मंगळवार, ३० सप्टेंबर, २०२५

" विचार शृंखला: 40/41/42/ :30092025 "

" विचार शृंखला: 40/41/42/       :30092025 "

40)  " कुणी कोणासाठी किती त्याग केला ह्याचा हिशोब आला की आंब्याच्या झाडाने आपला मोहोर येण्याचा काळ संपला हे जाणावं. ". वपूर्झा/ Surendra/30092025.                  Ooo.                                                          41)   "  कबुतरला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीच वेड रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येतं नाही. ".          वपुर्झा/Surendra/30092025.             Ooo.                                                         42)   "   माणसाचं मन ही एक फार मोठी शक्ती आहे. ती कोणत्या स्वरूपात कुठे, कशी प्रकट होईल, हे सांगता यायचं नाही. प्रकट झाल्यावर ती विधायक होईल की विध्वनसक होईल, हेही सांगणं कठीण आहे. मला तर मन म्हणजे बाटलीत कोंडलेला राक्षसच वाटतो. अफाट शक्ती आणि बुद्धीवर ताबा नाही. " वपुर्झा/Surendra/30092025.                  Ooo

सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५

" विचार शृंखला: 37/38/39/ 29092025 "

विचार शृंखला: 37/38/39/       :29092025 "

37)       "  संसारातला नवरा-बायकोचा चार्म का जातो? तर तिथं प्रतीक्षा ही अवस्थाच नसते. एकमेकांना गृहीत घरलं जातं. सुख हाताशी असतं म्हणूनच हातातून निसटतं. संसारातील उदासीनता ही निव्वळ अभिरुचीवर अवलंबून नाही. प्रतीक्षेची अनुपस्थिती हेही एक कारण. "वपूर्झा/ Surendra/29092025.                   Ooo.                                                        38)   "  निर्बुद्धातल्या निर्बुद्ध माणसालाही, ' तुला ह्यातलं काही समजणार नाही ' म्हटलं की संताप येतो. बुद्धीवान माणसाला अकलेचे अहंकार असतो, तर मूर्ख माणसाच्या गर्वाला मूर्खपणा जाहीर झाल्याने त्याचा धक्का    पोचतो. ".        वपुर्झा/Surendra/29092025.            Ooo.                                                          39)   "   कोणत्याही श्रेष्ठपदाला पोहोचलेल्या व्यक्तीला समर्थनाशिवाय स्वतःच श्रेष्ठत्व टिकवता आलं पाहिजे. " वपुर्झा/Surendra/29092025.                     Ooo

रविवार, २८ सप्टेंबर, २०२५

" विचार शृंखला: 33/34/35/36:28092025 "

" विचार शृंखला: 33/34/35/36        :28092025 "

33)       " ज्याला प्रेम समजतं, शब्द समजतो तो वेळ पाळतो, नि ज्याला फक्त स्वार्थ समजतो, तो वेळ साधतो. ".                                    वपूर्झा/ Surendra/28092025.                  Ooo.                                                           34)   "   सुविचारांची वही नंतर शोभेची वस्तू होते. ".          वपुर्झा/Surendra/28092025.             Ooo.                                                         35)   "   सकाळचे जाग आल्याबरोबरचे क्षण नेहमीच शुद्ध असतात. निर्लॅप असतात. दिवसांच्या कारस्थांनाचा, कपटांचा, खोटेपणाचा थर त्यावर चढलेला नसतो. " वपुर्झा/Surendra/28092025.                Ooo.                                                        36).    " गादी-उशीशिवाय झोपणं तर सोडाच, पण नेहमीची उशी जरी वाटणीला आली नाही तरी आपली मिजास जाते. दिवसातून दहा वेळा जप करतो. डोळ्याला डोळा नाही हो रात्रभर. रात्र वैरीण नसते. सवय वैरीण. आणि तिला जन्म देणारे आपणच. "वपुर्झा/Surendra/28092025.                 Ooo

शनिवार, २७ सप्टेंबर, २०२५

" विचार शृंखला: 30/31/32 :27092025 "

" विचार शृंखला: 30/31/32        :27092025 "

30)  " मूल पाच वर्षाचं होईतो त्याला फारसं कळत नाही म्हणून त्याला विक्षिप्त म्हणायचं. नंतर दहा वर्षापर्यंत ' वाढतं वय ' म्हणून मुलांचं वागणं सहन करायचं. नंतरच वय धड ना बाल्य ना तारुण्य म्हणून हेकटपणाने वागण्याचा काळ. मग' ' तारुण्याची धुंदी ' म्हणून वेगळं वागणं. मग स्वभाव पक्का बनला म्हणून तो असेल तो स्वीकारायचा. असं म्हणता म्हणता, ' आता एव्हड्या उशिरा, हया वयात त्याचा स्वभाव बदलणं कसं शक्य आहे? ' हे म्हणायची पाळी येते. कोणत्या वयाची हमी  घ्यायची? '.      वपूर्झा/ Surendra/27092025.                   Ooo.                                                        31).   "   ' वियोग ' झाल्यावर माणूस का रडतो माहीत आहे? ', ' ते फक्त वियोगाच दुःख नसतं. जिवंतपणी आपण त्या व्यक्तीवर जे अन्याय केलेले असतात, त्याला आपल्यापायी जे दुःख भोगावं लागलेलं असतं, त्या जाणीवेचं दुःखही त्यात असतं. त्याशिवाय जीवघेण्या यातनाही त्यात असतात. ज्याच्या साठी आपण रडतो, नेमकी तीच व्यक्ती वगळून, आपण किती दुःख करीत आहोत अशा अनेकांना ते नुसतं दिसतं. ज्याच्यापर्यंत ते दुःख, अश्रू तसेच्या तसे पोचले असते तोच तिथं उपस्थित नसतो. ' तुम क्या जाने, तुम्हारी यादमे हम कितने रोये ' हेच खरं. "वपुर्झा/Surendra/2792025.              Ooo.                                                           32).   "   आपल्याला न आवडणारे विचारही आपल्यावर हुकमत गाजवून जातात. "वपुर्झा/Surendra/27092025.                     Ooo


गुरुवार, २५ सप्टेंबर, २०२५

" विचार शृंखला: 27/28/29 :26092025 "

" विचार शृंखला: 27/28/29         :26092025 "

27).       " निर्णयाची घाई असलेल्या व्यक्तींशी चर्चा करतांना सेफ वाटत नाही "

वपूर्झा/ Surendra/26092025.                            Ooo.                                                          28).       "   प्रत्येक खुर्चीचा मान असतो, बाबा. खुर्चीची शान ज्याची त्याने टिकवायची असते आणि तिचा मान इतरांनी सांभाळायचा असतो "               " ते ऑफिसात, घरी तसं काही नसतं. " " अरे बाबा, घरचांनी ही प्रथा सांभाळली, तरच पाहुणेही त्या खुर्चीच महत्व जाणतात. नाहीतर मग, आमची वाट्टेल तेव्हडी मैत्री आहे, हे सिद्ध करण्यासाठी माणसं वय, लौकिक काहीही न बघता शब्दही हवे तसें वापरतात आणि त्याची खुर्चीही. " 

वपुर्झा/Surendra/2692025.                                               29).      "   शब्द नेमकेपणा दर्शवतात. त्यांचं नातं सगुणसाकाराशी. ' भाव ' ही शब्दाहीन होणारी गोष्ट नव्हे. म्हणूनच परमेश्वराने डोळ्यांची मांडणी मेंदू आणि तोंड ह्यांच्या मध्ये केली. " 

 वपुर्झा/Surendra/26092025.                     Ooo


" विचार शृंखला: 24/25/26 :25092025 "

   " विचार शृंखला: 24/25/26         :25092025 "

  24)      " समोरच्या चालत्या-बोलत्या माणसांशी जितके छान वागता येईल तितकं छान वागायचं. आपल्यामुळे दुसऱ्याच आयुष्य दुःखी होत नाही एव्हडं माणूस नक्की सांभाळू शकतो. "वपुर्झा/Surendra/25092025.                Ooo.                                                        25).       " तुमचे-आमचे पूर्वज दारिद्र्याला घाबरले नाहीत. तुम्ही पण घाबरू नका. तुमच्या वाट्याला, इतरांचे वैचारिक दारिद्र्य पचवणं आले आहे. तेही पचवून दाखवा. सातत्य हा निसर्गाचा धर्म नाही. तेव्हा ढोगयुग संपेल. भविष्याबद्दल निराश राहण्याचा आपल्याला अधिकार नाही. तुमच्या सहवासात जी माणसं येतात, तेव्हढच जग नाही. हे जग अजुन चाललंय. ह्याचा अर्थच हा की इथं चांगलं जास्त आहे वाईट कमी      आहे. ".            वपुर्झा/Surendra/25092025.             26).      "   चेहरा म्हणजे भावना. डोळे म्हणजे शब्दातील भाव. स्पर्श्यांच्या-मोहाच्या राजधानीकडे नेणारी वाट. नजर चुकवली की पुढचा बराचसा प्रवास थांबवता येतो. मुक्कामाचा अखेरचा टप्पा टाळता येतो. "पुर्झा/Surendra/25092025.                     Ooo



शनिवार, २० सप्टेंबर, २०२५

" विचार शृंखला: 21,22,23/20092025 "




" विचार शृंखला: 21,22,23/20092025 "

21).    मैत्री, विवाह, संसार ह्यांचा प्रारंभ जसा होतो, तसाच त्यांचा शेवट अपेक्षेप्रमाणे होतं नाही. आयुष्य ही एक अज्ञात यात्रा आहे. भाग्योदयासाठी आपण जो प्रारंभ करतो, त्याचा शेवट भाग्यातच होतो, असं नाही. असं का होतं? आपल्या बरोबर आपल्या जीवन-यात्रेबरोबरच एक अज्ञात शक्ती ही प्रवास करीत असते. त्या शक्तीनेही एक हातचा राखून ठेवलेला असतो, हे आपल्याला माहीत नसतं. "

वपुर्झा/Surendra/20092025

Ooo

22).       " प्रत्येक नव्या अनुभवाचं नातं, अंगावर काटा किंवा रोमांच उठवणाऱ्या केवळ एकाच क्षणाशी असतं. दुसऱ्याच पुढच्या क्षणी तो अनुभव एका क्षणाने जुना झालेला असतो. भूतकाळात गेलेला असतो. नंतरचा आनंद पुनःरूक्तीचा असतो.    ' क्षणभंगूर ' हे विशेषण आयुष्याला न लावता अनुभवालाच लावलं पाहिजे. "

वपुर्झा/Surendra/20092025

23).      "   संसारातल्या प्रत्येक व्यक्तीची सुखाची कल्पना, सुखाच्या जागा, सुखाची साधन ही वयानुसार, कालानुसार निरनिराळी असतात. आणि प्रत्येकजण त्याच्या कल्पनेतल्या सुखामागे पळतोही. पण संसार टिकतो तो कसा? तर दुःख जेव्हा सगळ्यांच एकच होतं, तेव्हा घर उभं राहतं."

वपुर्झा/Surendra/20092025

-----------------------------------------------------------