण              ऐवढ्याश्या आयुष्यात तुम्हाला सुगंधच देतात. फुलांचं आयुष्यच अल्प. पाण्यामध्ये सामर्थ्य कुठून येत, ह्याचा विचार केला तर कळेल की त्यामागे सातत्य असतं. प्रवाहात एखादा खडक आला तर पाणी त्याच्याशी झुंज देत बसत नाही, थांबत नाही, स्वतःची वाट शोधून बाजूने निघून जातं. ह्या वाहण्याला सातत्य असल्यामुळेच खडक हळूहळू लहान होत जातो आणि प्रवाह रुंदावत जातो. सातत्य म्हणजे काळ. काळचं सामर्थ्य मोजता येणार नाही. अशा जबरदस्त शक्तीची साथ एवढ्याश्या दिसणाऱ्या जलधारेच्या पाठीशी असते. संसारात जोडीदार कसा असेल, त्याची साथ मिळेल की नाही, दोघांच्या संवेदना एकरूप होतील की भिन्न असतील ते सांगता येणं अशक्य आहे. लग्नाची आमंत्रणपत्रिका म्हणजे संपूर्ण संसाराच चित्र नव्हे.         मंगलंपत्रिकेतले शब्द वर्षानुवर्षे तसेच राहतात. त्यांचा दगड होतो, म्हटले तरी चालेल. संसारातले शब्द रोज बदलत जातात. कोणतेही शब्द ऐकावे लागले तरी जर त्या           स्त्रीजवळ त्या शब्दाच रूपांतर गीतात करायचं सामर्थ असेल, तर ती एक जलधाराच. साथीदाराला सुधारण्याच्या खटाटोप नको. त्याच्या दृष्टिकोनातून त्याचं वागणं योग्यच असतं. तिथे डोकं आपटत बसण्यापेक्षा त्याला वळसा देऊन पुढे जाणं चांगलं. "

वपुर्झा /181/Surendra /03062025