शुक्रवार, ६ डिसेंबर, २०२४

" स्वतः ' ची यथार्थ जाणीव आणि ओळख असलेला माणूस स्वाभिमानी असतो."

"  स्वतः ' ची यथार्थ जाणीव आणि ओळख असलेला माणूस स्वाभिमानी असतो."

                           000o000

          समाजापासून, वर्तुळापासून, नातेवाईक,मित्र, थोडक्यात म्हणजे, ' संवादा ' पासून जो तुमची फारकत करतो, ज्या वृत्तीमुळे तुम्ही एकटे पडता तो सगळा दुरभिमान. दुरभिमानात थोडी हिंसा डोकावते. इतरांची मन ही अशी सहजी मारता मारता, दूरभिमान स्वतःचीही हत्या करतो. स्वाभिमान गौरवास्पद असतो. तेवढाच फक्त जतन केला तर  वर्तुळातली माणसही त्याची बूज राखतात. स्वाभिमानाची सोयरिक कर्तुत्वाशी असते. कर्तृत्वशून्य स्वाभिमानाला ' पोकळ ' विशेषणाचा भरगच्च आहेर मिळतो. स्वाभिमानी माणूस परावलंबी नसतो. नियतीच्या.   लहरीपाई त्याला सत्तेपुढे नमत घ्यावं लागत. पण ती परिस्थिती तो फार सहन करू शकत नाही. स्वतंत्र, स्वायत्त होण्याच्या वाटा तो शोधत असतो. ' स्वतः ' ची यथार्थ जाणीव आणि ओळख असलेला माणूस स्वाभिमानी असतो.

वपूर्झा / 164 /Surendra /06122024

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा