" विचार शृंखला: 46/47 :03102025 "
46) " आकाशात जेव्हा एखादा कृतिम ग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळून लावेपर्यंतच सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वतःची गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो. असंच माणसाचं आहे. समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते. "
वपूर्झा/ Surendra/03102025. Ooo. 47) " ' इट जस्ट हॅपॅन्स ' म्हणत पुढच्याच क्षणी जी माणसं कामाला लागतात, ती जास्त जगतात. अश्रू गाळण्यात आपलं वीस टक्के आयुष्य वाया जात असेल. काही माणसांचं तितके टक्के आयुष्य इतरांच्या नावाने बोटं मोडण्यात जात. पुढच्याच क्षणी मागचा क्षण विसरणारे अलिप्त, कृतघ्न, वास्तववादी, की हे सगळे समर्थ्यांचे शिष्य?. ' मरे एक त्याचा, दुजा शोक वाहे, अकस्मात तोही, पुढे जात आहे, ' -- अकरा शब्दांत समर्थानी सगळं उकलून दाखवलं.'
वपुर्झा/Surendra/03102025.
Ooo.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा