" अनेक घरातून स्वत:चेच नातेवाईक सांगूनसुद्धा ऐकत नाहीत. असं का घडत असावं?
000o000
" लोकशाही तत्व म्हणून ठीक आहे. पण देशाचा कारभार करायचा म्हणजे शिस्तीचा बडगा हवाच. जिथे संस्कारच नसतात तिथे बडगाच हवा. आपल्या स्वतःच्या घरात ज्यांना आपण रक्ताचे नातेवाईकमानतो तिथेसूद्धा काही गोष्टी मनासारख्या व्हायला हव्या असतील तर, घर चालवणाऱ्या माणसाला अधूनमधून रुद्रावतार धारण करावाच लागतो. आपल्या नवऱ्याला किंवा बायकोला किंवा आईवडिलांना आपण अमुक तऱ्हेने वागलो तर आनंद होणार आहे, गैरसोय होणार नाही, ह्या समजुतीने वागणारी माणसं फार थोडी. अनेक घरातून स्वत:चेच नातेवाईक सांगूनसुद्धा ऐकत नाहीत. असं का घडत असावं? आणि तेही स्वतःच्याच माणसांकडून? कारण झोॅंडगिरीने वागलं तरी ते खपवून घेतलं जातं ह्याची खात्री आहे म्हणून. ह्याच वृत्तीने देशातली माणसं वागतात. "
वपुर्झा /223/Surendra /10062025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा