" मरणही जिथे शांतपणे मिळत नाही तिथे मृतात्मा शांत कसा राहिल? "
000o000
अपघाती मरण म्हणजे त्या मृतात्म्याचे धिंडवडे, शरीराची विटंबना आणि नातेवाईक, आप्तेष्टांनाची ससेहोलपट. कॉरोनरकडे ताटकळण. पोस्टमार्टेम विनाविलंब व्हावं म्हणून तिथंही हात ओला करण, फार कशाला, प्रेतावर टाकण्यासाठी पांढरा कपडा हवा असेल, तर तिथंही दक्षिणा मोजण, बससाठी डोळ्यात प्राण आणून, बॉडी ताब्यात मिळेतो पळापळ करण, नाहीतर नोटांमागून नोटा खर्च करायची तयारी ठेऊन टॅक्सीने प्रवास करण. ' मृतत्म्याला शांती मिळो ' अस फक्त म्हणायचं, पण त्यात काय अर्थ आहे ? चार घटका माथा टेकायला जमीन हवी असेल तर लाखो रुपये ह्या शहरात ओतावे लागतात. जिवंतपणी सामान्य माणसाची जी परवड व्हायची ती होतेच. पण मरणही जिथे शांतपणे मिळत नाही तिथे मृतात्मा शांत कसा राहिल?
वपूर्झा / 121/Surendra /17.122024
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा