".........धरित्री अशा काही माणसांना जन्माला घालते. "
000o000
" मला हेही माहीत आहे की अखंड उत्साह, शोधक नजर, वक्तृत्व, प्रवासाची विलक्षण हौस हे सगळे गुणविशेष व्हिट्यामिनच्या गोळ्या खाऊन येत नाहीत. कलमी आंबा हा मातीचाच हुंकार असतो. तशा काही काही व्यक्ती ही मातीला पडलेली स्वप्न असतात. वासुदेव बळवंत, सावरकर, लोकमान्य टिळकांपासून खरेखुरे क्रांतिकारक-विचारवंत, लता-आशा वगैरेसारख्या तीन तपांच्यावर स्वरांच्या संततधारांनी चिंब करणाऱ्या पार्श्वगायिका, बडे गुलामअलीखापासून पं. भीमसेन जोशीपर्यंतचे गायक, बाबा आमट्यानंपासून शिवाजीराव पटवर्धनांपर्यंत खरेखुरे मानवतेचे पूजारी, अशी सगळी माणसं पहिली की ' सुजलां सुफलां ' चा अर्थ सापडतो. राहलेल्या सगळ्या जनगणात जमिनीत फाळ खुपसणारे आहेतच. पण जेव्हा जमिनीलाच प्रसववेदनांचा मोह होतो, देठालाच जेव्हा रोमांच आवरेनासे होतात तेव्हा कळीचा हुंकार उमटतो त्याप्रमाणे धरित्री अशा काही माणसांना जन्माला घालते. "
वपुर्झा /161/Surendra /04052025(3)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा