विचार शृंखला :110 : 02112025
110) अधिकाराच्या जोरावर आपण जेव्हा दुसऱ्या माणसाला गप्प करण्याचा प्रयत्न करतो त्यामागे अधिकाराच्या भावनेपेक्षा भीतीची भावना मोठी असतेच. पण कदाचित निरुत्तर होऊ याची दहशत असते. ह्याचाच अर्थ सत्याची आपल्याला भीती वाटते. विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाला आपल्याकडे उत्तर नाही हे सत्य! त्या सत्याला आपण घाबरतो आणि मग बाजू लंगडी पडायला नको म्हणून, दुसऱ्या गोष्टीचा आधार घेऊन आपण समोरच्या माणसाचं तोंड गप्प करतो. हा मार्ग नेहमीच फसवणारा असतो. वंचना, आत्मवंचना म्हणतात ती ह्यालाच. ह्यामुळे दोन माणसं घायाळ होतात. दंडपशाहीमुळे बोलू न शकणारा आणि खुद्द दंडपशाही करणारासुद्धा. एक घायाळ झाल्याचं इतरत्र दाखवीत सुटतो, दुसरा दाखवत नाही एव्हडाच फरक. पण त्यात गंमत अशी की, जो उघडपणे दर्शवीत नाही तो कायम आतल्या आत धास्तावलेला असतो. "
वपूर्झा/सुरेंद्र/02112025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा