' सर्वेSपि सुखिन: संतु '
000o000
" आपल्या समोर छोटी छोटी संकट येतात. कुणाचा ना कुणाचा आधार मिळतो, आपण सावरतो. आपण सावरलो तरी मनावर उमटायचे ते चरे कायम राहतात. केव्हातरी सहनशक्तीच्या शेवटच्या टोकावर पोचण्याची वेळ येतेच. स्फोट झाल्यानंतर समाज फक्त आश्यर्य व्यक्त करतो की, ' अरे, अमका तमका प्राणी असा कोसळेल असं वाटलं नव्हतं', पंचवीस- पंचवीस वर्ष संसार केल्यावर कुणी घटस्फोट घेतला की नव्वद टक्के माणसं म्हणतात, ' ह्या वयात? घटस्फोट? मग पंचवीस वर्ष काय केलं?'. पंचवीस वर्ष जास्तीत जास्त सहन केलं. आंतरपाट दूर होताक्षणी अनेकांचा प्रवास घटस्फोटच्याच दिशेने सुरु होतो. पंचवीस वर्ष संसार केलाच नाही, फक्त सहन केलं. ह्यातूनच अनेकजण दैववादी होतात. पत्रिका, कुंडल्या घेऊन सर्वत्र फिरतात. कुणाला ' मंगळ ', कुणाचा ' वक्री राहू ' असं काही ना काही ऐकतात. जप करतात, नवस बोलतात. ही अशी सगळ्यांची केविलवाणी धडपड पाहून सगळ्याच माणसांबद्दल अपार कळवळा येतो आणि प्रचीती नसतांनाही वाटतं, ' सर्वेSपि सुखिन: संतु '. "
वपुर्झा /179/Surendra /31052025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा