बुधवार, ७ मे, २०२५

" स्वतः' चीं यथार्थ जाणीव आणि ओळख असलेला माणूस स्वाभिमानी असतो. "

"  स्वतः' चीं यथार्थ जाणीव आणि ओळख असलेला माणूस स्वाभिमानी असतो. "

                          000o000

                "  समाजापासून, वर्तुळापासून, नातेवाईक, मित्र, थोडक्यात म्हणजे ' संवादा ' पासून जो तुमची फारकत करतो ज्या वृत्तीमुळे तुम्ही एकटे पडता तो सगळा दुरभिमान. दुरभिमानात थोडी हिंसा डोकावते. इतरांची मनं ही अशी सहजी मारता मारता, दुरभिमान स्वतचीही हत्या करतो. स्वाभिमान गौरवास्पद असतो. तेव्हडाच फक्त जतन केला तर वर्तुळातली माणसंही त्याची बुज राखतात. स्वाभिमानाची सोयरीक कर्तृत्वाशी असते. कर्तृत्वशून्य स्वाभिमानाला          ' पोकळ ' विशेषणचा भरगच्च आहेर मिळतो. स्वाभिमानी माणूस परावलंबी नसतो. नियतीच्या लहरीपाई त्याला सत्तेपुढे नामतं घ्यावं लागतं. पण ती परिस्थिती तो फार सहन करू शकत नाही. स्वतंत्र, स्वयत्त होण्याच्या वाटा तो शोधत असतो.   ' स्वतः' चीं यथार्थ जाणीव आणि ओळख असलेला माणूस स्वाभिमानी असतो. "

वपुर्झा /164/Surendra / 08052025(2)

" एवढ्या साधनांवर माणूस देवळा पर्यंत होचतो. देवापर्यंत जातो का? "

" एवढ्या साधनांवर माणूस देवळा पर्यंत होचतो. देवापर्यंत जातो का? " 

                           000o000

                "   शिक्षण म्हणजे काय? पाठांतर करून लक्षात ठेवलेली जुजबी माहिती. ज्याचं पाठांतर जास्त तो हुशार. ज्याचं कमी तो मागे पडणारा. म्हणूनच शिक्षण संपत तेव्हा बरंचसं विसरल गेल तरी चालतं. व्यवहारात मिळतं ते शिक्षण वेगळं. शाळेत भाषा शिकवली जाते. माणसा-माणसातला संवाद कसा असावा हे व्यवहार सांगतो. पाढे पाठ करणं वेगळं आणि गणित समजणं वेगळं. शरीरशात्र वेगळं, तर आतला माणूस त्याहून निराळा. एकूण स्वर किती ह्याची संख्या समजण आणि संगीताच आकलन होणं ह्या भिन्न गोष्टी आहेत. ह्या सर्व उंची आणि जाडी वाढवणाऱ्या, मनाची खोली वाढवणाऱ्या गोष्टी वेगळ्या तेव्हड्यातच वरवर नजरेत आपण प्रतिसाद देणार एक शरीर शोधतो. डिग्री पाहून, ऐपत पाहून वीस रुपयांचा नारळ, पन्नास रुपयांचे पेढे, वीस रुपयांचा हार आणि चपला सांभाळणाऱ्या बाईला दोन रुपये, एवढ्या साधनांवर माणूस देवळा पर्यंत होचतो. देवापर्यंत जातो का? 

वपुर्झा /163/Surendra /08052025

मंगळवार, ६ मे, २०२५

" संसार हा एक व्यवहार आहे. प्रेमाइतकाच तो कर्तृत्वाचा भाग आहे."

" संसार हा एक व्यवहार आहे. प्रेमाइतकाच तो कर्तृत्वाचा भाग आहे."

                           000o000

                "   प्रेमपूर्तीत साफल्याची शंका असते. प्रेमभंगातलं वैफल्य नवी पायवाट शोधायला लावते, स्वतःच्या मालकीची. प्रेम, प्रेमविवाह दोन्ही मान्य. पण संसार हा व्यवहारही आहे. प्रेम करतानाही साथीदाराची वैचारिक पात्रता तपासायला हवी. संसार  हा स्थर्यासाठी असतो. आता स्थर्याची व्याख्या ठरवायला हवी. अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा. संसाराच्या प्रारंभी ह्या तीनही गरजा, मनं माराव लागणार नाही इतक्या ठणठणीत अवस्थेत भागणाऱ्या असतील तर ह्याच्यापलीकडच्या ज्या गोष्टी हव्या आहेत, ह्या सगळ्या wants आहेत. त्या needs नाहीत. मागण्या आणि गरजा इतका स्पस्ट फरक आहे हा. अन्न, वस्त्र, निवारा ह्या किमान गरजा जो भागवू शकत नाही, त्याने मुळात लग्न का करावं? ' पुरुष ' होण्यापूर्वी त्याने ' नवरा ' आणि नंतर ओघानेच " बाप ' व्हायची घाई का करावी? वरील तीन गरजापैकी ' निवारा ' ही गरज, राज्यकर्त्यांनी इतकी इतकी महाग करून ठेवली आहे की ती घेता घेता रक्त ओकावं लागतं. ह्या एव्हड्याच एका बाबतीत पत्नीने आर्थिक सहकार्य द्यावं ही नवऱ्याची अपेक्षा गैर मानता येणार नाही. पण निवाऱ्याचा प्रश्नही सुटलेला असेल तर आडकाठी राहिली कुठे? फ्रिज, फोन, होंडा, टीव्ही, टेपरेकॉर्डर हे फॅमिली मेंबर्स विकत घेऊन सांभाळायचे असतील तर  ' फ्रिज '   वगळता बाकीच्या wants आहेत. ह्यासाठी तुमच्या जोडीदाराने तुमच्या मनाविरुद्ध तुम्हाला नोकरीची जबरदस्ती केली तर नाईलाजाने त्याच्या मंनगटात ताकद नाही असं म्हणावं लागेल किंवा त्याला रातोरात पैॅरिस बांधून हवयं म्हणावं लागेल. ह्यातला दुर्दैवाचा भाग हाच आहे. कष्ट आणि वेळ, सतत्य आणि निष्ठा ह्यांच्या पाठपुराव्याशिवाय जगात काहीच मिळत नाही. ह्यावरचा उपवर तरुणाचा विश्वास उडत जाण हा दुर्विलास आहे. अशा माणसाच्या आयुष्यात तुम्ही एकजीव होऊ शकाल का? सगळं भवितव्य त्याच्या हातात सोपवतांना, तुमचं अगदी छोटं पण रास्त स्वप्न, लग्नाच्या होमात आहुती म्हणून टाकणार का? प्रारंभीच्या कळतलं प्रेम आंधळं असू शकत. कोणती व्यक्ती का आवडावी, ह्याला उत्तरं नाहीत. पण संसार हा एक व्यवहार आहे. प्रेमाइतकाच तो कर्तृत्वाचा भाग आहे. कालांतरानें कर्तुंत्वशून्य सहवास तुम्हाला नकोसा झाला तर? 

वपुर्झा /162/Surendra /06052025

रविवार, ४ मे, २०२५

" ........धरित्री अशा काही माणसांना जन्माला घालते. "

".........धरित्री अशा काही माणसांना जन्माला घालते. " 

                           000o000

                "   मला हेही माहीत आहे की अखंड उत्साह, शोधक नजर, वक्तृत्व, प्रवासाची विलक्षण हौस हे सगळे गुणविशेष व्हिट्यामिनच्या गोळ्या खाऊन येत नाहीत. कलमी आंबा हा मातीचाच हुंकार असतो. तशा काही काही व्यक्ती ही मातीला पडलेली स्वप्न असतात. वासुदेव बळवंत, सावरकर, लोकमान्य टिळकांपासून खरेखुरे क्रांतिकारक-विचारवंत, लता-आशा वगैरेसारख्या तीन तपांच्यावर स्वरांच्या संततधारांनी चिंब करणाऱ्या           पार्श्वगायिका, बडे गुलामअलीखापासून  पं. भीमसेन जोशीपर्यंतचे गायक, बाबा आमट्यानंपासून शिवाजीराव पटवर्धनांपर्यंत खरेखुरे मानवतेचे पूजारी, अशी सगळी माणसं पहिली की ' सुजलां सुफलां ' चा अर्थ सापडतो. राहलेल्या सगळ्या जनगणात जमिनीत फाळ खुपसणारे आहेतच. पण जेव्हा जमिनीलाच प्रसववेदनांचा मोह होतो, देठालाच जेव्हा रोमांच आवरेनासे होतात तेव्हा कळीचा हुंकार उमटतो त्याप्रमाणे धरित्री अशा काही माणसांना जन्माला घालते. " 

वपुर्झा /161/Surendra /04052025(3)

शनिवार, ३ मे, २०२५

" समाजात वाण आहे ती मोठ्या मनाची. मोकळ्या मनाची नव्हे. "

" समाजात वाण आहे ती मोठ्या मनाची. मोकळ्या मनाची नव्हे. " 

                           000o000

                "   पंचवीस वर्षांपूर्वीच्या चुका मान्य करतांना आपल्याला काही वाटतं नाही  काळ फक्त सगळ्या दुःखावरच इलाज नसतो तर चुकांवरही असतो. काल जर आपण एखाद्याचा अपमान केला, तर आज दिलगिरी दर्शवण जड जातं. काही माणसांजवळ लगेच चुका मान्य करण्याचा मोकळेपणा असतोही. तरी ती गप्प राहतात. का? एकच कारण. मोकळी होणारी मनं खूप अडतील. मोठ्या मनाची माणसं भेटतील न भेटतील. ह्या शंकने ती गप्प राहिली असतील, स्वतःचं मनं कुरतडत असतील.  समाजात वाण आहे ती मोठ्या मनाची. मोकळ्या मनाची नव्हे. " 

वपुर्झा /160/Surendra /04052025

" भक्ती, प्रेम, श्रद्धा, दया, शांती, क्षमा ही सगळी मौनाची रूपं आहेत."

"  भक्ती, प्रेम, श्रद्धा, दया, शांती, क्षमा ही सगळी मौनाची रूपं आहेत."

                          000o000

                "  परिवर्तन ही अंतर्मनातलीच प्रोसेस आहे. लाऊडस्पीकर्स लावून, कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात प्रार्थना म्हणणं, हा राजकारणाचा भाग आहे. भक्ती, प्रेम, श्रद्धा, दया, शांती, क्षमा ही सगळी मौनाची रूपं आहेत. बाहेरच्या कोलाहलापासून लांब गेलो म्हणजे तुम्हालाच तुमचा सूर ऐकू येतो. तो सूर ऐकू येऊनही जी माणसं तिकडे दुर्लक्ष करतात, त्यांना गुरु किंवा  सायक्रॅटिस्ट लागतो "

वपुर्झा /160/Surendra / 03052025(2)

"माणूस कशाच्या आधारावर जगतो? "

" माणूस कशाच्या आधारावर जगतो? "

                           000o000

                "  माणूस कशाच्या आधारावर जगतो सांगू? भूतकाळातल्या आठवणीवर! " ' ही निव्वळ कविकल्पना!. आयुष्य आहे म्हणून जगतोय हे उत्तरं फार रुक्ष वाटेल ह्या भीतीपायी माणूस बेधडक सांगतो, आठवणींवर जगतो म्हणून! आठवणी जीवन देण्या इतक्या तीव्र असत्या तर माणूस कशाचीही पर्वा न करता त्या आठवणींमागे लागला असता. पण तशी माणसं फार कमी. आठवणी असह्य होणारी माणसं सरळ जीव देतात. इतर आपल्या नशिबातच नव्हतं असं म्हणत, रडगाणी गात आयुष्याशी कोम्पर्माईज करतात " 

वपुर्झा /159/Surendra /03052025