" संसार हा एक व्यवहार आहे. प्रेमाइतकाच तो कर्तृत्वाचा भाग आहे."
000o000
" प्रेमपूर्तीत साफल्याची शंका असते. प्रेमभंगातलं वैफल्य नवी पायवाट शोधायला लावते, स्वतःच्या मालकीची. प्रेम, प्रेमविवाह दोन्ही मान्य. पण संसार हा व्यवहारही आहे. प्रेम करतानाही साथीदाराची वैचारिक पात्रता तपासायला हवी. संसार हा स्थर्यासाठी असतो. आता स्थर्याची व्याख्या ठरवायला हवी. अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा. संसाराच्या प्रारंभी ह्या तीनही गरजा, मनं माराव लागणार नाही इतक्या ठणठणीत अवस्थेत भागणाऱ्या असतील तर ह्याच्यापलीकडच्या ज्या गोष्टी हव्या आहेत, ह्या सगळ्या wants आहेत. त्या needs नाहीत. मागण्या आणि गरजा इतका स्पस्ट फरक आहे हा. अन्न, वस्त्र, निवारा ह्या किमान गरजा जो भागवू शकत नाही, त्याने मुळात लग्न का करावं? ' पुरुष ' होण्यापूर्वी त्याने ' नवरा ' आणि नंतर ओघानेच " बाप ' व्हायची घाई का करावी? वरील तीन गरजापैकी ' निवारा ' ही गरज, राज्यकर्त्यांनी इतकी इतकी महाग करून ठेवली आहे की ती घेता घेता रक्त ओकावं लागतं. ह्या एव्हड्याच एका बाबतीत पत्नीने आर्थिक सहकार्य द्यावं ही नवऱ्याची अपेक्षा गैर मानता येणार नाही. पण निवाऱ्याचा प्रश्नही सुटलेला असेल तर आडकाठी राहिली कुठे? फ्रिज, फोन, होंडा, टीव्ही, टेपरेकॉर्डर हे फॅमिली मेंबर्स विकत घेऊन सांभाळायचे असतील तर ' फ्रिज ' वगळता बाकीच्या wants आहेत. ह्यासाठी तुमच्या जोडीदाराने तुमच्या मनाविरुद्ध तुम्हाला नोकरीची जबरदस्ती केली तर नाईलाजाने त्याच्या मंनगटात ताकद नाही असं म्हणावं लागेल किंवा त्याला रातोरात पैॅरिस बांधून हवयं म्हणावं लागेल. ह्यातला दुर्दैवाचा भाग हाच आहे. कष्ट आणि वेळ, सतत्य आणि निष्ठा ह्यांच्या पाठपुराव्याशिवाय जगात काहीच मिळत नाही. ह्यावरचा उपवर तरुणाचा विश्वास उडत जाण हा दुर्विलास आहे. अशा माणसाच्या आयुष्यात तुम्ही एकजीव होऊ शकाल का? सगळं भवितव्य त्याच्या हातात सोपवतांना, तुमचं अगदी छोटं पण रास्त स्वप्न, लग्नाच्या होमात आहुती म्हणून टाकणार का? प्रारंभीच्या कळतलं प्रेम आंधळं असू शकत. कोणती व्यक्ती का आवडावी, ह्याला उत्तरं नाहीत. पण संसार हा एक व्यवहार आहे. प्रेमाइतकाच तो कर्तृत्वाचा भाग आहे. कालांतरानें कर्तुंत्वशून्य सहवास तुम्हाला नकोसा झाला तर?
वपुर्झा /162/Surendra /06052025