गुरुवार, २७ जानेवारी, २०२२

वांमला ऑटी/हातवळणे

जीवन जगण्याचे काही सुंदर तत्व

1..भुंकणारे कुत्रे कधी चावत नाही!!
2..एक निंदक घरात असावा!!
3..किड्यामुंग्या सारखे जगू नका!!
4..पडेल ते काम करा!!
5..कोणतेही ही काम लहान किंवा मोठे नसते..
6..हसतील त्यांचे दात दिसतील!!
7..खरं बोलायला कधीच घाबरु नका!!
अन् खोटं बोलण्याने कोणाचं भल होणार असेल तर वेळप्रसंगी जरूर खोटं बोला!!
8..अशक्य असे काहीच नाही!!
9..चालायला लागेल तर दोनच गोष्टी घडत असतात
एक तर वाट चुकते किंवा थेट नेऊन सोडते!!
अन् वाट चुकली की काही तरी कानाला खडे लावणारं शिकवुन जाते!!
10..जे पेराल तेच उगवेल
11..आळशी माणसाचा नादी लागत बसु नका!!
12..बोलुन तोंड खराब करू नका!!
13..पण जर एखादा उलट्या डोक्याचा माणूस असेल तर जमतील तितके बोल लावा!!
14..कुणापुढे हात पसरू नका , वेळ प्रसंगी उपाशी रहा, पण भीक मागुन खाऊ नका!!
15..लाथ माराल तिथे पाणी काढण्याचे सामर्थ्य स्वतः मध्ये तयार करा!!
16..तुमचा शिल्पकार कोणी बाहेरून येणार नाही
तुम्हालाच तुमचा शिल्पकार बनवा लागेल!!
17..चरित्र हा सगळ्यांत मोठा दागिना आहे, कुणी त्याच्यावर डाग लावायला गेला, तर त्यांचे त्याला असे काही खणखणीत उत्तर द्या! की पुढच्या वेळी तुमच्याकडे डोळे वर करून पाहण्याची हिंमत झाली नाही पाहिजे !!
18..जर कोणी तुमच्यावर विश्वास ठेवत नसेल तर त्यानें तुमच्यावर विश्वास ठेवावा म्हणून त्याचे पाय धरायला जाऊ नका!!
एक लक्षात घ्या जर तुम्ही सच्चे असाल तर ते सिध्द करावे लागणार नाही असे नाही पण ते सिध्द करण्यासाठी तुमचा स्वाभिमान गहाण टाकण्याची गरज नाही..
19.. सोबत काही आणले नाही अन् सोबत काही नेणारं नाही, त्यामुळे उगाच मोह करत बसु नका!!
20.. अन्न हे पूर्णब्रह्म आहे.. ताटात पडेल ते आवडीने खा!!
21.. तुमचं हक्काचं असे या भूमीवर काहीच नाही. सगळ मातीतून आले आहे अन् मातीत जाणार आहे..
22.. एकच करा माणसाला माणूस जोडत जा!!
23.. वाईट मार्गाने पैसा कमवू नका, कारण वाईटाला हजार पळवाटा!!
24.. जे हक्काचे आहे ते सोडू नका अन् जे तुमचे नाही त्यावर हक्क गाजवायला जाऊ नका!!
25.. अन्न,वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा आहेत.. बाकी सगळे शौक!!
26.. माझे माझे अन् मातीत जा जे!!
27.. ओझे बननण्या पेक्षा आधार बना!!
28.. स्वाभिमान अन् अभिमान ही दोन्ही तत्वे वेगळी आहे..
29.. लोकांस सांगे ब्रम्हज्ञान अन् स्वतः मात्र कोरडे पाषाण असे बनू नका!!
30.. एक नाते जोडल्याने जर हजार नाती तुटणार असतील तर त्या एका नात्याला विश्वासात घेऊन त्या नात्यापासून लांब जाण्याचा निर्णय घ्या!!
अन् एक नाते जोडल्याने हजार नाती आनंदाने भरून पावणार असतील तर ते नाते हसत हसत स्वीकारा कधी ना कधी त्या नात्याचा देखील तुम्ही प्रेमात पडाला...

आयुष्य खुप खुप सुंदर आहे...
त्याचा आनंद घ्या!!
तुमच्यामुळे जर हजार लोकं जरी हसले तरी तुमच्या जन्माचे सार्थक झाले असे म्हणता येईल...

!!वनमाला औटी/ हतवळणे!!
जय श्री स्वामी समर्थ महाराज..
🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा