" सदवर्तनाची जशी एक नशा असते तशीच दृशकृत्याची पण एक चटक असते. कैफ असतो."
000
" आपण एखाद्याचा मोठेपणा झुगारूनच द्यायचं ठरवलं, तर ते काय अशक्य आहे का? त्याला फार धाडस किंवा अक्कल लागते का? त्यासाठी फक्त नफ्फडपणा लागतो. आज वकील, डॉक्टर, प्राध्यापक, व्यापारी, समाजसेवक, चित्रपट, नाट्यव्यवसाय, राजकारण, न्याययंत्रणा ह्या सगळ्या व्यवसायात शुद्ध चारित्र्य राहीलच नाही, असं आहे का? जकात नाक्यावरही कात टाकलेली साधी, सरळ माणसं नाहीत का? रेल्वेपासून पोलीस खात्यापर्यंत युनिफॉर्मचा गैरवापर न करणारी माणसं कमी असतील का? पण तशी माणसं भेटावी लागतात. ह्यांच्या माना, पदं, पैंसा, प्रतिष्ठा मानणाऱ्या गेंड्यांच्या-नव्हे-झेंड्यांच्या गळफासत गेल्या असतील, तर ते कुठे जातील? - एका रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वतःची मानणाऱ्या लालबहादूर शास्त्रीचा जमाना कधीच संपला. शास्त्री गेले तेव्हा त्यांच्या खात्यावर किती पैसे होते, हे त्या वेळच्या समाजाला माहीत आहे. त्या शास्त्रीना दोन वेळा 'कोटी' ,' कोटी' नमस्कार. परिवर्तरन ही अंतर्मनाची प्रक्रिया आहे. तुम्ही एखाद्या माणसासमोर शंभर आदर्श ठेवा, दासबोधची पारायण करा किंवा अनेकजणांची उदाहरणं ज्ञा, त्या माणसावर ' डिम्म ' परिणाम होणार नाही. तो जे पटल्यासारखं दाखवतो, ते intellectual appreciation असतं. सदवर्तनाची जशी एक नशा असते तशीच दृशकृत्याची पण एक चटक असते. कैफ असतो. ज्या मनात ह्या दोन्ही गोष्टींचा उगम होतो, तिथंच जागृतीचा, awareness चा कोंब फुटावा लागतो. "
वपुर्झा /212/Surendra / 14082025