मंगळवार, २४ जून, २०२५

" मनाची ताकद मनालाच कुणीतरी दाखवायची असते."

" मनाची ताकद मनालाच कुणीतरी दाखवायची असते."

                                  000o000

                " प्रत्येक जुन्या अनुभवाला नव्याने सामोरे जाण्याची एक कला असते. आयुष्य म्हणजे पुनरूक्ती. ब्रेकफास्ट, आंघोळ, दुपारचं जेवण, त्यासाठी स्वयंपाक, आलटूनपालटून त्याच भाज्या, आमटी, तीच कणिक, त्याच पोळ्या. मग एखादी डुलकी, पून्हा दुपारचा चहा. परत रात्रीचं जेवण. मग झोप. हा झाला एक दिवस. प्रति क्षणी नवा जन्म घेण्याची शक्ती फक्त मनाजवळ असते. पण त्याला ते शिकवावं लागतं. मनाची ताकद मनालाच कुणीतरी दाखवायची असते. त्याने ती उचलली की मग सगळं सोपं असतं. मग ते मनच तुम्हाला एक आयुष्य पुरणार नाही इतक्या युक्त्या शिकवत. ते मन मग लेखकांला कथानक पुरवत, कवीला शब्द सुचवतं, संगीतकारला चाल, नर्तकाला पदन्यास, शात्रज्ञाला शोध, साध्यासुध्या, सर्वसामान्य बाईचं आदर्श गृहिणीत रूपांतर कसं करायचं, हेही मनच शिकवतं. श्त्रीची गृहिणी होणं, ही सुद्धा कलाकृतीच आहे. "

वपुर्झा /126/Surendra / 25062025

" माणसाच्या स्वभावातली एखादी छटा म्हणजे तो संपूर्ण माणूस नाही."

" माणसाच्या स्वभावातली एखादी छटा म्हणजे तो संपूर्ण माणूस नाही."

                                  000o000

                " माझी संसाराची व्याख्याच निराळी आहे. एकमेकांचे वाभाडे काढण्यासाठी किंवा वर्मावर चोची मारण्यासाठी संसार करायचा नसतो. जिथे जोडीदार कमी पडेल तिथे आपण उभं रहायचं. मी तुला स्वीकारलं ते तुझ्या वलयासहित स्वीकारलं. माणसाच्या स्वभावातली एखादी छटा म्हणजे तो संपूर्ण माणूस नाही. एखाद्या क्षणी, एखादी भावना अनावर होते. का? ह्याचं उत्तर ज्याचं त्याच्या जवळ नसतं. भावनांचे तिढे आपण बुद्धीने सोडवायला बघतो आणि बुद्धी्वादाने कठोर प्रश्न सोडवायचे असतात, तिथं भावनेचा घोळ घालतो. ही भावनेची बुद्धीवरआणि बुद्धीची भावनेवर अवेळी पडणारी झापडच असते. झापड उडायच्या आत माणूस संसारात पडतो, आणि जाग येण्यापूर्वी संसार संपलेला असतो. "

वपुर्झा /124/Surendra / 24062025

सोमवार, २३ जून, २०२५

" ओझं दिसतं कारण ते लादलेल असतं. जबाबदारी स्वीकारलेली असते."

" ओझं दिसतं कारण ते लादलेल असतं. जबाबदारी स्वीकारलेली असते."                             

                                  000o000

                '  संसार ही जबाबदारी असते. त्याचं ओझं वाटायला लागलं, की आनंद संपला. ' ' जबाबदारी आणि ओझं, ह्यातला नेमका फरक काय? ' " ओझं म्हणजे खांद्यावर दिलेला बोजा. पण कधी कधी दहा-बारा हजारांचा एखादा दागिना सांभाळायचा असतो. ते इतरांनाही माहीत नसतं. त्याला जबाबदारी म्हणतात. आयुष्यात प्रेम, मैत्री, संगोपन, शुश्रुषा ह्या सगळ्या जबाबदाऱ्या. त्यांचं ओझं वाटली की सहजता गेली. " ओझं हीदेखील जबाबदारी नसते का? " " ओझं दिसतं कारण ते लादलेल असतं. जबाबदारी स्वीकारलेली असते. ओझं बाळगणाऱ्याला कदाचित मदतीचा हात मिळतो. तसं जबाबदारीचं नसतं. "

वपुर्झा /117/Surendra / 23062025

शनिवार, २१ जून, २०२५

"ह्यातला कोणता माणूस खरा? कोणता खोटा? "

"ह्यातला कोणता माणूस खरा? कोणता खोटा?"                                   

                                  000o000

                "  मान्य करा अथवा करू नका, माणसाला सतत काही ना काही थरारून टाकणार हवं असतं. ' माणूस ' कोणतीही व्याख्या, गणित, न्यायशात्र, मानसशांत्र आणि तर्कशात्र ह्या सगळ्यातून ' निसटण्याचं शात्र ' शिकल्याप्रमाणे पळणारा वा निसटणारा प्राणी. वर्तमानपत्रातील भयानक बातमी वाचून तो थरारतो. खून, आत्महत्या म्हटलं की हळळतो. महापुराच्या बातम्या पाहून तो परमेश्वराचा उद्धार करतो. अत्याचार, बलात्कार, लाचलुचपत, खुर्चीसाठी पागल झालेले पुढारी पाहून त्याची झोप उडते. तो शिव्यांची लाखोली वाहती. आणि हाच माणूस पेपर उघल्याबरोबर जर ह्या पैकी काही सापडलं नाही तर म्हणतो, " आज पेपरमध्ये काहीच नाही ". ह्यातला कोणता माणूस खरा? कोणता खोटा? " 

वपुर्झा /113/Surendra / 22062025

" दुःखातली व्यक्ती रडणं एका क्षणात विसरू शकत नाही."

" दुःखातली व्यक्ती रडणं एका क्षणात विसरू शकत नाही."                                         

                                  000o000

                "  सांत्वनासाठी आजवर जगात कुणालाही शब्द सापडलेनसतील. सांत्वन म्हणजे दुःखाचं मूल. मूल आईपेक्षा मोठ कसं होईल? मूल मोठ व्हायला लागलं की आई आणखी मोठी व्हायला लागते. म्हणून, समजूत घालणारे कुणी भेटलं म्हणजे हुंदके वाढतात. हसता हसता माणूस एका क्षणात थांबू शकतो. दुःखातली व्यक्ती रडणं एका क्षणात विसरू शकत नाही."

वपुर्झा /101/Surendra / 21062025(2)

शुक्रवार, २० जून, २०२५

" जगण्यासाठी प्रयोजन मिळालं की माणूस जगतो."

"      जगण्यासाठी प्रयोजन मिळालं की माणूस जगतो."                                               

.                                   000o000

                "   जगण्यासाठी प्रयोजन मिळालं की माणूस जगतो. तो प्रयोजन शोधत असतो. बायको, प्रेयसी, मुलबाळं, नोकरीं, पत, प्रतिष्ठा, पैंसा, वाहन, कीर्ती, मानसन्मान.... जितके डबे जोडता येतील तितके जोडायचे, व्याप वाढत गेला की बँकर्स शोधायचे. घाट संपला की जरजेपुरते जोडलेले बँकर्स सोडून द्यायचे. त्याच पळापळीत, गरज संपली आणि हौस भागली की आपल्यालाही तोडणारे भोवती असतात. पुन्हा एकाकीपण सुरु. अशा एकटेपणात ज्या माणसाकडे त्यांचं जगण्याचं प्रयोजन स्वतःच्या हातात नसतं, त्या माणसांच्या. ' ने रे पांडुरंगा ' च्या आरोळ्या सुरु होतात. " 

वपुर्झा /101/Surendra / 21062025

गुरुवार, १९ जून, २०२५

" Birds of the same feathers flock together म्हणतात, ते उगीच नाही. "

"  Birds of the same feathers flock together म्हणतात, ते उगीच नाही. "

                           000o000

                "   स्वतःची अस्मिता कधी टिकवता येते? तर मित्राच्या अस्मितेची जेव्हा सखोल जाणीव असते तेव्हा. ती जाणीव असली म्हणजे चारचोघात आपल्या मित्राशी वा मैत्रिणीच्या बाबतीत कस वागायचं, बोलायचं हे आपोआप समजतं. आयुष्यभर माणूस समानधार्मियांच्या शोधात असतो. Birds of the same feathers flock together म्हणतात, ते उगीच नाही. मैत्रीत न पटणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची शक्ती मिळवायची असते. वेगवेगळ्या प्रसंगी आपलं वर्तन कसं होतं आणि तीच परिस्थिती मित्र कशी हाताळतो इकडे भान हवं. त्याचं चुकलं तर कान पकडण्याचा अधिकार मिळवायचा असतो आणि त्याचं बरोबर वाटलं तर अनुकरण करण्याचा मोठेपणा कमवावा लागतो. "

वपुर्झा /101/Surendra /20062025