शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०२४

" छोट्या प्रश्नांची सामना करचत आपलं आयुष्य संपत. ."

 " छोट्या प्रश्नांची सामना करचत आपलं आयुष्य संपत. ." 

                           000o000

       संबंध आयुष्यभर आपण अशाच निरगाठी-सुरगाठी मारत असतो. ह्याच एकच कारण, आपल्या सर्वांच्यात अर्जुनाचा वावर सातत्याने होत असतो. नोकरीं करणाऱ्या माणसाच्या बाबतीत साधे साधे निर्णय घेतांना अर्जुनापेक्षा वेगळं काय घडतं? प्रमोशन हवं असत, पण बदली नको असते. लिव्ह ट्रॅव्हल अलाऊन्स घेऊन खरोखरचं पर्यटनाला जावं, कीं घरातच एखादी वस्तू खरेदी करावी? धाकदपटशा दाखवून मुलांना शिस्त लावावी कीं गोडीगूलाबीने? तीच गोष्ट, नवऱ्याची सिगारेट सुटायला हवी असेल, तर असहकार पुकारावा, अबोला धरावा, का प्रेमाने जिंकावं? यासारखे कुठलेच प्रश्न असं कीं तसं, याशिवाय सुटत नाहीत. मुलांना धाक हवा. पण त्याने दहशत घेऊन लांब जाऊ नये, नवरा चांगला आहे,पण त्याच व्यसन नकोय. अशा छोट्या छोट्या प्रश्नांची सामना करचत आपलं आयुष्य संपत.

वपूर्झा /177 /Surendra /29112024


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा