" केवळ अंतरपाट दूर केल्याने अंतर्मनाच मिलन होईल ह्याची शाश्वती नाही. "
000
" कुणावर तरी प्रेम बसणं. त्यानंतर मनात होणारी हुरहूर, त्या पाठोपाठ काहूर ह्या सगळ्या अवस्था डोळ्यासमोर उभ्या राहतात. लग्नाला एकच दिशा असते, प्रेमाला अनेक. लग्न केलं म्हणजे एकमेकात प्रेम निर्माण होईल हया चुकीच्या धारणेवरच समाज उभा आहे. प्रेम हे आकाशाइतकं उत्तुंग आणि विशाल आहे. तर लग्नसंस्था जमिनीला घट्ट धरून उभी आहे. म्हणूनच लग्नानंतर प्रेमाच नात निर्माण झालं नाही तर पायाखालची जमीन सरकायला लागते. नैसर्गिक धरणीकंप अधूनमधूनच होतात, अनेक घराघरातून होणाऱ्या धरणीकंपाची नोंद कुठल्याही वेधशाळेत घेतली जातं नाही. त्या जमिनी तिथल्या तिथेच थरथरत राहरात. प्रेम निसर्गाने निर्माण केलंय आणि लग्न संस्था समाजाने. प्रेमातून संसार फुलला पाहिजे, त्याऐवजी संसारातून मुलांची पैदास होते आणि त्यालाच आम्ही प्रेम समजून कवटाळत राहतो. प्रेम ही चैतन्याची खूण आहे. ते फुलतं आणि वरमाला बनवावी लागते. म्हणून केवळ अंतरपाट दूर केल्याने अंतर्मनाच मिलन होईल ह्याची शाश्वती नाही. "
वपुर्झा /200/Surendra / 11082025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा