विचार शृंखला :108 : 01112025
109) एक काळ असा होता की, आपल्या आई-वडिलांचा केंद्राबिंदू आपणच होतो. अपत्यसंगोपन हा त्यांचा विसावा, छंद आणि ध्येय होतं. आपलं मूल आपल्याला दुरावेल का?- हा प्रश्न त्यांना कधी पडला नाही. आपल्या मुलांसाठी आज आपण वेळ देत आहोत का? मुलांपलीकडे आपल्या आनंदाच्या जागा कोणत्या आहेत? त्यांचे आणि आपले आनंद एकच आहेत का? आईबाप म्हणून आपण त्यांचा विश्वास कमावला आहे का? तसं नसेल, तर ते अस्थिर आहेत. अस्थिर माणसं जशी बारमध्ये सापडतात तशी सिद्धिविनायकाच्या रांगेतही. अर्थहीन श्रद्धाही व्यसनासारखीच. जित्याजागत्या माणसांशी संवाद संपला की हे तकलादू आधार शोधावे लागतात. "
वपूर्झा/सुरेंद्र/01112025