" माणसाचं मनं फार विचित्र असतं "
. . .000o000
" माणसाचं मनं फार विचित्र असतं. आपण एखाद्या माणसाला भेटायला जातो, तेव्हा त्या आजारी माणसाला त्याची विचारपूस केल्याचा आनंद प्रत्येक वेळी मिळतोच असं नाही. त्याच्या मनात हा भेद कायम असतो की भेटायला येणाऱ्या माणसाचं विश्व हे निराळ विश्व आहे. धडधाकडं माणसाचं विश्व ते! आपलं आजारी माणसाचं विश्व वेगळं, हा विचार त्याला कायम सतावतो. आजारी माणूस इतरांशी चिडल्यासारखा वागतो त्याचं हेच कारण. त्या आजारी माणसाला जेव्हा त्याच्याहीपेक्षा गंभीर अवस्थेतला रोगी दिसतो तेव्हा त्याला खरं समाधान होतं. एरवी इतर धडधाकडं माणसं व आपण ह्यांत फार मोठ अंतर पडलं आहे आणि जे काही बरे वाईट व्हायचं आहे ते आपलं होणार आहे. धडधाकडं माणसं शाबूत राहणार आहेत हया विचारांपाई तो चिडचिडा व अगतिक झालेला असतो. आणि थोड्याफार फरकाने संकटात सापडलेला माणूस हा आजारी माणसासारखाच असतो. त्याला सहानभूती नको असते. त्याला आपल्यापेक्षा मोठ्या संकटात सापडलेला माणूस पाहायला हवा असतो. आपली अवस्था इतरांपेक्षा वाईट आहे हया विचारापेक्षा आपली अवस्था आपल्याला वाटली होती तेव्हडी वाईट नाही हा विचारच त्याला तारून नेतो. "
वपुर्झा /98/Surendra / 18062025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा