' कुठे शोधशी रामेश्वर अन!कुठे शोधिशी काशी!' . 000o000.
" आपल्याला स्वतःला एखाद निरपेक्ष काम करतांना, अंतरंगातून शांतीचे झरे वाहत आहेत किंवा निःस्वार्थीपणाने कुणासाठीही कोणतंही काम करतांना किंवा ' श्रेयस ' आणि ' प्रेयस ' ह्यांत स्वतचं काही ना काही प्रमाणात नुकसान होत असतांनासुद्धा तटस्थपणे श्रेयसची निवड करता आली, म्हणजे आपण आपले गुरु होतो. ह्याचाच अर्थ गुरुचं वास्तव्य आपल्यातच चोवीस तास असतं. आपल्याला त्याचं भान नसतं किंवा भान असूनही आपण ' प्रेयस ' ला प्राधान्य दिलं की गुरुत्वापासून लांब जातो. कोणतीही कृती करत असतांना आपण ती का करीत आहोत, त्यात जिव्हाळा किती, नाटक किती, उमाळा किती आणि नाईलाजास्तवता किती, समाजात प्रतिष्ठा मिळवण्यासाठी किती आणि शुद्ध सात्विक भाव किती, हे ज्याचं त्याला माहीत असतं. अशा अनेक प्रसंगी स्वतःचं स्वतःला होत, ते ज्ञान! ' ज्ञान म्हणजेच गुरु ' ज्याची व्याख्या करता येते, त्याला ' माहिती ' म्हणतात. ' परमात्मा तुमच्यातच आहे' असं म्हणतात. ' कुठे शोधशी रामेश्वर अन!कुठे शोधिशी काशी!' ह्या कवितेत पाडगावकरांनी ' हृदयातल्या उपाशी राहिलेल्या परमेश्वरावर ' अचूक बोट ठेवलेलं आहे. मग जसा परमात्मा बाहेर शोधायचा नसतो, तसा गुरुही! असं जर असेल तर मी स्वतः कायम गुरुपदावर का राहू शकत नाही? संभ्रम आणि द्वंद्व हेच ह्याचं कारण!
वपुर्झा /183/Surendra /07062025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा