" कोण कुणाला खऱ्या अर्थाने जाणून घेत असेल? "
000o000
" एका माणसाच्या समस्येवर दुसऱ्या माणसाजवळ उत्तरच नसतं. कारण सल्ला देणारा त्या समस्ये पर्यंत पोचू शकत नाही. तो स्वतःच्याच वैचारिक पातळीप्रमाणे त्या समस्ये कडे पाहतो. समस्येतून जाणाऱ्या माणसाच्या भूमिकेत तो जाऊ शकत नाही. समस्या सांगणारा माणूस अनुकूल उत्तरासाठीच अनेकांना भेटत राहतो आणि त्याला आवडणारा विचार मिळाला की त्या माणसाला ग्रेट मानून खूष होतो. हे सगळं पाहिलं की वाटतं, कोण कुणाला खऱ्या अर्थाने जाणून घेत असेल? "
वपुर्झा /170/Surendra / 25052025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा