" विचार शृंखला:113:05112025 "
113) " आपण सगळे किती तेच-तेच जगतो, असं तुम्हाला कधी वाटलं नाही? झोपणं-उठणं, तोंड धुणं, काहीतरी पिणं, दाढी, आंघोळ, प्रातरविधी, नोकरीं.... झालं ह्यात नवीन काय? शरीराने जगायचं आणि शरीराच्या सेवेसाठीच जगायचं, शरीराला जपायचं. मन बोबलत राहयलं तरी ते मारत राहायचं. एवढसं कुठं कुसळ गेलं तर डॉक्टर कडे पळायचं. मनात नाना गोष्टी सलतात. तो सल कुणी काढायचा? आपण फार बोअर झालो आहोत. पैसा मिळवणे, साठवण-उडवणं- सगळं तेच! कुठेच थ्रील नाही. अशा वेळेने बांधलेल्या आयुष्यात माणसं शंभरी सुद्धा गाठतात. लगेच सत्कार. का? खूप वर्ष मेला नाही म्हणून ह्यचा सत्कार. कसा जगला? तर बंधन पाळत. बंधन पाळत जगणं म्हणजे सातत्याने प्रत्येक क्षणी मरणंच. शंभरीला सत्कार करायचा, तो वारंवार मरण्याचा कंटाळा आला नाही म्हणून! "
वपूर्झा/सुरेंद्र/05112025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा