" विचार शृंखला : 73/74/75 : 16102025 "
73) " प्रामाणिकपणा ही शिकवण्याची बाब नव्हे. तो रक्तात असावा लागतो. त्यात टक्केवारी नसते. तो असतो किंवा नसतो. " 74) " जी माणसं भावनाप्रधान असतात, त्यांच्या स्वाभिमानाला जर जबरदस्त धक्का लागला तर दोनपैकी एक काहीतरी होत. काही माणसं गप्प बसतात, मनातल्या मनात कुढतात, आणि निवृत्तीचा मार्ग पत्करून सगळं आयुष्य एखाद्या बाभळीच्या झाडासारखं शुष्क घालवतात. हयाउलट काही माणसं चिडून उठतात. सारासार विचार गुंडाळून ठेवतात आणि मग सगळ्यांवर वांर करीत सुटतात. अशी माणसं एके काळी भावनाप्रधान होती, हे सांगून खरे वाटत नाही. " 75) ' स्त्री ' जन्माला घालतांना परमेश्वराने तिला विचारलं, ' तुला बुद्धी हवी की सौदर्य? ' तेव्हा स्त्री म्हणाली, ' बुद्धीची गरज नाही, सौदर्य दे! ' ' का ', ' बुद्धीच्या सामर्थ्यावर सौदर्य मिळवता येतं नाही, पण सौन्दर्याच्या जोरावर बुद्धी विकत घेता येते. " वपूर्झा/सुरेंद्र/16102025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा