मंगळवार, ३० सप्टेंबर, २०२५

" विचार शृंखला: 40/41/42/ :30092025 "

" विचार शृंखला: 40/41/42/       :30092025 "

40)  " कुणी कोणासाठी किती त्याग केला ह्याचा हिशोब आला की आंब्याच्या झाडाने आपला मोहोर येण्याचा काळ संपला हे जाणावं. ". वपूर्झा/ Surendra/30092025.                  Ooo.                                                          41)   "  कबुतरला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीच वेड रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येतं नाही. ".          वपुर्झा/Surendra/30092025.             Ooo.                                                         42)   "   माणसाचं मन ही एक फार मोठी शक्ती आहे. ती कोणत्या स्वरूपात कुठे, कशी प्रकट होईल, हे सांगता यायचं नाही. प्रकट झाल्यावर ती विधायक होईल की विध्वनसक होईल, हेही सांगणं कठीण आहे. मला तर मन म्हणजे बाटलीत कोंडलेला राक्षसच वाटतो. अफाट शक्ती आणि बुद्धीवर ताबा नाही. " वपुर्झा/Surendra/30092025.                  Ooo

सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५

" विचार शृंखला: 37/38/39/ 29092025 "

विचार शृंखला: 37/38/39/       :29092025 "

37)       "  संसारातला नवरा-बायकोचा चार्म का जातो? तर तिथं प्रतीक्षा ही अवस्थाच नसते. एकमेकांना गृहीत घरलं जातं. सुख हाताशी असतं म्हणूनच हातातून निसटतं. संसारातील उदासीनता ही निव्वळ अभिरुचीवर अवलंबून नाही. प्रतीक्षेची अनुपस्थिती हेही एक कारण. "वपूर्झा/ Surendra/29092025.                   Ooo.                                                        38)   "  निर्बुद्धातल्या निर्बुद्ध माणसालाही, ' तुला ह्यातलं काही समजणार नाही ' म्हटलं की संताप येतो. बुद्धीवान माणसाला अकलेचे अहंकार असतो, तर मूर्ख माणसाच्या गर्वाला मूर्खपणा जाहीर झाल्याने त्याचा धक्का    पोचतो. ".        वपुर्झा/Surendra/29092025.            Ooo.                                                          39)   "   कोणत्याही श्रेष्ठपदाला पोहोचलेल्या व्यक्तीला समर्थनाशिवाय स्वतःच श्रेष्ठत्व टिकवता आलं पाहिजे. " वपुर्झा/Surendra/29092025.                     Ooo

रविवार, २८ सप्टेंबर, २०२५

" विचार शृंखला: 33/34/35/36:28092025 "

" विचार शृंखला: 33/34/35/36        :28092025 "

33)       " ज्याला प्रेम समजतं, शब्द समजतो तो वेळ पाळतो, नि ज्याला फक्त स्वार्थ समजतो, तो वेळ साधतो. ".                                    वपूर्झा/ Surendra/28092025.                  Ooo.                                                           34)   "   सुविचारांची वही नंतर शोभेची वस्तू होते. ".          वपुर्झा/Surendra/28092025.             Ooo.                                                         35)   "   सकाळचे जाग आल्याबरोबरचे क्षण नेहमीच शुद्ध असतात. निर्लॅप असतात. दिवसांच्या कारस्थांनाचा, कपटांचा, खोटेपणाचा थर त्यावर चढलेला नसतो. " वपुर्झा/Surendra/28092025.                Ooo.                                                        36).    " गादी-उशीशिवाय झोपणं तर सोडाच, पण नेहमीची उशी जरी वाटणीला आली नाही तरी आपली मिजास जाते. दिवसातून दहा वेळा जप करतो. डोळ्याला डोळा नाही हो रात्रभर. रात्र वैरीण नसते. सवय वैरीण. आणि तिला जन्म देणारे आपणच. "वपुर्झा/Surendra/28092025.                 Ooo

शनिवार, २७ सप्टेंबर, २०२५

" विचार शृंखला: 30/31/32 :27092025 "

" विचार शृंखला: 30/31/32        :27092025 "

30)  " मूल पाच वर्षाचं होईतो त्याला फारसं कळत नाही म्हणून त्याला विक्षिप्त म्हणायचं. नंतर दहा वर्षापर्यंत ' वाढतं वय ' म्हणून मुलांचं वागणं सहन करायचं. नंतरच वय धड ना बाल्य ना तारुण्य म्हणून हेकटपणाने वागण्याचा काळ. मग' ' तारुण्याची धुंदी ' म्हणून वेगळं वागणं. मग स्वभाव पक्का बनला म्हणून तो असेल तो स्वीकारायचा. असं म्हणता म्हणता, ' आता एव्हड्या उशिरा, हया वयात त्याचा स्वभाव बदलणं कसं शक्य आहे? ' हे म्हणायची पाळी येते. कोणत्या वयाची हमी  घ्यायची? '.      वपूर्झा/ Surendra/27092025.                   Ooo.                                                        31).   "   ' वियोग ' झाल्यावर माणूस का रडतो माहीत आहे? ', ' ते फक्त वियोगाच दुःख नसतं. जिवंतपणी आपण त्या व्यक्तीवर जे अन्याय केलेले असतात, त्याला आपल्यापायी जे दुःख भोगावं लागलेलं असतं, त्या जाणीवेचं दुःखही त्यात असतं. त्याशिवाय जीवघेण्या यातनाही त्यात असतात. ज्याच्या साठी आपण रडतो, नेमकी तीच व्यक्ती वगळून, आपण किती दुःख करीत आहोत अशा अनेकांना ते नुसतं दिसतं. ज्याच्यापर्यंत ते दुःख, अश्रू तसेच्या तसे पोचले असते तोच तिथं उपस्थित नसतो. ' तुम क्या जाने, तुम्हारी यादमे हम कितने रोये ' हेच खरं. "वपुर्झा/Surendra/2792025.              Ooo.                                                           32).   "   आपल्याला न आवडणारे विचारही आपल्यावर हुकमत गाजवून जातात. "वपुर्झा/Surendra/27092025.                     Ooo


गुरुवार, २५ सप्टेंबर, २०२५

" विचार शृंखला: 27/28/29 :26092025 "

" विचार शृंखला: 27/28/29         :26092025 "

27).       " निर्णयाची घाई असलेल्या व्यक्तींशी चर्चा करतांना सेफ वाटत नाही "

वपूर्झा/ Surendra/26092025.                            Ooo.                                                          28).       "   प्रत्येक खुर्चीचा मान असतो, बाबा. खुर्चीची शान ज्याची त्याने टिकवायची असते आणि तिचा मान इतरांनी सांभाळायचा असतो "               " ते ऑफिसात, घरी तसं काही नसतं. " " अरे बाबा, घरचांनी ही प्रथा सांभाळली, तरच पाहुणेही त्या खुर्चीच महत्व जाणतात. नाहीतर मग, आमची वाट्टेल तेव्हडी मैत्री आहे, हे सिद्ध करण्यासाठी माणसं वय, लौकिक काहीही न बघता शब्दही हवे तसें वापरतात आणि त्याची खुर्चीही. " 

वपुर्झा/Surendra/2692025.                                               29).      "   शब्द नेमकेपणा दर्शवतात. त्यांचं नातं सगुणसाकाराशी. ' भाव ' ही शब्दाहीन होणारी गोष्ट नव्हे. म्हणूनच परमेश्वराने डोळ्यांची मांडणी मेंदू आणि तोंड ह्यांच्या मध्ये केली. " 

 वपुर्झा/Surendra/26092025.                     Ooo


" विचार शृंखला: 24/25/26 :25092025 "

   " विचार शृंखला: 24/25/26         :25092025 "

  24)      " समोरच्या चालत्या-बोलत्या माणसांशी जितके छान वागता येईल तितकं छान वागायचं. आपल्यामुळे दुसऱ्याच आयुष्य दुःखी होत नाही एव्हडं माणूस नक्की सांभाळू शकतो. "वपुर्झा/Surendra/25092025.                Ooo.                                                        25).       " तुमचे-आमचे पूर्वज दारिद्र्याला घाबरले नाहीत. तुम्ही पण घाबरू नका. तुमच्या वाट्याला, इतरांचे वैचारिक दारिद्र्य पचवणं आले आहे. तेही पचवून दाखवा. सातत्य हा निसर्गाचा धर्म नाही. तेव्हा ढोगयुग संपेल. भविष्याबद्दल निराश राहण्याचा आपल्याला अधिकार नाही. तुमच्या सहवासात जी माणसं येतात, तेव्हढच जग नाही. हे जग अजुन चाललंय. ह्याचा अर्थच हा की इथं चांगलं जास्त आहे वाईट कमी      आहे. ".            वपुर्झा/Surendra/25092025.             26).      "   चेहरा म्हणजे भावना. डोळे म्हणजे शब्दातील भाव. स्पर्श्यांच्या-मोहाच्या राजधानीकडे नेणारी वाट. नजर चुकवली की पुढचा बराचसा प्रवास थांबवता येतो. मुक्कामाचा अखेरचा टप्पा टाळता येतो. "पुर्झा/Surendra/25092025.                     Ooo



शनिवार, २० सप्टेंबर, २०२५

" विचार शृंखला: 21,22,23/20092025 "




" विचार शृंखला: 21,22,23/20092025 "

21).    मैत्री, विवाह, संसार ह्यांचा प्रारंभ जसा होतो, तसाच त्यांचा शेवट अपेक्षेप्रमाणे होतं नाही. आयुष्य ही एक अज्ञात यात्रा आहे. भाग्योदयासाठी आपण जो प्रारंभ करतो, त्याचा शेवट भाग्यातच होतो, असं नाही. असं का होतं? आपल्या बरोबर आपल्या जीवन-यात्रेबरोबरच एक अज्ञात शक्ती ही प्रवास करीत असते. त्या शक्तीनेही एक हातचा राखून ठेवलेला असतो, हे आपल्याला माहीत नसतं. "

वपुर्झा/Surendra/20092025

Ooo

22).       " प्रत्येक नव्या अनुभवाचं नातं, अंगावर काटा किंवा रोमांच उठवणाऱ्या केवळ एकाच क्षणाशी असतं. दुसऱ्याच पुढच्या क्षणी तो अनुभव एका क्षणाने जुना झालेला असतो. भूतकाळात गेलेला असतो. नंतरचा आनंद पुनःरूक्तीचा असतो.    ' क्षणभंगूर ' हे विशेषण आयुष्याला न लावता अनुभवालाच लावलं पाहिजे. "

वपुर्झा/Surendra/20092025

23).      "   संसारातल्या प्रत्येक व्यक्तीची सुखाची कल्पना, सुखाच्या जागा, सुखाची साधन ही वयानुसार, कालानुसार निरनिराळी असतात. आणि प्रत्येकजण त्याच्या कल्पनेतल्या सुखामागे पळतोही. पण संसार टिकतो तो कसा? तर दुःख जेव्हा सगळ्यांच एकच होतं, तेव्हा घर उभं राहतं."

वपुर्झा/Surendra/20092025

----------------------------------------------------------- 

  

शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२५

" विचार शृंखला: 18,19,20 "

" विचार शृंखला: 18,19,20 "  

18) " स्वतःचा वेळ खर्च करणारा, तुमचा मित्रच देवमाणसासारखा असतो. फार कशाला, तुमच्या विद्द मन:स्थितीत, भीषण एकटेपणी, एकाकी अस्थिर मनाच्या अवस्थेत, एकांतात एखाद्या व्यक्तीचा निःशब्द वावरही तुम्हाला किती बळ देतो, ते जीवनाचा साथीदार गेल्यावर कळत. "

19) " काळ फक्त माणसाचं वय वाढवतो. आठवणींना वार्धक्याचा शाप नसतो. "

20) " शत्रूची व्याख्या काय? : शतृत्व पैदा होण्यासाठी प्रथम परिचय हवा. त्याच मैत्रीत रूपांतर व्हायला हवं. मग केव्हातरी किरकोळ अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, म्हणून मतभेद किंवा ' अतिपरीचयात अवज्ञा ' असे शत्रूत्वाचेही टप्पे असतात. "

वपुर्झा/Surendra/19092025

Ooo



" विचार शृंखला: 15,16,17 "

" विचार शृंखला: 15,16,17"  

 15) " मैत्री म्हटलं की काय असावं, काय नसावं ह्याचं चिंतन करावं. आणि खऱ्या प्रेमाची व्याख्या Love decides what is wrong, instead of who is wrong अशी आहे. "

16) " आपल्या बद्दल एखाद्याला विश्वास वाटतो ही सुखवणारी भावना, आणि अस्वस्थता वाटते कारण तो विस्वास सार्थ ठरवण्याची जाणीव. "

" कोणतीही महत्वाकांक्षा न बाळगणाऱ्या माणसाला वैफल्य येण्याचा अधिकार आहे का?

17) " देखणी माणसं सगळ्यांनाच मोहात पाडतात. पण एखाद्या देखण्या माणसाबद्दल आपलेपणाची भावना कधी निर्माण होते? - तो प्रेमळ असेल तर, लाघवी, नम्र, मनमिळाऊ असेल तर. उन्मत्त सौदंर्यावर कोण लुब्ध होईल?

वपुर्झा/Surendra/19092025

" विचार शृंखला: 12,13,14 "

" विचार शृंखला: 12,13,14"  

   

12) " संपत आलेल्या जाणिवेच्या दुःखावर औषध नाही. "

13) " माणसाचा, मृत्यूपेक्षा भयंकर शत्रू कुणी तर तो म्हणजे अहंकार! "

14) " संशयाने एकदा समजूतदारपणाची वाट अडवली की माणूस सत्य जाणून घेण्याचा खटाटोपच करीत नाही." 

वपुर्झा/Surendra/19092025

गुरुवार, १८ सप्टेंबर, २०२५

" विचार शृंखला: 9,10,11"

 " विचार शृंखला: 9,10,11"                        

9)    " प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैंसा तर कधी माणसं. या तीन गोष्टींच्या टप्प्यापलीकडचा प्रॉब्लेम अस्तित्वातचं नसतो. "

वपुर्झा /250/Surendra / 18092025

-----------------------------------------------------------10)      "  मार्गदर्शन फक्त एकाच बाबतीत करता येतं. कोणत्या रस्त्याने गेलं तर शॉर्टकट पडतो, इतकंच मार्गदर्शन करता येतं. मुक्कामाचं ठिकाण प्रवाशानेच पसंत करायचं असत. "

वपुर्झा /250/Surendra / 18092025

----------------------------------------------------------

11). " निरनिराळ्या लोकांच्या दृष्टिकोनातून आपण जर स्वतःला पाहू शकलो, तर आपल्याला खूप नवे मित्र आपल्यातच मिळतील. "

वपुर्झा /249/Surendra / 18092025

-----------------------------------------------------------

"विचारशृंखला:6,7,8"

"विचारशृंखला:6,7,8" 

6)    " नेतृत्वाचा संबंध पितृत्वापेक्षा कर्तृत्वाशी असायला हवा "

वपुर्झा /252/Surendra / 17092025

-----------------------------------------------------------

7)      "  माणसाला जिवाभावाची सखी एकच. तीच नाव वेदना. सुख, समाधान, आनंद हे सगळे ' बर्ड्स ऑफ प्यासेज '. वेदना मरेपर्यंत सोबत करते तर आपण तिचाच राग करतो. "

वपुर्झा /250/Surendra / 17092025

-----------------------------------------------------------

8).   " खरं प्रेम फक्त एकदाच करता येतं. सर्वस्वाच दान आयुष्यात एकदाच. त्यानंतर जे स्वीकारलं जातं त्याला सर्वस्वाच जतन म्हणायचं. ते जतन करायला दुसऱ्याची मदत लागतं नाही. ज्याचा तो समर्थ असतो. शरीर वार्धक्यापूर्वी थकत ते मनं म्हातारं होतं म्हणून. "

वपुर्झा /250/Surendra / 17092025

-----------------------------------------------------------

मंगळवार, १६ सप्टेंबर, २०२५

" विचार शृंखला " 3, 4, 5.

                 " विचार शृंखला "                           3) नोकरी काय पैशासाठीच असते का? शरीरात बरोबर ती बुद्धीची गुंतवणूक अडते.            वपुर्झा /257/Surendra / 16092025-

-------------------------------------------------------4)      "  सौन्दर्याने समाजातला वावर सांभाळून केला पाहिजे. सौन्दर्याने आपलं अस्तित्व स्वतः पुरतंच ठेवायला हवं. शिंपलीतला मोती, शिंपली उघडली तरच दिसतो. तसच सौदर्य निराकाराच्या अवगुंठनात नंदावं. "

पुर्झा /256/Surendra / 15092025

-----------------------------------------------------------

5).  " शांततेमागे तृप्ती असावी,

.       सुतक नसावे. 

        तटस्थतेमागे जाणीव असावी, 

        तडफडाट नसावा. "

वपुर्झा /253/Surendra / 15092025

-----------------------------------------------------------

सोमवार, १५ सप्टेंबर, २०२५

" विचार शृंखला " 1, 2 /15092025

" विचार शृंखला "                        

1)                  '   कायम विवाद्य विषय कोणता असेल तर तो म्हणजे पाऊस. तो पडो आथवा न पडो, केव्हाही पडो, कितीही कोसळो, कसाही येवो, तो कायम टिकेचाच विषय झालाय. पुरुष आणि पाऊस, त्यापेक्षा नवरा आणि पाऊस ह्या दोघांनी नक्की कसं वागावं हे त्या दोघांनाही ठरवता येणार नाही आणि इतरांनाही सांगता येणार नाही. ' अर्ध्या वचनात ' ची अपेक्षा आपण कुणाकडून करीत नाही? साहेब, नोकर, भावंड, मुलं, आणि नवरा, सगळे अर्ध्या वचनातलेच हवेत. पुरुष कसेही असोत, त्यांचे ' नवरे ' झाले की ते अर्धा वचनात हवेत. "

वपुर्झा /256/Surendra / 15092025

---------------------------------------------------------2)      " बोलायला कोणी नसणं ह्या शोकांतिकेपेक्षा, आपण बोललेलं समोरच्या माणसापर्यंत न पोचण ही शोकांतिका जास्त भयाण. "

वपुर्झा /257/Surendra / 15092025

-----------------------------------------------------------


शनिवार, १३ सप्टेंबर, २०२५

"नुसत्या वाचनाने माणूस मोठा होत नाही."

"नुसत्या वाचनाने माणूस मोठा होत नाही."                           

                             ooo

                  '   नुसत्या वाचनाने माणूस मोठा होत नाही. वाचलेल्या विचारांना स्वतःचे अनुभव जोडायचे असतात. म्हणजे ते ते साहित्य       स्वतःपुरतं चिरंजीव होत. करमणूक करवून घेतांनाही स्वतःला खर्ची घातल्या शिवाय ती करमणूक भिनत नाही. ' साहित्य हे केवळ चुन्या सारखं असत.' त्यात आपल्या विचारांचा कात टाकल्याशिवाय आपल्या आयुष्याचा ग्रंथ रंगत नाही. आणि लेखकाला हवा असतो संवाद. त्याशिवाय त्याच पान रंगत नाही.' 

वपुर्झा /258/Surendra / 13092025

गुरुवार, ११ सप्टेंबर, २०२५

" मूळ जगण्याचं प्रयोजन शोधायला हवं."

"     मूळ जगण्याचं प्रयोजन शोधायला हवं."                                  

                             ooo

                  '   मूळ जगण्याचं प्रयोजन शोधायला हवं. आयुष्य आहे तोपर्यंत जगायला हवं, असं तर प्रत्येकजण म्हणतो तरी देखील जगण्याचं प्रयोजन शोधण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न दिसतो. सामान्यातली सामान्य माणसंही  ' मुलांचं शिक्षण होऊ दे, मग नोकरीं, टाळक्यावर आता चार अक्षता पडू देत आणि शेवटी नातवाचं तोंड पाहू दे ' ह्यासारखी चाकोरीबद्द अटळ प्रयोजनं आणि प्रलोभनं शोधत असतात. चाकोरी सतत ' कोरी ' ठेवण्याचा प्रयत्न करतात. ह्या माणसांची काहीच चूक नाही. मुलाबाळांनी भरलेला संसार हा ज्या प्रवासाचा प्रारंभ आणि शेवट आहे त्याचा स्वीकार केल्यावर वेगळं आयुष्य वाट्याला कसं यावं? त्यातही सत्तर ते ऎशी टक्के लोकांना प्रयोजन शोधण्याची गरजच वाटत नाही. Survival for Existence ह्यातच त्यांची इतकी शक्ती खर्च होत असावी की जरा मान उंच करून, दृष्टी पल्याड न्यावी, काही वेगळ्या दिशेचा शोध घ्यावा ह्याची त्यांना भूक नसते. जाणीव नसते. अपुऱ्या जागेत फळीवरचा छोटासा देव्हारा त्यांना आपल्यासाठी पुरतो आणि वर्षाकाठी सत्यनारायणाची पूजा, उरलेल्या ' अंरिअर्स ' साठी बास होते. सर्व विपरीत घटनां ची उत्तर ' प्रारब्ध ' ह्या शब्दात त्यांना मिळतात. ही तमाम जनता सुखी. पण ह्यापलीकडे  थोंडी जास्त जिज्ञासा जागी झाली, आयुष्याचा अर्थ शोधण्याची धडपड सुरु झाली की, न संपणारी प्रश्नमाला सुरु. "

वपुर्झा /243/Surendra / 11092025

बुधवार, १० सप्टेंबर, २०२५

" मानसोपचार तज्ञ त्यांचं अस्तित्व मान्य करतात, पण त्याच उच्यटन करू शकत नाहीत. "

" मानसोपचार तज्ञ त्यांचं अस्तित्व मान्य करतात, पण त्याच उच्यटन करू शकत नाहीत. "

                                 000

                  '   एखाद्या व्यक्तीच्या प्रपंचांत जेव्हा काही व्यथा निर्माण होतात तेव्हा त्याला इतर व्यक्तींपेक्षा परिस्थिती जबाबदार असते. ही परिस्थिती प्रत्येक व्यक्तीला कमी अधिक प्रमाणात जाणवते. काहींना जणू भूकंपाचे धक्के बसतात, तर काहींना केवळ वेधशाळेने नोंद केली तरच समजते. जी व्यक्ती मनानें जास्तीत जास्त संवेदनक्षम असते तिलाच तातडीने रया वातावणावर उपाय हवाअसतो. हा उपाय कधी प्रत्यक्ष स्वरूपात हवा असतो तर कधी निव्वळ शब्दांची फुंकर पुरते. स्वतःच्या यातनामय आयुष्यक्रमाची आणि भानात्मक ताणतणावाची तितक्याच  लहरीवर दुसऱ्या कुणाला तरी जाणीव आहे आणि ती व्यक्तीही  तेव्हडीच बेचैन आहे एव्हढाही आधार काहींना पुरेसा असतो. अशा आधाराची आवश्यकता निर्माण होणं आणि चार भिंतीच्या घरकुलात तसा हात न मिळणं इथंच कुठेतरी वाळ्वी लागली आहे, ह्याची साक्ष आहे. घरकुलाच्या बांधकामत कुठंतरी ओल आहे. मी व्यवसायाने आर्किटेक्ट असूनही सांगतो की भिंतीत ही अशी ' ओल ' नक्की कोठून येते, हे शोधणे अशक्य असत. पूनर्बंधणी करणं हाही इलाज योग्य ठरत नाही. एखादी व्यथा अशी असते. वाळवीचा बंदोबस्त एक वेळ करता येतो पण बांधकामात ' ओल ' कुठं वा का आहे हे भल्या भल्या        तंत्रज्ञाना कळत नाही. तशी एखादी व्यथा-रुखरूखीची पाळमुळं किती खोलवर गेलेली आहेत, ते उकळत नाही. मानसोपचार तज्ञ त्यांचं अस्तित्व मान्य करतात, पण त्याच उच्यटन करू शकत नाहीत. "

वपुर्झा /240/Surendra / 10092025

मंगळवार, ९ सप्टेंबर, २०२५

"पुन्हा ' नोकरीचा रुबाब दाखवू नकोस ' ही अरेरावी आहेच. "

" पुन्हा ' नोकरीचा रुबाब दाखवू नकोस ' ही अरेरावी आहेच. "

                                 000

                  '  ' विचार करा ' तुमच्या नोकरीची तुमच्या संसाराला नितांत गरज आहे. हे जर तुम्हाला स्वतःला पटलं तर तो जीवनक्रम खळखळ न करता स्वीकारा. त्यानंतर सगळ्या ' प्रयोरिटीज ' बदलतील. त्यांचही मग स्वागत करा. ' नोकरीं ' की ' अपत्य ' ह्यातही अग्रहक्क कशाला हे ठरवणं आलं. हा सगळा तिढा अवघड का? तर ह्या वेगवेगळ्या पातळीवरच्या डिमांड्स आहेत म्हणून. नोकरीधर्म श्रेष्ठ की मातृत्वाची भावना? प्राप्ती की अपत्य? अपत्यप्राप्ती हा मग एकच शब्द उरत नाही. तिथंही ' प्राप्ती ' हा शब्द प्रथम लिहायचा की ' अपत्य '? अपत्य आणि प्राप्ती दोन्ही साधायचं म्हणजे मूल नोकराकडे किंवा सासू- ' unwilling guardian की willing? अपत्य झाल्यावर हे कळणार.  नाहीतर मग शेजारी, थोडक्यात म्हणजे त्या निष्पाप पिल्लाला  ' आई ' सोडून कुणीही. बाप परकाच असतो. ' श्त्री ' ही क्षणाची पत्नी, अनंतकाळची माता असं एक वचन, हयाउलट ' पुरुष हा क्षणाचा पिता आणि अनंतकाळचा..... ' मोकळ्या जागेत, पुरुष पिता खऱ्या अर्थानें झाला तर, नाहीतर पती, dictator जो शब्द असेल तो. शाळा, अभ्यास, संगोपन सुश्रुषेबरोबर नोकरीं. त्यातही श्त्रीला म्हणजे बायकोला नवऱ्यापेक्षा पगार जास्त असला तर किती नवऱ्यांना खपत? पुन्हा ' नोकरीचा रुबाब दाखवू नकोस ' ही अरेरावी आहेच. "

वपुर्झा /238/Surendra / 09092025

शनिवार, ६ सप्टेंबर, २०२५

" कारण वेगवेगळी असतात, पण माणसं एकमेकांना वापरतात. "

" कारण वेगवेगळी असतात, पण माणसं एकमेकांना वापरतात. "

                                 000

                  '  शी: शी:! किती गलिच्छ विचार आहेत तुमचे? ' "  गलिच्छ म्हण किंवा आणखी कोणतेही नाव दे. पण विचार तेव्हडेच खरे आहेत. माणसं माणसांना वापरतात. राज्यकर्ते जनतेला वापरतात. फार कशाला एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राला वापरत. आईबाप मुलांना वापरतात. मुलंही नंतर तेच करतात. नाहीतर ज्यांचा उपयोग संपलेला आहे अशा आईवडिलांची वार्धक्यात सासेहोलपट झाली नसती. कुणी भावनात्मक गरज भागवण्या साठी, कुणी सुरक्षितपणाच्या नावाखाली, कुणी केवळ आर्थिक लाभासाठी, तर कुणी फक्त विकृत आनंद शमविण्यासाठी, कारण वेगवेगळी असतात, पण माणसं एकमेकांना वापरतात. "

वपुर्झा /238/Surendra / 06092025

गुरुवार, ४ सप्टेंबर, २०२५

" जिथे संस्कारच नसतात तिथे बडगाच हवा "

" जिथे संस्कारच नसतात तिथे बडगाच हवा "

                                 000

                "  लोकशाही तत्व म्हणून ठीक आहे, पण देशाचा कारभार करायचा म्हणजे शिस्तीचा बडगा हवाच. जिथे संस्कारच नसतात तिथे बडगाच हवा. आपल्या घरातल्या घरात ज्यांना आपण रक्ताचे नातेवाईक मानतो तिथेसूद्धा काहीं गोष्टी मनासारख्या व्हायला हव्या असतील तर घर चालविणाऱ्या माणसाला अघूनमधून रुद्रावतार घारण करावाच लागतो. आपल्या नवऱ्याला किंवा बायकोला किंवा आईवडिलांना आपण अमुक तऱ्हेने वागलो तर आनंद होणार आहे, गैरसोय होणार नाही, ह्या समजूतीने वागणारी माणसं फार थोडी. अनेक घरांतून स्वतःचेच नातेवाईक सांगूनसुद्धा ऐकत नाहीत. असं का घडत असावं? आणि तेही स्वतःच्याच माणसांकडून? कारण झोडगिरीने वागलं तरी ते खपहून घेतलं जातं ह्याची खात्री आहे म्हणून. ह्याचं वृत्तीने देशातली माणसं    वागतात. "

वपुर्झा /223/Surendra / 05092025

" महापालिकेच्या पिवळ्या कागदावर तुझी जी जन्मतारीख आहे, तो जन्म नव्हे, ती केवळ तू कायद्याने ' सज्ञान ' कधी झालास ह्याच्या तपासणी साठी आवश्यक असलेली नोंद."

" महापालिकेच्या पिवळ्या कागदावर तुझी जी जन्मतारीख आहे, तो जन्म नव्हे, ती केवळ तू कायद्याने  ' सज्ञान ' कधी झालास ह्याच्या तपासणी साठी आवश्यक असलेली नोंद."

                                 000

                "  कथाकथनचा कार्यक्रम संपल्यावरचे क्षण कसे असतात? हे आयुष्यातले शून्य क्षण. मुक्त क्षण नव्हेत. शून्यातूनच सगळं निर्माण झालं म्हणतात. पण हे निर्मितीक्षम शून्य नव्हे, हे तुम्हाला उजाड, एकाकी, पोरकं करणार शून्य. तुमच्यावर जिवाभावाने, उत्कटतेने तुटून पडणारं कुणीतरी सानिध्यात असणं ही त्या शून्याची गरज. त्याने काही बोलू नये, काही सांगू नये, काही विचारू नये. स्तुती नको, कार्यक्रमाचं कौतुक नको, त्याने फक्त असावं. कधी कधी काहीच नसतं. आपण फक्त असतो. कधी कधी हे क्षण चिरंतन स्वरूपाचे पण स्वतःचीच साधना नसल्यामुळे, उत्तर हरवलेले प्रश्न समोर उभे करतात. हे सगळं काय आहे?,  का आहे?, कधी सुरु झालं?, कधी संपणार?, मागं काय उरणार?, किती काळ उरणार?, वरवरची उत्तर तयार असतात. हे सगळं काय आहे ह्याचं आकलन तुला होणारच नाही. तू गप्प रहा. का आहे? - सांगता येणार नाही. कारण तू ह्याचा निर्माता नाहीस. हे कधी सुरु झालं?- तुझ्या जन्मापासून हे सुरु झालं. महापालिकेच्या पिवळ्या कागदावर तुझी जी जन्मतारीख आहे, तो जन्म नव्हे, ती केवळ तू कायद्याने  ' सज्ञान ' कधी झालास ह्याच्या तपासणी साठी आवश्यक असलेली नोंद. त्यातला ' सज्ञान ' हा शब्द संपूर्ण अज्ञान दर्शविणारा. कॅलेण्डरवरचे छापील चोकोन मागे पडल्याने माणूस सज्ञान होतो काय? ज्या दिवशी तुझ्या जाणीवांचा प्रारंभ झाला तो तुझ्या जन्म. तो दिवस टिपता येईल? नो. नेमक्या कोणत्या दिवशी गर्भ राहिला हेही सांगता येतं नाही. तरीही समज, जाणिवा जाग्या झाल्या त्या दिवसापासून हे चक्र फिरू लागलं. कधी संपणार?- तुझ्या शेवटच्या श्वासाबरोबर. मागं काय उरणार?, काही नाही. तुझ्या पश्चात तुझं अस्तित्व किती?, इतरांच्या जाणिवा जितके दिवस राहतील तितके दिवस. कदाचित तुझं अस्तित्व तुझ्या हयातीतच संपल्याच तुला पहावं लागेल. " 

वपुर्झा /222/Surendra / 04092025

बुधवार, ३ सप्टेंबर, २०२५

कर्तृत्वाला प्रयत्नांचे अश्व जुमपायचे असतात. एकच दिशा ठरवायची असते. निग्रहाचे लगाम हातात ठेवायचे असतात आणि सातत्याचा चाबूक स्वतवरच उगारायचा असतो. "

" कर्तृत्वाला प्रयत्नांचे अश्व जुमपायचे असतात. एकच दिशा ठरवायची असते. निग्रहाचे लगाम हातात ठेवायचे असतात आणि सातत्याचा चाबूक स्वतवरच उगारायचा असतो. "

                                 000

                "  आयुष्यातली पहिली पंचवीस वर्ष सोडूनच द्यायची. कोणत्या कुटुंबात जन्म, कोणतं गाव, कोणती शाळा, शिक्षक, प्राध्यापक, यश, व्यवसाय, आयुष्याचा साथीदार........ प्रत्येकाने मागे वळून पाहिलं तर हीच स्टेशन'. पण इलाखे वेगवेगळे. आणि मग मर्यादांनी वेढलेल्या ह्या प्रवासात, एका माणसाला अनुभव येऊन येऊन किती येणार? आयुष्यात किती माणसं भेटणार? त्यातली साधी किती? सोज्वळ किती? मिडिऑकर किती? विद्वान पण आढयताखोर किती? असे अनेक प्रश्न मला पडतात आणि तरीसुद्धा वाटतं, विचारांचा मागोवा घेण्याचा ज्यांना ज्यांना छंद आहे त्या सगळ्यांना ज्ञानभाराने नम्र झालेला एक तरी महाभाग भेटला असेलच. विचारांचाच मागोवा घेणारे समाजात किती लोक आहेत, हा प्रश्न बाजूला ठेवणे भाग आहे. पण अशी विनम्र असलेली, ज्ञानी माणसं, सगळीच्या सगळी भेटणं अशक्य. मलाच असं नव्हे, तर कोणत्याही एका व्यक्तीला. कर्तृत्वाला प्रयत्नांचे अश्व जुमपायचे असतात. एकच दिशा ठरवायची असते. निग्रहाचे लगाम हातात ठेवायचे असतात आणि सातत्याचा चाबूक स्वतवरच उगारायचा असतो. असं केलं तरच            ' व्यक्ती ' च्या गावापासून  ' व्यक्तिमत्ववा ' च्या महानगरी पर्यंतचा प्रवास होतो. निग्रहाचे लगाम सोडले की आश्वाचा.   ' वारू ' होतो. ' वारू ' आणि ' वारा ' ह्यांचं एक नातं असावं. ते कोणत्याही दिशेने जातात. "

वपुर्झा /218/Surendra / 03092025