गुरुवार, ३ जुलै, २०२५

" हेच आंधळेपण. विचारहीनता."

 " हेच आंधळेपण. विचारहीनता."

                               000o0"00

                "  जड वस्तुंना पण भावना असतात. सगळं विश्व त्रिगुणत्मक आहे. रजोगुण, तमोगुण, सत्वगुण. ह्याबाहेर कुणी जाऊ शकणार नाही. ऍटम मध्ये सुद्धा प्रोटॉन,          इलेंकट्रॉन, न्यूट्रॉन हे तीनच घटक सापडले. वर्षानुवर्षं एखादा दगड एकाच जागी पडून असतो. का? तिथे तमोगुणाचा अतिरेक आहे. कुणीतरी तो उचलून लांबवर भिरकावतो. म्हणजे काय करतो? तर स्वतःचीं रजोगुणाची शक्ती त्याला अर्पण करतो. रजोगुणाचा शेवटचा अंश ज्या स्थानावर संपेल तिथे तो दगड पुन्हा स्थिर होतो. तमोगुण आहे म्हणून घरातलं फर्निचर आहे तसच राहतं. ती चैतनन्याचीच रूपे आहेत. आपल्याला कोणत्याही दिव्य शक्तीची गरज नाही. निसर्गाने दिलेल्या दृष्टीचा तरी आपण उपयोग करतो का? गीता दूरच राहिली. सिगारेट, दारू ह्यासारखी व्यसनं आपण ध्रुतराष्ट्रसारखी गुरु करतो आणि धोक्याच्या जाहिराती नजरेसमोर आल्या, म्हणजे गंधारीसारखी पट्टी बांधतो. ह्या व्यसनांपायी कॅन्सर वगैरे होणारी माणसं दुसरी आहेत, आपण नव्हे--असं समजतो. हेच आंधळेपण. विचारहीनता.'

वपुर्झा /197/Surendra / 03072025(2)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा