बुधवार, २८ मे, २०२५

" नोकरीं करणाऱ्या माणसाच्या बाबतीत साधे साधे निर्णय धेतांना अर्जुनापेक्षा वेगळं काय घडतं?

" नोकरीं करणाऱ्या माणसाच्या बाबतीत साधे साधे निर्णय धेतांना अर्जुनापेक्षा वेगळं काय घडतं?

                           000o000

                " सबंध आयुष्यभर आपण अशाच निरगाठी - सुरगाठी मारत असतो. ह्याचं एकच कारण, आपल्या सर्वांच्यात अर्जुनाचाच वावर सातत्याने होत असतो. नोकरीं करणाऱ्या माणसाच्या बाबतीत साधे साधे निर्णय धेतांना अर्जुनापेक्षा वेगळं काय घडतं? प्रमोशन हवं असतं, पण बदली नको असते. लिव्ह ट्रॅव्हल अलाऊन्स घेऊन खरोखरच पर्यटणाला जावं, की घरातच एखादी वस्तू खरेदी करावी? धाकडदपशा दाखवून मुलांना शिस्त लावावी की गोडीगूलाबीने? तीच गोष्ट, नवऱ्याची सिगारेट सुटायला हवी असेल, तर असहकारपुकारावा, अबोला धरावा, का प्रेमाने जिंकावं? यासारखे कुठलेच प्रश्न असं की तसं, याशिवाय सुटत नाहीत. मुलांना धाक हवा, पण त्याने दहशत घेऊन लांब जाऊ नये. नवरा चांगला आहे, पण त्याचं व्यसन नकोय. अशा छोट्या छोट्या प्रश्नांशी सामना करतचं आपलं आयुष्य संपत. "

वपुर्झा /177/Surendra /29052025

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा