".भाऊबंदकीच ठीक आहे. तो आपला राष्ट्रीय धर्म आहे "
000o000
भाऊबंदकीच आपल्या महाराष्ट्रात बारमाह पीक येत. त्याशिवाय आणखी एक पीक आहे. ह्या पिकाला पाऊस नको. जमिनीची निगा राखायची कटकट नको. विहीर न खणताच " ती खणली " अस दाखवून सरकारी खर्च वसूल करण नको. ह्या पिकाला खडकाळ जमीन पण चालते. ह्या शेतात " कंड्या" पिकतात. सर्वात जवळचे नातेवाईक हे पीक काढतात. हे भाऊबंदकीच ठीक आहे. तो आपला राष्ट्रीय धर्म आहे. पण फुटीर बाणा हा तर आयुष्याचा कणा आहे.
वपूर्झा / 108/Surendra /21122024(२)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा