बुधवार, २१ मे, २०२५

" परिवाराच्या चेहऱ्यावर आनंद पाहणं, ही एकमेव कसोटी "

" परिवाराच्या चेहऱ्यावर आनंद पाहणं, ही एकमेव कसोटी "

                          000o000

                "  संसारात आनंदी वातावरण जो ठेवू शकतो, त्याला मी आत्मवान समजतो. मनात शांती असेल वा नसेल, पण वातावरण आनंदी ठेवणं आपल्या हातात आहे. ह्यासाठी दिनरात कोशिश करणारा अंतर्यामी शांत आहे, असं कधीच होणार नाही. संसार ही सर्वात अवघड कला आहे. प्रत्येक क्षण हा शिक्षणक्रमाचा आहे आणि ह्या क्रमातून जातं असतांनाच परीक्षा द्यावी लागते. अभ्यासक्रमाची टेक्स्टबुकं आणि नं फुटणारी प्रश्नपत्रिका एकाच वेळी हातात पडतात. बायको, वेगवेगळ्या वयाचा मुलगा आणि मुलगी, इतर नातेवाईक आणि टाळ्या वाजवणारे प्रेक्षक हे सगळे परीक्षक आणि ह्यातलेच काही पेपरसेंटर. काल बरोबर घेतलेला निर्णय आज चालतं नाही. डिग्री-डिप्लोमासारखे प्रकार नसल्यामुळे भिंतीवर लावायला प्रशस्तिपत्रक नाहीत. परिवाराच्या चेहऱ्यावर आनंद पाहणं, ही एकमेव कसोटी आणि वेगवेगळ्या वयाच्या, वृत्तीच्या माणसांना एकाच वेळी न्याय देता येत नाही. तुम्ही जेवढे विचारवंत, तुमची स्वतःची उंची जेवढी विराट, तेवढ्या प्रमाणात तुम्ही आनंद निर्माण करू शकता. ही उंची वाढवण्याच्या खटाटोपात जो सापडतो, तो अंतर्यामी अतृप्त आणि अशांतच असणार. तरीही जो परिवारात रोषणाई करू शकतो, तो आत्मवान. प्रत्येकापाशी ही शक्ती असते, ज्योत असते. चैतन्य हीच ज्योत. श्वासोस्वास हेच सत्य. फक्त ह्या तेवणाऱ्या ज्योतीला स्वार्थत्याग आणि समर्पणाचं तेल लागतं. " 

वपुर्झा /168/Surendra / 22052025

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा