" प्रत्येक पती/पत्नीने संसाराच्या यशासाठी समजणे आवश्यक"
000o000
" अक्षता ह्या शब्दातल प्रत्येक अक्षर महत्वाचं आहे. अ = अर्पणभाव, क्ष = क्षमाशीलता, ता = तारतम्य . हे गुण दोघांजवळ हवेत. एकमेकांसाठी आपण कोणत्या गोष्टींना, किती प्रमाणात मुरड घालू शकणार आहोत, त्याचा शोध घ्यावा. संघर्षाच्या जागा हेरून ठेवाव्यात. मुरड घालणं हा सहजधर्म व्हायला हवा. कात टाकली की साप तिकडे वळूनही बघत नाही. इतक्या सहजतेने आपण एकमेकांसाठी काय टाकू शकतो त्याचं संशोधनाचं करायला हवं. एकमेकांना टाकण्यापेक्षा, एकमेकांसाठी काही ना काही टाकणं ह्यालाच अर्पणभाव म्हणतात. स्वतःतल्या उणिवांची खरी जाणीव झाली आहे. दोष समजले आहेत. कमकुवतपणाच्या जागा समजल्या आहेत. पण प्रामाणिक प्रयत्न करूनही आपल्या जोडीदाराचे वृतिदोष जात नाहीत समजल्यावर तिकडे दुर्लक्ष करायची शक्ती म्हणजे क्षमाशीलता. तरतमभाव न बाळगता घ्यायचं कसं आणि लडिवाळ हट्ट करून वसूल कधी करायचं, वाकायचं कधी आणि कधी वाजवायला लावायचं , स्थळ, काळ, स्थिती ह्याच भान म्हणजे तारतम्य."
वपुर्झा /126/Surendra /15032025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा