गुरुवार, १९ जून, २०२५

" Birds of the same feathers flock together म्हणतात, ते उगीच नाही. "

"  Birds of the same feathers flock together म्हणतात, ते उगीच नाही. "

                           000o000

                "   स्वतःची अस्मिता कधी टिकवता येते? तर मित्राच्या अस्मितेची जेव्हा सखोल जाणीव असते तेव्हा. ती जाणीव असली म्हणजे चारचोघात आपल्या मित्राशी वा मैत्रिणीच्या बाबतीत कस वागायचं, बोलायचं हे आपोआप समजतं. आयुष्यभर माणूस समानधार्मियांच्या शोधात असतो. Birds of the same feathers flock together म्हणतात, ते उगीच नाही. मैत्रीत न पटणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची शक्ती मिळवायची असते. वेगवेगळ्या प्रसंगी आपलं वर्तन कसं होतं आणि तीच परिस्थिती मित्र कशी हाताळतो इकडे भान हवं. त्याचं चुकलं तर कान पकडण्याचा अधिकार मिळवायचा असतो आणि त्याचं बरोबर वाटलं तर अनुकरण करण्याचा मोठेपणा कमवावा लागतो. "

वपुर्झा /101/Surendra /20062025

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा