गुरुवार, ४ सप्टेंबर, २०२५

" जिथे संस्कारच नसतात तिथे बडगाच हवा "

" जिथे संस्कारच नसतात तिथे बडगाच हवा "

                                 000

                "  लोकशाही तत्व म्हणून ठीक आहे, पण देशाचा कारभार करायचा म्हणजे शिस्तीचा बडगा हवाच. जिथे संस्कारच नसतात तिथे बडगाच हवा. आपल्या घरातल्या घरात ज्यांना आपण रक्ताचे नातेवाईक मानतो तिथेसूद्धा काहीं गोष्टी मनासारख्या व्हायला हव्या असतील तर घर चालविणाऱ्या माणसाला अघूनमधून रुद्रावतार घारण करावाच लागतो. आपल्या नवऱ्याला किंवा बायकोला किंवा आईवडिलांना आपण अमुक तऱ्हेने वागलो तर आनंद होणार आहे, गैरसोय होणार नाही, ह्या समजूतीने वागणारी माणसं फार थोडी. अनेक घरांतून स्वतःचेच नातेवाईक सांगूनसुद्धा ऐकत नाहीत. असं का घडत असावं? आणि तेही स्वतःच्याच माणसांकडून? कारण झोडगिरीने वागलं तरी ते खपहून घेतलं जातं ह्याची खात्री आहे म्हणून. ह्याचं वृत्तीने देशातली माणसं    वागतात. "

वपुर्झा /223/Surendra / 05092025

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा