गुरुवार, १४ मार्च, २०२४

लेखक:- सुरेंद्र पाथरकर अभिवाचक:- अंजना लगस. " अंतिम लढत" हे मी लिहिलेले पुस्तक नसून "कथा" आहे. कोल्हापूरचा एक युवक विपरीत परिस्थितीत शिकून इंजिनिअर होतो. जॉब साठी अनेक अडचणीतून जावे लागते. अखेर सैन्य भरतीत सेलेक्शन होते, मग कठोर ट्रेनिंग होते. दरम्यान त्याचे प्रेम प्रकरण. बॉर्डर वर नियुक्ती झाल्यावर अनेक सिक्रेट जबाबदाऱ्या पार पाडतो. पण प्रेम मनापासून केले असते ते तो विसरू शकत नाही. त्याची प्रेमिका त्याचीच वाट पहात हॉस्पिटल मधे हेड नर्स म्हणून काम करत असते व वृध्द आईचा सांभाळ करत असते. सैन्यात त्याच्यावर जीवघेणा हल्ला होतो. त्याला हॉस्पिटल केले जाते. प्रेमिके ची भेट होते. भारताच्या पंतप्रधानां कडून सर्वोच्य शौर्य पुरस्कार दिला जातो. लहान भाऊ पण सैन्यात भरती होतो. तरुणांसाठी मार्गदर्शक कथा. लाखो रुपयांची डोनेशन देऊन डॉक्टर, इंजिनिअर खूप पैसे कमवायचे स्वप्न बघण्या पेक्षा सैन्यात भरती होऊन भारतमातेची सेवा करावी हा संदेश.

https://youtu.be/HllTGqzy-Pw?si=DqELeZpafnWlLDXK


मंगळवार, ६ फेब्रुवारी, २०२४