SurendraSP blog
गुरुवार, ३० एप्रिल, २०२६
*जोड़ीदार* - संघर्ष एका मुलाचा, लग्नासाठी, नोकरीसाठी आणि अपेक्षांच्या जगातला!पूर्ण शॉर्टफिल्म नक्कीच बघा.लाईक शेअर,कमेंट्स आणि चॅनलला सब्स्क्राईब नक्कीच करा.30/04/2026
बुधवार, ३१ डिसेंबर, २०२५
🌹 Happy New Year 2026 🌹
🌹 Happy New Year 2026 🌹
. " नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करूया, आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाची सुरुवात करुयानवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
To all my well wishers
Surendra Patharkar,
Writer/Blogger/Podcastar
गुरुवार, १८ डिसेंबर, २०२५
मराठी कथा: " अंतिम लढत " लेखक : सुरेंद्र पाथरकर, ई प्रकाशित by ई साहित्य प्रतिष्ठान, मुंबई.
गुरुवार, २० नोव्हेंबर, २०२५
" विचार शृंखला:124: 20112025 "
"विचार शृंखला:124:20112025 "
124) " वर्तमानकाळ बोलायचा नसतोच. तो जगायचा असतो. माणसं बोलतात ती भूतकाळाबद्दल. त्यातल्या त्यात दुःखाच्या हकीगती. त्याचीच उजळणी. दुःख जितकं जुनं तितकं त्याला जास्त पॉलिश. जुनी दुःख जास्त आकर्षक करायची. ती अनेकदा सांगून सांगून निरूपणाला नेमकेपणा आलेला असतो. मोठ्या आघातांसाठी मनाची तयारी झालेली असते आणि तशा प्रसंगी सावरणणारेही अनेक भेटतात. छोटे छोटे आघात असंख्य असतात. ते एकट्याला गाठून हतप्रभ करतात. त्यात वाटेकरी नसतात. ते एकट्याने सोसायचे! माणूस थांबतो, शिणून जातो, खचतो. पण पुन्हा सावरतो. तो शिणवटा कुणाला कळत नाही. सावरणही समजत नाही! नव्या उमेदीने, मागे पहात पहात प्रवास चालू असतो, ठेवावा लागतो. "
वपूर्झा/सुरेंद्र/20112025
मंगळवार, १८ नोव्हेंबर, २०२५
" विचार शृंखला:122/123: 19112025 "
"विचार शृंखला:122/123: 19112025 "
122) " चोख कर्तव्य बजावणाऱ्या माणसांचा आनंदही स्वावलंबी असतो. नेमून दिलेल्या कामांना मी स्वीकारलेल्या कामांचे गणवेश चढवले. काम आणि कर्तव्य ह्यात मग फरक राहिला नाही. म्हणूनच ही व्यक्ती इतकी आनंदी कशी राहू शकते ह्याचं कोडं इतरांना उकललं नाही. अनेक कोडी उकलण्या पलीकडची असतात, कारण निव्वळ उभे शब्द आणि आडवे शब्द ह्यांच्या चौकटीत ती सजवता येत. नाहीत. "
123) " प्रत्येक मूल त्याच्या आईवडिलांना स्वतःच्या रूपाने दुसरं बालपण जगण्याची संधी मिळवून देतं आणि काळाबरोबर पुढे जाऊन सुधारलेला समाज तुमच्या मुलांचं बालपण तुमच्या बालपणापेक्षा समृद्ध करतं. जनरेशन गॅपच्या नावाने हाकाटी करण्यापेक्षा, आपण आपलं बालपण नव्याने अनुभवावं, अशी वृत्ती असते, तेव्हाच आपल्याला लहानपणी न मिळालेल्या गोष्टी आपल्या मुलांना मिळाव्यात ह्यासाठी धडपडावंसं वाटतं. तुमचं सगळं बालपण दुःखाने भरलेलं होतं, ह्याला जो जेव्हा जन्मालाच आला नव्हता तो तुमचा मुलगा कसा जबाबदार होऊ शकतो? "
वपूर्झा/सुरेंद्र/19112025
मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०२५
" विचार शृंखला:120/121: 11112025 "
"विचार शृंखला:120/121: 11112025 "
120) " कर्तव्याची जाणीव तीव्रतेने जतन केली की, काम कोणतं करतं आहोत, हा विचार गौण ठरतो. फक्त कामच करायचं ठरवलं की मोजकी कामं केल्यावर इतर कामं आपण नाकारू शकतो. आवडीच्या कामाला प्राधान्य दिलं जातं. ते कामही पुरून उरण्याईतक असतं. आणि तरीही जी कामं राहतात किंवा आपण टाळतो त्यासाठीच हाकाटी सुरु होते. संसारासाठी राबूनही श्रेय हरवून बसावं लागतं. काम आणि कर्तव्य ह्यातला फरक नेमकेपणाने समजावा लागतो. "
121) " मृत्यूवर कुणालाच विजय मिळवता येतं नाही. त्याचं कारणच हे, तो काटेकोरपणे वेळा सांभाळतो. वर्तमाकाळ जपतो. मागच्या-पुढच्या क्षणाचं तो काही देणं लागत नाही. जीव वाचावा म्हणून केलेल्या प्रार्थनांशी त्याचा संबंध नाही. जिवाभावाचा माणूस त्याने नेला म्हणून तुम्ही दिलेले शिव्याशाप आणि पुढच्याच क्षणी नातेवाईकांनी फोडलेल्या किंकाळ्या तो ऐकत नाही. "
वपूर्झा/सुरेंद्र/11112025