" भावनाप्रधान माणूस संवेदनशील व्यक्तीच्या शोधात असतो."
000o000
" भावनाप्रधान माणूस संवेदनशील व्यक्तीच्या शोधात असतो. तेच थोड्याफार प्रमाणात बौद्धिक स्तरावर घडतं. निव्वळ शारीरिक सुखाच्या बाबतीतली माणसं आपण सोडून देऊ. भावनात्मक आणि बौद्धिक पातळीवर हवा तसा सहप्रवासी मिळाल्यावर त्याच्या विचारांची आपल्याला संपूर्ण ओळख होते. संपूर्ण ओळख झाली रे झाली की त्यातलं नावीन्य संपत. मग दुसऱ्या माणसाचा शोध. या पद्धतीनेच माणसं जोडली जातात आणि जोडलेली माणसं मागे पडतात. प्रत्येक नव्या ओळखीच्या बाबतीत ह्या माणसाकडून नवी ओळख मिळेल, नवे विचार मिळतील, या अपेक्षेने माणसं जोडण्याचा छन्द कायम राहतो. ह्या शोधातच सौख्य आहे. प्राप्तीत नाही.
वपुर्झा /178/Surendra / 3052025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा