" साधे प्रश्न आपण गहन करतो आणि मग जी समस्या निर्माण होते, तिचे बळी होतो. "
000o000
" आपली मुलं म्हणजे आपले खरे परीक्षक असतात. आई, वडील म्हणजेच नवरा - बायको आपण होऊन एका ठिकाकाराला जन्माला घालतात. ती मुलं परखडपणे कुणाचं चुकतं हे अचूक सांगतात. आपण त्यांना ' तुला अक्कल नाही ' म्हणून गप्प बसवतो. " त्यांना अक्कल असते का? " नसते म्हणूनच ती खरं बोलतात. अक्कल वाढली की अहंकार वाढतो. आडमुठेपणा रक्तात वाहतो. खरं आणि खोटं ह्यांत जे सूक्ष्म अंतर आहे तिचं मतलब साठू लागतो. पुढे त्यात स्वार्थाची भर पडते. मुलांनामग कुणाची बाजू घ्यायची ते कळायला लागतं. मुलं सबजेक्टिव्हली बोलत नाहीत. ऑब्जेक्टिव्हली बोलतात. हयाउलट आपणस सबजेक्टिव्हली जगतो. " आपण कसे जगतो ह्याचाच पत्ता लागत नाही. आपण सगळे ' डिप्लोमॅटिक ' कडून ' ऑटोमॅटिक 'कडे दौड करीत आहोत. आपल्यातला माणूस झपाट्याने नाहीसा होत आहे. साधे प्रश्न आपण गहन करतो आणि मग जी समस्या निर्माण होते, तिचे बळी होतो. डिप्लोमॅटिकली प्रश्न विचारले की ऑटोमॅटिकली उत्तरं मिळतील ह्या भ्रमात आपण वावरतो. मुलांचा उपयोग मग ' साथीदारा ' ऐवजी आपण ' साक्षीदारा ' सारखा करतो. मुलंही मग ' कल ' पाहून बोलायला शिकतात " चार अपशब्दांपेक्षा अनावश्यक - अनुकंपा ही कोणत्याही धारदार शस्त्र्यापेक्षा जास्त तीक्ष्ण असते.
"वपुर्झा /97/Surendra / 11062025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा