शुक्रवार, ३१ जानेवारी, २०२५

"एकाकी अस्थिर अवस्थेत, एकांतात एखाद्या व्यक्तीचा निशब्द वावरही तुम्हाला किती बळ देतो, ते जीवनाचा साथीदार गेल्यावर कळत."

"एकाकी अस्थिर अवस्थेत, एकांतात एखाद्या व्यक्तीचा निशब्द वावरही तुम्हाला किती बळ देतो, ते जीवनाचा साथीदार गेल्यावर कळत."  

                           000o000

                "   ज्यांचा परिचय झाल्यावर आपल्याला आपलं जगणं समृद्ध झाल्यासारखं वाटतं ती सगळी चैतन्यन्याची रूप. ज्यांची नावं ऐकल्या - आठवल्यावर आपल्याला सुरक्षित वाटतं. ते सगळे अवतारी पुरुष. अवतारी पुरुष म्हटलं की रुद्राक्षांच्या माळा दिसायला हव्यात असं नाही. उलट असा काही व्यक्तीकडे मी आजवर, माहिती समजता क्षणी, श्रद्धेने गेलो आहे. तेव्हा वेदांत ऐवण्यापलीकडे, चिरंतन तत्व ऐकवण्यापल्याड त्यांनी काहीही केल नाही.       ' प्रयत्न चालू ठेवा किंवा मार्गशिर्ष महिना जाऊ दे, ग्रीषम उलटू दे, मग बघा ' ह्यापलीकडे काही सांगितले नाही. मला अशा सगळ्या साधकांच्या वैयक्तिक साधने बद्दल काहीही शंका घ्यायची नाही. त्यांनी अप्रत्यक्ष दिलेल्या आशिर्वादावर सुद्धा काही संकटानंच परस्पर निर्दलान झालं असेल, पण व्यवहारात येणारी संकट आणि समस्या निवारण्या साठी जे वेगळं रसायन लागत, त्याला 'मित्र' म्हणतात. ऐन वैशाखात, ' वर्षा  ' ऋतुची शास्वती आणि गारवा फक्त मित्रच देतो. कसलेही हिशोब न ठेवता जो गणिताप्रमाणे शाश्वत, नेमकेपणा देतो, तो मित्र. 

                स्वतःचा वेळ खर्च करणारा, तुमचा मित्र  देवमाणसासारखा असतो. फार कशाला, तुमच्या विद्ध मन:स्थितीत, भीषण एकटेपणी, एकाकी अस्थिर अवस्थेत, एकांतात एखाद्या व्यक्तीचा निशब्द वावरही तुम्हाला किती बळ देतो, ते जीवनाचा साथीदार गेल्यावर कळत. 

वपुर्झा /Surendra /31012025

सोमवार, २७ जानेवारी, २०२५

" परकीय शत्रूशी कसं वागावं?"

" परकीय शत्रूशी कसं वागावं?" 

                           000o000

           "  परकीय शत्रू हा तर राजनीतितला फार महत्वाचा विषय, त्याच्याशी कसं वागावं? परराष्ट्रनींतीत संधी आणि स्वार्थ महत्वाचा. इथे कधीच कोणाशी कायमच शतृत्व वा मैत्री करायची नसते. परराष्ट्रनीती आणि युद्धनीती हाताळतांना राजाने संधी, विग्रह, आसन द्वेधीभावं आणि समाश्रय याचा विचार केला पाहिजे. शत्रू आपल्याहून बलिष्ठ असेल तर संधी साठी जास्त प्रयत्न करावेत, शांतीचे गोडवे गावेत, स्वतःच फार नुकसान होणार नाही याची काळजी घेत शत्रूचं तुष्टीकरणहीं कराव. पण तेच जर आपलं सामर्थ अधिक असेल तर शांती धुडकावून विग्रहाची तयारी करावी. तो नसला तरी मुद्दाम निर्माण करावा, कुरापती काढाव्यात, शत्रूच्या मर्मस्थळावर छुपे आघात करावेत, त्याच्या राज्यातल्या घरभेद्दयांना हाताशी धरून शत्रूराज्यात उत्पात माजवावा. असे प्रयत्न करावेत की जेणेकरून शत्रू संघर्षासाठी सिद्ध होईल. कलहाच्या आढीत शत्रूच फळ आधी पक्व करावं, आणि मगच ते तोडण्यासाठी हात घालावा. कलह किंवा विग्रह हा छूप्या युद्धाचा प्रकार आहे. प्रत्यक्ष युद्धाआधी हे छद्म युद्ध राजाने अवश्य लढावं. त्यातून शत्रूला अडचणीत आणून ' यान ' म्हणजे चढाई करावी. चढाईपूर्वी शत्रूची सर्व बलंस्थान माहित करून घ्यावीत. शक्तियुक्तीचा योग्य समन्वयं साधून शत्रूला रणांगणात खेचाव आणि नष्ट करावं."दुर्योधन/144/Surendra /27012025

शनिवार, २५ जानेवारी, २०२५

" प्रजेसाठी चांगला राजा कोणता?"

 "  प्रजेसाठी चांगला राजा कोणता?"                           

           "  प्रजेसाठी चांगला राजा कोणता? धर्मात्मा, सत्यवक्ता, शांत, चारित्रवान, जितेंद्रीय, आणि सौम्य शिक्षा करणारा राजा प्रजेला सुखावह होतो. राजाने बलाच्या उपासनेला योग्य ते महत्व दिलंच पाहिजे. कारण धर्मसुद्धा बलवंतांच्या अधीन असतो. जय केवळ धर्मामुळे मिळत नाही. त्याला शक्तीची, सामर्थ्यांची जोड हवी. वृक्षांच्या आश्रयाने वाढणाऱ्या वेलींची सत्ता जशी त्या वृक्षावर नसते, तशीच सामर्थ्यावर घर्माची सत्ता चालत नाही. दुबळ्यांच्या धर्माला कोण विचारतो? 

               राजाने कोणावरही विश्वास ठेवू नये. ज्याचा आपल्यावर विश्वास नाही त्याच्यावर तर नाहीच नाही, पण ज्याचा आपल्यावर विश्वास आहे, त्याच्यावरही नाही. राज्याची वाणी नम्र, पण अंतःकरण शस्त्राहूनही तीक्ष्ण असावं. शत्रूवर प्रहार करण्यापूर्वी गोड बोलाव, प्रहार करतानाही गोडच बोलाव आणि प्रहार केल्यावर त्याच्या विषयी सहानभूती व्यक्त करावी, खेद प्रदर्शित करावा. शत्रूने कितीही गयावया केली तरी त्याची गय करू नये. कारण ऋण,अग्नी आणि शत्रू यांना शिल्लक राहू दिल की, ते पुन्हा पुन्हा वृद्धिंगत होतात. वणव्याने होणारी वाताहत टाळायची असेल तर ठिणगीची उपेक्षा करताच कामा नये. शत्रूला आमिष दाखवावीत, आश्वासन, वचन द्यावीत, पण ती कधीही पाळू नयेत. त्यासाठी योग्य सबबी सांगतं जाव्यात. आपल्या कठीण काळात शत्रूशी सख्य करून आपलं सामर्थ वाढवावं. त्यासाठी कोणताही सुष्ट - दुष्ट मार्ग वापरावा. शक्ती वाढली की मग शत्रूशी धर्माच्या चर्चा करायला, प्रसंगी त्याला डोक्यावर घेऊन नाचायलाही हरकत नाही. मात्र योग्य वेळ येताच दगडावर आपटलेल्या मडक्याप्रमाणे त्याचा चुराडा करावा. राजकारणात            गोपनीयता हवीच. राज्यकारभाराचा प्राण आहे. पदरी माणसं निष्ठावान असावीत. त्यांची निष्ठा पुन्हा पुन्हा पारखून घावी. विषप्रयोगाने वा शत्राने एकटा - दुकटा  माणूस मरतो, पण गोपनीयता फुटली तर राजा, प्रजा यासह अवघ राष्ट्र धुळीला मिळत.

दुर्योधन/140/Surendra /26012025

शुक्रवार, २४ जानेवारी, २०२५

" राजाची कर्तव्य काय असतात ? ".

" राजाची कर्तव्य काय असतात ? ".                           

           "  राज्यकारभार करतांना त्याने काय दक्षता घ्यावी, प्रजेशी कसं वागावं, शत्रूशी कसं वागावं याविषयी उदबोधक माहिती .

         प्रजापालान हेच राजाचं मुख्य कर्तव्य. प्रजापालन करायचं म्हणजे नेमक काय करायचं? तर कुलीनांचा चरितार्थ चालवायचा, दृष्टांना दंडित करुन सज्जनांच रक्षण करायचं, आपत्काली प्रजेला धनधान्य देऊन मदत करायची, नवनव्या सुखसोई तिच्यासाठी निर्माण करायच्या, परचक्रापासून तिच संरक्षण करायचं. एकूण llकाय तर प्रजेची ऐहिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक प्रगती साधंण म्हणजे प्रजापालन. तपस्येहूनही त्याचं पुण्य मोठं असल्याचं नीतिकार सांगतात.

               राज्याच्या विविध अंगांनवर लक्ष ठेवणे, नियम तयार करणे, प्रजेकडून त्याचं पालन करवून घेणं. डोळ्यात तेल घालून राज्याच्या सीमांच संरक्षण करण, कोषाची अभिवृद्धी करण. बसल्या जागी राज्यातील प्रत्येक घडामोड -- मग ती लहानशी का असेना --  त्याला कळली पाहिजे. त्यासाठी अर्थातच हाताशी कार्यक्षम हेरखाते हवं. त्याचे स्वतःचे विश्वासपात्र त्याने नेमावेत. त्यांच्या करवी अमात्य, मंत्री, सेनापती, अधिकारी, आपले मित्र, इतकंच नव्हें, स्वतच्या पुत्रावरही पाळत ठेवावी. या हेरांची एकमेकाशी ओळख होणार नाही याची काळजी घ्यावी. पाणवठे, नदीचे घाट, चौक, बसण्यासाठी बांधलेले पार, मंदिरे, यात्रा, उत्सव - जिथं जिथं माणस जमतात, गर्दी होते -- तिथे तिथं हेरांचा वावर असावा. हेर म्हणजे राजाचे चक्षूच.

दुर्योधन/141/Surendra /25012025

"' राजाचे गुण दोष "

"' राजाचे गुण दोष " 

                           000o000

           "  वत्कृत्व, प्रगल्भता, स्मृती , तर्कशुद्धी, दूरदृष्टी आणि मुत्सद्देगिरी हे गुण राजाकडे असले पाहिजेत . त्याचबरोबर नास्तिकपणा , असत्य, अत्यंतिक क्रोध, प्रमाद,

दीर्घसुत्रता, कुसंगती, आळस, इंद्रियासक्ती, धनलोभ,   रहस्यस्फोट, सज्जनांचा अनादर करण, सत्कर्माविषयी उदासीन असण, शत्रुची उपेक्षा करण आणि आत्यंतिक विरक्ती या दुर्गुणांचा त्याने त्याग केला पाहिजे. राज्य             चांलवतांना अनेक अडचणी येतात. त्याचं निराकरण करण्या साठी प्रसंगानुरूप साम, दाम, दंड, भेद, मंत्र, औषधी यापैकी जो मार्ग योग्य तो त्याने वापरला पाहिजे."

दुर्योधन/140/Surendra /24012025(2)

"' तुमच्या नोकरीची तुमच्या संसाराला नितांत गरज आहे?"

"' तुमच्या नोकरीची तुमच्या संसाराला नितांत गरज आहे?" 

                           000o000

           ' विचार करा ' तुमच्या नोकरीची तुमच्या संसाराला नितांत गरज आहे. हे जर तुम्हाला स्वतःला पटल तर तो जीवनक्रम खळखळ न करता स्वीकारा. त्यानंतर सगळ्या 

' प्रायोरिटीज' बदलतील. त्याचंही मग स्वागत करा.             ' नोकरी ' की ' अपत्य' ह्यातही अग्रक्रम कशाला हे ठरवणं आल. हा सगळा तिढा अवघड का? तर हया वेगवेगळ्या पातळीवरच्या डिमांड्स आहेत म्हणून. नोकरर्धर्म श्रेष्ठ की मातृत्वाची भावना? प्राप्ती की अपत्य? अपत्यप्राप्ती हा मग एकच शब्द उरत नाहीं. तिथंही ' प्राप्ती ' हा शब्द प्रथम लिहायचा की ' अपत्य ' ? अपत्य आणि प्राप्ती दोन्हीं साधायचं म्हणजे मूल नोकरकडे किंवा सासू कडे. Unwilling guardian की willing? अपत्य झाल्यावर हे कळणार. नाहीतर मग शेजारी. थोडक्यात म्हणजे त्या निष्पाप पिल्लालां ' आई ' सोडून कुणीही. बाप परकाच असतो. ' स्त्री ' ही क्षणाची पत्नी,  अनंतकाळची ' माता ' असं एक वचन. हया उलट ' पुरुष हा क्षणाचां पिता आणि अनंतकलचा ......' . शाळा,अभ्यास,संगोपन, शुष्रुषेबरोबर नोकरी. त्यातही बायकोला नवऱ्यापेक्षा पगार जास्त असला तर किती नवऱ्यांना खपत? 

वपूर्झा/238/Surendra /24012025

गुरुवार, २३ जानेवारी, २०२५

" मानसोपचार तज्ञ त्याचं अस्तित्व मान्य करतात, पण त्याचं उच्चाटन करू शकत नाहीत "

" मानसोपचार तज्ञ त्याचं अस्तित्व मान्य करतात, पण त्याचं उच्चाटन करू शकत नाहीत " 

                           000o000

           "    एखाद्या व्यक्तीच्या प्रपंचात जेव्हा काही व्यथा निर्माण होतात तेव्हा त्याला इतर व्यक्तींपेक्षा परिस्थिती जबाबदार असते. ही परिस्थिती प्रत्येक व्यक्तीला कमी अधिक प्रमाणात जाणवते. काहींना जणू भूकंपाचे धक्के बसतात, तर काहींना केवळ वेधशाळेने नोंद केली तरच समजतं. जी व्यक्ती मनाने जास्तीत जास्त संवेदनक्षम असते तिलाच तातडीने त्या वातावरणावर उपाय हवा असतो. हा उपाय कधी प्रत्यक्ष स्वरूपात हवा असतो तर कधी निव्वळ शब्दांची फुंकर पुरते. स्वतःच्या यातनामय आयुष्यक्रमाची आणि भावनात्मक 

तांणतणावाची तितक्याच लहरीवर दुसऱ्या कुणालातरी जाणीव आहे आणि ती व्यक्तीही तेव्हढीच बेचैन आहे, एवढाही आधार काहींना पुरेसा असतो. अशा आधाराची आवश्यकता निर्माण होणे आणि चार भिंतींच्या घरकुलात तसा हात न मिळण इथच कुठतरी वाळवी लागली आहे, ह्याची साक्ष आहे.  एखादी व्यथा अशी असते. वाळवीचा बंदोबस्त एकवेळ करता येतो पण बांधकामात ' ओल ' कुठं वा का आहे हे भल्या भल्या तंत्रज्ञांना कळत नाही. तशी एखादी व्यथा - रुखरुखीची पाळमुळ किती खोलवर गेलेली आहेत, ते उकलत नाही. मानसोपचार तज्ञ त्याचं अस्तित्व मान्य करतात, पण त्याचं उच्चाटन करू शकत नाहीत."

वपूर्झा/239/Surendra /23012025(2)

बुधवार, २२ जानेवारी, २०२५

" उभ्या आयुष्यात असं वेस्टेज किती होईल ?

"उभ्या आयुष्यात असं वेस्टेज किती होईल ?" 

                           000o000

           "   अशी कल्पना करा, सकाळी आरामात सात वाजता उठायचं. चहा, दाढी, आंघोळ आठ वाजेपर्यंत. नंतर पंधरा मिनिट चक्क टिवल्याबावल्या. साडेनऊ वाजता साधारणपणे तुम्ही घर सोडत असाल तर सकाळी सव्वा तास वेळ उरतो. संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत घर. सात वाजेपर्यंत टिवल्याबावल्या. रात्री साडेनऊलां जेवण असेल तर दोन तास मिळतात. नऊ ते साडेनऊ जेवण. पुन्हा दहा वाजेपर्यंत अर्धा तास उरतो. दहा वाजता जनगणमन. रोज

पावणेचार तास मिळतात. त्या वेळेचा आपण काय उपयोग करतो? कुणाला तीन तास रिकामे मिळतील, कुणाला दोन,कुणाला अडीच. पण त्याच आपण काय करतो ? पावणेचार तासांप्रमाणे वर्षात सत्तावन्नं दिवस होतात. एका वर्षात आपण दोन महिने वाया घालवतो. मग उभ्या आयुष्यात असं वेस्टेज किती होईल ? कॉलेजचा कोर्स होईल. म्हणूनच ' वेळ मिळत नाहीं ' म्हणणाऱ्या माणसांवर विश्वास नाही"

वपूर्झा / 242/Surendra /23012025


सोमवार, २० जानेवारी, २०२५

" संसार ही सर्वात अवघड कला आहे "

" संसार ही सर्वात अवघड कला आहे " 

                           000o000

           " संसारात आनंदी वातावरण जो ठेऊ शकतो, त्याला मी आत्मवान समजतो. मनात शांती असेल वा नसेल, पण वातावरण आनंदी ठेवण आपल्या हातात आहे. ह्यासाठी दिनरात कोशिश करणारा अंतर्यामी शांत आहे, अस कधीच होणार नाही. संसार ही सर्वात अवघड कला आहे. 

              प्रत्येक क्षण हा शिक्षणक्रमाचा आहे आणि आणि या क्रमातून जात असतानाच परीक्षा द्यावी लागते. वर्षभर अभ्यास नंतर परीक्षा असा सरकारी कोर्स नाही. अभ्यासक्रमाची टेक्स्टबुक आणि न फुटणारी प्रश्नपत्रिका एकाच वेळी हातात पडतात. बायको, वेगवेगळ्या वयाचा मुलगा आणि मुलगी, इतर नातेवाईक आणि टाळ्या वाजवणारे प्रेक्षक हे सगळे परीक्षक आणि ह्यातलेच काही पेपरसेटर.

वपूर्झा / 168/Surendra /21012025

रविवार, १९ जानेवारी, २०२५

"विफलता हेच अध्यात्माच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल"

"विफलता हेच अध्यात्माच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल 

                           000o000

           " पायथ्याशीच राहण्यामध्ये कल्याण आहे, ह्याचा शोध लागला की आयुष्यात धर्माचा उगम झाला अस समजावं. प्रत्येकाची कहाणी वेगळी असेल, पहाड वेगवेगळे असतील, त्याचप्रमाणे दगडही. आपण तेच तेच काम सातत्याने करत राहतो. प्रत्येक वेळेला म्हणत राहतो की, माझ्या हातून काहीतरी चुकल असेल. पुढच्या वेळेला दुरुस्ती करू.  पुन्हा यश मिळालं नाही की, माणूस केव्हातरी थकतो. ह्यात सुख असेल किंवा त्यात सुख असेल, अस म्हणत आयुष्यभर सुखमागे पळत राहतो. शेवटी हातात वैफल्यच येत. असा अनुभव आला, म्हणजे तो चिरंतन सुखाच्या शोधामागे लागतो. विफलता हेच अध्यात्माच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल. म्हणूनच भौतिक सुखाच्या मागे लागलेल्या माणसाला अधार्मिक म्हणता येणार नाही. शाश्वत सुखाचीचं ती चुकलेली वाट आहे. "

वपूर्झा / 171/Surendra /19012025

शनिवार, १८ जानेवारी, २०२५

"स्वभावधर्माला परिवार लाभला म्हणजेच त्याचा धर्म होतो."

"स्वभावधर्माला परिवार लाभला म्हणजेच त्याचा धर्म होतो." 

                           000o000

           " काही माणस तापट असतात, काही आढयतेखोर, काही धुमी तर काही गर्व करणारी, काही ऑर्थोडॉक्स तर इतर न्यूनगंडवाली, धूर्त, लबाड, लफंगी, खोटारडी, नम्र, भिऊन राहणारी, ऐदी, आळशी , सतत उसन्या पैशांवर आयुष्य रेटणारी. प्रत्येक माणसाबरोबर एक नवा धर्म जन्माला येतो. खरतर तो स्वभावधर्म. स्वभावधर्माला परिवार लाभला म्हणजेच त्याचा धर्म होतो. पाठोपाठ संघटना, युनियन . नाव संघटना पण विघटन त्याचं कार्य. एकटा माणूस धार्मिक असू शकतो, पण त्याला अनुयायी म्हणजे गर्दी लाभली की तो तयार होणारा समाज धार्मिक असूच शकत नाही. तो हिंसेकडेच वळतो." 

वपूर्झा / 171/Surendra /18012025(2).

"माणूस स्वतःपासून पळू शकत नाही."

"माणूस स्वतःपासून पळू शकत नाही." 

                           000o000

           "वास्तव म्हणजे काय नामक? स्वतची पात्रता. समाजात आपण आपल्याबद्दल जी प्रतिमा उभी केली असेल किंवा आपल्या आणि समाज्याच्याही नकळत आपली जी प्रतिमा तयार झाली असेल, ती पुसण्याच सामर्थ्य पाहिजे.  एकांतात,   एकाकीपणात, प्रत्येकाने आत डोकावून पहावं. जाहीरपणे मान्य करण्याचं सामर्थ्य नसेल, तर तीही वास्तवता. स्वतःची स्वतःला संपूर्ण ओळख असते, कारण माणूस स्वतःपासून पळू शकत नाही. "

वपूर्झा / 174/Surendra /18012025

गुरुवार, १६ जानेवारी, २०२५

" एक विचार नष्ट करायचा, म्हणजे विचारवंतच मारावा लागतो "

" एक विचार नष्ट करायचा, म्हणजे विचारवंतच मारावा लागतो" 

                           000o000

           " एक विचार नष्ट करायचा, म्हणजे विचारवंतच मारावा लागतो. माणूस किती क्रूर, हिंस्त्र आहे, ते अशी कुणाची हत्या झाली की कळत, कालांतराने त्याचे पुतळे उभे करणाराही समाजच असतो. पुतळे उभे राहतात आणि पिंडाला न शिवणारे कावळे, त्या पुतळ्यावर बसून त्याची विटंबना करतात आणि ढोंगी राज्यकर्त्यांना वर्षातून एकदा पुतळ्यांना हार घालण्यासाठी निमित्त मिळत. समाजकंटकांना पुतळ्याची विटंबना करण्याची संधी मिळते. निधर्मी राज्यात जातीय दंगे होतात. ज्यांचे पुतळे उभारण्यात आले आहेत, त्यांनी हिंसा करू नका, हेचं सांगितले असताना, '  हमारा नेता अमर रहे ' अस पुतळ्यांकडे पाहत म्हणायचं आणि 'एके - 47' पासून 'चौपर ' पर्यंत सगळी हत्यारवा परायची. सत्ताधाऱ्यांनी अश्रुधुरांची नळकांडी फोडून जनतेच्या डोळ्यात धूळफेकीची नळकांडी सोडायची. "

वपूर्झा / 175/Surendra /17012025

" प्रत्यक्षात सुख हातांमध्ये आल्यावर ह्यात सुख नव्हत, हे प्रत्ययाला येत."

"  प्रत्यक्षात सुख हातांमध्ये आल्यावर ह्यात सुख नव्हत, हे प्रत्ययाला येत." 

                           000o000

               "पुष्कळ विचार करून ज्या माणसाला सुख मिळत, अस त्याला आणि आपल्याला वाटतं, तो माणूस नवीन दुःखाच्या शोधामध्ये असतो. खर तर, नव्या दुःखाच्या शोधमागे लागताना त्यात सुख आहे, अशी मनामध्ये संकल्पना करूनच शोध घ्यावा लागतो. जोपर्यंत शोध चालू आहे, तोपर्यंतच   सौख्य आहे. आपण काहीतरी शोधत आहोत, ह्याच सुखामध्ये माणूस हरवतो. प्रत्यक्षात सुख हातांमध्ये आल्यावर ह्यात सुख नव्हत, हे प्रत्ययाला येत. "

वपूर्झा / 179/Surendra /16012025(2)

" संसार असाच असतो "

"   संसार असाच असतो " 

                           000o000

               " संसार असाच असतो. लाकडाचा धूर डोळ्यात जातो म्हणून चूल पेटवायची थांबवायच नसत. जीवनात दरी निर्माण झाली म्हणून आपण खोल खोल जायचं नसत. ती दरी पार करायची असते."

वपूर्झा / 061/Surendra /16012025

सोमवार, १३ जानेवारी, २०२५

" सुचल्यावर जे त्याच्यावर चिंतन करतात, पण कृती करत नाहीत ते सगळे फिलॉसॉफर्स "

"   सुचल्यावर जे त्याच्यावर चिंतन करतात, पण कृती करत नाहीत ते सगळे फिलॉसॉफर्स" 

                         000o000

A).              " सुचण  ही प्रोसेस फार सोपी असते . स्वतःच्या आयुष्यात आपल्याला कोणती सुखं हवीत, कोणते आनंद हवेत ह्याचा शोध घ्यायचा. नेमक तसच सगळ समोरच्याला हवं असत. आपण जितक्या उच्च पातळीवरच्या अपेक्षा करू, देहातील भावनांचा विचार करू, तेव्हढ जास्त इतरांसाठी करू शकू. दुसऱ्याच मन ओळखण सोप. स्वतःचा विचार करतांना क्षणभर दुसऱ्याच मन दत्तक घ्यायचं,की झालं! " हेही कस सुचत?                                            " प्रत्यक्ष कृती केली म्हणजे.  प्रत्यक्ष कृती घडली ह्याची कारण आपण शोधू लागतो. कधी स्वतःच्या समाधानासाठी. इतरांना सुचत नाहीं, अस नाही. ज्यांना नुसतच सुचत ते फक्त आयुष्यभर ' मला हेच म्हणायचं होत ' अस म्हणत राहतात. सुचल्यावर जे त्याच्यावर चिंतन करतात, पण कृती करत नाहीत ते सगळे फिलॉसॉफर्स . आणि जे कृती करतात ते संत." 

B)                " माणूस अपयशाला भीत नाही, अपयशाचं खापर फोडायला काही सापडलं नाही तर ? ह्याची त्याला भीती वाटते."                

वपूर्झा / 254/Surendra /14012025

शनिवार, ११ जानेवारी, २०२५

"प्रत्येक माणसाला आयुष्यभर कुणाचा ना कुणाचा मत्सर वाटत असतो"

" प्रत्येक माणसाला आयुष्यभर कुणाचा ना कुणाचा मत्सर वाटत असतो" 

                           000o000

              संघर्ष न वाढवता नlदाव कसं हे सहज जमत. त्यासाठी खूप अक्कल लागते अस नाही. लागतो तो पेशन्स आणि संघर्षशिवाय जगावं ही तळमळ. मनस्ताप ही अवस्था अटळ. पण आपणच संघर्ष टाळू शकलो तर...... तडा गेलेल्या काचेच्या भांड्याचे दोन्हीं तुकडे जागच्या जागी राहतात. त्यातून पाणी पिता आल नाहीं तरी त्यात फुल ठेवता येतात. प्रत्येक माणसाला आयुष्यभर कुणाचा ना कुणाचा मत्सर वाटत असतो. ज्या सुखाला आपण लायक आहोत ते दुसऱ्या कुणालातरी मिळतंय ह्याचं एक ठसठसणार दुःख तो कायम जवळ बाळगून असतो.        

  वपूर्झा / 255/Surendra /12012025

रविवार, ५ जानेवारी, २०२५

" क्रिएटिव्हिटीचा क्षण एवढाच आनंद "

" क्रिएटिव्हिटीचा क्षण एवढाच आनंद "

                           000o000

                क्रिएटिव्हिटीचा क्षण एवढाच आनंद. क्षणाइतकाच छोटा. कवी, लेखक, नाटककार ह्यांना ज्या क्षणी सुचते, तेव्हा त्यांच्या आयुष्यातला तो तेवढाच क्षण ते जगतात. नंतर ती कल्पना कागदावर उतरवण ही कारकुनी. कंटाळवाणी प्रोसेस. अक्षर ओळख झाल्यापासून लिही - लिही लिहायचं. मग पुढचे क्षण चिंतेचेच. ते छापायला पाठवण... वेळेवर मिळेल का? नीट छापतील का? प्रसिद्ध होईल का? लोकांना आवडेल का? कौतुक करतील का? -- हया सर्व प्रश्नचिन्हात निर्मितीच्या आनंदाचा क्षण कुठं बरबाद झाला, कळत पण नाही.             

वपूर्झा / 070/Surendra /05012025

शनिवार, ४ जानेवारी, २०२५

" शंभरीला सत्कार करायचा, तो वारंवार मरण्याचा कंटाळा आला नाही म्हणून ! "

" शंभरीला सत्कार करायचा, तो वारंवार मरण्याचा कंटाळा आला नाही म्हणून !  "

                           000o000

                ' आपण सगळे किती तेच तेच जगतो ', अस तुम्हाला कधी वाटल नाही?. झोपणं - उठण, तोंड धुण, काहीतरी पिण, दाढी , आंघोळ, प्रातर्विधी, नोकरी.... ह्यात नवीन काय?- शरीराने जगायचं आणि शरीराच्या सेवेसाठीच जगायचं, शरीराला जपायच. मन बोंबलत राहिलं तरी ते मारत राहायचं. एवढंस कुठं कुसळ डोळ्यात गेलं तर डॉक्टर कडे पळायचं. मनात नाना गोष्टी सलतात. तो सल कुणी काढायचा? आपण फार बोअर झालो आहोत. पैसा मिळवणं, साठवण, उडवण - सगळ तेच! कुठेच थ्रिल नाही. अशा वेळेने बांधलेल्या आयुष्यात माणस शंभरी सुध्दा गाठतात. लगेच सत्कार. का? खूप वर्ष मेला नाहीं म्हणून ह्याचा सत्कार. कसा जगला? तर बंधनं पाळत. बंधनं पाळत जगणं म्हणजे सातत्याने प्रत्येक क्षणी मरणचं. शंभरीला सत्कार करायचा, तो वारंवार मरण्याचा कंटाळा आला नाही म्हणून !             

वपूर्झा / 070/Surendra /04012025