" मैत्रीचा प्रत्येक टप्पा हा व्यक्तिमत्वाचा नवा उत्कृषबिंदू ठरावा,"
000o000
" निखळ मैत्रीतली एक विलक्षण ताकद जर कोणती असेत तर त्यातली सहजता. त्या सहजते मधून सुरक्षितपणाची साय आपोआप धरते. साय दूधातूनच तयार होते आणि दुधावर छत धरते. साय म्हणजे गुलामी नव्हें. सावीखालच्या दुधाला साईचे दडपण वाटत नाही. मैत्री तशी असावी. दुधापेक्षा स्निग्ध. सायीची नंतरची सगळी स्थित्यंतर : म्हणजे दही, ताक, लोणी, तूप - ही जास्त जास्त पौष्टिकच असतात. तसं मैत्रीच घडाव. मैत्रीचा प्रत्येक टप्पा हा व्यक्तिमत्वाचा नवा उत्कृषबिंदू ठरावा. ज्यांच्या मैत्रीमुळे प्रगती खुंटते ती मैत्री संपण्याच्याच लायकीची असते. ह्याच दृष्टिकोनातून ज्या ज्या संसारात पतिपत्नीचं नातं मैत्रीसारखं राहील ते ते संसार टिकले. संसारात रुसवे _ फुगवे हवेत. चेष्टा - मस्करी हवी. जोडीदाराच्या व्यसंगात साथ हवी त्याप्रमाणे हक्काने ' आता तुमच्या एकूण एक गोष्टी माझ्यासाठी दूर ठेवा ' अस अतिक्रमण पण हवं. केवळ स्वतःच स्वास्थ आणि ऐषोराम जोपासण्यासाठी जोडीदाराला गुलाम करायचं नसतं.
वपुर्झा /110/Surendra /02032025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा