SurendraSP blog
गुरुवार, १८ डिसेंबर, २०२५
मराठी कथा: " अंतिम लढत " लेखक : सुरेंद्र पाथरकर, ई प्रकाशित by ई साहित्य प्रतिष्ठान, मुंबई.
गुरुवार, २० नोव्हेंबर, २०२५
" विचार शृंखला:124: 20112025 "
"विचार शृंखला:124:20112025 "
124) " वर्तमानकाळ बोलायचा नसतोच. तो जगायचा असतो. माणसं बोलतात ती भूतकाळाबद्दल. त्यातल्या त्यात दुःखाच्या हकीगती. त्याचीच उजळणी. दुःख जितकं जुनं तितकं त्याला जास्त पॉलिश. जुनी दुःख जास्त आकर्षक करायची. ती अनेकदा सांगून सांगून निरूपणाला नेमकेपणा आलेला असतो. मोठ्या आघातांसाठी मनाची तयारी झालेली असते आणि तशा प्रसंगी सावरणणारेही अनेक भेटतात. छोटे छोटे आघात असंख्य असतात. ते एकट्याला गाठून हतप्रभ करतात. त्यात वाटेकरी नसतात. ते एकट्याने सोसायचे! माणूस थांबतो, शिणून जातो, खचतो. पण पुन्हा सावरतो. तो शिणवटा कुणाला कळत नाही. सावरणही समजत नाही! नव्या उमेदीने, मागे पहात पहात प्रवास चालू असतो, ठेवावा लागतो. "
वपूर्झा/सुरेंद्र/20112025
मंगळवार, १८ नोव्हेंबर, २०२५
" विचार शृंखला:122/123: 19112025 "
"विचार शृंखला:122/123: 19112025 "
122) " चोख कर्तव्य बजावणाऱ्या माणसांचा आनंदही स्वावलंबी असतो. नेमून दिलेल्या कामांना मी स्वीकारलेल्या कामांचे गणवेश चढवले. काम आणि कर्तव्य ह्यात मग फरक राहिला नाही. म्हणूनच ही व्यक्ती इतकी आनंदी कशी राहू शकते ह्याचं कोडं इतरांना उकललं नाही. अनेक कोडी उकलण्या पलीकडची असतात, कारण निव्वळ उभे शब्द आणि आडवे शब्द ह्यांच्या चौकटीत ती सजवता येत. नाहीत. "
123) " प्रत्येक मूल त्याच्या आईवडिलांना स्वतःच्या रूपाने दुसरं बालपण जगण्याची संधी मिळवून देतं आणि काळाबरोबर पुढे जाऊन सुधारलेला समाज तुमच्या मुलांचं बालपण तुमच्या बालपणापेक्षा समृद्ध करतं. जनरेशन गॅपच्या नावाने हाकाटी करण्यापेक्षा, आपण आपलं बालपण नव्याने अनुभवावं, अशी वृत्ती असते, तेव्हाच आपल्याला लहानपणी न मिळालेल्या गोष्टी आपल्या मुलांना मिळाव्यात ह्यासाठी धडपडावंसं वाटतं. तुमचं सगळं बालपण दुःखाने भरलेलं होतं, ह्याला जो जेव्हा जन्मालाच आला नव्हता तो तुमचा मुलगा कसा जबाबदार होऊ शकतो? "
वपूर्झा/सुरेंद्र/19112025
मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०२५
" विचार शृंखला:120/121: 11112025 "
"विचार शृंखला:120/121: 11112025 "
120) " कर्तव्याची जाणीव तीव्रतेने जतन केली की, काम कोणतं करतं आहोत, हा विचार गौण ठरतो. फक्त कामच करायचं ठरवलं की मोजकी कामं केल्यावर इतर कामं आपण नाकारू शकतो. आवडीच्या कामाला प्राधान्य दिलं जातं. ते कामही पुरून उरण्याईतक असतं. आणि तरीही जी कामं राहतात किंवा आपण टाळतो त्यासाठीच हाकाटी सुरु होते. संसारासाठी राबूनही श्रेय हरवून बसावं लागतं. काम आणि कर्तव्य ह्यातला फरक नेमकेपणाने समजावा लागतो. "
121) " मृत्यूवर कुणालाच विजय मिळवता येतं नाही. त्याचं कारणच हे, तो काटेकोरपणे वेळा सांभाळतो. वर्तमाकाळ जपतो. मागच्या-पुढच्या क्षणाचं तो काही देणं लागत नाही. जीव वाचावा म्हणून केलेल्या प्रार्थनांशी त्याचा संबंध नाही. जिवाभावाचा माणूस त्याने नेला म्हणून तुम्ही दिलेले शिव्याशाप आणि पुढच्याच क्षणी नातेवाईकांनी फोडलेल्या किंकाळ्या तो ऐकत नाही. "
वपूर्झा/सुरेंद्र/11112025
रविवार, ९ नोव्हेंबर, २०२५
" विचार शृंखला:118/119: 09112025 "
शनिवार, ८ नोव्हेंबर, २०२५
" विचार शृंखला:116/117: 08112025 "
"विचार शृंखला:116/117: 08112025 "
116) " नाण्याचा खानखणीतपणा जाणायला वरचा अधिकारी जाणकार हवा. तो करप्ट असतो. त्याची खानखणीतपणाची व्याख्या वेगळी असते. तरीदेखील मनात येतं की, करप्ट ऑफिसरही परवडला. खालेल्या पैशांशी तरी तो ईमानी असतो. एखादा बिनडोक जेव्हा वरची जागा मिळवतो, तेव्हा तो हाताखालच्या माणसांनाच नालायक ठरवतो. निगरगट्टानचं नुकसान परमेश्वरही करू शकत नाही म्हणतात, त्याप्रमाणे सगळं ऑफिस अशा दगडला शेंदूर फासून कुर्निंसात करतं. "
117) " पोरकेपणा म्हणजे काय? आपली व्यथा इतरांना न समजण हाच पोरकेपणा. केव्हा केव्हा हे पोरकेपण आपण लावून घेत नाही. हे असंच असतं आयुष्यात, असं म्हणतो. स्वतःची समजूत स्वतःच घालतो. पण कुठेतरी ठिणगी पडते आणि सगळं खाक होतं. असं हे पेटणं म्हणजे कापराचं पेटणं. ज्याच्यात जळून जाण्याची ताकद आहे, तोच माणूस!पण कापरासारखं जळणं नको. ह्याचं कारण मागे काही उरतच नाही. राखेच्या रूपाने का होईना, मागे काहीतरी राहायला हवं. त्या राखेतून काहीतरी निर्माण होण्याची आशा असते. व्यथासुद्धा कापरासारखी जळता कामा नये. "
वपूर्झा/सुरेंद्र/08112025
शुक्रवार, ७ नोव्हेंबर, २०२५
" विचार शृंखला: 114/115: 07112025 "
" विचार शृंखला: 114/115: 07112025 "
114) " नियंत्रणाचा मार्ग पोटाकडून मेंदूकडे जातो. महाराज, पोट गहाण पडलं की, मेंदू आपोआप गुलाम होतात. "
115) " खुर्ची म्हणजे काय? खुर्ची म्हणजे कर्तव्य. खुर्ची म्हणजे वसा. प्रत्येक खुर्चीचा एकेक वसा असतो. तो खुर्चीबरोबर पतकरावा लागतो. माणसं त्यातली फक्त खुर्ची उचलतात, वसा विसरतात. खुर्ची मिळाली की उततात, माततात, घेतला वसा टाकून देतात. लोककल्याण जितक्या मार्गांनी करता येतं तेव्हड्या खुर्च्या निर्माण केल्या जातात. एखादा मार्ग नव्याने दृष्टिक्षेपात आला तर खुर्च्यांची संख्याही वाढवली जाते. माणसं लगेच त्या नव्या खुर्चीसाठी वर्णी लावतात, आणि वसा विसरतात. इथं खुर्ची काय करणार/ "
116) " प्रकाश हा प्रकाशच असतो. त्याबद्दल दुमत नाही. संधीपर्काशाबाबत मतभेद संभवतात. पण आपल्या या लोकशाहीत प्रकशाला पण संधी शोधावी लागते. "
वपूर्झा/सुरेंद्र/07112025