सोमवार, १० फेब्रुवारी, २०२५

" माणूस कितीही मोठा असो. राजा असो - भिकारी असो, गरीब असो श्रीमंत असो, आई असो - बाप असो वा अगदी पोटचा पोर असो."

" माणूस कितीही मोठा असो. राजा असो - भिकारी असो, गरीब असो श्रीमंत असो, आई असो - बाप असो वा अगदी पोटचा पोर असो."

                     000o000

                " माणूस कितीही मोठा असो. राजा असो - भिकारी असो, गरीब असो श्रीमंत असो, आई असो - बाप असो वा अगदी पोटचा पोर असो. त्याच्या नशिबातले शेवटचे शब्द हेच, " उचला आता! ". सगळे अवयव म्हणे एकदा ब्रम्हदेवाकडे गेले आणि म्हणाले," आमच्यातला मोठा कोण हे सांगा. " ब्राम्हदेव म्हणाले " ज्याच्या वाचून अडतं तो मोठा. "  त्यावर प्रथम डोळे रुसून गेले. माणसाला देवाने विचारलं, ' डोळ्या शिवाय तू कसा जगलास? " त्यावर माणसाने सांगितले, ' जगलो एखाद्या आंधल्याप्रमाणे! '. मग कान रुसून गेले. पुन्हा प्रश्न विचारल्यावर माणूस म्हणाला, ' जगलो एखाद्या बहिऱ्याप्रमाणे! '. असं होता होता, सगळे अवयव रुसून थकले. शेवटी प्राण रुसून जायला लागला आणि माणूस उत्तर द्यायला उरलाच नाही. तेव्हा जेहेत्ते कालाचे ठायी, सर्वात महत्वाचा प्राण. म्हणूनच तो एकदा रुसून गेला कीं बाकीचे म्हणतात ' उचला आता ! ".

वपुर्झा /36/Surendra /09022025

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा