" पतीपत्नीच एकच एक मत असल तर संसारात स्वर्ग निर्माण होतो.
000o000
" माणसाला काही ना काही छन्द हवा. स्वप्न हवीत. पूरी होणारी किंवा कायम अपुरी राहणारी. त्यातून तो स्वतःला हरवायला शिकतो. सापडायला शिकतो. हे हरवण - सापडणं प्रत्येकाचं निराळ असतं. पतीपत्नीच एकच एक मत असल तर संसारात स्वर्ग निर्माण होतो. पतीपत्नीच्या ह्या हरवण्या- सापडण्याच्या जागा एकच निघाल्या तर ते सुख - दुःखाचे समान वाटेकरी होतील. दोघांच्या अशा जागा किंवा स्वप्न वेगवेगळी असतील, तर प्रकृतीधर्मानुसार हे स्वाभाविक आहे, पण तो एकमेकांच्या टींगलीचा विषय होऊ नये. इतपत भान संसारात ज्यांना टिकवता येईल, त्यांना संसार सुखाचं मर्म सापडलं. ज्यांना हे असं हरवता येत नाही, रिकाम्या वेळेचे बळी होतात. रिकामा वेळ सैतानाचाच.
वपुर्झा /19/Surendra /07022025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा