मंगळवार, ३ जून, २०२५

' लग्नाची आमंत्रणपत्रिका म्हणजे संपूर्ण संसाराच चित्र नव्हे. "

 ' लग्नाची आमंत्रणपत्रिका म्हणजे संपूर्ण संसाराच चित्र नव्हे. "

                           000o000

                " कोमलतेत ताकद असते ती ही अशी. पावसाचं पाणी तर आकाशातून पडतं. माती वाहून जाते, नद्यांना पूर येतात, भलेभले खडक झिजतात. पाणी वाहतच राहते. फुलही पाण्यासारखीच कोमल असतात. एक दगड भिरकावला तर दहा  - बारा फुलं खाली पडतात. ज्या दगडामुळे फुलं वेचायला मिळाली तो दगड कोणी घरी आणत नाही. आपण फुलंच आणतो. ती कोंमजतात. पण              ऐवढ्याश्या आयुष्यात तुम्हाला सुगंधच देतात. फुलांचं आयुष्यच अल्प. पाण्यामध्ये सामर्थ्य कुठून येत, ह्याचा विचार केला तर कळेल की त्यामागे सातत्य असतं. प्रवाहात एखादा खडक आला तर पाणी त्याच्याशी झुंज देत बसत नाही, थांबत नाही, स्वतःची वाट शोधून बाजूने निघून जातं. ह्या वाहण्याला सातत्य असल्यामुळेच खडक हळूहळू लहान होत जातो आणि प्रवाह रुंदावत जातो. सातत्य म्हणजे काळ. काळचं सामर्थ्य मोजता येणार नाही. अशा जबरदस्त शक्तीची साथ एवढ्याश्या दिसणाऱ्या जलधारेच्या पाठीशी असते. संसारात जोडीदार कसा असेल, त्याची साथ मिळेल की नाही, दोघांच्या संवेदना एकरूप होतील की भिन्न असतील ते सांगता येणं अशक्य आहे. लग्नाची आमंत्रणपत्रिका म्हणजे संपूर्ण संसाराच चित्र नव्हे.         मंगलंपत्रिकेतले शब्द वर्षानुवर्षे तसेच राहतात. त्यांचा दगड होतो, म्हटले तरी चालेल. संसारातले शब्द रोज बदलत जातात. कोणतेही शब्द ऐकावे लागले तरी जर त्या           स्त्रीजवळ त्या शब्दाच रूपांतर गीतात करायचं सामर्थ असेल, तर ती एक जलधाराच. साथीदाराला सुधारण्याच्या खटाटोप नको. त्याच्या दृष्टिकोनातून त्याचं वागणं योग्यच असतं. तिथे डोकं आपटत बसण्यापेक्षा त्याला वळसा देऊन पुढे जाणं चांगलं. "

वपुर्झा /181/Surendra /03062025

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा