मंगळवार, ३ जून, २०२५

' लग्नाची आमंत्रणपत्रिका म्हणजे संपूर्ण संसाराच चित्र नव्हे. "

 ' लग्नाची आमंत्रणपत्रिका म्हणजे संपूर्ण संसाराच चित्र नव्हे. "

                           000o000

                " कोमलतेत ताकद असते ती ही अशी. पावसाचं पाणी तर आकाशातून पडतं. माती वाहून जाते, नद्यांना पूर येतात, भलेभले खडक झिजतात. पाणी वाहतच राहते. फुलही पाण्यासारखीच कोमल असतात. एक दगड भिरकावला तर दहा  - बारा फुलं खाली पडतात. ज्या दगडामुळे फुलं वेचायला मिळाली तो दगड कोणी घरी आणत नाही. आपण फुलंच आणतो. ती कोंमजतात. पण              ऐवढ्याश्या आयुष्यात तुम्हाला सुगंधच देतात. फुलांचं आयुष्यच अल्प. पाण्यामध्ये सामर्थ्य कुठून येत, ह्याचा विचार केला तर कळेल की त्यामागे सातत्य असतं. प्रवाहात एखादा खडक आला तर पाणी त्याच्याशी झुंज देत बसत नाही, थांबत नाही, स्वतःची वाट शोधून बाजूने निघून जातं. ह्या वाहण्याला सातत्य असल्यामुळेच खडक हळूहळू लहान होत जातो आणि प्रवाह रुंदावत जातो. सातत्य म्हणजे काळ. काळचं सामर्थ्य मोजता येणार नाही. अशा जबरदस्त शक्तीची साथ एवढ्याश्या दिसणाऱ्या जलधारेच्या पाठीशी असते. संसारात जोडीदार कसा असेल, त्याची साथ मिळेल की नाही, दोघांच्या संवेदना एकरूप होतील की भिन्न असतील ते सांगता येणं अशक्य आहे. लग्नाची आमंत्रणपत्रिका म्हणजे संपूर्ण संसाराच चित्र नव्हे.         मंगलंपत्रिकेतले शब्द वर्षानुवर्षे तसेच राहतात. त्यांचा दगड होतो, म्हटले तरी चालेल. संसारातले शब्द रोज बदलत जातात. कोणतेही शब्द ऐकावे लागले तरी जर त्या           स्त्रीजवळ त्या शब्दाच रूपांतर गीतात करायचं सामर्थ असेल, तर ती एक जलधाराच. साथीदाराला सुधारण्याच्या खटाटोप नको. त्याच्या दृष्टिकोनातून त्याचं वागणं योग्यच असतं. तिथे डोकं आपटत बसण्यापेक्षा त्याला वळसा देऊन पुढे जाणं चांगलं. "

वपुर्झा /181/Surendra /03062025

रविवार, १ जून, २०२५

" माणूस असाच आयुष्यभर एकटाच असतो."

"  माणूस असाच आयुष्यभर एकटाच असतो."

                          000o000

                "  समस्या नावाची वस्तूच अस्तित्वात नसते. एक विशिष्ट परिथिती निर्माण होते आणि माणसाने तारतम्याने वागायचं असतं. त्याचप्रमाणे एक माणूस दुसऱ्या माणसाच्या संदर्भात एका ठराविक मर्यादेपर्यंत विचार करू शकतो किंवा मदत करू शकतो. म्हणून एव्हड्यासाठीच कुणालाही बदलण्याच्या खटाटोपात माणसाने पडू नये. असह्य झालं तर अलिप्त व्हावं, उपदेशक होऊ नये. दुसऱ्याचे प्रश्न सोडवतांना तुम्ही त्याची बुद्धी वापरून, त्या समस्येंकडे कधीच बघू शकत नाही. तुम्ही तुमचाच तराजू वापरता. माणूस असाच आयुष्यभर एकटाच असतो. दोन मुलांपैकी एका मुलाला आमटी तिखट लागते आणि दुसऱ्याला सौम्य वाटते, हे चूक की बरोबर कुणी ठरवायचं? ".

वपुर्झा /180/Surendra / 01062025

शनिवार, ३१ मे, २०२५

' सर्वेSपि सुखिन: संतु '

  ' सर्वेSपि सुखिन: संतु '

                           000o000

                " आपल्या समोर छोटी छोटी संकट येतात. कुणाचा ना कुणाचा आधार मिळतो, आपण सावरतो. आपण सावरलो तरी मनावर उमटायचे ते चरे कायम राहतात. केव्हातरी सहनशक्तीच्या शेवटच्या टोकावर पोचण्याची वेळ येतेच. स्फोट झाल्यानंतर समाज फक्त आश्यर्य व्यक्त करतो की, ' अरे, अमका तमका प्राणी असा कोसळेल असं वाटलं नव्हतं', पंचवीस- पंचवीस वर्ष संसार केल्यावर कुणी घटस्फोट घेतला की नव्वद टक्के माणसं म्हणतात, ' ह्या वयात? घटस्फोट? मग पंचवीस वर्ष काय केलं?'. पंचवीस वर्ष जास्तीत जास्त सहन केलं. आंतरपाट दूर होताक्षणी अनेकांचा प्रवास घटस्फोटच्याच दिशेने सुरु होतो. पंचवीस वर्ष संसार केलाच नाही, फक्त सहन केलं. ह्यातूनच अनेकजण दैववादी होतात. पत्रिका, कुंडल्या घेऊन सर्वत्र फिरतात. कुणाला ' मंगळ ', कुणाचा ' वक्री राहू ' असं काही ना काही ऐकतात. जप करतात, नवस बोलतात. ही अशी सगळ्यांची केविलवाणी धडपड पाहून सगळ्याच माणसांबद्दल अपार कळवळा येतो आणि प्रचीती नसतांनाही वाटतं, ' सर्वेSपि सुखिन: संतु '. "

वपुर्झा /179/Surendra /31052025

गुरुवार, २९ मे, २०२५

" भावनाप्रधान माणूस संवेदनशील व्यक्तीच्या शोधात असतो."

"  भावनाप्रधान माणूस संवेदनशील व्यक्तीच्या शोधात असतो."

                          000o000

                "  भावनाप्रधान माणूस संवेदनशील व्यक्तीच्या शोधात असतो. तेच थोड्याफार प्रमाणात बौद्धिक स्तरावर घडतं. निव्वळ शारीरिक सुखाच्या बाबतीतली माणसं आपण सोडून देऊ. भावनात्मक आणि बौद्धिक पातळीवर हवा तसा सहप्रवासी मिळाल्यावर त्याच्या विचारांची आपल्याला संपूर्ण ओळख होते. संपूर्ण ओळख झाली रे झाली की त्यातलं नावीन्य संपत. मग दुसऱ्या माणसाचा शोध. या पद्धतीनेच माणसं जोडली जातात आणि जोडलेली माणसं मागे पडतात. प्रत्येक नव्या ओळखीच्या बाबतीत ह्या माणसाकडून नवी ओळख मिळेल, नवे विचार मिळतील, या अपेक्षेने माणसं जोडण्याचा छन्द कायम राहतो. ह्या शोधातच सौख्य आहे. प्राप्तीत नाही. 

वपुर्झा /178/Surendra / 3052025

बुधवार, २८ मे, २०२५

" नोकरीं करणाऱ्या माणसाच्या बाबतीत साधे साधे निर्णय धेतांना अर्जुनापेक्षा वेगळं काय घडतं?

" नोकरीं करणाऱ्या माणसाच्या बाबतीत साधे साधे निर्णय धेतांना अर्जुनापेक्षा वेगळं काय घडतं?

                           000o000

                " सबंध आयुष्यभर आपण अशाच निरगाठी - सुरगाठी मारत असतो. ह्याचं एकच कारण, आपल्या सर्वांच्यात अर्जुनाचाच वावर सातत्याने होत असतो. नोकरीं करणाऱ्या माणसाच्या बाबतीत साधे साधे निर्णय धेतांना अर्जुनापेक्षा वेगळं काय घडतं? प्रमोशन हवं असतं, पण बदली नको असते. लिव्ह ट्रॅव्हल अलाऊन्स घेऊन खरोखरच पर्यटणाला जावं, की घरातच एखादी वस्तू खरेदी करावी? धाकडदपशा दाखवून मुलांना शिस्त लावावी की गोडीगूलाबीने? तीच गोष्ट, नवऱ्याची सिगारेट सुटायला हवी असेल, तर असहकारपुकारावा, अबोला धरावा, का प्रेमाने जिंकावं? यासारखे कुठलेच प्रश्न असं की तसं, याशिवाय सुटत नाहीत. मुलांना धाक हवा, पण त्याने दहशत घेऊन लांब जाऊ नये. नवरा चांगला आहे, पण त्याचं व्यसन नकोय. अशा छोट्या छोट्या प्रश्नांशी सामना करतचं आपलं आयुष्य संपत. "

वपुर्झा /177/Surendra /29052025

" माणूस जितका प्रतिभाशाली असतो, तितकाच तो नैराश्यवादी पण असतो."

"  माणूस जितका प्रतिभाशाली असतो, तितकाच तो नैराश्यवादी पण असतो."

                          000o000

                "  दगडलाही कधी विषाद झाल्याचं ऐकीवात नाही. याचं कारण दगडाची आणि आनंदाची सुद्धा कधी गाठभेट होतं नाही. विषादाच आकलन होण्यामागे सुद्धा ते एका आनंदाच स्मरण आहे. पण कुणाच्या बावतीत? माणूस जितका प्रतिभाशाली असतो, तितकाच तो नैराश्यवादी पण असतो. पण जड बुद्धी असलेला माणूस कधीही उदास होतं नाही. कारण आपण आहोत, त्यापेक्षा कोण होऊ शकतो, या विचाराचा त्याला स्पर्शही होऊ शकत नाही. मी आनंदातच राहू शकतो, मी आनंद निर्माण करू शकतो, असा विश्वास स्वतःच्या बाबतीत ज्या माणसाला आहे, तितका तो अंतर्यामी उदध्वस्त असतो. केव्हातरी सकाळी कोवळी उन्ह पडणार आहेत, प्रकाशाचं साम्राज्य पसरणार आहे, ह्याची ज्याला खात्री आहे, अशा माणसालाच रात्रीचा अंधार जास्त भेडसावतो. ज्याला सकाळच माहीत नाही, त्याला रात्र सुद्धा प्रकाशसारखीच वाटते. " 

वपुर्झा /176/Surendra / 28052025

मंगळवार, २७ मे, २०२५

" आत्मनस्तु कामाय सर्व प्रियम भावंती! '

" आत्मनस्तु कामाय सर्व प्रियम भावंती! '

                           000o000

                "   खोटं बोलणं हे एकदा रक्तात मुरलं, हाडं-मांस-मज्या-- रक्तवाहिन्यांप्रमाणे ' ऐनॅटॉमी' चाच एक भाग झाला की, तो खोटेपणा ज्याचा त्यालाही कळत नाही. झोपेत आणि जागेपणीचे एकूण एक व्यवहार करतांना आपण श्वास घेत आहोत, ह्याचा आपल्याला पत्ता तरी लागतो का? आपल्या एखाद्या खोट्या समर्थनाचा आपल्याला बोधही होतं नाही, इतके आपण असत्याशी एकजीव होतो. ' माझ्या जिवाची सगळी लावतोड तुमच्यासाठी होतं आहे, त्याचा तुम्हाला पत्ता तरी आहे का? हे सगळं चाललंय ते कुणासाठी? असा प्रश्न घरोघरी बायका आपल्या नवऱ्यांना विचारतात. त्याप्रमाणे, " दिवसभर नोकरीं करतोय, त्याशिवाय ब्रोकरचं काम करतोय किंवा पार्टटाईम जॉब करतोय, क्लासेस चालवतोय, ही सगळी धडपड कुणासाठी करतोय? रक्ताचं पाणी करतोय. ' असली विधाने नवरेही करतात. हा सगळा बकवास आहे. रक्ताचं खरोखरच पाण्यात रूपांतर झालं, तर ते रक्तदानच. प्रत्येकजण जाता - येता RBC/ वेबच टोटल काऊंटच्या तपासण्या करून घेईल. बायकोसाठी जीव गहाण ठेवणाऱ्या नवऱ्यापासून, त्याच्या बायकोने घटस्फोट मागितला तर? ' आत्मनस्तु कामाय सर्व प्रियम भावंती! ' हे नारदाचं वचनच खरं. नवऱ्याच्या आवडीचा पदार्थ त्याला करून वाढण्यात जोपर्यंत पत्नीला आनंद आहे, तोपर्यंतच ती तो पदार्थ करते. एकूण एक नात्यांच्या, मित्रांच्या बाबतीत हे एकमेव सत्य आहे. " 

वपुर्झा /174/Surendra /27052025(2)

सोमवार, २६ मे, २०२५

" जगावं, असं काहीतरी एक आहे ' असं वाटायला लावतात."

"  जगावं, असं काहीतरी एक आहे ' असं वाटायला लावतात."

                          000o000

                "  ' भौतिक सौख्य ' इतका मोठा शब्दही वारायचं कारण नाही. अमुक एक काम करण्यात मोठा आनंद आहे किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी गप्पागोष्टी केल्याशिवाय चैन पडत नाही. प्रत्येकाच्या वृत्तीनुसार त्याचं ' हरवण, सापडणं, हुरहूर वाटणं ' हे सगळं भावविश्व स्वतंत्र असतं. या अनंत किती तरी मित्र भेटतात. ' ह्या माणसाशिवाय मी जगू शकणार नाही ' असं वाटायला लावणारी अनेक माणसं, एक ठराविक कालखंड सुगंधित करून जातात. आयुष्याला गती देतात. ' जगावं, असं काहीतरी एक आहे ' असं वाटायला लावतात. काही- काही जणांना एका ठराविक हॉटेलमधलं जेवण आवडतं. नंतर नंतर अतिपरिचयाने म्हणा किंवा आपल्या सुखाच्या व्याख्या बदलतात, म्हणून समजू या, आपण त्याचं ठिकाणी फार काळ रमत नाही. तेच माणसांच्या सहवासाच्या बाबतीतही घडतं. स्वतःच्याच सावलीवर जो भाळला, तो फसला. " 

वपुर्झा /172/Surendra / 27052025

" प्रत्येक माणसाबरोबर एक नवा धर्म जन्माला येतो. खरं तर तो स्वभावधर्म."

" प्रत्येक माणसाबरोबर एक नवा धर्म जन्माला येतो. खरं तर तो स्वभावधर्म."

                           000o000

                "   काही माणसं तापट असतात, काही आढयतेखोर, काही घुमी तर काही गर्व करणारी, काही ऑर्थोडॉक्स तर इतर न्यूनगंडवाली, धूर्त, लबाड, लफंगी, खोटारडी, नम्र, भिऊन राहणारी, ऐदी, आळशी, सतत उसन्या पैशावर आयुष्य रेटणारी. प्रत्येक माणसाबरोबर एक नवा धर्म जन्माला येतो. खरं तर तो स्वभावधर्म. स्वभावधर्माला परिवार लाभला म्हणजेच त्याचा धर्म होतो. पाठोपाठ संघटना, युनियन. नावं संघटना पण विघटन हे त्यांचं कार्य. एकटा माणूस धार्मिक असू शकतो, पण त्याला अनुयायी म्हणजे गर्दी लाभली की तो तयार होणारा समाज धार्मिक असूच शकत नाही. "

वपुर्झा /171/Surendra /26052025

रविवार, २५ मे, २०२५

" कोण कुणाला खऱ्या अर्थाने जाणून घेत असेल? "

 " कोण कुणाला खऱ्या अर्थाने जाणून घेत असेल? "

                          000o000

                "  एका माणसाच्या समस्येवर दुसऱ्या माणसाजवळ उत्तरच नसतं. कारण सल्ला देणारा त्या समस्ये पर्यंत पोचू शकत नाही. तो स्वतःच्याच वैचारिक पातळीप्रमाणे त्या समस्ये कडे पाहतो. समस्येतून जाणाऱ्या माणसाच्या भूमिकेत तो जाऊ शकत नाही. समस्या सांगणारा माणूस अनुकूल उत्तरासाठीच अनेकांना भेटत राहतो आणि त्याला आवडणारा विचार मिळाला की त्या माणसाला ग्रेट मानून खूष होतो. हे सगळं पाहिलं की वाटतं, कोण कुणाला खऱ्या अर्थाने जाणून घेत असेल? "

वपुर्झा /170/Surendra / 25052025

शुक्रवार, २३ मे, २०२५

" भौतिक सुखाच्या मागे लागलेल्या माणसाला अधार्मिक म्हणता येणार नाही."

"  भौतिक सुखाच्या मागे लागलेल्या माणसाला अधार्मिक म्हणता येणार नाही."

                          000o000

                "  पायथ्याशीच राहण्यामध्ये कल्याण आहे, ह्याचा शोध लागला की आयुष्यात धर्माचा उगम झाला असं समजावं. प्रत्येकाची कहाणी वेगळी असेल, पहाड वेगवेगळे असतील, त्याचप्रमाणे दगडही. आपण तेच काम सत्यत्याने करत राहतो. प्रत्येक वेळेला म्हणत राहतो की, माझ्या हातून काही तरी चुकलं असेल. पुढंच्या वेळेला दुरुस्ती करू. पुन्हा यश मिळालं नाही की, माणूस केव्हातरी थकतो. ह्यात सुख असेल किंवा त्यात सुख असेल, असं म्हणत आयुष्यभर सुखामागे पळत राहतो. शेवटी हातात वैफल्यच येत. असा अनुभव आला, म्हणजे तो चिरंतन सुखाच्या शोधमागे लागतो. विफलता हेच अध्यात्म्याच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल. म्हणूनच भौतिक सुखाच्या मागे लागलेल्या माणसाला अधार्मिक म्हणता येणार नाही. शाश्वत सुखाचीच ती चुकलेली वाट आहे. "

वपुर्झा /170/Surendra / 24052025

" श्वास घेणं आणि सोडणं ह्याला जगणं म्हणत नाहीत."

" श्वास घेणं आणि सोडणं ह्याला जगणं म्हणत नाहीत." 

                           000o000

                "   महाराज किंवा सिद्ध पुरुषांचीच उदाहरणं कशासाठी हवीत? आपले मित्र, नातेवाईक, पत्नी, पती, आपली स्वतःची मुलं, ह्यांच्या समस्या, गाऱ्हाणी, अडचणी ऐकतांना आपल्याला काही त्यांच्या पातळीयर्यंत जाता येत नाही. त्यांची समस्या सोडवण अंतरावरच राहतं. त्या व्यक्तीला काय म्हणायचं आहे, हे शांतपणे ऐकून घ्यायलाही आपल्याला सवड नसते किंवा इच्छा नसते. ' काय करणार?' माणसाचा स्वभाव बदलतो का? ' तुम्ही सहन करायला शिका ' असं सांगणं म्हणजे एक तर पळवाट झाली किंवा आपली तेव्हडी कुवत नाही, हाच त्याचा अर्थ झाला. ऐकणारा माणुसही मग कधी कधी, ' तुम्हाला नुसतं सांगायला काय जातं? चार दिवस माझ्या घरी या आणि ' बायकोच्या ' किंवा ' नवऱ्याच्या ' सहवासात राहून दाखवा' -असं म्हणतो.  ह्या त्याच्या पत्रिपादनातच आपण त्यांच्या पातळीयर्यंत जाऊ शकलो नाही, असा अर्थ होतो. ह्याचं एका कारणासाठी एखादी प्रिय व्यक्ती ' हे जग सोडून गेली' तर' आत्मा अमर आहे ' ह्या आध्यात्मिक पातळीवरचं समर्थन सात्वनापर्यंत पोचत नाही. गड्या, आयुष्य खूप साधं असतं. कधी कधी खूप रटाळ असतं. आयुष्याचा महोत्सव करता आला पाहिजे. श्वास घेणं आणि सोडणं ह्याला जगणं म्हणत नाहीत. प्रत्येक श्वास घेताना आसमंतातल्या सुगंधाचा प्रत्यय आला पाहिजे.' म्हणजे नेमक काय करायचं? ' परमेश्वराने प्रत्येक माणसाला एक स्वर देऊन पाठवलेलं आहे. अंतर्मनातल्या वीणेवर तो सूर सतत वाजत असतो. बाहेरच्या गोंगाटाकडे थोडं दुर्लक्ष केलं म्हणजे तो सूर ऐकू येतो. तो सूर ऐकू आला म्हणजे जीवन महोत्सवासारखंच होतं "

वपुर्झा /170/Surendra /23052025

बुधवार, २१ मे, २०२५

" परिवाराच्या चेहऱ्यावर आनंद पाहणं, ही एकमेव कसोटी "

" परिवाराच्या चेहऱ्यावर आनंद पाहणं, ही एकमेव कसोटी "

                          000o000

                "  संसारात आनंदी वातावरण जो ठेवू शकतो, त्याला मी आत्मवान समजतो. मनात शांती असेल वा नसेल, पण वातावरण आनंदी ठेवणं आपल्या हातात आहे. ह्यासाठी दिनरात कोशिश करणारा अंतर्यामी शांत आहे, असं कधीच होणार नाही. संसार ही सर्वात अवघड कला आहे. प्रत्येक क्षण हा शिक्षणक्रमाचा आहे आणि ह्या क्रमातून जातं असतांनाच परीक्षा द्यावी लागते. अभ्यासक्रमाची टेक्स्टबुकं आणि नं फुटणारी प्रश्नपत्रिका एकाच वेळी हातात पडतात. बायको, वेगवेगळ्या वयाचा मुलगा आणि मुलगी, इतर नातेवाईक आणि टाळ्या वाजवणारे प्रेक्षक हे सगळे परीक्षक आणि ह्यातलेच काही पेपरसेंटर. काल बरोबर घेतलेला निर्णय आज चालतं नाही. डिग्री-डिप्लोमासारखे प्रकार नसल्यामुळे भिंतीवर लावायला प्रशस्तिपत्रक नाहीत. परिवाराच्या चेहऱ्यावर आनंद पाहणं, ही एकमेव कसोटी आणि वेगवेगळ्या वयाच्या, वृत्तीच्या माणसांना एकाच वेळी न्याय देता येत नाही. तुम्ही जेवढे विचारवंत, तुमची स्वतःची उंची जेवढी विराट, तेवढ्या प्रमाणात तुम्ही आनंद निर्माण करू शकता. ही उंची वाढवण्याच्या खटाटोपात जो सापडतो, तो अंतर्यामी अतृप्त आणि अशांतच असणार. तरीही जो परिवारात रोषणाई करू शकतो, तो आत्मवान. प्रत्येकापाशी ही शक्ती असते, ज्योत असते. चैतन्य हीच ज्योत. श्वासोस्वास हेच सत्य. फक्त ह्या तेवणाऱ्या ज्योतीला स्वार्थत्याग आणि समर्पणाचं तेल लागतं. " 

वपुर्झा /168/Surendra / 22052025

शनिवार, १७ मे, २०२५

" ह्यासारख्या प्रसंगांना ' राखाडी ' रंग म्हणायचा नाही तर काय म्हणायचं? "

"  ह्यासारख्या प्रसंगांना ' राखाडी ' रंग म्हणायचा नाही तर काय   म्हणायचं? "

                          000o000

                "  ' हा काळा आणि हा पांढरा ' अशा दोन कप्यांत आयुष्याचे सगळे रंग भरता येत नाहीत. काळा आणि पांढरा ह्या रंगांच्या मिश्रणाने, जो ' ग्रे ' म्हणजे ' राखाडी ' रंग तयार होतो, त्याप्रमाणे कौटुंबिक जीवनातले अनेक क्षण राखाडी रंगाचे असतात. म्हणून आपला सतत अर्जुन होतो.  नातवंडांची बाजू घेऊन मुलाला किंवा मुलीला, त्यांचं चुकलंय, हे दिसत असूनही नातवंडांना न्याय देता येत नाही. आपला मुलगा हा त्यांच्या मुलांचा बाप आहे, त्याचा पिता म्हणून जे स्थान आहे, त्याला धक्का लागू नये म्हणून            नातवंडानसमोर त्याला चार शब्द सुनवता येत नाहीत. आपण आजोबा असूनही, स्वतच्या मुलांसमोर मुलगा तुम्हाला उलट उत्तरं किंवा दुरुत्तर देऊ शकतो. त्या वेळेला आजोबांची ' आजोबा ' म्हणून जी प्रतिष्ठा आहे, ती काटेकोरपणे सांभाळण्याची गरज नसते. आई-वडिलांकडून जो न्याय मिळतं नाही, तो आजोबांकडून मिळवू, ह्या भावनेने नातवंड तुम्हाला बिलगतात. त्यांच्या विश्वास सार्थ होता, हे तुम्ही सिद्ध करू शकत नाही. मुलाच्या आधारावर जगायचं असतं. नातवंडांवर अन्याय होऊ द्यायचा नसतो. ह्यासारख्या प्रसंगांना ' राखाडी ' रंग म्हणायचा नाही तर काय   म्हणायचं? "

वपुर्झा /168/Surendra / 18052025

" एखादी अनावश्यक पण नवी वस्तू खरेदी करुनसुद्धा ही माणसं अशी उब मिळवतात. "

" एखादी अनावश्यक पण नवी वस्तू खरेदी करुनसुद्धा ही माणसं अशी उब मिळवतात. "

                           000o000

                "   काही माणसांना चौकटीतल आयुष्य पेलत नाही. सुरक्षित वातावरणात ती कावरीबावरी होतात  त्यांना हुरहूर हवी असते. सुखद बेचैनी हवी असते. चार वळून बघणाऱ्या माना हव्या असतात. कौतुकाने, आश्चर्याने बघणाऱ्यांच्या नजरेत ह्या अशा माणसांना, त्यांना अभिप्रेत असलेल्या स्वास्थ्याचा शोध लागतो. ' ह्यांना काय कमी आहे?' असं जेव्हा इतरांना वाटतं तेव्हा ते वाटणं शिष्टसंमत समाजापेक्षा वेगळं नसतं. ज्यांच्याजवळ कोणतीही वेगळी क्वालिटी नसते, अशीच माणसं विचित्र वागतात. ह्या अशा माणसांना फार लवकर सगळ्याचा कंटाळा येतो. ह्यांना कायम कसली तरी उब हवी असते. एखादी अनावश्यक पण नवी वस्तू खरेदी करुनसुद्धा ही माणसं अशी उब    मिळवतात. "

वपुर्झा /165/Surendra /17052025

बुधवार, ७ मे, २०२५

" स्वतः' चीं यथार्थ जाणीव आणि ओळख असलेला माणूस स्वाभिमानी असतो. "

"  स्वतः' चीं यथार्थ जाणीव आणि ओळख असलेला माणूस स्वाभिमानी असतो. "

                          000o000

                "  समाजापासून, वर्तुळापासून, नातेवाईक, मित्र, थोडक्यात म्हणजे ' संवादा ' पासून जो तुमची फारकत करतो ज्या वृत्तीमुळे तुम्ही एकटे पडता तो सगळा दुरभिमान. दुरभिमानात थोडी हिंसा डोकावते. इतरांची मनं ही अशी सहजी मारता मारता, दुरभिमान स्वतचीही हत्या करतो. स्वाभिमान गौरवास्पद असतो. तेव्हडाच फक्त जतन केला तर वर्तुळातली माणसंही त्याची बुज राखतात. स्वाभिमानाची सोयरीक कर्तृत्वाशी असते. कर्तृत्वशून्य स्वाभिमानाला          ' पोकळ ' विशेषणचा भरगच्च आहेर मिळतो. स्वाभिमानी माणूस परावलंबी नसतो. नियतीच्या लहरीपाई त्याला सत्तेपुढे नामतं घ्यावं लागतं. पण ती परिस्थिती तो फार सहन करू शकत नाही. स्वतंत्र, स्वयत्त होण्याच्या वाटा तो शोधत असतो.   ' स्वतः' चीं यथार्थ जाणीव आणि ओळख असलेला माणूस स्वाभिमानी असतो. "

वपुर्झा /164/Surendra / 08052025(2)

" एवढ्या साधनांवर माणूस देवळा पर्यंत होचतो. देवापर्यंत जातो का? "

" एवढ्या साधनांवर माणूस देवळा पर्यंत होचतो. देवापर्यंत जातो का? " 

                           000o000

                "   शिक्षण म्हणजे काय? पाठांतर करून लक्षात ठेवलेली जुजबी माहिती. ज्याचं पाठांतर जास्त तो हुशार. ज्याचं कमी तो मागे पडणारा. म्हणूनच शिक्षण संपत तेव्हा बरंचसं विसरल गेल तरी चालतं. व्यवहारात मिळतं ते शिक्षण वेगळं. शाळेत भाषा शिकवली जाते. माणसा-माणसातला संवाद कसा असावा हे व्यवहार सांगतो. पाढे पाठ करणं वेगळं आणि गणित समजणं वेगळं. शरीरशात्र वेगळं, तर आतला माणूस त्याहून निराळा. एकूण स्वर किती ह्याची संख्या समजण आणि संगीताच आकलन होणं ह्या भिन्न गोष्टी आहेत. ह्या सर्व उंची आणि जाडी वाढवणाऱ्या, मनाची खोली वाढवणाऱ्या गोष्टी वेगळ्या तेव्हड्यातच वरवर नजरेत आपण प्रतिसाद देणार एक शरीर शोधतो. डिग्री पाहून, ऐपत पाहून वीस रुपयांचा नारळ, पन्नास रुपयांचे पेढे, वीस रुपयांचा हार आणि चपला सांभाळणाऱ्या बाईला दोन रुपये, एवढ्या साधनांवर माणूस देवळा पर्यंत होचतो. देवापर्यंत जातो का? 

वपुर्झा /163/Surendra /08052025

मंगळवार, ६ मे, २०२५

" संसार हा एक व्यवहार आहे. प्रेमाइतकाच तो कर्तृत्वाचा भाग आहे."

" संसार हा एक व्यवहार आहे. प्रेमाइतकाच तो कर्तृत्वाचा भाग आहे."

                           000o000

                "   प्रेमपूर्तीत साफल्याची शंका असते. प्रेमभंगातलं वैफल्य नवी पायवाट शोधायला लावते, स्वतःच्या मालकीची. प्रेम, प्रेमविवाह दोन्ही मान्य. पण संसार हा व्यवहारही आहे. प्रेम करतानाही साथीदाराची वैचारिक पात्रता तपासायला हवी. संसार  हा स्थर्यासाठी असतो. आता स्थर्याची व्याख्या ठरवायला हवी. अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा. संसाराच्या प्रारंभी ह्या तीनही गरजा, मनं माराव लागणार नाही इतक्या ठणठणीत अवस्थेत भागणाऱ्या असतील तर ह्याच्यापलीकडच्या ज्या गोष्टी हव्या आहेत, ह्या सगळ्या wants आहेत. त्या needs नाहीत. मागण्या आणि गरजा इतका स्पस्ट फरक आहे हा. अन्न, वस्त्र, निवारा ह्या किमान गरजा जो भागवू शकत नाही, त्याने मुळात लग्न का करावं? ' पुरुष ' होण्यापूर्वी त्याने ' नवरा ' आणि नंतर ओघानेच " बाप ' व्हायची घाई का करावी? वरील तीन गरजापैकी ' निवारा ' ही गरज, राज्यकर्त्यांनी इतकी इतकी महाग करून ठेवली आहे की ती घेता घेता रक्त ओकावं लागतं. ह्या एव्हड्याच एका बाबतीत पत्नीने आर्थिक सहकार्य द्यावं ही नवऱ्याची अपेक्षा गैर मानता येणार नाही. पण निवाऱ्याचा प्रश्नही सुटलेला असेल तर आडकाठी राहिली कुठे? फ्रिज, फोन, होंडा, टीव्ही, टेपरेकॉर्डर हे फॅमिली मेंबर्स विकत घेऊन सांभाळायचे असतील तर  ' फ्रिज '   वगळता बाकीच्या wants आहेत. ह्यासाठी तुमच्या जोडीदाराने तुमच्या मनाविरुद्ध तुम्हाला नोकरीची जबरदस्ती केली तर नाईलाजाने त्याच्या मंनगटात ताकद नाही असं म्हणावं लागेल किंवा त्याला रातोरात पैॅरिस बांधून हवयं म्हणावं लागेल. ह्यातला दुर्दैवाचा भाग हाच आहे. कष्ट आणि वेळ, सतत्य आणि निष्ठा ह्यांच्या पाठपुराव्याशिवाय जगात काहीच मिळत नाही. ह्यावरचा उपवर तरुणाचा विश्वास उडत जाण हा दुर्विलास आहे. अशा माणसाच्या आयुष्यात तुम्ही एकजीव होऊ शकाल का? सगळं भवितव्य त्याच्या हातात सोपवतांना, तुमचं अगदी छोटं पण रास्त स्वप्न, लग्नाच्या होमात आहुती म्हणून टाकणार का? प्रारंभीच्या कळतलं प्रेम आंधळं असू शकत. कोणती व्यक्ती का आवडावी, ह्याला उत्तरं नाहीत. पण संसार हा एक व्यवहार आहे. प्रेमाइतकाच तो कर्तृत्वाचा भाग आहे. कालांतरानें कर्तुंत्वशून्य सहवास तुम्हाला नकोसा झाला तर? 

वपुर्झा /162/Surendra /06052025

रविवार, ४ मे, २०२५

" ........धरित्री अशा काही माणसांना जन्माला घालते. "

".........धरित्री अशा काही माणसांना जन्माला घालते. " 

                           000o000

                "   मला हेही माहीत आहे की अखंड उत्साह, शोधक नजर, वक्तृत्व, प्रवासाची विलक्षण हौस हे सगळे गुणविशेष व्हिट्यामिनच्या गोळ्या खाऊन येत नाहीत. कलमी आंबा हा मातीचाच हुंकार असतो. तशा काही काही व्यक्ती ही मातीला पडलेली स्वप्न असतात. वासुदेव बळवंत, सावरकर, लोकमान्य टिळकांपासून खरेखुरे क्रांतिकारक-विचारवंत, लता-आशा वगैरेसारख्या तीन तपांच्यावर स्वरांच्या संततधारांनी चिंब करणाऱ्या           पार्श्वगायिका, बडे गुलामअलीखापासून  पं. भीमसेन जोशीपर्यंतचे गायक, बाबा आमट्यानंपासून शिवाजीराव पटवर्धनांपर्यंत खरेखुरे मानवतेचे पूजारी, अशी सगळी माणसं पहिली की ' सुजलां सुफलां ' चा अर्थ सापडतो. राहलेल्या सगळ्या जनगणात जमिनीत फाळ खुपसणारे आहेतच. पण जेव्हा जमिनीलाच प्रसववेदनांचा मोह होतो, देठालाच जेव्हा रोमांच आवरेनासे होतात तेव्हा कळीचा हुंकार उमटतो त्याप्रमाणे धरित्री अशा काही माणसांना जन्माला घालते. " 

वपुर्झा /161/Surendra /04052025(3)

शनिवार, ३ मे, २०२५

" समाजात वाण आहे ती मोठ्या मनाची. मोकळ्या मनाची नव्हे. "

" समाजात वाण आहे ती मोठ्या मनाची. मोकळ्या मनाची नव्हे. " 

                           000o000

                "   पंचवीस वर्षांपूर्वीच्या चुका मान्य करतांना आपल्याला काही वाटतं नाही  काळ फक्त सगळ्या दुःखावरच इलाज नसतो तर चुकांवरही असतो. काल जर आपण एखाद्याचा अपमान केला, तर आज दिलगिरी दर्शवण जड जातं. काही माणसांजवळ लगेच चुका मान्य करण्याचा मोकळेपणा असतोही. तरी ती गप्प राहतात. का? एकच कारण. मोकळी होणारी मनं खूप अडतील. मोठ्या मनाची माणसं भेटतील न भेटतील. ह्या शंकने ती गप्प राहिली असतील, स्वतःचं मनं कुरतडत असतील.  समाजात वाण आहे ती मोठ्या मनाची. मोकळ्या मनाची नव्हे. " 

वपुर्झा /160/Surendra /04052025

" भक्ती, प्रेम, श्रद्धा, दया, शांती, क्षमा ही सगळी मौनाची रूपं आहेत."

"  भक्ती, प्रेम, श्रद्धा, दया, शांती, क्षमा ही सगळी मौनाची रूपं आहेत."

                          000o000

                "  परिवर्तन ही अंतर्मनातलीच प्रोसेस आहे. लाऊडस्पीकर्स लावून, कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात प्रार्थना म्हणणं, हा राजकारणाचा भाग आहे. भक्ती, प्रेम, श्रद्धा, दया, शांती, क्षमा ही सगळी मौनाची रूपं आहेत. बाहेरच्या कोलाहलापासून लांब गेलो म्हणजे तुम्हालाच तुमचा सूर ऐकू येतो. तो सूर ऐकू येऊनही जी माणसं तिकडे दुर्लक्ष करतात, त्यांना गुरु किंवा  सायक्रॅटिस्ट लागतो "

वपुर्झा /160/Surendra / 03052025(2)

"माणूस कशाच्या आधारावर जगतो? "

" माणूस कशाच्या आधारावर जगतो? "

                           000o000

                "  माणूस कशाच्या आधारावर जगतो सांगू? भूतकाळातल्या आठवणीवर! " ' ही निव्वळ कविकल्पना!. आयुष्य आहे म्हणून जगतोय हे उत्तरं फार रुक्ष वाटेल ह्या भीतीपायी माणूस बेधडक सांगतो, आठवणींवर जगतो म्हणून! आठवणी जीवन देण्या इतक्या तीव्र असत्या तर माणूस कशाचीही पर्वा न करता त्या आठवणींमागे लागला असता. पण तशी माणसं फार कमी. आठवणी असह्य होणारी माणसं सरळ जीव देतात. इतर आपल्या नशिबातच नव्हतं असं म्हणत, रडगाणी गात आयुष्याशी कोम्पर्माईज करतात " 

वपुर्झा /159/Surendra /03052025

शुक्रवार, २ मे, २०२५

" जिव्हाळ्याच्या वर्तुळला माणूस हवा असतो, शात्राला उत्तरं हवी असतात "

"  जिव्हाळ्याच्या वर्तुळला माणूस हवा असतो, शात्राला उत्तरं हवी असतात " 

                          000o000

                "  कुणाच्या वाट्याला कोणतं आयुष्य येईल, का येईल, तसंच का, वेगळं का नाही, एका ठराविक प्रसंगी त्या त्या व्यक्तीने तसेच निर्णय का घेतले ह्या प्रश्नांना उत्तरं नाहीत. आधी घटना घडतात. प्रश्नमाला नंतर तयार होतात. इट इज जस्ट लाईक पोस्ट-मार्टेम. प्राण गेला हे खरं. चिंकित्सा नंतर.  निश्चित कशाने मेला ह्याचं अचूक उत्तर मिळाल्याने प्राण थोडाच परत येतो? जिव्हाळ्याच्या  वर्तुळला माणूस हवा असतो, शात्राला उत्तरं हवी असतात " 

वपुर्झा /157/Surendra / 02052025

गुरुवार, १ मे, २०२५

" संसार टिकतो तो कसा?"

" संसार टिकतो तो कसा?"

                           000o000

                " संसारातल्या प्रत्येक व्यक्तीची सुखाची कल्पना, सुखाच्या जागा, सुखाची साधन ही वयानुसार, कालानुसार निरनिराळी असतात, आणि प्रत्येकजण त्याच्या कल्पनेतल्या सुखामागे पळतोही. पण संसार टिकतो तो कसा? तर दुःख जेव्हा सगळ्यांच एकच होतं तेव्हा घर उभं राहतं. "


वपुर्झा /156/Surendra /01052025

बुधवार, ३० एप्रिल, २०२५

" प्रेमात पडलेली व्यक्ती फक्त प्रियकर असते "

"  प्रेमात पडलेली व्यक्ती फक्त प्रियकर असते "

                           000o000

                "  प्रेमात पडल्यावर संकेत स्थळी भेटणे ओघानेच आले. दिवसाच्या 24 तासापैकी दोन-तीन तास एकमेकांना भेटत असतील. ह्या दोन तीन तासांच्या भेटीत परस्परांना न दुखवण्याची पराकाष्ठा चालते. सतरा-अठरा तास भेटीसाठी वाट पाहण्याचा टॅक्स भरलेला असतो आणि पुन्हा तितक्याच तासांची प्रतीक्षा करायची शिक्षा असते. त्यामुळे ह्या           चुटपुटत्या भेटीत फक्त एकमेकांना सुखी करण्याची आश्वासन दिली- घेतली जातात. निरीक्षणतच दंग असलेले जीव परीक्षणासाठी मोकळे राहतच नाहीत  हाच कालखंड अभ्यासाचा आहे. ह्या अभ्यासात आपला जोडीदार आपल्याशी कसा वागतो ह्याचाच केवळ अभ्यास करून चालणार नाही. मित्र-मैत्रिणी, वडीलधारी माणसं, घरातले नोकरचाकर, हॉटेलातले वेटर्स, रेल्वेतले सहप्रवासी, टॅक्सी-रिक्षावाले, नातेबाईक, दुकानदार, थोडक्यात म्हणजे संसाराला प्रारंभ केल्यावर ज्या ज्या व्यक्तीचा समाजात समावेश होतो त्या सर्वांशी त्याचं वागणं कसं आहे ह्याचं अवलोकन तुम्ही करायला हवं. कारण दैनंदिन व्यवहार ह्या सगळ्या घटकांवरच अवलंबून असतो. सुख आणि संवाद ह्या तराजूत तोलून खरेदी करण्याच्या वस्तू नव्हेत.   प्रपंच करणाऱ्या माणसाचा आनंद ह्या ना त्या रूपात व्यवहारातच गुंतलेला असतो. व्यवहारासारखी परखड गोष्ट, सुसंवादनेच सुलभ होते. ह्या सुसंवादाच वेड, छंद तुमच्या जोडीदाराला आहे कीं नाही, ह्याचाच कसून शोध घ्या. वेगवेगळ्या स्तरातील व्यक्तींशी बोलतांना तुमचा सखा, त्या त्या गोष्टी जोडत जोडत व्यवहार साधतो की मोडतोड करीत कार्यभाग उरकतो ते पाहा. बारीकसारीक गोष्टीतूनच देवगण, माणुसगण, राक्षसगण प्रकट होत असतो. निरीक्षणशिवाय, परीक्षणाशिवाय लक्षण- अवलक्षणांचा अभ्यास अशक्य. हे आवश्यक आहे. प्रेमात पडलेली व्यक्ती फक्त प्रियकर असते. ती ' प्रिय ' असेल तेच बोलते. प्रिय असेल तेव्हढच बघते, ऐकते, स्पर्शून घेते  ' प्रियकर ' म्हणजे आदर्शवाद. ' माणूस' म्हणजे वास्तववाद.


वपुर्झा /155/Surendra /30042025

मंगळवार, २९ एप्रिल, २०२५

" ह्याचा अर्थच हा कीं इथं चांगलं जास्त आहे, वाईट कमी आहे. "

"  ह्याचा अर्थच हा कीं इथं चांगलं जास्त आहे, वाईट कमी आहे. "

                          000o000

                "  तुमचे पूर्वज दारिद्र्याला घाबरले नाहीत. तुम्ही पण घाबरू नका. तुमच्या वाट्याला, इतरांचे वैचारिक दारिद्र पचवण आलं आहे. तेही पचवून दाखवा. सातत्य हा निसर्गाचा धर्म नाही. तेव्हा धोंगयुग संपेल. भविष्याबद्दल निराश राहण्याचा आपल्याला अधिकार नाही. तुमच्या सहवासात जी माणसं येतात, तेवढच जग नाही. हे जग अजून चाललंय. ह्याचा अर्थच हा कीं इथं चांगलं जास्त आहे, वाईट कमी आहे. "

वपुर्झा /155/Surendra / 29042025(2)

" कधी कधी, प्रतिभाशाली माणसं मीडीऑकर लोकांच्या घोळक्यात रमतांना दिसतात."

"  कधी कधी, प्रतिभाशाली माणसं मीडीऑकर लोकांच्या घोळक्यात रमतांना दिसतात."

                           000o000

                "  प्रगल्भ बुद्धीच्या माणसाला तेव्हड्याच ताकदीची दुसरी व्यक्ती हवी असते. एकाच फ्रिकवेन्सिवरची.नाहीतर एकदम साधी, अनभिज्ञ, चटकन थक्क होणारी व्यक्ती. अशा व्यक्तीला एखाद्या पुस्तकाबद्दल सांगतांना उजळणीचा आनंद मिळतो. आपण किती लक्षात ठेवलंय, ह्याचा अंदाज येतो आणि जिथे जिथे थक्क झालो, विचारात पडलो, अस्वस्थ झालो ती ती सगळी स्पंदन समोरच्या व्यक्ती बरोबर पुन्हा जगता येतात. ' ही किती अफाट व्यक्ती आहे' असा भाव दुसऱ्याच्या डोळ्यात        तरंगताना दिसल्याशिवाय, केलेल्या व्यासंगला कोंडणं मिळत नाही. बुद्धीवान माणसाची तीही एक गरज असते. म्हणूनच कीं काय, कधी कधी, प्रतिभाशाली माणसं मीडीऑकर लोकांच्या घोळक्यात रमतांना दिसतात.

वपुर्झा /153/Surendra /29042025

सोमवार, २१ एप्रिल, २०२५

" आपल्यामुळे दुसऱ्याच आयुष्य दुःखी होत नाही एवढं माणूस नक्की सांभाळू शकतो."

"  आपल्यामुळे दुसऱ्याच आयुष्य दुःखी होत नाही एवढं माणूस नक्की सांभाळू शकतो." 

                          000o000

                " सौदर्य हा प्रचंड मोठा सर्वस्पर्शी शब्द आहे. भरपूर मेहनत करून घामाचा वर्षाव करीत जाणारा हातगाडीवाला, दुपारच्या भाजणाऱ्या उन्हात सौदंर्याने चमकत असतो. कष्ट हे सौदंर्य बुद्धी हे सौदंर्यचंच रूप. नम्रता म्हणजे देखणेपणा. कोणतंही काम भक्तीने करणं हेच सौदंर्य, आणि प्राप्त झालेली कोणतीही शक्ती कुजवत ठेवणं ही कुरूपता. समोरच्या चालत्या बोलल्या माणसाशी जितकं छान वागता येईल तितकं छान वागायचं. आपल्यामुळे दुसऱ्याच आयुष्य दुःखी होत नाही एवढं माणूस नक्की सांभाळू शकतो." 

वपुर्झा /155/Surendra / 22042025

"क्रियाशून्य माणसं खूपदा इतरांचं कर्तृत्व अमान्य करतात."

" क्रियाशून्य माणसं खूपदा इतरांचं कर्तृत्व अमान्य करतात."

                           000o000

                "  शंभरपैकी नव्याणव कुटुंबातून ह्याचं कहाण्या घडतात. म्हणूनच सगळी सुबत्ता असून, नजर लागेल अशी परिस्थिती असूनही माणसं चिंतेत असतात. " " घरात, संसारात येणाऱ्या नव्या व्यक्तीकडे, म्हणजेच सुनेकडे बघतांना सून किंवा बायको किंवा वहिनी म्हणा, भावजय म्हणा - जे नातं असेल ते - प्रत्येकजण एक इमेज तयार करतो. ती इमेज तयार करतांना त्या मुलीच्या वागणुकीचा, हावभावांचा, एखाद्या कॅमेऱ्यासारखा फोटो घेतला जातो. तिच्या अंतर्मनाचा शोध घेऊन कोणत्याही कृतिमागची संवेदना कुणीही जाणून घेत नाही. प्रत्येकाचं स्वतःने तयार केलेल्या इमेजवर प्रेम बसत. त्या प्रेमापाई, प्रत्यक्षात वावरणारी व्यक्ती उध्वस्त झाली तरी फिकीर नाही, पण स्वतः तयार केलेली चुकीची प्रतिमा अभंग राहील अशी धडपड कुटुंबातली माणसं करतात. कारण त्यांनी निर्माण केलेली प्रतिमा खोटी निघाली तर त्यांच्या स्वतःच्या भूमिकेला तडे जातील, ते स्वतः उध्वस्त होतील अशी त्यांना भीती वाटते.  ही अशी माणसं भ्याड असतात. क्रियाशून्य असतात. क्रियाशून्य माणसं खूपदा इतरांचं कर्तृत्व अमान्य करतात. अशी माणसं कळप करून जगतात आणि सतत कार्यरत असणारा माणूस ' चुकतो कधी?' - ह्याची वाट पाहतात. दुर्दैवाने जर अशी कर्तृत्वशून्य साथ आणि आळसापायी आयुष्य, तारुण्य वाया घालवणारी संतती वाट्याला आली तर एखाद्या बाणेदार स्त्रीने काय करावं? अशा नादान माणसांसाठी तिला आयुष्यभर खपावं लागतं. तशी ती राब राब राबते. पण ते करतांना तिला  प्रक्षोभ आवरता येत नाही. ती वाक्ताडन करते आणि श्रेय गमावते."

वपुर्झा /154/Surendra /21042025

रविवार, २० एप्रिल, २०२५

" ह्या सर्व धडपडीतून चालतो तो पूर्णत्वाचा वेध."

"  ह्या सर्व धडपडीतून चालतो तो पूर्णत्वाचा वेध."

                          000o000

                "  आयुष्यात, संसारात ज्यांना काहीही घडलेलं चालतं, त्यांच्यासमोर काही समस्या नसतात. कॉफी कीं चहा इतक्या साध्या, ऐहिक गोष्टीपासून ज्या माणसांना विशिष्ट गरजा आहेत, आवडनिवड आहे, त्यांच्या समस्या रोज जाग आल्यापासून सुरु होतात. त्यात पुढे मग दुधाचं प्रमाण किती, टॅम्परेचर किती, ब्रँड कोणता.... एक न संपणारी किंवा कुठून सुरु झाली, ह्याचा पत्ता लागू न देणारी मुंग्याची रांग. ही रांग जेव्हा वैचारिक भूमिकेपर्यंत जाऊन पोचते आणि अग्रहक्क मागू लागते तेव्हा डोक्याचं वारूळ झाल्यास नवल काय? विचारांचा शोध विचारच घेत राहतात. जोपर्यंत स्वतःच्या वृत्तीचा शोध स्वतःलाच लागलेला नसतो तोपर्यंत ठीक चाललेलं असतं. सगळ्यांचच. तो शोध संपला, नक्की काय हवं होत ह्याचा शोध लागला कीं समानधर्मीयांचा शोध सुरु होतो. कारण स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा, निश्चित गरजांचा पत्ता लागला म्हणजेच संवादाची भूक वाढत जाते. ' गरजा ' आणि ' व्यक्तिमत्व ' हे शब्द खूप ढोबळ आहेत आणि काटेकोरसुद्धा. ' काही तरी हवं असणं' असं साधेपणाने म्हणता येईल. स्वतःचं स्वतःला सावडणं हे महत्वाचं. कोणत्याही गरजा कमी लेखायचं कारण नाही. स्वतःचा पत्ता स्वतःला सापडला म्हणजे मग वायफळ शब्दांनी भरलेला संवाद खपत नाही. शब्दही नेमके हवे असतात. नेमकेपणाला सगळंच ' नेमक' लागतं. हा अभिप्रेत असलेला नेमकेपणा कधी एकाच व्यक्तीत एकवटलेला गवसतो. कधी तो विखूरलेला आढळतो. निरनिराळ्या व्यक्ती निरनिराळ्या कारणांसाठी आवडतात आणि म्हणूनच प्रत्येकाशी जुळणारे संवादही वेगवेगळे असतात. ह्या सर्व धडपडीतून चालतो तो पूर्णत्वाचा वेध. ते स्थळ सापडलं कीं माणसं तिथं स्थिरावतात. "

वपुर्झा /152/Surendra / 20042025

मंगळवार, १५ एप्रिल, २०२५

" आम्ही इतके कुणाला विकले गेलो? का गेलो? "

" आम्ही इतके कुणाला विकले गेलो? का गेलो? " 

                           000o000

                "   काही मोजकी घर वगळली तर विवाह सोहळ्या निमित्त दरवाजावर लावलेलं तोरण जीर्ण व्हायच्या आतच सगळ्या वास्तूला विसंवादाची वाळ्वी लागल्याचं चित्र सर्वत्र दिसतंच. इतक्या झपट्याने अनेक ठिकाणी हेच चित्र का दिसावं? एकीकडे वेगवेगळ्या आकारांच्या, रंगांच्या, माध्यमांच्या कलापूर्ण मंगलपत्रिका छापल्या जाताहेत. प्रत्येक मंगल पत्रिकेगणिक गणपती बाप्पा नावीन्यपूर्ण फॉर्ममध्ये अवतार घेत आहेत. बुद्धीच्या ह्या देवतेला कलावंतांनी वेगवेगळे आकार दिले आणि त्या दैवतानेही चित्रकाराच्या कुंचल्यापेक्षा आपण जास्त लवचिक आहोत, हे सिद्ध केलं. प्रत्यक्ष विवाह सोहळ्यात तर पोरोहित्य करणाऱ्या गुरुजींपेक्षा जास्त महत्व व्हिडिओ कॅमेरामनला प्राप्त झालं आहे. मंत्रसंस्कारांच्या पावित्र्याकडून किती झपाट्याने बुद्धीवान समजला जाणारा आपला समाज, यांत्रिक झगमगाटाकडे वळतोय, त्याचं हे विदारक उदाहरण. खरं तर सगळ्या मंगलकार्यावर ' थिएटर्स ' चे फलक लावावेत. ' श्रुती मंगल  थिएटर ', ' आनंद थिएटर ' असं म्हणावं. स्टुडिओतले कॅमेरे फक्त बटनच दाबायची अक्कल असलेल्या माणसांच्या हातात आले आणि संसारात रंग भरायचं कौशल्य, अर्पणभाव ह्या गुणांशी फारकत घेऊन आम्ही फक्त सोहळे सुशोभित करायला लागतो. आम्ही इतके कुणाला विकले गेलो? का गेलो? 

वपुर्झा /153/Surendra /15042025

" यश म्हणजे ताटा भोवतीची रांगोळी."

"  यश म्हणजे ताटा भोवतीची रांगोळी."

                          000o000

                "  अपयशाला वाचा नसते. असं का? खरंच वाचा नसते का? मला तसें वाटतं नाही. अपयश आलं कीं अवतीभोवतीच्या, प्रत्यक्ष कार्य न करणाऱ्या माणसांना इतकी वाचा येते, कंठ फुटतो, कीं त्यापुढे अपयशी मनाचा आक्रोशच कुणाला ऐकू येत नाही. यश मिळाल कीं, गळा दाटून येतो. अपयश मिळालं कीं, गळाच दाबला जातो. अपयश पचवायला शिकायचं म्हणजे, स्वकीयांनीच केलेल्या वार पचवायला शिकायचं. त्यांनी केलेल्या उपदेशाला धीराचा कान द्यायचा प्रयत्न करायचा. खरी फुंकर, खोटी फुंकर किंवा फुंकर किंवा फुत्कार पारखायची शक्ती वाढवायची, अपयश मिळालं तर छोट्यातला छोटा माणूस आपल्याहून मोठा होतो आणि त्याला काहीही सांगायचा अधिकार प्राप्त होतो ह्या सत्याला सामोरं जाण्याची तयारी ठेवायची. यश म्हणजे ताटा भोवतीची रांगोळी. सतत अस्तित्व दर्शवणारी. रांगोळीचा भुकेशी संबंध नाही. म्हणूनच ती पचवण्याचा प्रश्न उद्भवत नाही. अपयश हे वाढलेल्या ताटासारखं. अन्नावर वासना नसली तरी ते वाढणं गिळावं लागत. पचवावं लागतं. चेहऱ्याची रांगोळी विस्कटू न देता. " 

वपुर्झा /152/Surendra / 15042025

सोमवार, १४ एप्रिल, २०२५

" हीं माणसं त्यांच्या भावनांना बुद्धीनिष्ठेने कवटाळतात."

" हीं माणसं त्यांच्या भावनांना बुद्धीनिष्ठेने कवटाळतात."

                           000o000

                "     सर्वात टॅलेंटेड माणसं त्या मानाने पटकन फसतात. अतिबुढीवादी म्हणून ती अगोदरच एकटी पडलेली असतात. भावनात्मक पातळीवरचा आक्रोश त्यांनी सतत दाबलेला असतो. हीं माणसं त्यांच्या भावनांना बुद्धीनिष्ठेने कवटाळतात. They are intellectually attached to their sentiments. त्यामुळे त्यांना तृप्त व्हायला जसा वेळ लागतो तसाच त्या विश्वातून बाहेर पडायलाही विलक्षण प्रयास पडतो. दीर्घ काळ त्या भावनांचा इन्कार करत आल्याने ती जेव्हा त्या मागण्यांना वश होतात तेव्हा सामान्यांपेक्षा जास्त वेगाने वश होतात. पुन्हा पुन्हा फसतात, पुन्हा झगडा देतात. बुद्धीला खाद्य, बुद्धीला खाद्य असं कितीही मान्य केलं तरी त्याचा जबर थकवा असतो. तो थकवा घालवण्याची हाकाटी सुरु होते. तसं झालं कीं बुद्धी हेच ज्यांचं भांडवल अशी माणसं भांडवलशाही झुगारून देतात आणि बुद्धीला नं पटणाऱ्या गोष्टीच अधूनमधून करतात. सिगारेटपासून नाना प्रकारची व्यसन कमी न होता वाढतात का? तर त्याचं कारण हेच. मग सामान्य माणसं ह्याच असामान्य माणसाच्या सामान्य गोष्टींच अनुकरण करतात. उंची गाठणं ताकदीबाहेर. खोल जाण्यासाठी ताकद वापरावी लागत नाही. ग्रेव्हीटेशनल फोर्स ह्याही प्रांतात उपयोगी पडतो " 

वपुर्झा /152/Surendra /14042025

गुरुवार, ३ एप्रिल, २०२५

" जो तुमचा आनंद वाढवतो, तो धर्म."

"  जो तुमचा आनंद वाढवतो, तो धर्म."

                           000o000

                "  जो तुमचा आनंद वाढवतो, तो धर्म. आयुष्य एक सातारीसारखं वाद्य आहे. ती सतार वाजवण्याचं सामर्थ्य आणि कला अवगत करून घेणं, हाच धर्म. तो धर्म समजला तर छोट्या बिजातून प्रचंड वृक्ष जन्माला येतो.  त्यावर पक्षी येऊन बसतात. गातात. त्यांचे संसार बहरतात. पैशाशिवाय. पक्षांचं धन वेगळंच असतं. गाणं हेच त्यांचं आयुष्यभराचं कार्य. पक्षी पिल्लांसाठी घरं बांधतात. स्वतः वळचणीखाली राहतात. मला सांगा, एकातरी पक्षाची हाउसिंग सोसायटी आहे का? तसं असतं तर झाडाझाडांवर अनेक अनधिकृत कॉलनीज दिसल्या असत्या. पाखरं घरं बांधतात पिल्लांसाठी. पिल्लाला मुक्त आकाश खुलं झालं की घर आपणहोऊन काटक्या टाकतं. म्हणून झाडंही नोटीसा पाठवत नाहीत. मनाचा हा मोठेपणा झाडं जमिनीपासून शिकतात आणि पावसाचा वर्षाव करून आकाश जमिनीवर प्रेमाचा अभिषेक करतं. सृष्टीतल हे नातं ओळखता आलं की सतार योग्य हातात पडली, असं समजावं. हाच धर्म.

वपुर्झा /151/Surendra / 03042025

मंगळवार, १ एप्रिल, २०२५

पाकिटावर स्वतःचं नाव न घालता आहेर करणाऱ्या आप्तांसारखी असतात "

" पाकिटावर स्वतःचं नाव न घालता आहेर करणाऱ्या आप्तांसारखी असतात "

                           000o000

                "  आयुष्याचं पुस्तक वाचायला निराळाच इंद्रिय लागतं. सरकारने मंजुरी दिलेल्या पुस्तकापेक्षा हे पुस्तक खूपच निराळं. ह्या पुस्तकाची भाषा ही लिपी नसलेली भाषा आहे. म्हणूनच पुस्तकाचं वाचन करणाऱ्या माणसाला डिग्री नाही. आयुष्याचं पुस्तक वाचणारा माणूस ओळखायचा कसा? कधी? तर तो माणूस अर्थपूर्ण हसतो तेव्हा ओळखायचा. ' मी अडाणी माणूस आहे ' ह्यासारख्या वाक्यातून अशा माणसाची विद्वत्ता बाहेर पडते. नम्रतेचा पोशाख घालून चातुर्य जेव्हा प्रकट व्हायला लागतं, तेव्हा या माणसांची युनिव्हर्सिटी शोधायची नसते. ही माणसंच निराळी. चार बुके शिकलेल्या माणसांना आपली हुशारी, आपलं ज्ञान, विद्वत्ता, रुखवतासारखी कधी मांडून ठेऊ असं होत आणि ही माणसं कशी असतात? पाकिटावर स्वतःचं नाव न घालता आहेर करणाऱ्या आप्तांसारखी असतात."

वपुर्झा /148/Surendra /02042025

" अनेक ज्ञात -अज्ञात सारथ्यांच्या हातात आपल्या संसाराचे अनंत लगाम असतात."

"  अनेक ज्ञात -अज्ञात सारथ्यांच्या हातात आपल्या संसाराचे अनंत लगाम असतात."

                           000o000

                "  कुवतीनुसार कलावंतांसाठी जे जे करता येईल, ते ते करण्यासाठी समाजातील छोटी माणसं फार झटतात. खरं तर छोटी माणसं, मोठी माणसं असं काही असतच नाही. संपूर्ण रामरक्षा मोठी की नुसतं ' राम ' हे नाव मोठ? प्रपंच करणारा जीव व्यवहारावरच जगतो. निर्माण केलेल्या वस्तुने आणि नेमलेल्या माणसाने सांगितलेले काम करायला हवं. प्रत्येकजण म्हणून त्याच्या त्याच्या कार्यक्षेत्रातला सम्राट असतो. वाफेतली ताकद ओळखून इंजिनाचा शोध लावणारा 

वॅट मोठा, हे कोण नाकारून? पण आपण ज्या गाडीने प्रवास करणार असतो त्या गाडीचा ड्रायव्हर वॅटपेक्षा मोठा असतो. योग्य वेळी योग्य ड्रायव्हर भेटल्याशिवाय संसाराचा गाडा चालत नाही. आपण आपला संसार चालवतो असं रुबाबात म्हणण्यात काही अर्थ नाही. अनेक ज्ञात -अज्ञात सारथ्यांच्या हातात आपल्या संसाराचे अनंत लगाम असतात. फक्त दुसऱ्या माणसांसाठी नियमांवर बोट ठेवणाऱ्या आडमुठ्या ड्रायव्हर्सपायी आपली साधी साधी कामं कशी रखडतात, हे आठवून पहावं, आणि अचानक एखादा असाच सारथी लाभल्यामुळे रेंगाळलेली कामं कशी हां हां म्हणता झाली आहेत, ह्याचंही स्मरण ठेवावं." 

वपुर्झा /147/Surendra / 01042025

रविवार, ३० मार्च, २०२५

" वैवाहिक जीवनात पदार्पण करतांना एक सप्तपदी असते तशीच ती व्यवसायातही."

" वैवाहिक जीवनात पदार्पण करतांना एक सप्तपदी असते तशीच ती व्यवसायातही."

                           000o000

                "  मिळालेला लौकिक म्हणजे अश्वमेधाचा घोडा दाराशी आल्याप्रमाणे. त्याचा लगाम हातात धरला की मग कायम युद्ध. हे युद्धाचं आव्हान व्यवसाय स्वीकारणारा पेलू शकेल का? वैवाहिक जीवनात पदार्पण करतांना एक सप्तपदी असते तशीच ती व्यवसायातही.

पहिलच पाऊल - शब्द

दुसर - वेळ

तिसरं - तत्परता 

चौथ - नजर 

पाचव - कौशल्य 

सहावं -  ज्ञान 

सातव - सातत्य 

          सातव पाऊल हे फार अवघड पाऊल. सातव पाऊल सतराव्या, सातशेव्या, सात हजार.. .. थोडक्यात शून्य वाढवत जायचं. पत्करलेल्या व्यवसायात सातत्य टिकलं तर पहिल्या सहा पावलांना, बळीच्या तीन पावलांची शक्ती प्राप्त होते. पहिल्या सहा पावलांसाठी गुरु भेटू शकतो. सातव पाऊल रक्तात हवं."  

वपुर्झा /147/Surendra /31032025

गुरुवार, २७ मार्च, २०२५

"साथीदारधीच स्पर्धा केलीत, तर कदाचित आपल्याला पॅव्हेलियनमध्ये बसावं लागेल"

" साथीदारधीच स्पर्धा केलीत, तर कदाचित आपल्याला पॅव्हेलियनमध्ये बसावं लागेल"

                           000o000

                "  पारितोषिकं, प्रशस्तिपत्रकं, कप, पेले, सुवर्णपदक, म्हणजे यश नव्हे. ती कीर्ती, यशाचं नातं वर्तमानकाळातल्या प्रत्येक क्षणाशी, श्वासाइतकं असत. प्रत्येक क्षणी श्वास घ्यावाच लागतो. यश तसंच. आणि संसार क्रिकेट सारखा असतो. विकेटसमोर उभं राह्यलं की प्रत्येक बॉलंच काहीतरी करावं लागतं. ' भूत, वर्तमान, भविष्य म्हणजे तीन स्टॅम्पस ' असं एक क्रिकेटिअर म्हणतो. बेल्स म्हणजे काळ. टाकलेला प्रत्येक चेंडू काळावर सोपवायचा नाही. तो तुम्हाला अडवावा लागतो. सोडून देणं, थांबवणं, टोलवण यांपैकी काहीतरी एक करावच लागतं. तुम्ही जर बॉलर्स ऍण्डला असाल तर साथीदाराबरोबर पळापळ करावी लागते. टेनिस, बॅडमिंटन किंवा आपल्या हुतुतूच्या खेळा प्रमाणे इथं पुनर्जन्म नाही. साथीदार आऊट होऊ नये म्हणून जपायच असतं. साथीदारधीच स्पर्धा केलीत, तर कदाचित आपल्याला पॅव्हेलियनमध्ये बसावं लागेल, आणि आपला जोडीदार मग दुसऱ्याच खेळाडूंबरोबर खेळतांना पहावं लागेल."

वपुर्झा /146/Surendra /28032025

मंगळवार, २५ मार्च, २०२५

" मी माझ्या आईचं सबंध जीवन जवळून पाहिलं आहे. तिच्या स्वभावाच बारीक निरीक्षण केलं आहे."

"  मी माझ्या आईचं सबंध जीवन जवळून पाहिलं आहे. तिच्या स्वभावाच बारीक निरीक्षण केलं आहे."

                           000o000

                "  नोकरी करता तेव्हा तुम्ही काय करता ! जातीने - गोतीने  एक नसलेल्या वरिष्ठाला मनातून शिव्या देत, प्रत्यक्षात तुम्ही माना वाकवताच ना ! त्याची प्रसंगी मुर्खासारखी बोलणी सहन करताच ना! अपराध नसतांना शिक्षा सहन करताच ना! मग तशीच थोडी पॉलिसी घरी का वापरू नये? दुसऱ्यासाठी नाही, स्वतःसाठीच! द्या थोडा मोठेपणा घरातल्यांना! एवढ काय नुकसान होणार आहे त्याने? घरातल्या माणसांशी असं दुटप्पी वागण्याची वेळ येऊ नये हे मान्य, पण दुर्दैवाने माणसं तशी भेटली तर काय इलाज? त्या मोठ्या माणसांचे स्वभाव तसे का बनत गेले त्यालाही काही कारणं आहेत, इतिहास आहे. त्यांच्या पूर्वायुष्यात त्यांनीही झगडा दिला आहे, पराभव पचवले आहेत. हे सगळं कुणी पहायचं? याचा विचार कुणी करायचा? मी एकट्याने! कारण मला बायकोही हवी आणि आईही हवी, हा माझा दोष! मी माझ्या आईचं सबंध जीवन जवळून पाहिलं आहे. तिच्या स्वभावाच बारीक निरीक्षण केलं आहे. तिच्या स्वभावातल्या गुणांपेक्षाही तिच्यात ह्या वयात निर्माण झालेले दोष मला जास्त माहीत आहेत. त्या दोषांसकट तिला कुणीतरी सांभाळायला हवं आहे. सगळ्यांच व्यवस्थित होणार आहे. आईच्या मार्गाने आई जाणार आहे. पत्नी चाललीच आहे. लोंबकळतो काय तो मीच ! "


वपुर्झा /145/Surendra /26032025

रविवार, २३ मार्च, २०२५

" आयुष्याच्या प्रवासात एकाची तत्व दुसऱ्याला थिअरी वाटते "

"  आयुष्याच्या प्रवासात एकाची तत्व दुसऱ्याला थिअरी वाटते "

                           000o000

                "  ' मना सज्जना भक्तीपंथेचि जावे ' ह्या वचनापासून कोणत्याही गोष्टीकडे, नाक उडवून ' ही फक्त थिअरी  आहे,' अस म्हणून तिला तिला निकालात काढता येतं. पण चार पावलं जर त्या दिशेने टाकून पाहिली तर, आपल्यापुरती ती ' थिअरी ' राहत नाही. प्रथम थिअरी नाकारायची नाही. ती जगायची. त्यातून जो अनुभव येतो त्या अनुभवाची थिअरीला जोड द्यायची. मग तिला प्रत्ययाचं बळ येतं. ती  थिअरी इतरांना सांगत बसायचं नाही. कारण प्रचीती आली की ती तुमची तत्व होतात आणि तुमची तत्व इतरांची थिअरी होतात. अस का? कारण अनुभव घेणारा प्रत्येकजण वेगळा असतो. प्रवासाला निघतांना, केवळ कागदावर छापलेला रोड मॅप मिळतो. विश्रामधाम, गाव, पेट्रोलपंप, त्यांच्या जागा आणि मैल, इतकंच त्याच्यावर छापतात. रस्त्यावरचे खड्डे, ड्रायव्हर कसा आहे, ट्रॅव्हल कंपनीचा प्रामाणिकपणा आणि हल्ली विश्रामधामात चालणारे प्रकार, दुर्दैवाने वाटेत दरोडा पडला तर, अशा गोष्टी नकाशात छापत नाहीत. नकाशा म्हणजे थिअरी   समजा, प्रवासाचा अनुभव घेणारा प्रत्येक प्रवासी वेगळा. म्हणूनच आयुष्याच्या प्रवासात एकाची तत्व दुसऱ्याला थिअरी वाटते." 

वपुर्झा /144/Surendra /23032025

रविवार, १६ मार्च, २०२५

" वारंवार प्रकट होऊनही जे शांत होत नाही त्यालाच ' शल्य ' म्हणतात."

  " वारंवार प्रकट होऊनही जे शांत होत नाही त्यालाच

 ' शल्य ' म्हणतात."

                           000o000

                "   वारंवार प्रकट झाल्याशिवाय जे शांत होत नाही किंवा वारंवार प्रकट होऊनही जे शांत होत नाही त्यालाच ' शल्य ' म्हणतात. गतकाळातील दुःखाची उजळणी करण हाच त्या दुःखावर सूड घेण्याचा मार्ग असतो. काहीकाही घटनांची उजळणी करतांना कधी कधी त्या घटनांना साक्ष असलेला श्रोता जवळचा वाटतो, तर काही काही वेळेला ' कोरा ' रॅपरही न फोडलेला, श्रोता, बोलणाऱ्यांना हवा असतो. पहिल्या श्रोत्याच्या बाबतीत सगळं सगळं सांगाव लागत नाही. तर दुसऱ्या श्रोत्यांच्या बाबतीत त्याच्या चेहऱ्यावरचे आश्चर्य, कुतूहल, उत्सुकता, मधून मधून बसणारे धक्के, त्यात व्यक्त केलेली अनुकंपा अशा वळणावळणांनी आपण क्रमशः सांगतो, ह्याचा आनंद मिळतो. भूतकाळातले काही क्रम नव्याने उलगडतात. श्रोता बदलला की वक्ताही बदलतो."

वपुर्झा /143/Surendra / 17032025

" निर्णय घेता न येण ह्यासारखा दुसरा घातक दोष नाही."

" निर्णय घेता न येण ह्यासारखा दुसरा घातक दोष नाही."    

                           000o000

                "   निर्णय घेता न येण ह्यासारखा दुसरा घातक दोष नाही. निर्णय न घेण्यापेक्षा चुकीचा निर्णय घेणं अधिक बरं. चुकीचा निर्णय घेणाऱ्या माणसांनी जीवनात यश मिळवलेल आहे. परंतु जो निर्णय घेऊ शकत नाही त्याचं मन नेहमी हे करू की ते करू या गोंधळात गुनलेल असतं. मात्र हा मनुष्य कधीही यशस्वी झाल्याचं ऐकिवात नाही. ज्याला निर्णय घेता येत नाही, त्याला कृती करता येत नाही आणि ज्याला कृती करता येत नाही, त्याला कोणत्याही क्षेत्रातयश मिळवता येत नाही."

वपुर्झा /138/Surendra / 17/032025

शनिवार, १५ मार्च, २०२५

" प्रत्येक पती/पत्नीने संसाराच्या यशासाठी समजणे आवश्यक"

"  प्रत्येक पती/पत्नीने संसाराच्या यशासाठी समजणे आवश्यक"

                           000o000

                "   अक्षता ह्या शब्दातल प्रत्येक अक्षर महत्वाचं आहे. अ = अर्पणभाव, क्ष = क्षमाशीलता, ता = तारतम्य . हे गुण दोघांजवळ हवेत. एकमेकांसाठी आपण कोणत्या गोष्टींना, किती प्रमाणात मुरड घालू शकणार आहोत, त्याचा शोध घ्यावा. संघर्षाच्या जागा हेरून ठेवाव्यात. मुरड घालणं हा सहजधर्म व्हायला हवा. कात टाकली की साप तिकडे वळूनही बघत नाही. इतक्या सहजतेने आपण एकमेकांसाठी काय टाकू शकतो त्याचं संशोधनाचं करायला हवं. एकमेकांना टाकण्यापेक्षा, एकमेकांसाठी काही ना काही टाकणं ह्यालाच अर्पणभाव म्हणतात.  स्वतःतल्या उणिवांची खरी जाणीव झाली आहे. दोष समजले आहेत. कमकुवतपणाच्या जागा समजल्या आहेत. पण प्रामाणिक प्रयत्न करूनही आपल्या जोडीदाराचे वृतिदोष जात नाहीत समजल्यावर तिकडे दुर्लक्ष करायची शक्ती म्हणजे क्षमाशीलता. तरतमभाव न बाळगता घ्यायचं कसं  आणि लडिवाळ हट्ट करून वसूल कधी करायचं, वाकायचं कधी आणि कधी वाजवायला लावायचं , स्थळ, काळ, स्थिती ह्याच भान म्हणजे तारतम्य."


वपुर्झा /126/Surendra /15032025

शुक्रवार, १४ मार्च, २०२५

" स्त्रीची गृहिणी होण, हीसुद्धा कलाकृतीच आहे."

" स्त्रीची गृहिणी होण, हीसुद्धा कलाकृतीच आहे."

                     000o000

              "  प्रत्येक जुन्या अनुभवाला नव्याने सामोरं जाण्याची एक कला असते. आयुष्य म्हणजे पुनरुक्ती. ब्रेकफास्ट, आंघोळ, दुपारचं जेवण, त्यासाठी स्वयंपाक, आलटूनपालटून त्याच भाज्या, आमटी, तीच कणीक, त्याच पोळ्या. मग एखादी डुलकी. पुन्हा दुपारचा चहा. परत रात्रीच जेवण. मग झोप. हा झाला एक दिवस. प्रति क्षणी नवा जन्म घेण्याची शक्ती फक्त मनाजवळ असते. पण त्याला ते शिकवावं लागतं. मनाची ताकद मनालाच कुणीतरी दाखवायची असते. त्याने ती ताकद उचलली की मग सगळं सोपं असत. मग ते मनच तुम्हांला एक आयुष्य पुरणार नाही इतक्या युक्त्या शिकवत. ते मन मग लेखकाला कथानकं पुरवत, कवीला शब्द सुचवत, संगीतकाराला चाल, नर्तकाला पदन्यास, शास्त्रज्ञाला शोध. साध्यासुध्या, सर्वसामान्य बाईचं आदर्श गृहिणीत रूपांतर कसं करायचं, हेही मनच शिकवत. स्त्रीची गृहिणी होण, हीसुद्धा कलाकृतीच आहे."

वपुर्झा /126/Surendra /15032025

गुरुवार, १३ मार्च, २०२५

" कालांतराने मिळणाऱ्या वस्तूंचीही किंमत राहत नाही आणि त्या वस्तू देणाऱ्यांचीही."

"  कालांतराने मिळणाऱ्या वस्तूंचीही किंमत राहत नाही आणि त्या वस्तू देणाऱ्यांचीही."

                           000o000

                "   डिपेंडंट  माणसं फार प्रेमळ आहेत असं आपल्याला वाटतं. प्रेम दाखवणे ही त्यांची व्यावहारिक गरज असते. मुलं जोपर्यंत लहान असतात तोपर्यंत त्यांचा तो आंतरिक उमाळा असतो. त्यांच्या वैयक्तिक गरजा कमी असतात. आपण आपल्या प्रेमाचा वर्षाव वस्तूंच्या रूपाने व्यक्त करतो. देणग्यांचा वर्षाव करतो. तिथं चुकतं." " आपल्या मुलाचं वस्तूंवरच प्रेम आपणच वाढवीत नेतो. त्यांच्या गरजांची वाढ करतो. मग चालत्याबोलत्या माणसांपेक्षा, वस्तूंना प्रायोरिटी मिळते. मुलं मोठी व्हायला लागली की त्यांची स्वतःची मतं तयार व्हायला लागतात. ती तुमचं मूल्यमापन करायला लागतात. देणग्यांचा वर्षाव करून करून तुम्ही त्यांना इनडायरेक्टली आत्मकेंद्रित बनवत जाता. कालांतराने मिळणाऱ्या वस्तूंचीही किंमत राहत नाही आणि त्या वस्तू देणाऱ्यांचीही.

वपुर्झा /125/Surendra /14032025

" पॅटर्न म्हणून स्वीकार करायचा. सगळ्याचाच. "

" पॅटर्न म्हणून स्वीकार करायचा. सगळ्याचाच. "

                     000o000

              "  पॅटर्न म्हणून स्वीकार करायचा. सगळ्याचाच. सत्ता गाजवण्यासाठी जे गळचेपी करतात, खून करतात, पोलिसयंत्रणा राबवतात. पद्मश्री, पद्मभूषणाच्या खिरापती वाटून विचारवंतांना गप्प बसवतात. फार कशाला, कोण्या एखाद्या महात्म्याने हा जन्म संपवून, पुनर्जन्मातल निम्मं आयुष्य संपवल्यावर त्याची गणना ' रत्नात ' करतात. हे सगळं ' पॅटर्न ' म्हणून मान्य करायचं. नुसतं मान्य करून थांबायचं असेल तर फार नफ्फड व्हावं लागतं. गेंड्याची कातडी..... ओह नो ! गेंडाही जिव्हाग्री बाण लागला तर मरतो. रंग कोणताही असो. मूळ रंग स्वार्थाचा. तो झाकायला. तोही पॅटर्न. पण ज्याला तो पॅटर्न शरीराला, मन आणि बुद्धी पणाला लाऊन सांभाळावा लागतो तो त्या पॅटर्नच किती काळ कौतुक करील? विषारी सापाचा दंश झाल्यावर, त्या सापाच्या हिरव्यागार रंगाचं आणि चावल्याचं कौतुक राहील काय?

वपुर्झा /122/Surendra /13032025

मंगळवार, ११ मार्च, २०२५

" हे अशा, लोळून दिवस काढणाऱ्या महाभागांचं जीवितकार्य."

"  हे अशा, लोळून दिवस काढणाऱ्या महाभागांचं जीवितकार्य."

                     000o000

              "  समाजात गेंड्याची कातडी पांघरून वावरणारी माणसं कमी आहेत का? आहार, निद्रा, मैथुन एवढ्याच त्यांच्या गरजा. ह्या गरजांना धक्का लागू नये म्हणूनही माणसं पात्रता नसताना फक्त स्पर्धा करतात. कुणाशी? तर स्वतःच्या हिमतीवर मार्ग शोधणाऱ्या स्वयंप्रकाशी प्रतिभावंतांशी, कष्टांवर भक्ती करणाऱ्या माणसांशी. लोकप्रियतेचं वरदान लाभलेल्या सेवाभावी जोडीदाराशी. काही संसारातून गृहिणी अशा असतात तर काही संसारातून स्वतःला कुटुंबप्रमूख म्हणवून मिरवणारे पुरुष तसे असतात. जोडीदाराचे पाय खेचणं,  स्वतःच्या स्वास्थ्यासाठी, कार्यरत असलेल्या पार्टनरचाच अंत बघणं हे अशा, लोळून दिवस काढणाऱ्या महाभागांचं जीवितकार्य."

वपुर्झा /121/Surendra /12032025

सोमवार, १० मार्च, २०२५

" मरणही जिथे शांतपणे मिळत नाही तिथे मृतात्म्या शांत कसा राहील ?

" मरणही जिथे शांतपणे मिळत नाही तिथे मृतात्म्या शांत कसा राहील ? "

                     000o000

              "  अपघाती मरण म्हणजे त्या मृतात्म्याचे धिंडवडे. शरीराची विटंबना आणि नातेवाईक, आप्तेष्टांची ससेहोलपट. कॉरोनरकडे ताटकळण, पोस्टमार्टम विनाविलंब व्हावं म्हणून तिथंही हात ओला करण, फार कशाला, प्रेतावर टाकण्यासाठी पांढरा कपडा हवा असेल, तर तिथंही दक्षिणा मोजणं, बससाठी डोळ्यांत प्राण आणून बॉडी ताब्यात मिळेतो पळापळ करणं, नाहीतर नोटामागून नोटा खर्च करायची तयारी ठेवून टॅक्सीने प्रवास करण.         ' मृतात्म्यास शांती मिळो ' अस फक्त म्हणायचं, पण त्यात काय अर्थ आहे? चार घटका माथा टेकायला जमीन हवी असेल तर लाखो रुपये ओतावे लागतात. जिवंतपणी सामान्य माणसांची जी परवड व्हायची ती होतेच. पण मरणही जिथे शांतपणे मिळत नाही तिथे मृतात्म्या शांत कसा राहील ?

वपुर्झा /121/Surendra /11032025

शनिवार, ८ मार्च, २०२५

" स्वतःच्या माणसांजवळ पराभव मान्य करण त्याच्यापेक्षा कठीण."

"  स्वतःच्या माणसांजवळ पराभव मान्य करण त्याच्यापेक्षा कठीण."

                           000o000

                "  प्रत्येक माणूस प्रेमळ असतो, आपली फक्त रीत बदलणं आवश्यक आहे. कशी?. चार भिंतीच्या आत फक्त प्रेमच असावं. चार भिंतींच्या बाहेर तर्काने प्रश्न सोडवावेत. आपण उलट करतो. ज्यांच्याबरोबर आयुष्य घालायचं त्यांच्याशी मोकळेपणाने न बोलता नुसते तर्क करीत बसतो. अनेक माणसांचे भयानक अनुभव घेऊन घेऊन कोणत्या माणसाला विश्वासात घ्यावं असा प्रश्न पडतो हे एक आणि दुसरं म्हणजे, उद्ध्वस्त माणूस जास्त स्वाभिमानी आणि कडवा होतो. पराभव मान्य करायची त्याची शक्ती संपलेली असते. दुसऱ्या माणसाशी युद्ध करायला फार बळ लागत नाही. स्वतःशीच सामना करण भयानक कठीण आणि स्वतःच्या माणसांजवळ पराभव मान्य करण त्याच्यापेक्षा कठीण."

वपुर्झा /118/Surendra /09032025

शुक्रवार, ७ मार्च, २०२५

" स्वतःचा रुबाब स्वतःच्या पायावर उभा नाही, हे कितीजण जाणतात ?

" स्वतःचा रुबाब स्वतःच्या पायावर उभा नाही, हे कितीजण जाणतात ?

                     000o000

              "  स्वतःचा रुबाब स्वतःच्या पायावर उभा नाही, हे कितीजण जाणतात ? खुर्चीच्या चार पायांची ताकद फार वर्ष पुरत नाही. काही माणसांची तर रिव्हॉल्विंग खुर्ची असते. नावडत्या माणसांकडे त्यांना झटकन पाठ फिरवता येते. राज्यकर्त्यांची खुर्ची, विरोधी पक्षाच्या नेत्यांची खुर्ची तर अनेकांच्या खांद्यावर असते. तो खांदा खुर्चीऐवजी, खुर्चीवरच्या माणसाला देण्याची वेळ फार अंतरावर नसते. खुर्चीपेक्षा माणसांना जिंकावं, ते जास्त सोप. त्यासाठी काय लागतं? हसतमुख चेहरा आणि इतरांपेक्षा स्वतःशी प्रामाणिक राहणं."

वपुर्झा /117/Surendra /08032025

गुरुवार, ६ मार्च, २०२५

" समस्या या वयाच्या कोणत्याही वळणावर पडतात."

" समस्या या वयाच्या कोणत्याही वळणावर पडतात."

                     000o000

              "  प्रत्यक्ष पराभवापेक्षा, तो कबूल करावा लागणं हा पराभव मोठा असतो. पहिल्या पराभवात कधीकधी कर्तृत्व कमी पडत तर कधीकधी कर्तबगारी असून, भूमीच रथाच चाक पकडून ठेवते. पण दुसऱ्या पराभवासाठी, चाकं न  गिळणारी मनोभूमीच विशाल लागते. प्रत्येकाच असण हे जस त्याचं स्वतःचं असण असतं त्याप्रमाणे प्रत्येकाच्या समस्या पण ownership च्या असतात. समस्या आणि जखमा पण. समोरचा माणूस फक्त फुंकर घालण्याचं काम करतो. ठणका आतून पण फुंकर बाहेरून आत. समस्या या वयाच्या कोणत्याही वळणावर पडतात. त्या सोडवण्याची आपली उमेद मात्र ओसरत जाते. जशी उमेद ओसरत असते, त्याचप्रमाणे फुंकर घालणारे सहप्रवासी पण कमी होत जातात. नवे प्रवासी जोडण्याची ताकद राहत नाही, कारण पूर्वीच्या प्रवाशांसाठी आपण खूप राबलेले असतो. "

वपुर्झा /112/Surendra /06032025

मंगळवार, ४ मार्च, २०२५

" माणसाच्या हालचाली, माणसाचे विचार ह्यावर कित्येक गोष्टीचा पगडा असतोच असतो "

"  माणसाच्या हालचाली, माणसाचे विचार ह्यावर कित्येक गोष्टीचा पगडा असतोच असतो "

                           000o000

                "  एखाद्याला एकदम ' बोगस ' ठरवू नका!  जग तुम्हाला वाटत त्यापेक्षा फार निराळं आहे. समोर दिसणारा माणूस हा दिसतो त्यापेक्षा फार निराळा असतो. तर्काला सोडून किंवा स्वतःच्या वृत्तीला सोडून तो एकदम वेगळीच कृती करून दाखवतो. तुम्ही चमकता. हे कस घडलं, अस निष्कारण, वारंवार दुसऱ्यांना विचारत बसतो ! आपल्याला माणसं कशी आहेत, हे अजून समजत नाही, अस म्हणत स्वतःला अज्ञानी मानून गप्प बसता. अस का होत माहित आहे का? आपण पटकन एखाद्याला ' बोगस ' म्हणून निकालात काढतो व मोकळे होतो. मला तुम्ही सांगा, एवढ्या घाईघाईने निर्णय घेऊन तुम्हा  आम्हाला कुठे जायचं असतं? ही घाई नडते आपल्याला ! आपण थोड शांतपणे घेतलं तर त्या माणसाच्या सगळ्या हालचाली आपल्याला समजतील. माणसाच्या हालचाली, माणसाचे विचार ह्यावर कित्येक गोष्टीचा पगडा असतोच असतो. पण निर्जीव वस्तूही माणसावर आपली हुकमत गाजवतात." 

वपुर्झा /111/Surendra /05032025

सोमवार, ३ मार्च, २०२५

" सवय वैरीण "

"  सवय वैरीण "

                           000o000

                "  गादी - उशीशिवाय झोपणं तर सोडाच, पण नेहमीची उशी जरी वाटणीला आली नाही तरी आपली मिसाज जाते . दिवसातून दहा वेळा जप करतो. डोळ्याला डोळा नाही हो रात्रभर. रात्र वैरीण नसते. उशी तर नसतेच नसते. सवय वैरीण. आणि तिला जन्म देणारे आपणच.

वपुर्झा /111/Surendra /03032025

रविवार, २ मार्च, २०२५

" ठिणगी ठिणगीच असते."

" ठिणगी ठिणगीच असते."

                     000o000

              "  ठिणगी ठिणगीच असते. ती कुठे पडते ह्यावर तिचं अस्तित्व टिकत. पाण्याच्या पृष्ठभागावर पडते की ज्वालाग्राही साठवणीच्या गुदामात? माणसाचं मनही जलाशयाप्रमाणे शीतल आहे की स्पोटक वस्तूंचं गोडाऊन आहे ते ठिणगीशिवाय समजत नाही. संशय, स्पर्था, द्वेष, मत्सर, क्रोध अशी नाना रूप ठिणगीला धारण करता येतात. मन इंधनाने तुडुंब भरलेले असेल तर ठिणगी उग्र रूपाने जगते."

वपुर्झा /111/Surendra /03032025

शनिवार, १ मार्च, २०२५

" मैत्रीचा प्रत्येक टप्पा हा व्यक्तिमत्वाचा नवा उत्कृषबिंदू ठरावा,"

" मैत्रीचा प्रत्येक टप्पा हा व्यक्तिमत्वाचा नवा उत्कृषबिंदू ठरावा,"

                     000o000

                "  निखळ मैत्रीतली एक विलक्षण ताकद जर कोणती असेत तर त्यातली सहजता. त्या सहजते मधून सुरक्षितपणाची साय आपोआप धरते. साय दूधातूनच तयार होते आणि दुधावर छत धरते. साय म्हणजे गुलामी नव्हें. सावीखालच्या दुधाला साईचे दडपण वाटत नाही. मैत्री तशी असावी. दुधापेक्षा स्निग्ध. सायीची नंतरची सगळी स्थित्यंतर : म्हणजे दही, ताक, लोणी, तूप - ही जास्त जास्त पौष्टिकच असतात. तसं मैत्रीच घडाव. मैत्रीचा प्रत्येक टप्पा हा व्यक्तिमत्वाचा नवा उत्कृषबिंदू ठरावा. ज्यांच्या मैत्रीमुळे प्रगती खुंटते ती मैत्री संपण्याच्याच लायकीची असते. ह्याच दृष्टिकोनातून ज्या ज्या संसारात पतिपत्नीचं नातं मैत्रीसारखं राहील ते ते संसार टिकले. संसारात रुसवे _ फुगवे हवेत. चेष्टा - मस्करी हवी. जोडीदाराच्या व्यसंगात साथ हवी त्याप्रमाणे हक्काने ' आता तुमच्या एकूण एक गोष्टी माझ्यासाठी दूर ठेवा ' अस अतिक्रमण पण हवं. केवळ स्वतःच स्वास्थ आणि ऐषोराम जोपासण्यासाठी जोडीदाराला गुलाम करायचं नसतं.

वपुर्झा /110/Surendra /02032025

गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२५

त्यावरून लहान मुलांची मतं बनतात."

"  त्यावरून लहान मुलांची मतं बनतात."

                           000o000

                " माणसांची माणसांबद्दल मतं कशी तयार होतात, हे पाहणं मोठं मजेच असत. स्वतःच्या अनुभवांवरून ठाम निष्कर्ष काढण्याची परिपक्वता प्रत्येकाला निरनिराळ्या वयात येत असेल. पण प्रारंभीच्या काळात ही मतं बनवण्याच काम घरातली मोठी माणस करीत असतात. पाहुण्यांची पाठ वळल्याबरोबर जे त्यांच्या बद्दल बोललं जातं किंवा ती व्यक्ती मागे जे वातावरण निर्माण करून जाते, त्यावरून लहान मुलांची मतं बनतात."


वपुर्झा /109/Surendra /28022025

बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२५

" निर्माल्य म्हणजे हौतात्म्य. धुळीचा पेहेराव म्हणजे अमरता."

"  निर्माल्य म्हणजे हौतात्म्य. धुळीचा पेहेराव म्हणजे अमरता.

                           000o000

                "  व्यवहाराला गंध नसतो. स्पर्श नसतो. गोंगाट असतो. रुचीच नसते. मग अभिरुचीची बातच दूर. व्यवहार प्लास्टिकच्या फुलांसारखा असतो. प्लॅस्टिकची फुल सुकत नाहीत आणि ही तर इम्पोरटेड फुल. या फुलांचे रंग विटत नाहीत. ही फुल ज्यांना परवडतात त्यांच्या माना, त्या फुलांच्या देठासारख्याच ताठ राहतात. त्याचं निर्माल्य होत नाही. जन्मच नाही, तिथं मरण कुठलं? ह्या फुलांना फक्त धुळीचा शाप. सर्फने धुतली की झालं. पण नळाखाली धरल्यावर ती शहारून येत नाहीत. जन्ममरणाचाच फेरा नसेल, तर शहारे, रोमान्स, आसक्ती, विरह - मिलन, भय, सगळ्यातूनच मुक्ती. जिवंत फुलं स्वाभिमानी असतात. धुळीचा थर जमण्याआधीच मरण पत्करतात. निर्माल्य म्हणजे हौतात्म्य. धुळीचा पेहेराव म्हणजे अमरता.

वपुर्झा /106/Surendra /27022025

मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२५

" क्षमा कोणत्या कारणासाठी मागावी लागत आहे, ह्याच आत्मनिरीक्षण करावं."

"  क्षमा कोणत्या कारणासाठी मागावी लागत आहे,  ह्याच आत्मनिरीक्षण करावं."

                           000o000

                "  शरण आल्याने फरक पडत नाही. रिaलायझेशन केवळ पाय पकडून होत नाही. क्षमा मागणारा माणूस जास्त धोकेदायक. क्षमा मागं, चूक कबूल करणं हा बहाणा असतो. पुन्हा पहिल्याच मार्गावर जाण्याचा परवाना असतो. कारण वाकाव लागलं ह्याचा खोलवर राग असतो. कुणाचा तरी अपमान केला, असभ्य उद्गार काढले, आपल्या प्रतिमेला तडा गेला, तो सांधण्यासाठी माणूस क्षमा मागतो.  आपण मूळचे तसे नाही आहोत, हे ठसवण्याचा तो दुबळा प्रयत्न असतो. क्षमा मागण्याने पुन्हा पहिल्यासारखच वागण्याची मोकळीक मिळते. त्याऐवजी आपल्याला क्षमा कोणत्या कारणासाठी मागावी लागत आहे,  ह्याच आत्मनिरीक्षण करावं."

वपुर्झा /106/Surendra /26022025

सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२५

" आनंदाला परिवार हवा, सगेसोयरे हवेत."

" आनंदाला परिवार हवा, सगेसोयरे हवेत." 

                     000o000

                " यांत्रिक हालचालीने हसता येत. फोटोतली हसणारी व्यक्ती म्हणजे हसऱ्या व्यक्तीचा फोटो नव्हें. ' ह्या फोटोत तुम्ही किती छान हसत आहात ' अस कुणी म्हटल, तर नव्याने प्रसन्न कुठे वाटत? ' आणि रडतांना कुणी फोटो काढत नाहीत. रडण भोगायचं असत. हसण उपभोगायच असत. ह्याच कारणासाठी आनंदाला परिवार हवा, सगेसोयरे हवेत. आनंदाला सहल हवी, दुःखाला घर हवं. "

वपुर्झा /104/Surendra /25022025

रविवार, २३ फेब्रुवारी, २०२५

" आपला नवरा एकदम इब्लिस आहे.*

" आपला नवरा एकदम इब्लिस आहे.*

                     000o000

                "  प्रत्येक पुरुषाच्या बायकोला अस वाटतं की आपण फार सहनशील, साध्या, भोळ्या, मूकपणाने संसारातले फटके खाणाऱ्या आहोत आणि आपला नवरा एकदम इब्लिस आहे. त्याला जहांबाज बायको मिळणं फार जरुरीचं होत. वास्तविक प्रत्येक बाई स्वतःच्या नवऱ्याशी यथास्थित खंबीरपणाने, सावधगिरीने संसार करत असते. तरीही दुसरी बाई तिला फटकळ वाटते , नवऱ्याचा मान न सांभाळणारी दिसते आणि तिला वाटते की, अशी बाई आपल्या नवऱ्याला मिळायला हवी होती.*

वपुर्झा /102/Surendra /24022025

शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२५

" जगण्यासाठी प्रयोजन मिळालं की माणूस जगतो."

"  जगण्यासाठी प्रयोजन मिळालं की माणूस जगतो."

                           000o000

                "  जगण्यासाठी प्रयोजन मिळालं की माणूस जगतो. तो प्रयोजन शोधत असतो. बायको, प्रेयसी, मुलंबाळं, नोकरी , पत, प्रतिष्ठा, पैसा, वाहन, कीर्ती, मानसन्मान..... जितके डबे जोडता येतील तितके जोडायचे. व्याप वाढत गेला की बँकर्स शोधायचे. घाट संपला की बँकर्स सोडून द्यायचे. त्याच पळापळीत, गरज संपली आणि हौस भागली की आपल्यालाही तोडणारे भोवती असतात. पुन्हा एकाकीपण सुरू. अशा एकटेपणात ज्या माणसांकडे त्याचं जगण्याचं प्रयोजन स्वतःच्या हातात नसतं, त्या माणसांच्या ' ने रे पांडुरंगा ' आरोळ्या सुरू होतात." 

वपुर्झा /101/Surendra /23022025

शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२५

" मृत्यूवर कुणालाच विजय मिळवता येत नाही "

" मृत्यूवर कुणालाच विजय मिळवता येत नाही "

                     000o000

                "  मृत्यूवर कुणालाच विजय मिळवता येत नाही. त्याच कारणच हे, तो काटेकोरपणे वेळा सांभाळतो. वर्तमानकाळ जपतो. मागच्या पुढच्या क्षणांचं तो काही देणं लागत नाही. जीव वाचावा म्हणून केलेल्या प्रार्थनांशी त्याचा संबंध नाही. जिवाभावाचा माणूस त्याने नेला म्हणून तुम्ही दिलेले शिव्याशाप आणि पुढच्याच क्षणी नातेवाईकांनी फोडलेल्या किंकाळ्या तो ऐकत नाही.*

वपुर्झा /95/Surendra /22022025

" माणूस हा तसा नेहमी एकटाच असतो. त्याला म्हणूनच हवी असते एक सोबत."

"  माणूस हा तसा नेहमी एकटाच असतो. त्याला म्हणूनच हवी असते एक सोबत."

                           000o000

                "  माणूस हा तसा नेहमी एकटाच असतो. त्याला म्हणूनच हवी असते एक सोबत. जिला मनातील सगळी स्पंदन समजतील, आकांत कळेल, आक्रोश उमगेल, महत्वाकांक्षा पेलेल अशी हवी असते. आयुष्यातली हीं मोठी गरज नियतीने भागवल्यावर माणसाचं समाधान व्हायला हवं. पण नाही. एकमेकांच एकमेकांवर जिवापाड प्रेम आहे, हे आणखीन कुणालातरी समजावं अस त्याला वाटतं. अस का? ... .. ह्याला उत्तर नाही.

वपुर्झा /91/Surendra /21022025

गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२५

" स्वार्थी किंवा स्वतःच्याच सुखाचा विचार करणाऱ्या माणसांच्या जगात इतरांना अस्तित्व नसतं "

" स्वार्थी किंवा स्वतःच्याच सुखाचा विचार करणाऱ्या माणसांच्या जगात इतरांना अस्तित्व नसतं " 

                     000o000

                " जगायचं - आणि तेही जनावरापेक्षा वेगळं जगायचं __ म्हटलं की भूतकाळही हवा आणि स्वप्नही हवीत. केवळ कटू आठवणींनीच भूतकाळ भरलेला असला, तरी तो हवा, त्याच्या आठवणीही हव्यात. भोगून पार केलेली संकट आणि यातना, त्यांच्या येत                  ऊच्याराबरोबरच वेगळं सामर्थ्य देतात. त्याची नशा माणसाला मस्त बनवते , मस्तवाल बनवत नाही. ' वर्तमान मानणारा माणूस अत्यंत अमानुष होतो. कारण ह्या माणसांच्या गरजा क्षणांशी निगडीत असतात. कार्यक्षेत्रच संकुचित निवडलं की, यशस्वी ठरायला वेळ लागत नाही. भूतकाळ ओझच टाकतो का? काही रम्य आठवणींचे नजराणे देण्याचे सामर्थही भूतकाळातच असतं . अनेक माणसांचा उपयोग आपण शिडीसारखा केलेला असतो. ज्यांना हे मोठेपण नाकारायच असतं, तीच माणसं गेलेल्या काळाच काही देणं लागतं नाहीत.' ' हेकट माणसाजवळ तर्कशास्त्र नसतं, तर स्वार्थी किंवा स्वतःच्याच सुखाचा विचार करणाऱ्या माणसांच्या जगात इतरांना अस्तित्व नसतं.

वपुर्झा /94/Surendra /20022025(2)

बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२५

" ह्या बहिणीच नाव ' तडजोड ' ही तुम्हाला आयुष्यभर साथ देते"

" ह्या बहिणीच नाव ' तडजोड '  ही तुम्हाला आयुष्यभर साथ देते"

                     000o000

                "  चांगलं आणि वाईट ह्या शब्दांना स्वतंत्र अर्थ आणि अस्तित्व असत का? ' हो ' आणि ' नाहीं ' ही.           ' तुलना ' नावाची राक्षसीण जोपर्यंत मध्ये उभी राहत नाही, तोपर्यंत ह्या शब्दांचा विहार चालतो. तिने हस्तक्षेप केलं की संपल ! ही राक्षसीण येतांना एकटी येत नाही. तिच्याबरोबर तिची बहीण येते. ती तुम्हाला बहिणीच्या स्वाधीन करते आणि दुसऱ्या मनाचा बळी घेण्यासाठी ती निघून जाते. ह्या बहिणीच नाव ' तडजोड '  ही तुम्हाला आयुष्यभर साथ देते. 

वपुर्झा /94/Surendra /20022025

मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२५

" उशाशी त्या क्षणी डॉक्टर असेलच तर ते म्हणतात, ' I am sorry.' "

" उशाशी त्या क्षणी डॉक्टर असेलच तर ते म्हणतात, ' I am sorry.'

                     000o000

                "  काळ म्हटलं कीं वर्ष आली, महिने आले, महिन्याचे दिवस आणि दिवसांचे तासही आले. तासांनाही मर्यादा आहेच. सात दोनदा वाजतात. आठ, नऊ, दहा, अकरा, बारा,..... सगळे तास दोनदा वाजतात. एव्हढया प्रचंड, अनादि- अनंत काळाची किती छोटी शकलं? चोवीस तासांचा एवढास्सा तरजू. तो कसा काळाला न्याय देईल? दोन पायांचा माणूसही मग काळापेक्षा वेळेचं भान जास्त ठेवतो. वेळेइतकाच छोटा होतो. क्षुद्र होतो. माणूस क्षुद्र होतो आणि काळचं काम सोपं होत. क्षुद्र कीटकला मारण्यासाठी फार बळ वापराव लागतं नाही. काळ फक्त वेळ साधतो. सेकंदाइतका छोटा होतो. उशाशी त्या क्षणी डॉक्टर असेलच तर ते म्हणतात, ' I am sorry.'

वपुर्झा /86/Surendra /18022025

सोमवार, १७ फेब्रुवारी, २०२५

" बायकोचा उपयोग मी कसाही करीन, तिनं चांगलंच वागण्याची ग्यारंटी दिली पाहिजे."

" बायकोचा उपयोग मी कसाही करीन, तिनं चांगलंच वागण्याची ग्यारंटी दिली पाहिजे." 

000o000

   "  बहुसंख्य माणसांना कशाची ना कशाची  ग्यारंटी हवी असते. ह्या मूर्ख माणसांना कसली ग्यारंटी हवी असते? ह्या माणसांचा स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास नाही का? जगात हमी कशाची देता येते? ' आय प्रॉमिस टु पे द बेअरर ' ---- ह्या शब्दाकडे गहाण पडलेल्या माणसांना यंत्र आणि मानवी मन ह्यातला फरक समजतं नाही. माणूस ग्यारंटी मागतो, त्यामागे खरच काय धारणा असेल? चपलेचा अंगठा शिवून देणाऱ्या चांभाराकडेही एक रुपयाच्या बदल्यात आपल्याला हमी हवी असते. तो शांतपणे सांगतो, " साहेब, चपलेचा अंगठा किती टिकेल, ते चालण्यावर अवलंबून हाय!". हे उत्तर आपल्याला व्यावसायिक चातुर्याच वाटत. आम्ही कसेही चाललो, चप्पल कशीही वापरली, तरी ती ' टिकली पाहिजे ' हा हेतू. चप्पल काय आणि संसार काय -- तो कुणाच्या हातात पडतो त्यावर अवलंबून. बायकोचा उपयोग मी कसाही करीन, तिनं चांगलंच वागण्याची ग्यारंटी दिली पाहिजे.

वपुर्झा /84/Surendra /17022025(2)

रविवार, १६ फेब्रुवारी, २०२५

" आयुष्यात मग माणसाला वेगवेगळे पाय फुटायला लागतात."

"  आयुष्यात मग माणसाला वेगवेगळे पाय फुटायला लागतात."

                           000o000

                "  चालायला शिकणार मूलच फक्त स्वतःच्या पायांवर चालत. ते जस जस मोठ व्हायला लागतं तसं तसं ते स्वतःला पाय आहेत हे विसरायला लागतं. नंतरच्या आयुष्यात मग माणसाला वेगवेगळे पाय फुटायला लागतात. पत, ऐपत, प्रतिष्ठा, पैसा, सत्ता, कीर्ती, यश, लौकिक, प्रसिद्धी, राजकारण, स्पर्धा, पक्ष, जात, धर्म  परंपरा, रूढी..... पायच पाय. ह्या पायांच्या जोरावर तो आयुष्यभर लाथाळी करतो. हळूहळू एकेक पाय गळायला लागतात. 'सत्ता ' हा एक महत्वाचा पायच जातांना खूपच पाय नेतो. वार्धक्य जवळ येईतो सगळं गेललं असतं. तोपर्यंत आपल्याला स्वतःचे पाय होते ह्याच विस्मरण झालेलं असतं, ज्यामुळे तो माणूस आहे हे ओळखलं जात होत. वार्धक्यात गुढगे गेले असं म्हणायचं. खरं तर सगळे पायच गेलेले असतात. 

वपुर्झा /83/Surendra /17022025

शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२५

"आपण सिव्हिलियन्स. आपली युद्ध वेगळी."

"आपण  सिव्हिलियन्स. आपली युद्ध वेगळी."

                           000o000

                "  असा बघतोस काय मित्रा? -- बाबा रे, आयुष्य हे नुसतं जगण्यासाठी नसून, ' मजेत जगण्यासाठी ' आहे. ' Life is for Living' ह्याच्यापुढे ' Happily' हा शब्द आपण लिहायचा आहे. कितीही किंमत मोजावी, पण हसत जगाव. पर्वा करू नये. त्यासाठी प्रथम स्वतःच रक्षण करावं. ' आत्मानं सततं रक्षेत!' आता हे रक्षण कुणापासून? परचक्रापासून? No राजा No! युद्ध वारंवार होत नाहीत. आणि झाली तरी त्यासाठी मिल्ट्री आहे. आपण    सिव्हिलियन्स. आपली युद्ध वेगळी. आपला बुद्धिभेद करणारी माणसं सतत आपल्या आसपास वावरत असतात,  त्यांच्यापासून स्वतःचं रक्षण करायला हवं. "

वपुर्झा /56/Surendra /14022025

बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२५

"आपण नक्की म्हातारे झालो, असं केव्हा समजावं?"

"आपण नक्की म्हातारे झालो, असं केव्हा समजावं?"

                     000o000

                "  आपण नक्की म्हातारे झालो, असं केव्हा समजावं? तर चमचमीत कांद्याची भजी खातांना जेव्हा खोकल्याची आठवण होते तेव्हा! उडी मारून रुळ ओलांडायची भीती वाटते तेव्हा! जागरण म्हणजे रक्तदाब किंवा पंगतीतलं पिवळ्याधमक केशरी जिलेबीच ताट म्हणजे मधुमेह, असली त्र्यराशिक दिसायला लागतात तेव्हा! रस्त्यावरून जाणाऱ्या बाईकडे नजर जाण्याअगोदर तिच्या कडेवरच्या मुलाकडे जेव्हा प्रथम लक्ष जातं, तेव्हा म्हातारपण आलं असं खुशाल समजावं.

वपुर्झा /47/Surendra /12022025

" पोरकेपणा म्हणजे काय? "

"  पोरकेपणा म्हणजे काय? " 

                           000o000

                "  पोरकेपणा म्हणजे काय? आपली व्यथा इतरांना नं समजण हाच पोरकेपणा. केव्हा केव्हा हे पोरकेपण आपण लावून घेत नाही. हे असच असतं आयुष्यात, असं म्हणतो. स्वतःची समजूत स्वतःच घालतो. पण कुठेतरी ठिणगी पडते आणि सगळं खाक होत. असं हे पेटणं म्हणजे कापराचं पेटणं. मला स्वतःला जळायला आवडत. ज्याच्यात जळून जाण्याची ताकद आहे, तोच माणूस! पण त्याच वेळेला मला आमच्याकडे येत असतील तर नक्कीच शिवसेनेमध्ये त्यांचं स्वागत आहेहे असं कापराचं जळणं आवडत नाही. ह्याच कारण, मागे काही उरतच नाही. राखेच्या रूपाने का होईना, माग काहीतरी राहायला हवं. त्यां राखेतूनच काहीतरी निर्माण होण्याची आशा असते. व्यथासुद्धा कापरासारखी जळता कामा नये.  थैलीच तोंड सुटलं कीं सुटणारी तोंड घट्ट मिटतात. नीती - अनीतीच्या चौकटी शेवटी बँकेच्या काउंटरवरच ठरतांत. म्हणूनच पैशेवाल्यांना त्यांच्या भानगडी करणं आणि निस्तरण सोपं जातं. कारण समाजानंच त्यांना स्वाभाविकपणाची लेबलं बहाल केलेली असतात.

वपुर्झा /39/Surendra /12022025

मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०२५

"संसार बुद्धिमत्तेच्या जोरावर होत नाही नेहमी."

"संसार बुद्धिमत्तेच्या जोरावर होत नाही नेहमी."

                           000o000

                "  संसार बुद्धिमत्तेच्या जोरावर होत नाही नेहमी. तो होतो भक्तीतून, प्रेमातून. प्रेमाचा उगम मनात असतो. भक्तीने संसार करणाऱ्या स्त्रीने वैवाहिक जीवनातला प्रत्येक क्षण संसार आणि नवरा यासाठी जपलेला असतो. तिने स्वतःच निराळ अस्तित्व मानलेल नसतं. तिच्या साथीदारासाठी तिचा सतत त्याग चाललेला असतो. तो त्याग तिच्या साथीदाराने ओळखुन तिला सतत 'दाद ' द्यावी एव्हडीच तिची एकमेव इच्छा असते. आणि मग तेव्हड्याचसाठी तिला प्रेमात भागीदार नको असतात. आपला माणूस कायम आपलाच राहावा हीं पत्नीची भावना पण स्वाभाविकच. " 

वपुर्झा /38/Surendra /11022025

सोमवार, १० फेब्रुवारी, २०२५

" माणूस कितीही मोठा असो. राजा असो - भिकारी असो, गरीब असो श्रीमंत असो, आई असो - बाप असो वा अगदी पोटचा पोर असो."

" माणूस कितीही मोठा असो. राजा असो - भिकारी असो, गरीब असो श्रीमंत असो, आई असो - बाप असो वा अगदी पोटचा पोर असो."

                     000o000

                " माणूस कितीही मोठा असो. राजा असो - भिकारी असो, गरीब असो श्रीमंत असो, आई असो - बाप असो वा अगदी पोटचा पोर असो. त्याच्या नशिबातले शेवटचे शब्द हेच, " उचला आता! ". सगळे अवयव म्हणे एकदा ब्रम्हदेवाकडे गेले आणि म्हणाले," आमच्यातला मोठा कोण हे सांगा. " ब्राम्हदेव म्हणाले " ज्याच्या वाचून अडतं तो मोठा. "  त्यावर प्रथम डोळे रुसून गेले. माणसाला देवाने विचारलं, ' डोळ्या शिवाय तू कसा जगलास? " त्यावर माणसाने सांगितले, ' जगलो एखाद्या आंधल्याप्रमाणे! '. मग कान रुसून गेले. पुन्हा प्रश्न विचारल्यावर माणूस म्हणाला, ' जगलो एखाद्या बहिऱ्याप्रमाणे! '. असं होता होता, सगळे अवयव रुसून थकले. शेवटी प्राण रुसून जायला लागला आणि माणूस उत्तर द्यायला उरलाच नाही. तेव्हा जेहेत्ते कालाचे ठायी, सर्वात महत्वाचा प्राण. म्हणूनच तो एकदा रुसून गेला कीं बाकीचे म्हणतात ' उचला आता ! ".

वपुर्झा /36/Surendra /09022025

शनिवार, ८ फेब्रुवारी, २०२५

"तो लेखक नसेल, पण प्रतिभावंत असतो."

"तो लेखक नसेल, पण प्रतिभावंत असतो."

                           000o000

                "  संसार यां शब्दा बरोबरच संघर्ष हा आलाच. संघर्ष नेहमी दुसऱ्या माणसाबरोबरच असतो, असं नाही. नको वाटणारा निर्णय घेण्याची पाळी स्वतःवरच आली कीं, स्वतःशीच संघर्ष सुरु होतो. संसारात यां संघर्षाचं खापर फोडण्यासाठी जोडीदार मिळतो इतकंच. पण, असे हे संभाव्य संघर्ष कुणामुळेही निर्माण झाले तरी, एकमेकांना    ' गुड - नाईट ' म्हणण्यापूर्वी त्यां दिवसाचे संघर्ष त्याच दिवशी संपवायचे आणि उगवत्या सूर्याच ताज्या मनाने स्वागत करायच. संसार यशस्वी करण्या साठी आणखी वेगळं काहीच करावं लागत नाही. नियती एक कोरा, करकरीत दिवस सूर्योदयाबरोबर तुम्हाला बहाल करते. रात्र म्हणजे कालचा फळा पुसून लख्ख करणार डस्टर. त्यां स्वछ फळ्यावर आपण कालचेच घडे का लिहायचे? - जो नव्या दिवसाला कोऱ्या मनाने समोरा जातो, नवा मजकूर लिहितो, तो लेखक नसेल, पण प्रतिभावंत असतो. "                      वपुर्झा /25/Surendra /09022025

" त्यापेक्षा एकलेपणाचा शाप परवडला "

"त्यापेक्षा एकलेपणाचा शाप परवडला "

                           000o000

                "  शृंगार आणि वैराग्य एकत्र नांदत नाहीत, त्याचप्रमाणे संशय आणि भक्ती. वैराग्य केवळ तारुण्यावर आघात करीत असेल, पण संशय उभ्या आयुष्याची राख करतो. आयुष्यातले आनंदाचे क्षण, उपेक्षेचे हुंदके, दुःखाचे कड आणि आवर घातलेले आवेग - हे ज्याचे त्यालाच माहीत असतात. एखादा तरी साक्षीदार अशा उन्मळून टाकणाऱ्या क्षणी जवळ असावा ह्यासारखी इच्छा पूरी नं होणं ह्यासारखा शाप नाही. पण साक्षीदार मिळून त्याला त्यातली उत्कटता नं कळण ह्यासारखी वेदना नाही. त्यापेक्षा एकलेपणाचा शाप परवडला . " 

वपुर्झा /23/Surendra /08022025(2)

" किती दमता तुम्ही? "

" किती दमता तुम्ही? "

                           000o000

                "  किती दमता तुम्ही? " ह्या एका वाक्याची माणसाला किती भूक असते हे सांगता येणार नाही. दहा माणसांचा स्वयंपाक करून दमलेल्या बाईला पण एवढं एकच वाक्य हवं असतं आणि कामावरून आलेल्या पुरुषालापण !  इतर कितीही गरजा असोत, पण हे एवढं एकच वाक्य ऐकायची ज्याला भूक आहे त्यां पुरुषाने आपल्या बायकोला कधीही नोकरीला लावू नये. पुरुषाला स्वयंपाक येऊ नये आणि बाईला नोकरीं करता येऊ नये. एकमेकांच्या कर्तृत्वाचे प्रांत एकमेकांना अनभिज्ञच हवेत. तरच एकमेकांच्या कर्तबगारीच कौतुक टिकतं. ' त्यात काय आहे, हे मी पण करीन ' - इथं अर्पणभाव संपला, स्पर्धा आली. कौतुक संपलं, तुलना आली. साथ संपली, स्वत्वाची जाणीव आली.

वपुर्झा /22/Surendra /08022025

गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०२५

" पतीपत्नीच एकच एक मत असल तर संसारात स्वर्ग निर्माण होतो."

" पतीपत्नीच एकच एक मत असल तर संसारात स्वर्ग निर्माण होतो.

                     000o000

                "  माणसाला काही ना काही छन्द हवा. स्वप्न हवीत. पूरी होणारी किंवा कायम अपुरी राहणारी. त्यातून तो स्वतःला हरवायला शिकतो. सापडायला शिकतो. हे    हरवण - सापडणं प्रत्येकाचं निराळ असतं. पतीपत्नीच एकच एक मत असल तर संसारात स्वर्ग निर्माण होतो. पतीपत्नीच्या ह्या हरवण्या- सापडण्याच्या जागा एकच निघाल्या तर ते सुख - दुःखाचे समान वाटेकरी होतील. दोघांच्या अशा जागा किंवा स्वप्न वेगवेगळी असतील, तर प्रकृतीधर्मानुसार हे स्वाभाविक आहे, पण तो एकमेकांच्या टींगलीचा विषय होऊ नये. इतपत भान संसारात ज्यांना टिकवता येईल, त्यांना संसार सुखाचं मर्म सापडलं.  ज्यांना हे असं हरवता येत नाही, रिकाम्या वेळेचे बळी होतात. रिकामा वेळ   सैतानाचाच.

वपुर्झा /19/Surendra /07022025

" बालपण जसं परावलंबी असतं तसंच वर्धक्यहीं "

" बालपण जसं परावलंबी असतं तसंच वर्धक्यही." 

                           000o000

                "  एक मनुष्यजन्म. तोही म्हणे चौरऐशी लक्ष फेऱ्यानंतर. अर्थातं मला त्याच्याशी कर्तव्य नाही. मला दिसतो तो समोरचा जिताजागता माणूस. त्यातल्या त्यात त्याचा तारुण्याचा काळ. उत्पत्ती, स्थिती, लय, सकाळ, दुपार, संध्याकाळ. सगळा निसर्गच दादरा तालात आखलेला. बालपण, तारुण्य, वार्धक्य. जास्तीत जास्त सुख उपभोगण्याचा काळ - तारुण्य. संततीच्या रूपाने माणसाला तारुण्यात, बालपण पुन्हा अनुभवता येत, पण वार्धक्यात तारुण्य अनुभवता येत नाही. जाणिवा जाग्या झाल्या पासून प्रत्येक जण आतुरतेने वाट पहातो, ती तारुण्याची. तारुण्याचा काळ हा जसा जास्तीत जास्त सुख उपभोगण्याचा काळ आहे, तसाच तो जास्तीत जास्त कर्तृत्व दाखवण्याचा, व्यक्तिमत्व घडविण्याचा काळ आहे. बालपण जसं परावलंबी असतं तसंच वर्धक्यही. स्वतःच्या मतांचा मागोवा आणि पाठपुरावा करण्याचा अधिकार तारुण्यातच अनुभवता - उपभोगता येतो "                                       वपुर्झा /17/Surendra /07022025

" परमेश्वराची योजना निराळी असते "

" परमेश्वराची योजना निराळी असते " 

                           000o000

                "  परमेश्वराची योजना निराळी असते. आपण मर्त्य जीवांनी त्यात ढवळाढवलं केली कीं बॅलन्स जातो. तोल बिघडतो. त्याची रचना पाहा, तो तापट नवऱ्याला थंड बायको देतो, कंजूष नवऱ्याला उधळी बायको देतो.            ' भगवंता, कसली जोडीदारीण देतोस? ' म्हणून आपण त्याच्या नावाने खडे फोडतो, पण त्याची ती योजना अचूक असते. आपल्याला तो हेतू समजत नाही. मग आपण दुःखी होतो. केवळ बाह्य देखाव्यावर भुलून, कातडीचा रंग पाहून लग्न जमवतो. आर्थिक बाजू पाहतो, सौदंर्य शोधतो, शिक्षणाचा अंदाज घेतो - आणि केवळ रुपावर भाळून आयुष्यातले निर्णय घेतो. आणि म्हणूनच वैतागतो, पस्तावतो. परमेश्वराने भलतातच जोडीदार गळ्यात मारला म्हणून कातावतो.  

वपुर्झा /12/Surendra /06022025

बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२५

" द्रव्यार्जनाची शक्ती म्हणजेच पुर्यषार्थ नाही "

" द्रव्यार्जनाची शक्ती म्हणजेच पुर्यषार्थ नाही " 

                     000o000

                "  स्वप्न बाळगण्या साठी कर्तृत्व लागत असं कुणी सांगलीतले? अनेक माणसांच्या बाबतीत, ते जन्माने पुरुष आहेत, एवढा पुरुषार्थ त्यांना पुरतो. ' अर्थ असलेला पुरुष ' म्हणजे पुरुषार्थ अशी व्याख्या ते करीत नाहीत. हिरकणी योगायोगाने मिकते. ती टिकवायची असते हे ज्यानां उमगत ते ' पुरुष'  शब्दाला ' अर्थाची ' जोड देतात. कर्तृत्व नसेल तर नसेल. प्रत्येकाकडे असतं असं नाही. पण कर्तृत्व अनेक प्रकारचं असतं. द्रव्यार्जनाची शक्ती म्हणजेच पुर्यषार्थ नाही. जोडीदारावर अमाप माया करणं, बायकोची शक्ती ओळखण, तिला सुरेख साथ देणं, तिला आपली साथ सोडावीशी नं वाटेल इतकी तिच्या कर्तृत्वाची शान सांभाळणे, हा सगळा पुरुषार्थच, क्षमाभाव, वात्सल्य हीं गुणवत्ता केवळ बायकांची माक्तेदारी नाही. 

वपुर्झा /08/Surendra /006022025

"वंचना, आत्मवंचना म्हणतात ती ह्यालाच."

"वंचना, आत्मवंचना म्हणतात ती ह्यालाच."

                           000o000

                "  अधिकाराच्या जोरावर आपण जेव्हा दुसऱ्या माणसाला गप्प करायचा प्रयत्न करतो, त्यामागे अधिकाराच्या भावनेपेक्षा भीतीची भावना मोठी असतेच, पण कदाचित निरुत्तर होऊ याची दहशत असते. ह्याचाच अर्थ सत्याची आपल्याला भीती वाटते. विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना आपल्या कडे उत्तर नाही हे सत्य! त्या सत्याला आपण घाबरतो आणि मग बाजू लंगडी पडायला नको म्हणून, दुसऱ्या गोष्टीचा आधार घेऊन आपण समोरच्या माणसाचं तोंड गप्प करतो. हा मार्ग नेहमीच फसवणारा असतो. वंचना, आत्मवंचना म्हणतात ती ह्यालाच. ह्यामुळे दोन माणसं घायाळ होतात. दंडपशाहीमुळे बोलू न शकणारा आणि खुद्द दंडपशाही करणारासुद्धा. एक घायाळ झाल्याचं इतरत्र दाखवीत सुटतो, दुसरा दाखवत नाही. एवढाच फरक! पण त्यात गंमत अशी कीं, जो उघडपणे दर्शवत नाही तो कायम आतल्या आत धास्तावलेला असतो" वपुर्झा /07 /Surendra /05022025

सोमवार, ३ फेब्रुवारी, २०२५

" हीं स्वतःचीच पूजा झाली !!"

" हीं स्वतःचीच पूजा झाली !!"

                           000o000

                "  व्यवहारी माणसात, समाजात चांगल वागायचं ते केवळ वाईट दिसू नये म्हणून. म्हणजेच मूळ वृत्तीला विसरून रीत सांभाळायची. इथंच यातना आहेत. एखादाच बदल असा असतो कीं त्याचा मनाने स्वीकार केला जातो. बाकी सगळं लादलेल असत. प्रत्येक माणूस आयुष्यभर इतरांवर काही ना काही लादत असतो. प्रत्येक माणूस समोरच्या माणसाला स्वतःसारखं करण्याची धडपड करतो. जितक्या प्रमाणात समोरचा माणूस आपल्या मनाप्रमाणे वागेल तेव्हड्याच प्रमाणात तो समोरच्या माणसांवर प्रेम करतो. ह्या स्वरूपाच प्रेम करणं हे प्रेमच नाही. हीं स्वतःचीच पूजा झाली. समोरचा माणूस जसा असेल तसें स्वीकारणारे किती? "

वपुर्झा /05 /Surendra /04022025(2)

खरं तर दासबोधा नंतर मराठी साहित्यात एकही ओळ कुणी लिहिली नसती तरी चाललं असत."

" खरं तर दासबोधा नंतर मराठी साहित्यात एकही ओळ कुणी लिहिली नसती तरी चाललं असत." 

                           000o000

                "  दासबोधसारखा महान ग्रंथ, करमणूक करणारा ग्रंथ नव्हे. माणसातल्या वृत्तीतली एकही छटा तिथं निसटलेली नाही. मुंबईच्या शेअर बाजारात मध्यभागी बसून समर्थांनी सगळ्या वृत्ती टिपल्यासारख्या वाटतात. खरं तर दासबोधा नंतर मराठी साहित्यात एकही ओळ कुणी लिहिली नसती तरी चाललं असत. तरी इतकी पुस्तक निघतात. कारण अहंकार, मलाही जग समजलंय हे सांगायचा अट्टाहास. मी तरी एवढं लेखन का केल? मनाचे श्लोक वाचून गप्प बसायला हवं होत.

वपुर्झा / 04  /Surendra /04022025

" शेवटी हे प्रश्न आपल्यापर्यंत पोचतात " 000o000

" शेवटी हे प्रश्न आपल्यापर्यंत पोचतात "

                           000o000

                "  राजकीय पातळी वरचे प्रश्न आपल्या आकलनापलीकडे आहेत. शेवटी हे प्रश्न आपल्यापर्यंत पोचतात, ते वर्तमाणपत्रातून. त्यातल्या सत्यासत्यतेची तरी कुठे शाश्वती आहे? कोणतं ना कोणतं वृत्तपत्र कोणत्या ना कोणत्या पक्षाला, नाहीतर उद्योगपती्ना विकलं गेलं आहे. ते खरं तर News papers नाहीत तर Views papers आहेत. एखादा प्रचंड मोठा भ्रष्टाचार प्रथम उघडकीस आला की, तो मथळ्याचा विषय होतो. चौकशी समिती नेमून काही प्रतिष्ठितांची चार पाच महिने सोय होते. हळूहळू त्या Headlines चीं पीछेहाट होते, चौथ्या पानावर तिचा Tail piece होतो आणि रोज नव्या भ्रष्टाचारासाठी मथळ्याची जागा रिकामी ठेवावी लागते. न्यूटनच्या मूव्हमेन्टच्या तत्वाप्रमाणे आपल्या देशाची लोकसंख्याच इतकी प्रचंड आहे कीं, तिच्याच गतीने राज्य आपोआप चाललं आहे."

वपुर्झा /Surendra /03022025

शनिवार, १ फेब्रुवारी, २०२५

" आपलं कुटूंब महाभारताचा भाग नाही का?"

"आपलं कुटूंब महाभारताचा भाग नाही का?"

                           000o000

                "  आपलं कुटूंब महाभारताचा भाग नाही का? लग्न -विवाह हा एकच विषय खूप मोठा आहे. आजही देशस्थ, कोकणस्थ, कऱ्हाडे, सी. के. पी., एस. के. पी. हे भेदभाव नाहीत का? समोरची व्यक्ती हीं आपल्या सारखीच जितीजागती आणि सुशिक्षित माणूस आहे, ह्याचा कितपत विचार होतो? सौन्दर्याच्या बाबतीत प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या असतील, ते मी समजू शकतो. गरिबी आणि श्रीमंतीचे राक्षस अजून मध्ये येतात. परंपरा, संस्कार, मानपान, देवाणघेवाण अशा किती क्षुद्र गोष्टीभोवती आजही आपण वावरत आहोत? कशाच्या आधारावर आपण स्वतःला माणूस म्हणवून घ्यायचं?

वपुर्झा /Surendra /01022025

"प्रकाशाचा हा किरण धरून ठेवता येणं हीं इतर अनेक कलापैकी श्रेष्ठ कला, पण ती कला आहे, हेच आपल्याला ज्ञात नाही"

"प्रकाशाचा हा किरण धरून ठेवता येणं हीं इतर अनेक कलापैकी श्रेष्ठ कला, पण ती कला आहे, हेच आपल्याला ज्ञात नाही"

                           000o000

                "  अपेक्षाभंगाचा क्षण, झटका ह्यांहून वेगळा असतो का? आयुष्य आजवर किती जगलो, ह्या आकडेमोडीत काही अर्थ नाही. प्रकाश आणि अंधाराचा खेळ कॅलेंडरवरच्या चौकोनासाठी. आपल्या आयुष्याच्या वाटेवर कायम अंधारच असतो. क्षणाला क्षण घट्ट चिकटून असतांनाही पुढच्या क्षणी काय घडणार आहे, हे आपल्याला माहीत नसणं म्हणजे अंधारच नव्हे काय? जेवता - जेवता ठसका लागण, चालतांना ठेचं लागण, इतक्या किरकोळ बाबीपासून, एखाद्याने पत्नीला चहा करायला सांगणं एक कप चहा तयार व्हायच्या आत त्याने जगाचा निरोप घेणं इतक्या घटनांपर्यंत, पुढचा क्षण अद्यात असतो. अपेक्षाभंगाचा क्षण हा प्रकाशाचा किरण. आपण अंधारातून चालत आहोत, ह्याची जाणीव हा किरण करून देतो. प्रकाशाचा हा किरण धरून ठेवता येणं हीं इतर अनेक कलापैकी श्रेष्ठ कला, पण ती कला आहे, हेच आपल्याला ज्ञात नाही. म्हणूनच आपण तेवढ्यापुरते सावध होतो आणि पुन्हा अंधारातली वाटचाल चालू ठेवतो.

वपुर्झा /Surendra /01022025

शुक्रवार, ३१ जानेवारी, २०२५

"एकाकी अस्थिर अवस्थेत, एकांतात एखाद्या व्यक्तीचा निशब्द वावरही तुम्हाला किती बळ देतो, ते जीवनाचा साथीदार गेल्यावर कळत."

"एकाकी अस्थिर अवस्थेत, एकांतात एखाद्या व्यक्तीचा निशब्द वावरही तुम्हाला किती बळ देतो, ते जीवनाचा साथीदार गेल्यावर कळत."  

                           000o000

                "   ज्यांचा परिचय झाल्यावर आपल्याला आपलं जगणं समृद्ध झाल्यासारखं वाटतं ती सगळी चैतन्यन्याची रूप. ज्यांची नावं ऐकल्या - आठवल्यावर आपल्याला सुरक्षित वाटतं. ते सगळे अवतारी पुरुष. अवतारी पुरुष म्हटलं की रुद्राक्षांच्या माळा दिसायला हव्यात असं नाही. उलट असा काही व्यक्तीकडे मी आजवर, माहिती समजता क्षणी, श्रद्धेने गेलो आहे. तेव्हा वेदांत ऐवण्यापलीकडे, चिरंतन तत्व ऐकवण्यापल्याड त्यांनी काहीही केल नाही.       ' प्रयत्न चालू ठेवा किंवा मार्गशिर्ष महिना जाऊ दे, ग्रीषम उलटू दे, मग बघा ' ह्यापलीकडे काही सांगितले नाही. मला अशा सगळ्या साधकांच्या वैयक्तिक साधने बद्दल काहीही शंका घ्यायची नाही. त्यांनी अप्रत्यक्ष दिलेल्या आशिर्वादावर सुद्धा काही संकटानंच परस्पर निर्दलान झालं असेल, पण व्यवहारात येणारी संकट आणि समस्या निवारण्या साठी जे वेगळं रसायन लागत, त्याला 'मित्र' म्हणतात. ऐन वैशाखात, ' वर्षा  ' ऋतुची शास्वती आणि गारवा फक्त मित्रच देतो. कसलेही हिशोब न ठेवता जो गणिताप्रमाणे शाश्वत, नेमकेपणा देतो, तो मित्र. 

                स्वतःचा वेळ खर्च करणारा, तुमचा मित्र  देवमाणसासारखा असतो. फार कशाला, तुमच्या विद्ध मन:स्थितीत, भीषण एकटेपणी, एकाकी अस्थिर अवस्थेत, एकांतात एखाद्या व्यक्तीचा निशब्द वावरही तुम्हाला किती बळ देतो, ते जीवनाचा साथीदार गेल्यावर कळत. 

वपुर्झा /Surendra /31012025

सोमवार, २७ जानेवारी, २०२५

" परकीय शत्रूशी कसं वागावं?"

" परकीय शत्रूशी कसं वागावं?" 

                           000o000

           "  परकीय शत्रू हा तर राजनीतितला फार महत्वाचा विषय, त्याच्याशी कसं वागावं? परराष्ट्रनींतीत संधी आणि स्वार्थ महत्वाचा. इथे कधीच कोणाशी कायमच शतृत्व वा मैत्री करायची नसते. परराष्ट्रनीती आणि युद्धनीती हाताळतांना राजाने संधी, विग्रह, आसन द्वेधीभावं आणि समाश्रय याचा विचार केला पाहिजे. शत्रू आपल्याहून बलिष्ठ असेल तर संधी साठी जास्त प्रयत्न करावेत, शांतीचे गोडवे गावेत, स्वतःच फार नुकसान होणार नाही याची काळजी घेत शत्रूचं तुष्टीकरणहीं कराव. पण तेच जर आपलं सामर्थ अधिक असेल तर शांती धुडकावून विग्रहाची तयारी करावी. तो नसला तरी मुद्दाम निर्माण करावा, कुरापती काढाव्यात, शत्रूच्या मर्मस्थळावर छुपे आघात करावेत, त्याच्या राज्यातल्या घरभेद्दयांना हाताशी धरून शत्रूराज्यात उत्पात माजवावा. असे प्रयत्न करावेत की जेणेकरून शत्रू संघर्षासाठी सिद्ध होईल. कलहाच्या आढीत शत्रूच फळ आधी पक्व करावं, आणि मगच ते तोडण्यासाठी हात घालावा. कलह किंवा विग्रह हा छूप्या युद्धाचा प्रकार आहे. प्रत्यक्ष युद्धाआधी हे छद्म युद्ध राजाने अवश्य लढावं. त्यातून शत्रूला अडचणीत आणून ' यान ' म्हणजे चढाई करावी. चढाईपूर्वी शत्रूची सर्व बलंस्थान माहित करून घ्यावीत. शक्तियुक्तीचा योग्य समन्वयं साधून शत्रूला रणांगणात खेचाव आणि नष्ट करावं."दुर्योधन/144/Surendra /27012025

शनिवार, २५ जानेवारी, २०२५

" प्रजेसाठी चांगला राजा कोणता?"

 "  प्रजेसाठी चांगला राजा कोणता?"                           

           "  प्रजेसाठी चांगला राजा कोणता? धर्मात्मा, सत्यवक्ता, शांत, चारित्रवान, जितेंद्रीय, आणि सौम्य शिक्षा करणारा राजा प्रजेला सुखावह होतो. राजाने बलाच्या उपासनेला योग्य ते महत्व दिलंच पाहिजे. कारण धर्मसुद्धा बलवंतांच्या अधीन असतो. जय केवळ धर्मामुळे मिळत नाही. त्याला शक्तीची, सामर्थ्यांची जोड हवी. वृक्षांच्या आश्रयाने वाढणाऱ्या वेलींची सत्ता जशी त्या वृक्षावर नसते, तशीच सामर्थ्यावर घर्माची सत्ता चालत नाही. दुबळ्यांच्या धर्माला कोण विचारतो? 

               राजाने कोणावरही विश्वास ठेवू नये. ज्याचा आपल्यावर विश्वास नाही त्याच्यावर तर नाहीच नाही, पण ज्याचा आपल्यावर विश्वास आहे, त्याच्यावरही नाही. राज्याची वाणी नम्र, पण अंतःकरण शस्त्राहूनही तीक्ष्ण असावं. शत्रूवर प्रहार करण्यापूर्वी गोड बोलाव, प्रहार करतानाही गोडच बोलाव आणि प्रहार केल्यावर त्याच्या विषयी सहानभूती व्यक्त करावी, खेद प्रदर्शित करावा. शत्रूने कितीही गयावया केली तरी त्याची गय करू नये. कारण ऋण,अग्नी आणि शत्रू यांना शिल्लक राहू दिल की, ते पुन्हा पुन्हा वृद्धिंगत होतात. वणव्याने होणारी वाताहत टाळायची असेल तर ठिणगीची उपेक्षा करताच कामा नये. शत्रूला आमिष दाखवावीत, आश्वासन, वचन द्यावीत, पण ती कधीही पाळू नयेत. त्यासाठी योग्य सबबी सांगतं जाव्यात. आपल्या कठीण काळात शत्रूशी सख्य करून आपलं सामर्थ वाढवावं. त्यासाठी कोणताही सुष्ट - दुष्ट मार्ग वापरावा. शक्ती वाढली की मग शत्रूशी धर्माच्या चर्चा करायला, प्रसंगी त्याला डोक्यावर घेऊन नाचायलाही हरकत नाही. मात्र योग्य वेळ येताच दगडावर आपटलेल्या मडक्याप्रमाणे त्याचा चुराडा करावा. राजकारणात            गोपनीयता हवीच. राज्यकारभाराचा प्राण आहे. पदरी माणसं निष्ठावान असावीत. त्यांची निष्ठा पुन्हा पुन्हा पारखून घावी. विषप्रयोगाने वा शत्राने एकटा - दुकटा  माणूस मरतो, पण गोपनीयता फुटली तर राजा, प्रजा यासह अवघ राष्ट्र धुळीला मिळत.

दुर्योधन/140/Surendra /26012025