शुक्रवार, २३ मे, २०२५

" भौतिक सुखाच्या मागे लागलेल्या माणसाला अधार्मिक म्हणता येणार नाही."

"  भौतिक सुखाच्या मागे लागलेल्या माणसाला अधार्मिक म्हणता येणार नाही."

                          000o000

                "  पायथ्याशीच राहण्यामध्ये कल्याण आहे, ह्याचा शोध लागला की आयुष्यात धर्माचा उगम झाला असं समजावं. प्रत्येकाची कहाणी वेगळी असेल, पहाड वेगवेगळे असतील, त्याचप्रमाणे दगडही. आपण तेच काम सत्यत्याने करत राहतो. प्रत्येक वेळेला म्हणत राहतो की, माझ्या हातून काही तरी चुकलं असेल. पुढंच्या वेळेला दुरुस्ती करू. पुन्हा यश मिळालं नाही की, माणूस केव्हातरी थकतो. ह्यात सुख असेल किंवा त्यात सुख असेल, असं म्हणत आयुष्यभर सुखामागे पळत राहतो. शेवटी हातात वैफल्यच येत. असा अनुभव आला, म्हणजे तो चिरंतन सुखाच्या शोधमागे लागतो. विफलता हेच अध्यात्म्याच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल. म्हणूनच भौतिक सुखाच्या मागे लागलेल्या माणसाला अधार्मिक म्हणता येणार नाही. शाश्वत सुखाचीच ती चुकलेली वाट आहे. "

वपुर्झा /170/Surendra / 24052025

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा