सोमवार, १४ एप्रिल, २०२५

" हीं माणसं त्यांच्या भावनांना बुद्धीनिष्ठेने कवटाळतात."

" हीं माणसं त्यांच्या भावनांना बुद्धीनिष्ठेने कवटाळतात."

                           000o000

                "     सर्वात टॅलेंटेड माणसं त्या मानाने पटकन फसतात. अतिबुढीवादी म्हणून ती अगोदरच एकटी पडलेली असतात. भावनात्मक पातळीवरचा आक्रोश त्यांनी सतत दाबलेला असतो. हीं माणसं त्यांच्या भावनांना बुद्धीनिष्ठेने कवटाळतात. They are intellectually attached to their sentiments. त्यामुळे त्यांना तृप्त व्हायला जसा वेळ लागतो तसाच त्या विश्वातून बाहेर पडायलाही विलक्षण प्रयास पडतो. दीर्घ काळ त्या भावनांचा इन्कार करत आल्याने ती जेव्हा त्या मागण्यांना वश होतात तेव्हा सामान्यांपेक्षा जास्त वेगाने वश होतात. पुन्हा पुन्हा फसतात, पुन्हा झगडा देतात. बुद्धीला खाद्य, बुद्धीला खाद्य असं कितीही मान्य केलं तरी त्याचा जबर थकवा असतो. तो थकवा घालवण्याची हाकाटी सुरु होते. तसं झालं कीं बुद्धी हेच ज्यांचं भांडवल अशी माणसं भांडवलशाही झुगारून देतात आणि बुद्धीला नं पटणाऱ्या गोष्टीच अधूनमधून करतात. सिगारेटपासून नाना प्रकारची व्यसन कमी न होता वाढतात का? तर त्याचं कारण हेच. मग सामान्य माणसं ह्याच असामान्य माणसाच्या सामान्य गोष्टींच अनुकरण करतात. उंची गाठणं ताकदीबाहेर. खोल जाण्यासाठी ताकद वापरावी लागत नाही. ग्रेव्हीटेशनल फोर्स ह्याही प्रांतात उपयोगी पडतो " 

वपुर्झा /152/Surendra /14042025

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा