" भौतिक सुखाच्या मागे लागलेल्या माणसाला अधार्मिक म्हणता येणार नाही. ".
000o000
पायथ्याशीच राहण्यामध्ये कल्याण आहे, ह्याचा शोध लागला की आयुष्यात धर्माचा उगम झाला अस समजावं. प्रत्येकाची कहाणी वेगळी असेल. पहाड वेगवेगळे असतील. त्याचप्रमाणे दगडही. आपण तेच तेच काम सातत्याने करत असतो. प्रत्येक वेळेला म्हणत राहतो की, माझ्या हातून काहीतरी चुकल असेल, पुढच्या वेळेला दुरुस्ती करू. पुन्हा यश मिळालं नाही की, माणूस केव्हातरी थकतो. ह्यात सुख असेल किंवा त्यात सुख असेल, अस म्हणत आयुष्यभर सुखामागे पळत राहतो. शेवटी हातात वैफल्यच येत. असा अनुभव आला, म्हणजे तो चिरंतन सुखाच्या शोधामागे लागतो. विफलता हेच अध्यात्माच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल. म्हणूनच भौतिक सुखाच्या मागे लागलेल्या माणसाला अधार्मिक म्हणता येणार नाही. शाश्वत सुखाचीच ती चुकलेली वाट आहे.
वपूर्झा / 170 /Surendra /04122024(2)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा