" मैत्रीची शान सांभाळणे हे अश्वमेधाचा वारू संभाळण्या इतकं जोखमीचे असत. "
000o000
मित्रामित्रांच्या वां दोन स्त्रियांच्या दोस्तीबाबत बघणाऱ्यांच्या डोळ्यांचा नंबर कमीजास्त होत नाही. पण एक स्त्री आणि एक पुरुष म्हटल की रामायणातल्या लंकेतले नागरिक आणि महाभारतातील कौरव एकत्र येतात. पांडवांप्रमाणे क्रमाक्रमाने, जाणिवेने पौरुषत्वाने द्रौपदीची जबाबदारी न उचलता, निव्वळ घटकाभर करमणूक म्हणून द्रौपदीच्या निऱ्यांना हात घालणाऱ्या कौरवांनी समाज भरलेला आहे. म्हणूनच स्त्री- पुरुष मैत्री म्हटल रे म्हटल की ती सेक्स रिलेशन साठीच असते, अशा रबरी शिक्यासकट माणस ती गोष्ट गृहीत धरतात. शिक्का सतत ओला ठेवतात. म्हणूनच त्या मैत्रीची शान सांभाळणे हे अश्वमेधाचा वारू संभाळण्या इतकं जोखमीचे असत.
वपूर्झा / 112/Surendra /20122024
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा