" माणूस जितका प्रतिभाशाली असतो, तितकाच तो नैराश्यवादी पण असतो."
000o000
" दगडलाही कधी विषाद झाल्याचं ऐकीवात नाही. याचं कारण दगडाची आणि आनंदाची सुद्धा कधी गाठभेट होतं नाही. विषादाच आकलन होण्यामागे सुद्धा ते एका आनंदाच स्मरण आहे. पण कुणाच्या बावतीत? माणूस जितका प्रतिभाशाली असतो, तितकाच तो नैराश्यवादी पण असतो. पण जड बुद्धी असलेला माणूस कधीही उदास होतं नाही. कारण आपण आहोत, त्यापेक्षा कोण होऊ शकतो, या विचाराचा त्याला स्पर्शही होऊ शकत नाही. मी आनंदातच राहू शकतो, मी आनंद निर्माण करू शकतो, असा विश्वास स्वतःच्या बाबतीत ज्या माणसाला आहे, तितका तो अंतर्यामी उदध्वस्त असतो. केव्हातरी सकाळी कोवळी उन्ह पडणार आहेत, प्रकाशाचं साम्राज्य पसरणार आहे, ह्याची ज्याला खात्री आहे, अशा माणसालाच रात्रीचा अंधार जास्त भेडसावतो. ज्याला सकाळच माहीत नाही, त्याला रात्र सुद्धा प्रकाशसारखीच वाटते. "
वपुर्झा /176/Surendra / 28052025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा