" मनाची ताकद मनालाच कुणीतरी दाखवायची असते."
000o000
" प्रत्येक जुन्या अनुभवाला नव्याने सामोरे जाण्याची एक कला असते. आयुष्य म्हणजे पुनरूक्ती. ब्रेकफास्ट, आंघोळ, दुपारचं जेवण, त्यासाठी स्वयंपाक, आलटूनपालटून त्याच भाज्या, आमटी, तीच कणिक, त्याच पोळ्या. मग एखादी डुलकी, पून्हा दुपारचा चहा. परत रात्रीचं जेवण. मग झोप. हा झाला एक दिवस. प्रति क्षणी नवा जन्म घेण्याची शक्ती फक्त मनाजवळ असते. पण त्याला ते शिकवावं लागतं. मनाची ताकद मनालाच कुणीतरी दाखवायची असते. त्याने ती उचलली की मग सगळं सोपं असतं. मग ते मनच तुम्हाला एक आयुष्य पुरणार नाही इतक्या युक्त्या शिकवत. ते मन मग लेखकांला कथानक पुरवत, कवीला शब्द सुचवतं, संगीतकारला चाल, नर्तकाला पदन्यास, शात्रज्ञाला शोध, साध्यासुध्या, सर्वसामान्य बाईचं आदर्श गृहिणीत रूपांतर कसं करायचं, हेही मनच शिकवतं. श्त्रीची गृहिणी होणं, ही सुद्धा कलाकृतीच आहे. "
वपुर्झा /126/Surendra / 25062025