शनिवार, ११ ऑक्टोबर, २०२५

" विचार शृंखला : 61/62/63 : 11102025 "






" विचार शृंखला : 61/62/63  : 11102025 "

61)       "    भांबावलेला माणूस अस्थिर असतो. अस्थिर माणसाची विचारशक्ती क्षीण बनते. क्षीण विचारांची माणसं एकत्र येतं नाहीत. माणसं एकत्रित नाहीत म्हणजे संघशक्ती नाही. संघशक्तीशिवाय आंदोलन अशक्य! "

62)       "     माणूस निराळा वागतोय, बिघडला - कामातून गेला, असं आपण पटकन एखाद्याबद्दल बोलतो. पण तसं नसतं. त्या सगळ्याचा अर्थ तो आपल्याला हवा तसा वागत नाही एव्हडाच असतो. "

63)       "      सुख, सुख म्हणजे तरी काय? समाधान मानून घेण्याची वृत्ती असलेला माणूस कधीच दुःखी होत नाही. स्वतःला सुखी समजणारी इतर माणसंही सवयीने सुखी झालेली असतात. शेकडा नव्वद टक्के लोकांना जे मिळतं ते आपल्यालाही मिळालं आहे ह्या जाणीवेतून ती सुखी होतात. " 

वपूर्झा/सुरेंद्र/111102025

                                                            

           

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा