सोमवार, २६ मे, २०२५

" जगावं, असं काहीतरी एक आहे ' असं वाटायला लावतात."

"  जगावं, असं काहीतरी एक आहे ' असं वाटायला लावतात."

                          000o000

                "  ' भौतिक सौख्य ' इतका मोठा शब्दही वारायचं कारण नाही. अमुक एक काम करण्यात मोठा आनंद आहे किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी गप्पागोष्टी केल्याशिवाय चैन पडत नाही. प्रत्येकाच्या वृत्तीनुसार त्याचं ' हरवण, सापडणं, हुरहूर वाटणं ' हे सगळं भावविश्व स्वतंत्र असतं. या अनंत किती तरी मित्र भेटतात. ' ह्या माणसाशिवाय मी जगू शकणार नाही ' असं वाटायला लावणारी अनेक माणसं, एक ठराविक कालखंड सुगंधित करून जातात. आयुष्याला गती देतात. ' जगावं, असं काहीतरी एक आहे ' असं वाटायला लावतात. काही- काही जणांना एका ठराविक हॉटेलमधलं जेवण आवडतं. नंतर नंतर अतिपरिचयाने म्हणा किंवा आपल्या सुखाच्या व्याख्या बदलतात, म्हणून समजू या, आपण त्याचं ठिकाणी फार काळ रमत नाही. तेच माणसांच्या सहवासाच्या बाबतीतही घडतं. स्वतःच्याच सावलीवर जो भाळला, तो फसला. " 

वपुर्झा /172/Surendra / 27052025

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा