शनिवार, ८ फेब्रुवारी, २०२५

"तो लेखक नसेल, पण प्रतिभावंत असतो."

"तो लेखक नसेल, पण प्रतिभावंत असतो."

                           000o000

                "  संसार यां शब्दा बरोबरच संघर्ष हा आलाच. संघर्ष नेहमी दुसऱ्या माणसाबरोबरच असतो, असं नाही. नको वाटणारा निर्णय घेण्याची पाळी स्वतःवरच आली कीं, स्वतःशीच संघर्ष सुरु होतो. संसारात यां संघर्षाचं खापर फोडण्यासाठी जोडीदार मिळतो इतकंच. पण, असे हे संभाव्य संघर्ष कुणामुळेही निर्माण झाले तरी, एकमेकांना    ' गुड - नाईट ' म्हणण्यापूर्वी त्यां दिवसाचे संघर्ष त्याच दिवशी संपवायचे आणि उगवत्या सूर्याच ताज्या मनाने स्वागत करायच. संसार यशस्वी करण्या साठी आणखी वेगळं काहीच करावं लागत नाही. नियती एक कोरा, करकरीत दिवस सूर्योदयाबरोबर तुम्हाला बहाल करते. रात्र म्हणजे कालचा फळा पुसून लख्ख करणार डस्टर. त्यां स्वछ फळ्यावर आपण कालचेच घडे का लिहायचे? - जो नव्या दिवसाला कोऱ्या मनाने समोरा जातो, नवा मजकूर लिहितो, तो लेखक नसेल, पण प्रतिभावंत असतो. "                      वपुर्झा /25/Surendra /09022025

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा