" क्रियाशून्य माणसं खूपदा इतरांचं कर्तृत्व अमान्य करतात."
000o000
" शंभरपैकी नव्याणव कुटुंबातून ह्याचं कहाण्या घडतात. म्हणूनच सगळी सुबत्ता असून, नजर लागेल अशी परिस्थिती असूनही माणसं चिंतेत असतात. " " घरात, संसारात येणाऱ्या नव्या व्यक्तीकडे, म्हणजेच सुनेकडे बघतांना सून किंवा बायको किंवा वहिनी म्हणा, भावजय म्हणा - जे नातं असेल ते - प्रत्येकजण एक इमेज तयार करतो. ती इमेज तयार करतांना त्या मुलीच्या वागणुकीचा, हावभावांचा, एखाद्या कॅमेऱ्यासारखा फोटो घेतला जातो. तिच्या अंतर्मनाचा शोध घेऊन कोणत्याही कृतिमागची संवेदना कुणीही जाणून घेत नाही. प्रत्येकाचं स्वतःने तयार केलेल्या इमेजवर प्रेम बसत. त्या प्रेमापाई, प्रत्यक्षात वावरणारी व्यक्ती उध्वस्त झाली तरी फिकीर नाही, पण स्वतः तयार केलेली चुकीची प्रतिमा अभंग राहील अशी धडपड कुटुंबातली माणसं करतात. कारण त्यांनी निर्माण केलेली प्रतिमा खोटी निघाली तर त्यांच्या स्वतःच्या भूमिकेला तडे जातील, ते स्वतः उध्वस्त होतील अशी त्यांना भीती वाटते. ही अशी माणसं भ्याड असतात. क्रियाशून्य असतात. क्रियाशून्य माणसं खूपदा इतरांचं कर्तृत्व अमान्य करतात. अशी माणसं कळप करून जगतात आणि सतत कार्यरत असणारा माणूस ' चुकतो कधी?' - ह्याची वाट पाहतात. दुर्दैवाने जर अशी कर्तृत्वशून्य साथ आणि आळसापायी आयुष्य, तारुण्य वाया घालवणारी संतती वाट्याला आली तर एखाद्या बाणेदार स्त्रीने काय करावं? अशा नादान माणसांसाठी तिला आयुष्यभर खपावं लागतं. तशी ती राब राब राबते. पण ते करतांना तिला प्रक्षोभ आवरता येत नाही. ती वाक्ताडन करते आणि श्रेय गमावते."
वपुर्झा /154/Surendra /21042025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा